Friday, May 22, 2026

DIO NEWS AMRAVATI 22.05.2026












                                महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे

-अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे

*महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी

अमरावती, दि. 22 (जिमाका) : महसूल विभाग हा समाजासाठी कार्य करणारा विभाग आहे. त्यामुळे विविध परिस्थितीमध्ये अनपेक्षित जबाबदाऱ्या या विभागावर येतात. मात्र जनतेसाठी कार्य करावयाचे असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारी घेऊन कार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री. खारगे यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज आदी अधिकारी उपस्थित होते.

श्री. खारगे यांनी महसूलमधील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस दौरा करावा. यामुळे प्रशासनावर पकड मजबूत करण्यास मदत होणार आहे. दौरा करताना विविध विकासकामांची तपासणी केल्यास तथ्य जाणून घेण्यास मदत मिळणार आहे. त्यासोबतच जनतेशी भेटावे. त्यांनी दिलेल्या निवेदनांवर सकारात्मक कारवाई करावी. निवेदनावर केलेली कारवाई कळवावी. यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्षात येतात. हे सर्व करीत असताना अधिनस्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधून समस्याही जाणून घ्याव्यात. प्रशासनाने नागरिकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी. त्यांच्या तक्रारींचा मागोवा घ्यावा. शासनने ईज ऑफ डुइंग बिझनेसचे धोरण स्विकारले आहे. त्यानुसार 12 दुरूस्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्याची संक्षिप्त माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रामुख्याने जिल्ह्यात लोकसहभागातून निर्माण करण्यात येणाऱ्या पांदन रस्त्याची माहिती दिली. तसेच रहिवासी जमिन नियमानुकूल करणे, पट्टेवाटप करणे, मिळकत पत्रिका वाटप करणे याबाबत माहिती दिली.

दरम्यान श्री. खारगे यांनी सकाळी अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमरावती तहसील कार्यालय, सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, वडाळी मंडळ अधिकारी कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी कार्यरत कर्मचारी यांच्याकडून कामकाजाची माहिती घेतली.

000000

Thursday, May 21, 2026

DIO NEWS AMRAVATI 21.05.2026

 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात 453 मतदार, 7 मतदान केंद्र

विभागांनी समन्वयाने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अमरावती, दि. 21 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी सोमवार, दि. 25 मे रोजी अधिसुचना प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 453 मतदार असून उपविभागीय अधिकारी स्तरावर मतदान केंद्र राहणार आहे, निवडणुकीसाठी अल्प कालावधी असल्याने सर्व विभागांनी समन्वाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणूक निमित्ताने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे निवडणुकीशी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी लागणारी आचारसंहिता जशीच्या तशी लागू करण्यात आली आहे. याची नोंद निवडणुकीशी संबंधितांनी घ्यावी. मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी उपविभागीय स्तरावर मतदान केंद्र राहणार आहे. मतदारांची ड्राफ्ट यादी तयार झाली असून सर्व राजकीय पक्षांना ती पाठविण्यात येईल. यावरील हरकतीनंतर मतदारयादी अंतिम करण्यात येणार आहे. आचारसंहितेसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती नेमणे आवश्यक आहे. त्यानुसार कारवाई करण्यात यावी.

आचारसंहितेच्या कालावधीत कामे प्रस्तावित करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती स्थापन करण्यात आली आहे. कामे प्रस्तावित करणे आवश्यक असल्यास या समितीकडे पाठविण्यात याव्यात. मतदार कमी असल्याने त्यांना प्रलोभन देण्याचे प्रकार होण्याची शक्यता असल्याने याबाबत काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली.

00000000

पसंतीच्या दुचाकी क्रमांकासाठी सोमवारी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 21 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे परिवहनेत्तर (दुचाकी) संवर्गातील वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील आवडते किंवा पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी सोमवार, दि. 25 मे रोजी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात 25 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंतच खिडकी क्रमांक 25 अर्ज स्वीकारले जातील. यासाठी वाहन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्या व्यक्तीच्या नावाचा अर्ज, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक अर्जावर नमूद करणे अनिवार्य आहे. पसंती क्रमांकाचे विहित शुल्क अमरावती कॅम्प ब्रँच, ट्रेझरी ब्रँच कोड नं. 003866 करिता देय असलेल्या डिमांड ड्राफ्टद्वारे भरणे आवश्यक आहे.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज असेल किंवा एकापेक्षा जास्त अर्ज आले असतील, अशा क्रमांकाची यादी 25 मे रोजीच सायंकाळी 4 वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावली जाईल. एकाच क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज आले असल्यास 26 मे रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत मूळ शुल्काव्यतिरिक्त जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात खिडकी क्र. 25 वर जमा करावा लागणार आहे. दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात लिफाफे उघडले जातील. सर्वाधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट असलेल्याला पसंती क्रमांक दिला जाईल. उर्वरित अर्जदारांचे डीडी परत केले जातील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

000000

दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ कार्यक्रम

अमरावती, दि. 21 (जिमाका) : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 21 मे रोजी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’साजरा केला जातो. यानिमित आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंदा दानेज यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ दिली. 

 दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

00000000

DIO NEWS AMRAVATI 21.05.2026


 

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात 453 मतदार, 7 मतदान केंद्र

विभागांनी समन्वयाने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 

       अमरावती, दि. 21 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी सोमवार, दि. 25 मे रोजी अधिसुचना प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 453 मतदार असून उपविभागीय अधिकारी स्तरावर मतदान केंद्र राहणार आहे, निवडणुकीसाठी अल्प कालावधी असल्याने सर्व विभागांनी समन्वाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

     स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणूक निमित्ताने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे निवडणुकीशी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित होते.

      जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी लागणारी आचारसंहिता जशीच्या तशी लागू करण्यात आली आहे. याची नोंद निवडणुकीशी संबंधितांनी घ्यावी. मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी उपविभागीय स्तरावर मतदान केंद्र राहणार आहे. मतदारांची ड्राफ्ट यादी तयार झाली असून सर्व राजकीय पक्षांना ती पाठविण्यात येईल. यावरील हरकतीनंतर मतदारयादी अंतिम करण्यात येणार आहे. आचारसंहितेसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती नेमणे आवश्यक आहे. त्यानुसार कारवाई करण्यात यावी.

     आचारसंहितेच्या कालावधीत कामे प्रस्तावित करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती स्थापन करण्यात आली आहे. कामे प्रस्तावित करणे आवश्यक असल्यास या समितीकडे पाठविण्यात याव्यात. मतदार कमी असल्याने त्यांना प्रलोभन देण्याचे प्रकार होण्याची शक्यता असल्याने याबाबत काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली.

00000

Wednesday, May 20, 2026

DIO NEWS AMRAVATI 20.05.2026

 


स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांची निवडणूक उपविभागीय स्तरावर होणार

*राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांची माहिती

अमरावती, दि. 20 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक उपविभागीय अधिकारीस्तरावर होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणूक निमित्ताने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच बैठक घेतली. बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित होते.

बैठकीत स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी जाहीर करण्यात आलेला कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता राहणार असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उमेदवार, प्रचार करणारे व्यक्ती आणि निवडणुकीशी संबंधितांसाठी मार्गदर्शक सूचना आहेत, त्यानुसार कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मंत्री आणि लोक प्रतिनिधी यांच्यासाठी वाहनाचा वापर किंवा प्रचारासाठी नियम ठरवून देण्यात आले आहे. तसेच प्रचार साहित्य तपासून देण्यासाठी माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती नेमण्यात आली असल्याचे सांगितले.

राजकीय पक्षांना मतदारांची ड्राफ्ट यादी देण्यात येणार असून यावर काही हरकती असल्यास त्या नोंदविण्यात याव्यात. सात दिवसानंतर या याद्यांना अंतिम स्वरूप देण्यात येणार असून याद्या मतदानकेंद्रनिहाय पुरविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली. बैठकीला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000000

--

Tuesday, May 19, 2026

DIO NEWS AMRAVATI 19-05-2026

                                आर्चरी वर्ल्ड कपमध्ये 'सुवर्ण' भेद करणाऱ्या

कुमकुम मोहोडचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

अमरावती, दि. 19 (जिमाका): नुकत्याच शांघाय, चीन येथे पार पडलेल्या 'वर्ल्ड आर्चरी चॅम्पीयनशिप' स्टेज 2 स्पर्धेत अमरावतीची आंतरराष्ट्रीय तिरंदाज कुमकुम मोहोड हिने भारतीय महिला संघाला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते कुमकुमचा शाल आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाकडून खेळाडूंना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

जागतिक स्पर्धेत भारत आणि यजमान चीन यांच्यातील अंतिम सामना 4-4 असा बरोबरीने सुटला होता. त्यानंतरच्या 'शूट-ऑफ'मध्ये कुमकुमने अचूक लक्ष्यभेद करीत चीनला पराभूत केले. या कामगिरीने भारतीय महिला संघाने 5 वर्षांनंतर पहिले सांघिक सुवर्णपदक पटकाविले. उपांत्य फेरीतही भारतीय संघाने 10 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या दक्षिण कोरियाच्या संघाला पराभूत केले. या सुवर्णविजेत्या भारतीय संघात कुमकुम मोहोडसह अंकिता भगत आणि 4 वेळची ऑलिम्पियन दीपिका कुमारी यांचा समावेश होता.

कुमकुम ही गेल्या 9 वर्षांपासून अमरावती जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, 'खेलो इंडिया' आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या शूटिंग रेंजवर आंतरराष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक प्रफुल्ल डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. अत्यंत कमी वयाची असलेली कुमकुम सध्या फॉर्मात असून, तिची आगामी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तुर्की येथे होणाऱ्या वर्ल्ड कप स्टेज 03, स्पेन (माद्रिद) येथील वर्ल्ड कप स्टेज 4 आणि सप्टेंबरमध्ये जपान येथे होणाऱ्या आशियाई गेम्ससाठी भारतीय संघात निवड झाली आहे. कुमकुमसोबतच अमरावतीचा यशदीप भोगे याची देखील आशियाई गेम्ससाठी निवड झाली आहे.

कुमकुमच्या यशाचे कौतुक करताना जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कुमकुमची लहान वयातील ही कामगिरी पाहता, ती 2028 मध्ये लॉस एंजेलिस (अमेरिका) येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत निश्चितच भारताचे प्रतिनिधित्व करेल आणि देशाचे नाव लौकिक वाढवेल, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, अनिल इंगळे, क्रीडा मार्गदर्शक. प्रफुल्ल डांगे उपस्थित होते.

0000000

अमरावतीत दि. 22 मे रोजी मेगा रिटेल क्रेडिट आउटरीच कार्यक्रम

अमरावती, दि. 19 (जिमाका): सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेगा रिटेल क्रेडिट आउटरीच कार्यक्रमांतर्गत अमरावती येथे विशेष ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. 22 मे रोजी सायंकाळी 6 वाजता एमआयडीसी रोडवरील गुणवंत लॉन येथे होणार आहे.

या मेळाव्यात आकर्षक व सुलभ कर्ज योजनांची विशेष माहिती देण्यासाठी रिटेल क्रेडिट आऊटरीच कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यात गृहकर्ज, वाहन कर्ज, व्यवसाय कर्ज, वैयक्तिक कर्ज, एज्युकेशन कर्ज, इतर किरकोळ कर्ज सुविधांची माहिती देण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, तात्काळ सल्ला आणि ऑन-द-स्पॉट प्राथमिक मंजुरीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच यावेळी इनप्रिन्सिपल सॅन्शन व चेक वितरण होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून रिजनल प्रबंधक उपस्थित राहतील.

याबाबत अधिक माहितीसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जवळच्या शाखेशी संपर्क साधावा आणि योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ यांनी केले आहे.

0000000

महाटेट 2025 परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण सुरू

अमरावती, दि. 19 (जिमाका) : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण दि. 19 मे पासून सुरू करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांना हे प्रमाणपत्र 8 जून पर्यंत कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घेता येणार आहे.

उमेदवारांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची रीतसर तपासणी केली जाईल. त्यानंतर तीन दिवसांनी उमेदवारांना प्रमाणपत्र वितरित केले जाईल. प्रमाणपत्र घेण्यासाठी येताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह छायांकित प्रती आणणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी येताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्राची प्रत, महाटेट परीक्षेच्या गुणपत्रिकेची प्रत, डी. टी. एड. किंवा बी. एड. उत्तीर्ण गुणपत्रिका अथवा प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, लागू असल्यास दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा अधिकृत पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र, या कागदपत्रांच्या प्रती आणि मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

0000000

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात

52 उमेदवारांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 19 (जिमाका) : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटरच्या वतीने आज, 19 मे रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कार्यालयात सकाळी 10 वाजता घेण्यात आला. मेळाव्यात प्रत्यक्ष मुलाखतींमधून 52 नोकरी इच्छुक उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

उद्घाटक म्हणून कौशल्य विकास विभागाचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे उपस्थित होते. सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी प्रमुख उद्योजक म्हणून जाधव गियर्सचे प्रतिनिधी रोहित प्रांजळे, जिनस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. ली. चे  प्रतिक इंगोले, प्रेसिजन मेपिंगचे सचिन निचले, टॅलेन्टकॉर्प सोल्यूशन प्रा. ली. नागपूरच्या  करिष्मा पासवान आणि शिखर एज्युकेअर अमरावतीचे आयुष अग्रवाल उपस्थित होते.

उपायुक्त श्री. ठाकरे यांनी युवकांनी केवळ रोजगार मिळविणारे न होता, स्वतःचे उद्योग सुरू करून रोजगार देणारे उद्योजक व्हावे, असे आवाहन केले. सहायक आयुक्त श्रीमती बारस्कर यांनी प्रास्ताविकातून प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचे महत्त्व पटवून दिले. ही योजना देशातील नामांकित कंपन्यांमध्ये प्रवेश मिळविण्याची सुवर्णसंधी आणि एक उत्तम मार्ग असल्याचे सांगितले.

मेळाव्यासाठी ऑनलाइन, ऑफलाइन माध्यमातून 164 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी 124 उमेदवारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर मुलाखती दिल्या. सर्व खाजगी आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांची योग्यता तपासून 52 उमेदवारांची प्राथमिक निवड केली. सोनाली भोगे यांनी सूत्रसंचालन केले, पंकज कचरे यांनी आभार मानले.

0000000

औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर

नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहिर

अमरावती, दि. 19 (जिमाका) : अखिल भारतीय औषधी विजेता संघटनेच्या वतीने बुधवार, दि. 20 मे रोजी देशव्यापी एक दिवसीय औषधविक्री बंदची घोषणा करण्यात आली आहे. या बंदमुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने हेल्पलाईन क्रमांक जाहिर केले आहे.

बंदच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी अत्यावश्यक औषधांचा पुरवठा अखंडीत व सुरळीत उपलब्ध राहावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केली आहे. सहआयुक्त (औषधे), अन्न व औषध प्रशासन यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते, रुग्णालयांशी संलग्र औषध दुकाने, तसेच 24 तास सुरु असणाऱ्या औषध दुकानांनी समन्वय साधण्यात येत आहे. यात अत्यावश्यक औषधांचा पुरवठा खंडित होणार नाही यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच औषधांचा अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. औषध उपलब्धतेबाबत कोणतीही अडचण उद्भवल्यास नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले ओ. अन व औषध प्रशासन, अमरावती कार्यालया हेल्पलाईन क्रमांक - गजानन घीरके, सहायक आयुक्त (औषधे) वाशिम, अमरावती-९८५०१५०६८७, मनिष गोतमारे, औषध निरीक्षक, वाशिम, अमरावती ९५५२५७४४९५, तालुकानिहाय आपत्कालीन औषध उपलब्धता हेल्पन्नाईन क्रमांक - अमरावती शहर - प्रविण देशमुख 9422158409, संजय बोबडे 9422157615, सौरभ मालानी 9423812345, मनोज डफळे 9823205250, राजा नानवाणी 9822643226 येथे संपर्क साधावा, असे आवाहन सह आयुक्त (औषधे) करण्यात मि. कृ. काळेश्वरकर यांनी केले आहे.

0000000


माझी लाडकी बहिण योजनेत ई-केवायसीसाठी

कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश नाही

अमरावती, दि. 19 (जिमाका) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करण्याच्या मुदतीत योग्य ती कागदपत्रे सादर करू न शकलेल्या लाडक्या बहिणींना जिल्ह्यांच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याची मुभा देण्यात आलेली आहे, अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ई-केवायसी करू शकले नाही अशा महिलांना जिल्ह्यांच्या महिला व बाल विकास विभागात कागदपत्रे सादर करण्याचे कोणतेही निर्देश शासनस्तरावरून देण्यात आलेले नाही.

या बातमीमुळे योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. बातमीमुळे महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय शहर व तालुकास्तर कार्यालयात महिलांचा जमाव होत आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता अशा चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. काही लाभार्थ्यांचे माहे फेब्रुवारी 2026चा हप्ता दि. 28 मार्च व दि. 29 मार्च 2026 रोजी जमा झालेला आहे. मार्च 2026चा हप्ता लवकरात लवकर जमा होणार असल्याने लाभार्थींनी संयम ठेवावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय गट यांनी केले आहे.

00000

Monday, May 18, 2026

DIO NEWS AMRAVATI 18-05-2026




                                               मेळघाट विकासासाठी प्रशासनातील समन्वय वाढवावा

-मंत्री डॉ. अशोक उईके

अमरावती, दि. 18 (जिमाका) : चिखलदरा आणि धारणी हे आदिवासी बहूल तालुके दत्तक घेतलेले आहेत. त्‍यामुळे या भागाच्या विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या मुलभूत समस्या दूर करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने सर्व विभागांशी समन्वय ठेवावा. यामुळेच त्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असे मत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले.

मंत्री डॉ. उईके यांच्या अध्यक्षतेखाली धारणी येथे आढावा बैठक पार पडली. बैठकीत कुपोषण, सिकलसेल, थॅलेसेमिया आणि क्षयरोग या गंभीर विषयांवर स्वतंत्रपणेचर्चा करण्यात आली. आदिवासी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची आवश्यकता, वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे आणि उपचार सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या क्षेत्रातील सिकलसेल आणि कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. कुपोषणमुक्तीसाठी पावसाळ्यापूर्वी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सक्त सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

मंत्री डॉ. उईके यांनी, आदिवासी क्षेत्राचा विकास करण्यासाठी प्रत्येकाने कार्य करणे गरजेचे आहे. शासनाची कामे प्रत्यक्षात दिसली पाहिजेत. त्यासोबतच नागरिकांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात यावी. तसेच योजनांच्या लाभासाठी अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि लाभार्थ्यांची यादी अनिवार्यपणे लावण्यात यावी.

बिरसा मुंडा कृषी योजनेत शेतकऱ्यांना विहिरीसोबतच सोलार सिस्टीम, पाईपलाईन, स्प्रिंकलर आणि मोटार पंपही देण्यात यावेत. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना पूर्ण लाभ मिळू शकेल. कृषी विद्यालयातील रिक्त पदे आणि इमारतीसाठी प्रयत्न करण्यात येतील. शासकीय आश्रम शाळांतील सुविधांबाबत चर्चा करण्यात आली. खारी आश्रमशाळा येथे वीज कनेक्शन आणि कमी दाबाच्या विजेची समस्या जाणवत आहे. याबाबत आश्रमशाळा आणि वसतिगृहांना स्वतंत्र डीपी बसविण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले. तसेच तारूबांदा गावात वाढीव वीज पोल तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले.

रायपूर येथील आश्रमशाळेला जाण्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासकीय मान्यता देऊन रस्ता मंजूर करण्यात यावा. १५ जूनपूर्वी सर्व आश्रमशाळांमध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच प्रत्येक गावात स्मशानभूमी आणि त्यासाठी पक्का जोडरस्ता तयार करण्यात यावा, असेही डॉ. उईके यांनी सूचविले.

यावेळी आमदार केवलराम काळे, प्रभुदास भिलावेकर, नगराध्यक्ष सुनिल चौथमल, आदिवासी विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, उपविभागीय अधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, आरोग्य उपसंचालक तसंगतुषार वारे, रमेश मावसकर उपस्थित होते. बैठकीपूर्वी डॉ. उईके यांचे धारणी येथील विश्रामगृह येथे आदिवासी परंपरेनुसार गदली सुसुन नृत्याने स्वागत करण्यात आले. तत्पुर्वी डॉ. उईके यांनी सकाळी तारूबांदा येथील कांद्रीबाबा हनुमान मंदिर भेट दिली.

00000000

अमरावती आयटीआयमध्ये सोमवारी शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

अमरावती, दि. 18 (जिमाका): मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती येथे सोमवार, दि. 25 मे रोजी सकाळी 10 वाजता भव्य शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा संस्थेच्या एनएसएस हॉलमध्ये पार पडणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण, तसेच सध्या अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना यात सहभागी होता येणार आहे. यात फिटर, टर्नर, मशिनिस्ट, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक व्हेइकल, वायरमन, इलेक्ट्रीशियन, आरएसी अभ्यासक्रमाचे प्रशिक्षणार्थी सहभागी होऊ शकतील.

या भरती प्रक्रियेसाठी नागपूर आणि पुणे येथील कंपन्या उपस्थित राहणार आहे. उमेदवारांनी मेळाव्याला येताना आपला अद्ययावत बायोडाटा आणि सर्व मूळ शैक्षणिक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती सोबत आणणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण आणि अंतिम वर्षातील प्रशिक्षणार्थ्यांनी याच लाभ घ्यावा, असे आवाहन आयटीआयचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी केले आहे.

0000000




स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी १८ जून रोजी मतदान

*जिल्ह्यात आचारसंहिता लागू


अमरावती, दि. 18 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांतील द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात अमरावतीचा समावेश असल्याने मतदारसंघांमध्ये आदर्श आचारसंहिता तातडीने लागू करण्यात आली आहे.

अमरावती जिल्ह्यामध्ये स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार, सोमवार, दि. २५ मे २०२६ रोजी अधिसूचना जारी करणे, १ जून रोजी नामांकने (उमेदवारी अर्ज) दाखल करण्याची अंतिम तारीख, २ जून रोजी नामांकनांची छाननी, ४ जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख, १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान, २२ जून रोजी मतमोजणी, २५ जून रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख आहे.

0000000

--

 

 

 

 

 

 

DIO NEWS AMRAVATI 17-05-2026







जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा 
विकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश
समन्वयातून विकासकामे गतिमान करण्यावर भर

अमरावती : 16 मे 
      
      मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा परिषद अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
      यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, आमदार प्रवीण तायडे, प्रताप अडसड, संजय खोडके, राजेश वानखडे, केवलराम काळे, उमेश उर्फ चंदू यावलकर, रवी राणा, महापौर श्रीचंद तेजवानी, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, महानगर पालिका आयुक्त वर्षा लड्डा उपस्थित होते.
        
      बैठकीदरम्यान जिल्हा परिषद अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा, विकासकामांच्या प्रगतीचा, प्रलंबित विषयांचा तसेच आगामी नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागांना कामकाज अधिक प्रभावी, गतिमान व लोकाभिमुख पद्धतीने राबविण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री महोदय यांनी दिलेत 
   
    बैठकीत पाणी पुरवठा, स्वच्छ भारत मिशन, शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, कृषी, लघु सिंचन, ग्रामपंचायत, बांधकाम तसेच सामान्य प्रशासन विभागांच्या कामांचा सखोल आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून काम करावे आणि शासनाच्या योजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

   उमेद अभियान अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गटांना बळकटी देण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपयांचे फिरते भांडवल उपलब्ध करून देण्यात येईल. स्वच्छ भारत मिशन मध्ये पाच हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांसह आसपासच्या गावांचा क्लस्टर तयार करून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभा करावा आणी प्रकल्पांतर्गत सेंद्रिय खत निर्मिती करून ते स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यात. 

    कृषी विभागाने भरारी पथक स्थापन करून कार्यान्वित करावे, महिला व बालविकास विभागाला पुढील तीन वर्षांचा आराखडा तयार करून नागपूर मॉडेलच्या धर्तीवर अंगणवाडी केंद्रांचे उन्नतीकरण करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. 

   लघु सिंचन विभागाने जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावीत. पाणीस्रोतांचे सर्वेक्षण करून मृत बंधारे पुनर्जीवित करावे, गॅबियन बंधारे तयार करावे आणी सि एस आर निधी उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एकत्रित नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. तर ग्रामपंचायत विभागाला टप्प्याटप्प्याने स्मशानभूमी विकासाची कामे पूर्ण करण्यास सांगण्यात आले. 
    
    सामान्य प्रशासन विभागाच्या आढाव्यात जिल्ह्यातील गट विकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे पालकमंत्री महोदय म्हणालेत. आरोग्य विभागाला नागपूर मॉडेलप्रमाणे "मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र" विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच सर्व विभागांच्या समन्वयातून जिल्ह्यात २५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या.

      शिक्षण विभागाने पुढील तीन वर्षांचा आराखडा तयार करून जास्त पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये डिजिटल शाळा विकसित करण्याचे निर्देश देण्यात आले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दूरवरून शाळेत येणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना सायकल उपलब्ध करून देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.

   पाणीपुरवठा विभागाला जुन्या योजनांची दुरुस्ती, रिचार्ज शाफ्ट उभारणी करण्याचे सूचित करून पाणीटंचाई निधी तातडीने वितरित केला जाईल असेही सांगण्यात आले. 
      
    वाचन संस्कृतीला बाळकट करण्यासाठी जिल्ह्यातील  १०० गावात "मॉडेल वाचनालये" तयार करण्यात येणार असून त्यासाठी वापरात नसलेल्या शासकीय इमारतींचा उपयोग करावा असे निर्देश मा. मंत्री महोदय यांनी दिलेत.  

     एल निनो च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणात राबविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. प्रत्येक गावात नाला खोलीकरण, शेततळे आणि इतर उपाययोजना हाती घेण्यावर भर देण्यात आला. शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, सिंचन, घरकुल दिवाबत्ती आणि सौर ऊर्जा या विषयांना प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी  बैठकीत दिले. याशिवाय, यावर्षी कोणत्याही निधीतून अनावश्यक सिमेंट रस्त्यांची कामे करू नयेत आणि गावांतील पथदिवे सौर ऊर्जेवर रूपांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

                           00000


 

DIO NEWS AMRAVATI 22.05.2026

                                        महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे -अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे *महसूल विभागाच्या विविध का...