Wednesday, June 17, 2026

DIO NEWS AMRAVATI 17.06.2026

 अमरावती जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज 'ड्राय डे'; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

अमरावती, दि. 17 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या विधान परिषदेची द्विवार्षिक निवडणूक घोषित केली आहे. या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदेश जारी केले असून, त्यानुसार संपूर्ण जिल्ह्यात 'कोरडा दिवस' पाळण्यात येणार आहे.या आदेशानुसार, उद्या गुरुवार, 18 जून 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत म्हणजेच मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमरावती जिल्ह्यातील सर्व ठोक आणि किरकोळ मद्यविक्रीची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पूर्वी जारी करण्यात आलेल्या आदेशांमध्ये अंशतः बदल करून प्रशासनाने हा सुधारित निर्णय घेतला आहे. संबंधित सर्व अबकारी अनुज्ञप्तीधारकांनी या आदेशाची काटेकोरपणे नोंद घ्यावी, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. या शासकीय आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा अंमलबजावणीत कुचराई करणाऱ्या मद्यविक्रेत्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नियम मोडणाऱ्यांवर 'महाराष्ट्र दारूबंदी कायद्या’न्वये कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केले आहे.

000000

नशा मुक्त सप्ताहाला आजपासून सुरवात; ऑनलाईन शपथ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 17 (जिमाका): देशातील अमली पदार्थांची मागणी कमी करण्यासाठी भारत सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नोडल विभाग म्हणून काम पाहत आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यात 'नशा मुक्त भारत अभियाना’ला आज 17 जूनपासून सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आगामी 26 जून रोजी साजरा होणाऱ्या 'आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिना'चे औचित्य साधून जिल्ह्यात ‘नशा मुक्त भारत अभियान, विकसित भारत की पहचान’ या संकल्पनेवर आधारित विशेष 'नशा मुक्त सप्ताह' आयोजित करण्यात आला आहे.

समाज कल्याण विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शासकीय वसतिगृहे, व्यसनमुक्ती केंद्रे, प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वसामान्य जनतेला या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत नागरिकांनी अमली पदार्थ मुक्तीचा संकल्प करावा आणि केंद्र सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://nmba.dosje.gov.in/content/take-a-pledge) जाऊन ऑनलाईन पद्धतीने तसेच विविध स्थानिक कार्यक्रमांचे आयोजन करून ऑफलाईन पद्धतीनेही नशामुक्तीची सामुहिक शपथ घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

00000000

अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक:

मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

अमरावती, दि. 17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या (महाराष्ट्र विधानपरिषदेची द्विवार्षिक निवडणूक) प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया उद्या, दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली असून, आज सर्व मतदान पथके पोलीस बंदोबस्तात साहित्यासह केंद्रांवर रवाना झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आहेत. या निवडणुकीत शांततेत व सुरळीतपणे मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

या निवडणुकीत एकूण 3 उमेदवार रिंगणात असून, प्रत्यक्ष मतदान पसंतीक्रम पद्धतीने होणार आहे. यामध्ये मतदारांना उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रम देण्याची मुभा असेल. या मतदारसंघांत एकूण 451 मतदार असून, यामध्ये 226 महिला व 225 पुरुष मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे सदस्य या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाकरिता उपविभाग स्तरावर एकूण 7 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

यामध्ये धारणी मतदान केंद्रावर 42 मतदार (20 पुरुष, 22 स्त्री), अचलपूर केंद्रावर 69 मतदार (33 पुरुष, 36 स्त्री), मोर्शी केंद्रावर 81 मतदार (43 पुरुष, 38 स्त्री), दर्यापूर केंद्रावर 60 मतदार (30 पुरुष, 30 स्त्री), तिवसा-भातकुली केंद्रावर 38 मतदार (18 पुरुष, 20 स्त्री), अमरावती केंद्रावर 95 मतदार (48 पुरुष, 47 स्त्री) आणि चांदूर रेल्वे मतदान केंद्रावर 66 मतदार (33 पुरुष, 33 स्त्री) आपले मत नोंदवतील. ही केंद्रे अनुक्रमे तहसील कार्यालय धारणी, उपविभागीय अधिकारी कार्यालय अचलपूर, तहसील कार्यालय मोर्शी, तहसील कार्यालय दर्यापूर, उपविभागीय अधिकारी तिवसा-भातकुली कार्यालय कॅम्प रोड अमरावती, 7/12 संगणकीकरण कक्ष, अमरावती तहसील कार्यालय आणि तहसील कार्यालय, चांदूर रेल्वे येथे स्थापन करण्यात आली आहेत.

सातही मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक व शिपाई असे एकूण 42 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांच्या स्तरावरून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी हे झोनल अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. आज सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथून सर्व पथके रवाना झाली. मतदानासाठी आयोगाचे मतदान कार्ड किंवा प्राधिकरणाने दिलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मतदारांची ओळख पटवण्यासाठी नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी आणि महानगरपालिका क्षेत्रात मनपाचे सहाय्यक आयुक्त मतदान केंद्रावर उपस्थित राहतील.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच केंद्राच्या आत मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त बंदी आहे. पावसाची शक्यता गृहीत धरून सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विशेष छत्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाचा दिवस हा कामकाजाचा दिवस असल्याने सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत केंद्र परिसर आणि 100 मीटरच्या बाहेर नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी तैनात राहतील. उद्या, 18 जून रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्व मतपेट्या चोख सुरक्षेत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सुरक्षा कक्षामध्ये ठेवल्या जातील. त्यानंतर सोमवार, दिनांक 22 जून 2026 रोजी नियोजन भवन येथेच मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

0000000

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह  यांना अभिवादन

            अमरावती, दि. 17 (जिमाका) : महान योद्धा मेवाडचे क्रांतीसूर्य राजे महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनीही राजे महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000000

सुधारीत वृत्त

अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक:

मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण

        अमरावती, दि. 17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या (महाराष्ट्र विधानपरिषदेची द्विवार्षिक निवडणूक) प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया उद्या, दिनांक 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार आहे. जिल्हा प्रशासनाने मतदानाची सर्व तयारी पूर्ण केली असून, आज सर्व मतदान पथके पोलीस बंदोबस्तात साहित्यासह केंद्रांवर रवाना झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे आहेत. या निवडणुकीत शांततेत व सुरळीतपणे मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

         या निवडणुकीत एकूण 3 उमेदवार रिंगणात असून, प्रत्यक्ष मतदान पसंतीक्रम पद्धतीने होणार आहे. यामध्ये मतदारांना उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रम देण्याची मुभा असेल. या मतदारसंघांत एकूण 451 मतदार असून, यामध्ये 226 महिला व 225 पुरुष मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकेचे सदस्य या निवडणुकीत मतदान करतात. मतदानाकरिता उपविभाग स्तरावर एकूण 7 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

       यामध्ये धारणी मतदान केंद्रावर 42 मतदार (20 पुरुष, 22 स्त्री), अचलपूर केंद्रावर 69 मतदार (33 पुरुष, 36 स्त्री), मोर्शी केंद्रावर 81 मतदार (43 पुरुष, 38 स्त्री), दर्यापूर केंद्रावर 60 मतदार (30 पुरुष, 30 स्त्री), तिवसा-भातकुली केंद्रावर 38 मतदार (18 पुरुष, 20 स्त्री), अमरावती केंद्रावर 95 मतदार (48 पुरुष, 47 स्त्री) आणि चांदूर रेल्वे मतदान केंद्रावर 66 मतदार (33 पुरुष, 33 स्त्री) आपले मत नोंदवतील. ही केंद्रे अनुक्रमे तहसील कार्यालय धारणी, उपविभागीय अधिकारी कार्यालय अचलपूर, तहसील कार्यालय मोर्शी, तहसील कार्यालय दर्यापूर, उपविभागीय अधिकारी तिवसा-भातकुली कार्यालय कॅम्प रोड अमरावती, 7/12 संगणकीकरण कक्ष, अमरावती तहसील कार्यालय आणि तहसील कार्यालय, चांदूर रेल्वे येथे स्थापन करण्यात आली आहेत.

        सातही मतदान केंद्रांवर प्रक्रिया पार पाडण्यासाठी केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सूक्ष्म निरीक्षक व शिपाई असे एकूण 42 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांच्या स्तरावरून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी हे झोनल अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत. आज सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथून सर्व पथके रवाना झाली. मतदानासाठी आयोगाचे मतदान कार्ड किंवा प्राधिकरणाने दिलेले ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मतदारांची ओळख पटवण्यासाठी नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी आणि महानगरपालिका क्षेत्रात मनपाचे सहाय्यक आयुक्त मतदान केंद्रावर उपस्थित राहतील.

        जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच केंद्राच्या आत मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास सक्त बंदी आहे. पावसाची शक्यता गृहीत धरून सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी विशेष छत्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानाचा दिवस हा कामकाजाचा दिवस असल्याने सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत केंद्र परिसर आणि 100 मीटरच्या बाहेर नागरिकांच्या सोयीसाठी संबंधित अधिकारी व कर्मचारी तैनात राहतील. उद्या, 18 जून रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्व मतपेट्या चोख सुरक्षेत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथील सुरक्षा कक्षामध्ये ठेवल्या जातील. त्यानंतर सोमवार, दिनांक 22 जून 2026 रोजी नियोजन भवन येथेच मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

0000000

Tuesday, June 16, 2026

परवडणारी आरोग्यसेवा आता पूर्वीपेक्षा अधिक कुटुंबांपर्यंत पोहोचत आहे. AB-PMJAY योजनेच्या विस्तारांतर्गत ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झाली आहे, १९ हजारांहून अधिक जनऔषधी केंद्रे कार्यरत आहेत आणि अनुदानित औषधांमुळे नागरिकांची ₹ ४०,००० कोटींपेक्षा अधिक बचत झाली आहे.


परवडणारी आरोग्यसेवा आता पूर्वीपेक्षा अधिक कुटुंबांपर्यंत पोहोचत आहे. AB-PMJAY योजनेच्या विस्तारांतर्गत ६ कोटी ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झाली आहे, १९ हजारांहून अधिक जनऔषधी केंद्रे कार्यरत आहेत आणि अनुदानित औषधांमुळे नागरिकांची ₹ ४०,००० कोटींपेक्षा अधिक बचत झाली आहे. Affordable healthcare is reaching more households than ever before, with 6 crore senior citizens enrolled under the AB-PMJAY expansion, over 19,000 Jan Aushadhi Kendras operational and savings of more than ₹40,000 crore through subsidised medicines. #12YearsOfSakshamMiddleClass

 

गेल्या १२ वर्षांत भारताने आधारद्वारे जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ओळख प्रणाली, UPI द्वारे जगातील सर्वात मोठी रिअल-टाईम डिजिटल पेमेंट व्यवस्था आणि AB-PMJAY द्वारे जगातील सर्वात मोठी सरकारी निधीतून चालणारी आरोग्य हमी योजना उभारली आहे. . .


गेल्या १२ वर्षांत भारताने आधारद्वारे जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ओळख प्रणाली, UPI द्वारे जगातील सर्वात मोठी रिअल-टाईम डिजिटल पेमेंट व्यवस्था आणि AB-PMJAY द्वारे जगातील सर्वात मोठी सरकारी निधीतून चालणारी आरोग्य हमी योजना उभारली आहे. . . Over the last 12 years, India has built the world's largest biometric identity system through Aadhaar, the world's largest real-time payment ecosystem through UPI and the world's largest government-funded health assurance scheme through AB-PMJAY. #12YearsOfSakshamMiddleClass #UIDAI #ADHAR #UPI #AyushmanBharat

 

आता १० कोटींहून अधिक वापरकर्ते UMANG ॲपद्वारे २४० पेक्षा अधिक विभागांच्या दोन हजार ४४६ सेवांचा लाभ घेत आहेत, ज्यामुळे अभूतपूर्व प्रमाणावर शासनाच्या सेवा एका एकात्मिक डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध झाल्या आहेत. .


 आता १० कोटींहून अधिक वापरकर्ते UMANG ॲपद्वारे २४० पेक्षा अधिक विभागांच्या दोन हजार ४४६ सेवांचा लाभ घेत आहेत, ज्यामुळे अभूतपूर्व प्रमाणावर शासनाच्या सेवा एका एकात्मिक डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध झाल्या आहेत.

. . More than 10 crore users now access 2,446 services across 240+ departments through the UMANG app, bringing governance onto a single digital platform at an unprecedented scale. #12YearsOfSakshamMiddleClass #UMANGapp #Digitalindia

DIO NEWS AMRAVATI 16.06.2026

 चांदुररेल्वे येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात

विद्यार्थिनींसाठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू

*इयत्ता 7 वी उत्तीर्ण झालेल्या व 8 वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जूनपर्यंत

* कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत

अमरावती, दि. 16 (जिमाका): चांदूर रेल्वे येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींसाठी विनामूल्य प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

चांदूर रेल्वे बस डेपोच्या मागील परिसरात असलेल्या या शासकीय वसतिगृहात इयत्ता 8 वी पासून ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींसाठी निवास, भोजन आणि अभ्यासिकेची उत्तम सोय पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिली जाते. या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात झाली असून, इयत्ता 7 वी उत्तीर्ण झालेल्या व 8 वीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 जून 2026 पर्यंत आहे.

 तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी 15 जुलै 2026 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थिनींनी प्रवेशासाठी https://hmasnew.mahait.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपले ऑनलाईन अर्ज मुदतीपूर्वी सादर करावेत. ग्रामीण व गरजू भागातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या शासकीय योजनेचा आणि मोफत सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाचे गृहपाल यांनी केले आहे.

00000000

‘पीएलएफएस’ आणि ‘अेएसयूएसई’ सर्वेक्षण ;

नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

            अमरावती, दि. 16 (जिमाका) : अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात 'नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण' आणि 'असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण' एप्रिल 2026 ते मार्च 2027 या कालावधीत राबविले जाणार आहे. या राष्ट्रीय कार्यात विभागातील नागरिकांनी सर्वेक्षणासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची आखणी करण्यासाठी ही सर्वेक्षणे अत्यंत मोलाची ठरणार आहेत. या सर्वेक्षणांमध्ये नियतकालिक श्रम शक्ती सर्वेक्षण अंतर्गत निवडक कुटुंबांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे श्रम बाजाराचे महत्त्वाचे निर्देशांक तयार केले जातील. यामध्ये प्रामुख्याने श्रम शक्ती सहभाग दर, कामगार-लोकसंख्या गुणोत्तर, बेरोजगारी द या घटकांची अचूक आकडेवारी संकलित केली जाईल, ज्यामुळे भविष्यातील रोजगार धोरणांना दिशा मिळेल.

असंघटीत क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण अंतर्गत राज्यातील उत्पादन, व्यापार आणि इतर सेवा क्षेत्रातील असंघटीत व बिगर-कृषि आस्थापनांच्या आर्थिक आणि कार्यात्मक वैशिष्ट्यांची आकडेवारी गोळा केली जाणार आहे. यामुळे असंघटीत क्षेत्रातील उद्योगांच्या विकासासाठी योजना आखणे सोपे होईल.

या सर्वेक्षणांची माहिती गोळा करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयांतर्गत 'Ipsos Research Private Limited' या नामांकित संस्थेची शासनाने निवड केली आहे. या संस्थेमार्फत नियुक्त केलेले अन्वेषक आणि पर्यवेक्षक केवळ 'नमुना पद्धतीने' निवडलेल्या ग्रामीण भागातील गावांना आणि शहरातील विशिष्ट वॉर्डांमधील कुटुंबांना व आस्थापनांना प्रत्यक्ष भेट देऊन विहित प्रपत्रात माहिती गोळा करणार आहेत.

            या सर्वेक्षणा अंतर्गत कुटुंब प्रमुख आणि उद्योग,आस्थापना प्रमुख यांच्या उपलब्धतेसाठी नियुक्त कर्मचारी रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशीही भेटी देऊ शकतात. सर्वेक्षणादरम्यान नागरिकांकडून किंवा उद्योगांकडून मिळालेली वैयक्तिक व व्यावसायिक माहिती पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. त्याचा वापर केवळ सांख्यिकी उद्देशांसाठी आणि शासकीय योजनांच्या नियोजनासाठीच केला जाईल. असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

00000000

शासकीय आय.टी.आय. गुरुकुंज मोझरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू;

10 वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगाराची सुवर्णसंधी

अमरावती, दि. 16 (जिमाका):  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.), गुरुकुंज मोझरी (ता. तिवसा, जि. अमरावती) येथे सत्र ऑगस्ट 2026 करिता अधिकृत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. औद्योगिक क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेता, कौशल्याधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवण्याची ही एक उत्तम संधी आहे. या शैक्षणिक सत्रासाठी संस्थेत एकूण 368 जागा उपलब्ध असून, 10 वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख अशा लोकप्रिय कोर्सेसचा यात समावेश आहे.

संस्थेमध्ये 1 वर्षाच्या कोर्सेस अंतर्गत वुड वर्क टेक्नॉलॉजी, कोपा, मेकॅनिक डिझेल, वेल्डर, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी आणि सोलर टेक्निशियन हे कोर्सेस उपलब्ध आहेत. तर 2 वर्षांच्या कोर्सेसमध्ये इलेक्ट्रीशियन, वायरमन, मेकॅनिक मोटर व्हेहिकल, मशिनिस्ट, फिटर, आय.सी.टी.एस.एम. आणि ड्राफ्ट्समन मेकॅनिक यांसारख्या ट्रेडचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेत सुसज्ज संगणक कक्ष, मोफत इंटरनेट, वाचनालय, वसतिगृह, कॅन्टीन, शुद्ध पिण्याचे पाणी आणि ओपन ग्रीन जिम या अद्ययावत सुविधा उपलब्ध आहेत.

केवळ सैद्धांतिक शिक्षणच नव्हे तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासाठी येथे कॅम्पस ड्राईव्ह, ऑन द जॉब ट्रेनिंग आणि इंडस्ट्रियल व्हिजिट याद्वारे नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या उत्तम संधी मिळवून दिल्या जातात. याशिवाय संस्थेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना प्रभावीपणे राबविली जात आहे तरी इच्छुकांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी आय.टी.आय. मोझरी येथे थेट किंवा 07225-224237 या क्रमांकावर संपर्क साधावा.

00000000

Monday, June 15, 2026

DIO NEWS AMRAVATI 15.06.2026

 

एकल महिला धोरणासाठी १७ जून रोजी जिल्हास्तरीय बैठक;

ठोस उपाययोजनांसह प्रस्ताव सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

अमरावती, दि १५ (जिमाका) : महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच इतर एकल महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी एक स्वतंत्र आणि व्यापक ‘एकल महिला धोरण’ तयार करण्यात येत असून, हे धोरण अधिक परिणामकारक आणि लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने बुधवार, दिनांक १७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा परिषद अमरावतीच्या पंजाबराव देशमुख सभागृहात जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीमध्ये एकल महिलांचे प्रश्न केवळ मांडण्याऐवजी त्यावर ठोस मार्ग काढण्याच्या उद्देशाने चर्चा केली जाणार असून, जिल्ह्यातील एकल महिला, नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि विषयतज्ज्ञांना या धोरण निर्मिती प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे.

 

या धोरणाचा मसुदा तयार करताना केवळ त्रोटक स्वरूपातील मते किंवा समस्या मांडण्याऐवजी, त्या समस्यांवर शासनाने नेमक्या कोणत्या ठोस उपाययोजना कराव्यात, कोणती नवीन योजना सुरू करावी, विद्यमान योजनांमध्ये काय बदल करावेत आणि आवश्यकतेनुसार कोणत्या कायद्यांमध्ये किंवा नियमांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, याविषयी सविस्तर आणि अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे. नागरिकांनी पाठवणाऱ्या या प्रस्तावामध्ये संबंधित विषयाची पार्श्वभूमी, अपेक्षित उपाययोजना, संभाव्य लाभार्थी आणि त्याचे अपेक्षित परिणाम या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश असावा.

 

ज्या नागरिकांना किंवा संस्थांना बैठकीव्यतिरिक्त आपले अभिप्राय थेट प्रशासनापर्यंत पोहोचवायचे आहेत, त्यांच्यासाठी प्रशासनाने  ८२०८५८१९१५  हा अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर केला असून, प्राप्त होणाऱ्या सर्व नाविन्यपूर्ण सूचना व अभिप्रायांचा 'एकल महिला धोरणाचा' मसुदा तयार करताना योग्य तो विचार केला जाईल, तरी अमरावती जिल्ह्यातील सर्व संबंधित घटकांनी या महत्त्वपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

 

 


 अमरावतीच्या कुमकुम मोहोडचा जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत सुवर्णवेध; मिक्स्ड टीम प्रकारात भारताला ऐतिहासिक सुवर्णपदक

 

अमरावती, दि १५ (जिमाका) :  तुर्की येथील अंतालिया येथे ९ ते १४ जून २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘आर्चरी वर्ल्ड कप स्टेज-३’ (धनुर्विद्या विश्वचषक) स्पर्धेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. अमरावतीच्या खेलो इंडिया केंद्राची प्रशिक्षणार्थी कुमकुम मोहोड हिने भारतीय संघातील धीरज बोम्मादेवरा राय याच्यासह मिक्स्ड टीम (मिश्र संघ) प्रकारात अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाचा ५-१ अशा सेट फरकाने पराभव करून भारताला हे ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून दिले आहे.

 

अमरावती येथील खेलो इंडिया धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्रात मागील आठ वर्षांपासून राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करणाऱ्या कुमकुमच्या या सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय यशामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव वाढला आहे. तसेच यापूर्वीही चीन येथे झालेल्या आर्चरी वर्ल्ड कप स्टेज-२ स्पर्धेत तिने भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. कुमकुमच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी तिचे विशेष अभिनंदन केले आहे.  

 

उपसंचालक तथा जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रमोद चांदुरकर आणि अध्यक्ष अॅड. श्री. प्रशांत देशपांडे यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. कुमकुमची सध्याची प्रगती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातत्य पाहता ती आगामी स्पर्धांमध्येही भारताला आणखी पदके मिळवून देईल, असा विश्वास तिचे प्रशिक्षक प्रफुल डांगे यांनी व्यक्त केला असून कुमकुम आता जुलै २०२६ मध्ये स्पेन येथे होणाऱ्या 'वर्ल्ड कप स्टेज-४' आणि जपान येथे होणाऱ्या '२० व्या आशियाई क्रीडा' स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

00000

 

निरोगी वृद्धत्वासाठी योग; २१ जूनला अमरावतीकर

एकत्र येऊन साजरा करणार योग दिन

 

अमरावती, दि १५ (जिमाका) : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या वतीने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी 'आंतरराष्ट्रीय योग दिन' साजरा केला जाणार आहे. यंदाच्या योग दिनासाठी ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ ही थीम आणि ‘योग करा निरोगी रहा आणि आनंदी आयुष्य जगा’ हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. या वर्षीचा मुख्य जिल्हास्तरीय कार्यक्रम २१ जून रोजी सकाळी ६.१५ ते ७.१५ या वेळेत विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला प्रमुख लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सनदी अधिकारी आणि ज्येष्ठ योग प्रसारक उपस्थित राहणार आहेत.

 

हा कार्यक्रम जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, एस.आर.पी.एफ., महानगरपालिका, शिक्षण विभाग, वनविभाग, जिल्हा होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना , संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग आणि क्रीडा भारती यांसह जिल्ह्यातील विविध योग व क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.

 

जिल्ह्यातील सर्व नागरिक, क्रीडाप्रेमी, योग समिती सदस्य, क्रीडा प्रशिक्षक, शिक्षक व विद्यार्थ्यांना २१ जून रोजी सकाळी ६.१५ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमाला येताना नागरिकांनी सोबत स्वतःची पाण्याची बॉटल आणि चटई किंवा मॅट्स आणावी, अशी सूचना देण्यात आली आहे.

****

 

'स्वाधार' योजनेच्या लाभासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेश अर्ज बंधनकारक; समाज कल्याण विभागाचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

अमरावती, दि १५ (जिमाका) :  शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत त्यांना स्वाधार योजनेचा तसेच वसतिगृह योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आर. व्ही. जाधवर यांनी दिली आहे.

 

             राज्यात व्यावसायिक व अव्यावसायिक महाविद्यालयांची आणि तेथे प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना शासकीय वसतिगृहातील जागांची मर्यादा लक्षात घेता सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होत नसल्याने, पात्र विद्यार्थ्यांच्या भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी थेट बँक खात्यात आर्थिक रक्कम जमा करण्यासाठी शासनाने 'स्वाधार योजना' सुरू केली आहे. मात्र समाज कल्याण विभागाने आता या नियमात महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदललेल्या नियमांनुसार इयत्ता ११ वी, १२ वी तसेच १२ वी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर १५  ते ३१ जुलै २०२६ या मुदतीत ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळणार नाही, तेच विद्यार्थी पुढील 'स्वाधार योजने’च्या लाभासाठी पात्र राहतील.

 

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहासाठी वेळेत अर्ज नोंदविण्याचे आवाहन केले असून अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती (चांदूर रेल्वे रोड, सी.पी. ऑफिसच्या मागे, अमरावती) येथे किंवा speldswo_amt@rediffmail.com या ई-मेल आयडीवर तसेच 0721-2661261 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आहे.

00000

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख.



१५ जून – जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिन ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, हीच आपल्या संस्कृतीची खरी ओळख. #WorldElderAbuseAwarenessDay #RespectElders #SeniorCitizens
 

DIO NEWS AMRAVATI 17.06.2026

  अमरावती जिल्ह्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर आज 'ड्राय डे'; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश अमरावती, दि. 17 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने ...