Monday, August 17, 2026

मृद आणि जल संवर्धनावर रिल बनवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा...


मृद आणि जल संवर्धनावर रिल बनवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा... #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रिलस्पर्धा #MahaWalkathon #WalkForWater #SaveSoilSaveWater

 

एक रिल पाण्यासाठी, एक रिल मातीसाठी! ‘रिल फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ राज्यस्तरीय रिल स्पर्धा.


 एक रिल पाण्यासाठी, एक रिल मातीसाठी!

‘रिल फॉर सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन’ राज्यस्तरीय रिल स्पर्धा. #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रिलस्पर्धा #MahaWalkathon #WalkForWater #SaveSoilSaveWater

'Mahawalkathon Walk for Water 2026'


 माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीदिनी शुक्रवार दि. २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त राज्यातील सर्व जिल्ह्यांत आयोजित करण्यात आलेल्या ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर २०२६’ मध्ये सहभागी व्हा. यानिमित्त जलसंधारणाचा संदेश देणाऱ्या रिल स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी अधिकृत QR कोड स्कॅन करा. या जनजागरणात आपल्यापैकी प्रत्येकजण सहभागी होऊया... जलदूत बनून पाण्यासाठी चालूया, पाणी अडवा पाणी जिरवा या मूलमंत्राला जगवूया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

@Dev_Fadnavis
'Mahawalkathon Walk for Water 2026'

Saturday, August 15, 2026

DIO NEWS AMRAVATI 15.8.2026













जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा

जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

उत्कृष्ट कार्यासाठी जिल्ह्यातील विविध अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सत्कार

 

अमरावती, दि.15(जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

 

         स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात देशप्रेम व उत्साहाचे वातावरण होते. वंदेमातरम् गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या औचित्याने कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गीताने झाली. यानंतर   जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली यावेळी पोलीस बँड पथकाकडून राष्ट्रगीत व महाराष्ट्र सादर झाले.

 

     यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व  विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व उपस्थिती विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांना जिल्हाधिकारी यांनी  महिलांचे लैंगीक शोषण प्रतिबंध कायदा, नशामुक्ती, जलसंधारण आणि साक्षरतेची शपथ दिली.

 

जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान

 

जिल्हास्तरावर उत्कृष्ट  कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.जिल्हाधिकार्यालयातील निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी शिवाजी शिंदे यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून गौरविण्यात आले.तिवसा तहसीलदार मयुर कळसे आणि अचलपूरचे तहसीलदार सुदर्शन शहारे यांना उत्कृष्ट तहसीलदाराच्या पुरस्काराने गौरविण्यात. धारणी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार राजेश माळी यांना उत्कृष्ट नायब तहसीलदार म्हणून गौरविण्यात.

 

          तहसिल कार्यालय, अंजनगाव सुर्जी चे सहायक  महसूल अधिकारी राहुल चव्हाण,मोर्शी तहसिल कार्यालययातील मंडळ अधिकारी मेघा खाडे, जिल्हधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक प्रतिक पावडे,तहसिल कर्यालय अंजनगाव सुर्जी चे ग्राम महसूल अधिकारी मनोज रुमाले,उपविभागीय अधिकारी कार्यालय चांदुर रेल्वेचे लघुलेखक बंटी कावरे,तहसिल कार्यालय, अचलपुर येथील वाहन चालक नंदकिशोर पावडे,अमरावती तहसिल कार्यालयाचे शिपाई मुन्ना तडोला,तहसील कार्यालय येथील  धामणगाव रेल्वे महसूल सेवक-कोतवाल नितीन पडधान कोतवाल, तहसील कार्यालय, भातकुली अंतर्गत पोलीस पाटील प्रशांत वानखडे आणि जिल्हास्तरावर नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विषयक उत्कृष्ट कार्य करणारे शोध व बचाव पथक प्रमुख सचिन धरमरकर यांना उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले.

 

      जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचाही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वंदे मातरम आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वंदे मातरम आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

              ०००००


















स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

जलसंधारण, शेतकऱ्यांच्या मदतीवर भर - दादाजी भुसे

 

    अमरावती, दि. 15 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३०८ कोटी रुपयांची शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. त्यासोबतच जलसंधारणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहे. येत्या काळातही जलसंधारण आणि शेतकऱ्यांना मदतीवर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

     स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलिस अधीक्षक निकेतन कदम आदी उपस्थित होते.

     मंत्री श्री. भुसे यांनी, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी 'जलसंधारण अभियान' राबवले जाणार आहे. तसेच, २१ ऑगस्ट रोजी माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 'जलसंधारण दिन' साजरा करण्यात येणार आहे. त्यासोबतच काही भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मदत व्हावी, म्हणून कर्जमुक्ती झालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येत आहे.

     शिक्षण क्षेत्रातही धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत अनिवार्य करण्यात आले आहे. शिक्षण क्षेत्रात मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, यासाठी केंद्रप्रमुख पदांची भरती करण्यात आली आहे, तसेच पवित्र पोर्टलद्वारे ३० हजार शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. २६ जानेवारी रोजी २ कोटी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सामूहिक कवायतीची 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली असल्याचे सांगितले.

     जिल्ह्यात पायाभूत सुविधा आणि ग्राम विकासासाठी जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रामुख्याने पांदण रस्त्यांसाठी निधी देण्यात आला असून यामुळे शेतकऱ्‍यांचे वहीवाटीचे रस्ते उपलब्ध करून होणार आहे. चिखलदरा हे परिपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी निधी देण्यात येत आहे. येथील स्कायवॉकचे वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विकासात योगदान देणारे अमरावती विमानतळ विस्तारीकरण, नाईट लँडिंग सुविधा आणि पायलट प्रशिक्षण केंद्र उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. तसेच वस्त्रोद्योग विकासासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.

     यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. महेश पाटील, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा, पोलिस उपअधिक्षक तयुब युनुस मुजावर, नागरी हक्क संरक्षण च्या पोलिस अधीक्षक अनिता पाटील, पोलिस निरीक्षक अशोक लांडे, सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल काळे, पोलिस हवालदार प्रशांत भटकर, त्र्यंबक मनोहर, राजेश पांडे, प्रभाकर बोदडे, हेड कॉन्स्टेबल निलेश अंबर्ते, दिपमाला साळुंखे, अतुल कडू, प्रदिप बद्रे, मिलींद बेलसरे, हरीना नेत्रदान समितीचे मनोज राठी, राजेंद्र वर्मा, रामप्रकाश मिश्रा, मुकेश लोहिया, शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविल्याबद्दल सारांश सारडा, गार्गी कुऱ्हाडे, दिया पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जलसंधारण, व्यसनमुक्ती, पॉश कायदा, साक्षरतेची शपथ घेण्यात आली. तसेच जलसंधारणाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

 00000












पालकांनी पाल्यांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे

   - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

 

जिल्हा परिषद कन्या शाळेत देशभक्ती गीतांवर विद्यार्थिनीं सादर केल्या उत्कृष्ट कवायती

गुणवंत विद्यार्थिनींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून १ लाखांचा प्रोत्साहन निधी जाहीर

      अमरावती, दि.१५ (जिमाका) : विद्यार्थी भविष्यातील  देशाचे सुजान नागरीक आहेत.दैनंदिन जीवनात  इतर गोष्टींमध्ये तडजोड करा मात्र, पाल्यांच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड न करता पालकांनी त्यांच्या शिक्षणाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री  दादाजी भुसे यांनी  आज येथे केले.जिल्हा परिषद कन्या शाळेला सुविधांसाठी शासनाच्यावतीने पूर्ण सहकार्य करण्यात येईल असे सांगत प्रत्येक वर्गात गुणानुक्रमे येणाऱ्या पहिल्या तीन विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून १ लाख रुपयांचा निधीही त्यांनी शाळेसाठी जाहीर केला.

     स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमानंतर शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी शहरातील जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट दिली यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. जिल्हाधिकारी आशिष येरेकर, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सिद्धेश्वर काळुसे,  शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख, जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण आंधळे आदी यावेळी उपस्थित होते.

      मंत्री श्री. भुसे म्हणाले, या शाळेत गुणात्मक शिक्षणासह मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात व सैनिकी प्रशिक्षणही दिले जात असल्याची बाब कौतुकास्पद आहे. मुलींच्या कला व क्रीडा गुणांनाही प्राधान्य देण्यात येत आहे ही समाधानाची बाब आहे. शाळा  व शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर आहे. यासोबतच शाळेतील अन्य आवश्यक सुविधांसाठी शासनातर्फे पूर्ण मदत करण्यात येईल. शाळांमधून चांगले संस्कार व गुणात्मक शिक्षण मिळते व यातूनच देशाचे सुजान नागरीक घडतात म्हणून पालकांनी कोणतीही तडजोड न करता पाल्यांना शिकवावे असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनीही चांगला अभ्यास करून आई-वडिल, गुरुजन,कुटुंब,गाव,राज्य व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असा संदेशही त्यांनी दिला. कन्या शाळेतील गुणवंत विद्यार्थींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून १ लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.

     तत्पूर्वी, विद्यार्थींनी ‘बलसागर भारत होवू विश्वात  शोभूनी राहू, ‘मेरा देश मेरा मुल्क मेरा ये वतन अशा एकानेक देशभक्ती गींतावर सुंदर कवायती सादर केल्या.

       विविध परीक्षांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या श्रावणी सोनोने,जाणीव नंदेश्वर, अंतरा वाट, अनुष्का सूर्यवंशी या विद्यार्थींनीचा यावेळी मंत्री भुसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गजानन पवार ,सुदाम वानखडे  आणि श्रीराम मकेश्वर या माजी सैनिकांचा तसेच शाळेचे माजी मुख्याध्यापक नारायणराव वानखडे यांचाही सत्कार करण्यात आला. वंदेमातरम व राष्ट्रीगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

                                                       ००००००

 









 

मृद आणि जल संवर्धनावर रिल बनवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा...

मृद आणि जल संवर्धनावर रिल बनवा आणि स्पर्धेत सहभागी व्हा... #वॉकेथॉन२०२६ #वॉकफॉरवॉटर #रिलस्पर्धा #MahaWalkathon #WalkForWater #SaveSoil...