Tuesday, July 24, 2018

सुधा नरवणे यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली


मुंबईदि24आकाशवाणीच्या प्रसिद्ध निवेदिका आणि लेखिका सुधा नरवणे यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या भावविश्वात एक अनोखे स्थान असणारा आवाज हरपला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्रीमती नरवणे  आपल्या वैशिष्ट्यपूर्ण निवेदनशैलीसाठी प्रसिद्ध होत्या. भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. याबरोबरच त्यांचे साहित्यातील योगदानही लक्षणीय होते. विशेषतः त्यांच्या लघुकथा या वाचकप्रिय होत्या. त्यांच्या निधनाने आकाशवाणीला सर्वसामान्यांशी जोडणारा एक दुवा निखळला आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...