मेळघाटच्या विकासासाठी आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणावर भर देणार
-जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 12 (जिमाका): मेळघाट परिक्रमासाठी सेवा देणाऱ्या खाजगी दवाखान्यातील डॉक्टर्संना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक औषधसाठा, वाहन सुविधा तसेच त्यांच्या राहण्याची सुविधा जिल्हा प्रशासनातर्फे पुरविण्यात येईल. मेळघाटच्या विकासासाठी येथील आरोग्य आणि आर्थिक सक्षमीकरणावर विशेष भर देणार, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज येथे केले.
महसूल भवन येथे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विषयाची आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्र, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी प्राचार्य डॉ. विभावरी दाणी, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे तसेच संबंधित विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते.
मेळघाट परिक्रमाउपक्रमातंर्गत माहिती, शिक्षण आणि संप्रेषण अभियान राबविण्यासाठी शिवाजी सायन्स कॉलेजचा सहभाग राहील. या महाविद्यालयाचे विद्यार्थी मेळघाटमध्ये कोरकू भाषेतून पथनाट्य, कोरकू बांधवांना समजेल अशा भाषेत संवादसत्र असे विविध उपक्रम राबवून आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणार आहेत. अन्य महाविद्यालयांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. येरेकर यांनी यावेळी केले.
मेळघाटमधील प्रामुख्याने होणारे कुटकी, सावा या मिलेट्स फूड्सबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबवावा. बदलत्या जीवनशैलीत नागरिकांना मिलेट्सचे महत्त्व कळावे यासाठी जनजागृती करावी. याअनुषंगाने मिलेट्स फुडच्या लागवडीखाली क्षेत्र वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात. हॉटेल्स तसेच दैनंदिन जीवनात नागरिकांचा मशरूम खाद्यान्नांचा वापर वाढला आहे. मशरूमची वाढती मागणी लक्षात घेता मशरूम ट्रेनिंग प्रोग्राम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक राहुल सातपुते यांना यावेळी दिले. मराठवाडा दुग्ध प्रकल्पासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली. या प्रकल्पातील लाभार्थ्यांना वैरण विकास चमूमार्फत सहकार्य पुरविण्यात यावे. तसेच या पूरक व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी आकृष्ट व्हावे, यासाठी जनजागृती करण्याचेही निर्देश श्री. सातपुते यांना दिले.
प्राथमिक कृषी सहकारी संस्था ही ग्रामीण स्तरावरील तळागाळातील सहकारी पतपुरवठा संस्था आहे. थेट शेतकऱ्यांशी निगडित ही संस्था खते, बियाणे, कीटकनाशके पुरवणे, अल्प मुदतीचे कर्ज देणे आणि शेतमाल साठवणूक, विक्री यांसारख्या बहुउद्देशीय सेवा पुरविते. या सहकारी संस्था ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देत असल्यामुळे येथील दोन-तीन गावातील महिलांना एकत्रित करून त्यांच्या आर्थिकस्तर उंचावण्यासाठी विशेष उपक्रम राबवून या महिलांना सहकार्य करण्याचे निर्देश महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना यावेळी देण्यात आले.
मोह फुलाचा हंगाम सुरू होत असून यावी उत्तम प्रतीची मोहफुले गोळा करण्यासाठी आवश्यक नेट सामग्री येथील स्थानिकांना उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी संबंधितांना निर्देश दिले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती महापात्र यांनी मेळघाट येथील आरोग्य समस्यावर सर्व विभागांनी एकत्रित येऊन समन्वयाने कार्यप्रणाली राबविण्याचे निर्देश दिले. येथील गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी लवकरच मोबाईल एक्स-रे मशीन घेण्यात येईल. जेणेकरून अती जोखमीच्या गर्भवती महिलांची तपासणी करणे सोयीचे होईल. तसेच आशाकिट मध्ये बीपी मशीन देण्यासाठी त्यांनी सकारात्मकता दर्शविली.
माजी प्राचार्य डॉ. विभावरी गाणी यांनी मेळघाट येथील आरोग्यविषयक विविध उपक्रम, जनजागृती कार्यक्रमायाबाबत माहिती दिली. मेळघाटमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी असून व्यसनाधिनता अधिक असल्यामुळे जनजागृती करण्यास अडचण निर्माण होते. यामुळे येथील नागरिकांना तंबाखू, दारू अशा विविध व्यसनाच्या विळख्यातून मुक्त करणे सर्वप्रथम गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी यावेळी मेळघाट क्षेत्रातील विद्युत पुरवठ्याबाबत आढावा घेतला. येथील विद्युत पुरवठा अखंडितपणे सुरू राहण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले. याबाबत चुर्णी येथील वैद्यकीय अधिकारी यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
000000
राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय नवीन जागेत स्थलांतरित;
आता विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातून चालणार कामकाज
अमरावती, दि. 12 (जिमाका): राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग, अमरावती हे आता नवीन जागेत स्थलांतरित झाले असून, यापुढे कार्यालयाचे कामकाज नवीन पत्त्यावरून चालणार आहे. या कार्यालयाचा नवीन संपर्क पत्ता राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग, विभागीय आयुक्त कार्यालय परिसर, जुना बायपास रोड, कॅम्प, अमरावती - 444 602 असा आहे. संबंधित नागरिकांनी तसेच शासकीय कामकाजासाठी संपर्क साधणाऱ्यांनी या बदललेल्या पत्त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालयाचे उपसचिव देवेंद्र चव्हाण यांनी केले आहे.
000000
नोंदणीकृत बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप 13 फेब्रुवारीपासून तात्पुरते स्थगित;
आता तालुकानिहाय होणार किटचे वाटप
अमरावती, दि. 12 (जिमाका): महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांना देण्यात येणाऱ्या गृहपयोगी वस्तू संच, सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संचाचे वाटप 13 फेब्रुवारी 2026 पासून तात्पुरते बंद करण्यात आले आहे. वाटपाच्या ठिकाणी होणारी प्रचंड गर्दी आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता, जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार आता हे वाटप तालुकानिहाय केले जाणार असल्याची माहिती कामगार उप आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
मंडळामार्फत साहित्याचे वाटप सुरळीत होण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करून वेळ दिली जाते. ज्या कामगारांनी 13 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत गृहपयोगी वस्तू संच मिळण्यासाठी नोंदणी केली होती, अशा ठिकाणी मोठ्या संख्येने कामगारांची गर्दी होऊन गोंधळ निर्माण होत आहे. यामुळे साहित्यासाठी नोंदणी केलेल्या कामगारांना वेळेत संच देणे शक्य होत नाही. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सध्याचे वाटप तात्काळ बंद करून प्रत्येक नोंदणीकृत कामगाराला त्यांच्या तालुक्याच्या ठिकाणी दररोज जास्तीत-जास्त 500 संच वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.
तालुकानिहाय वाटपाच्या तारखा संबंधित कंत्राटदाराकडून कामगारांना स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहेत. तोपर्यंत कामगारांनी वाटप केंद्रावर गर्दी करू नये आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळास सहकार्य करावे, असे आवाहन कामगार उप आयुक्त, अमरावती विभाग यांनी केले आहे.
000000
विविध राज्यस्तरीय सामाजिक पुरस्कारांसाठी प्रस्ताव आमंत्रित;
21 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे आवाहन
अमरावती, दि. 12 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यामध्ये महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार, नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार आणि क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारांचा समावेश असून, इच्छुकांनी 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपले प्रस्ताव सादर करावेत.
सर्व आवश्यक कागदपत्रे, कार्याचा सविस्तर अहवाल, शिफारस पत्रे व प्रमाणपत्रे जोडणे आवश्य, असे आवाहन सहायक संचालक सरिता बोबडे यांनी केले आहे.
या पुरस्कारांसाठी अर्जदार व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्जदाराने संबंधित समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अथवा अन्य क्षेत्रातील उत्थानासाठी सलग आणि उल्लेखनीय स्वरूपाचे कार्य केलेले असावे. पुरस्कारासाठीचा अर्ज विहित नमुन्यात सादर करणे बंधनकारक असून, त्यासोबत शासन निर्णयातील क आहे. अपूर्ण, चुकीची माहिती असलेले किंवा मुदतीनंतर प्राप्त होणारे प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत विचारात घेतले जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
पुरस्कारांबाबतचा अंतिम निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. पात्र व इच्छुक व्यक्तींनी आपले प्रस्ताव 21 फेब्रुवारी 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत 'सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, अमरावती' यांच्या कार्यालयात सादर करावेत. अर्जाचा नमुना आणि सविस्तर अटी व शर्तींची माहिती जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे, तरी जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी आपले प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन विभागामार्फत करण्यात आले आहे.
0000000
स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
अमरावती, दि. 12 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी शुक्रवार, दि. 20 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसल्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधांसाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट लाभ जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. योजनेचे निकष व अटी पोर्टलवर उपलब्ध आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना hmas.mahait.org वर उपलब्ध आहे.
परिपूर्ण कागदपत्रासह विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये दि. 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज सादर करावा. तसेच यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी बँक तपशील भरून घेण्याची कार्यवाही तातडीने करावी. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय भवन, सहायक आयुक्त, समाज कल्याण, अमरावती, तसेच speldswo_amt@rediffmail.
000000
निवृत्तीवेतनधारकांसाठी उद्या सायबर सुरक्षा जनजागृती शिबिर;
उपस्थित राहण्याचे जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन
अमरावती, दि. 12 (जिमाका): आजच्या डिजिटल युगात सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने, निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना सुरक्षित व्यवहार करता यावेत यासाठी विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. संचालनालय, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई व सी-डॅक यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांसाठी उद्या, शुक्रवार दि. 13 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता 'सायबर सुरक्षा जनजागृती' विषयावर ऑनलाईन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये डिजिटल युगात वावरताना, विशेषतः बँक व्यवहार आणि ऑनलाईन सुविधांचा लाभ घेताना कोणती खबरदारी घ्यावी, याविषयी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारकांना या मार्गदर्शनाचा लाभ घेता घ्यावा. कोषागार कार्यालयाच्या प्रांगणातील 'जिजाऊ सभागृह' येथे आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
अमरावती कोषागार कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ कोषागार अधिकारी शिल्पा पवार यांनी केले आहे.
0000000
राष्ट्रीय लोक अदालत 14 मार्च रोजी
अमरावती, दि. 12 (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात शनिवार, दि. 14 मार्च 2026 रोजी 'राष्ट्रीय लोकअदालत'चे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यात दाखल व दाखलपूर्व अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्याकरिता ठेवण्यात येणार आहेत. या आयोजनाची विशेष बाब म्हणून त्याकरिता कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नसून प्रकरणाचा अंतिम निकाल लागतो.
तडजोडपात्र प्रलंबित खटले 'राष्ट्रीय लोकअदालत'मध्ये ठेवून तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच (दाखलपूर्व) प्रकरणांबाबत नजीकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याकडे संपर्क साधावा. तसेच 14 मार्च रोजी आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय लोकअदालत' समक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अमरावतीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर वें. यार्लगड्डा तसेच सचिव डी. एस. वमने यांनी केले आहे.
000000
भारुडाच्या माध्यमातून कुष्ठरोग व क्षयरोग जनजागृती; जनुना येथे महिला मेळावा संपन्न
अमरावती, दि. 12 (जिमाका): मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जनुना ग्रामपंचायत येथे आरोग्य प्रबोधनाचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमात आरोग्य सेवक राजेंद्र चकुले यांनी गावातील वृद्ध महिलांसोबत भारुड सादर केले. या माध्यमातून कुष्ठरोग आणि क्षयरोगाविषयी संदेश देण्यात आला.
यावेळी सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. पूनम मोहोकार यांनी शास्त्रीय माहिती देत, कुष्ठरोग हा शाप नसून तो पूर्णपणे बरा होणारा आजार असल्याचे सांगितले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्राजक्ता वानखडे यांनी आरोग्य विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. कार्यक्रमात भारुड आणि भजनासोबतच अभिनय हायस्कूलच्या निबंध स्पर्धा विजेत्यांचा आणि रांगोळी कलाकारांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी महिलांना झाडांच्या कुंड्यांचे वाटप करण्यात आले. सरपंच जगदीश नरखेडकर व ग्रामसेवक जयश्री काकडे यांच्या नियोजनाखाली पार पडलेल्या या मेळाव्यात, 'लवकर निदान आणि त्वरित उपचार' या सूत्राद्वारे गाव कुष्ठरोग व क्षयरोगमुक्त करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केला.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)