Tuesday, May 26, 2026

DIO NEWS AMRAVATI 26.05.2026

 विद्यार्थ्यांनी बँक खात्यांची अचूक माहिती द्यावी

शाहू महाराज पुरस्कारासाठी 31 मेपर्यंत संधी

अमरावती, दि. 26 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड चुकीचे असल्याने त्यांच्या खात्यात अद्याप पुरस्काराची रक्कम जमा होऊ शकलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 31 मेपर्यंत अचूक माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविलबद्दल 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार' प्रदान करण्यात येतो. विद्यार्थ्यांनी आपल्या मूळ अर्जात चुकीचे बँक खाते क्रमांक किंवा आयएफएससी कोड नमूद केल्यामुळे त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास अडचण येत आहे.

याबाबत समाज कल्याण कार्यालयाकडून महाविद्यालयांना सूचना देण्यात आली आहे. परंतू महाविद्यालयांनी अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांचे अचूक बँक तपशील समाज कल्याण कार्यालयाकडे जमा केलेले नाहीत. त्यामुळे महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यावर पुरस्काराची रक्कम त्वरित जमा व्हावी, यासाठी संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे अचूक बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड दुरुस्त करून 31 मे पर्यंत समाज कल्याण कार्यालयात संपर्क साधून ते जमा करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

00000000

उर्ध्व वर्धातून खरीप सिंचनासाठी तीन पाणीपाळ्या प्रस्तावित

*शेतकऱ्‍यांनी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 26 (जिमाका) : उर्ध्व वर्धा प्रकल्पातून खरीप हंगामासाठी पाणीसाठा उपलब्ध असल्यास तीन पाणीपाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी दि. 31 जुलैपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून 95.50 किमीपर्यंत आणि डावा मुख्य कालव्याच्या 42.40 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसचित नदी, नाल्यांवरील लाभधारकांना खरीप हंगामासाठी पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ या तत्वानुसार सिंचन करण्यात येणार आहे.

खरीप हंगामात दि. 1 जुलै  ते 14 नोव्हेंबर 2026 या कालावधीत मागणीप्रमाणे तीन पाणी पाळ्या देण्यात येतील. कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7 संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून दि. 31 जुलैपर्यंत सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. लाभक्षेत्रातील कालव्यापासून 35 मीटर पर्यतच्या विहिरींच्या पाण्याने सिंचित होत असलेल्या ऊस, कापूस, केळी व फळबाग या नगदी पिकांसाठी पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के दर लागू राहणार आहे. यासाठी उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

उर्ध्व वर्धा जलाशयजवळील जमीन भाडेपट्टीसाठी अर्ज आमंत्रित

अमरावती, दि. 26 (जिमाका) : उर्ध्व वर्धा जलाशयाच्या सभोवतालची जमीन भाडेपट्टीवर देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

उर्ध्व वर्धा जलाशयाच्या बुडीत क्षेत्राच्या काठाभोवतालची 342.50 मीटर ते 343 मीटर तलांकातील अमरावती जिल्ह्यातील 298.22 हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील 30.60 हेक्टर गाळपेर जमीन रब्बी हंगाम आणि तलांक 340 मीटर ते 342.50 मीटरमधील अमरावती जिल्ह्यातील 806 हेक्टर आणि वर्धा जिल्ह्यातील 53 हेक्टर जमीन दरवर्षी उन्हाळी हंगामाकरीता उपलब्ध होऊ शकते.

ही गाळपेर जमीन भाडेपट्टीवर देण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. भाडेपट्टीचा दर हा जलसंपदा विभागाच्या पत्रानुसार एका वर्षात दोन पिके घेतली गेल्यास प्रति हेक्टरी 2 हजार रूपये प्रति 11 महिन्यासाठी आणि एका वर्षात एकच पिक घेतले गेल्यास प्रति हेक्टरी 1 हजार रूपये प्रति 11 महिन्यासाठी भरणे आवश्यक आहे, असे उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

00000000

मतदारयाद्यांचे मॅपिंग तातडीने पूर्ण करावे

अमरावती विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना आवाहन

अमरावती, दि. 26 (जिमाका) : मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 अंतर्गत अमरावती विधानसभा मतदारसंघात पूर्वतयारी सुरू आहेत. या अंतर्गत नागरिकांची 2002 मधील मतदारयादी आणि सध्याची मतदार यादी यांची आपापसात मॅपिंग करण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधित बीएलओंना भेटून मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

38 - अमरावती विधानसभा मतदारसंघात अद्यापही 24 टक्के मतदारांचे मॅपिंग होणे बाकी आहे. त्यामुळे ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही, त्यांनी तातडीने आपल्या भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. ज्या मतदारांचे बीएलओंकडून मॅपिंग पूर्ण झाले आहे, त्यांची 'एसआयआर' प्रक्रिया अत्यंत सोप्या आणि सुरळीत पद्धतीने पार पडणार आहे. मात्र, ज्यांचे मॅपिंग झालेले नसेल, अशा मतदारांना या प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी वेगवेगळी कागदपत्रे सादर करावी लागतील. हा त्रास टाळण्यासाठी मतदारांनी स्वतःहून पुढाकार घेणे गरजेचे आहे.

अनेक मतदारांची नावे मतदारयादीत दोन ठिकाणी असण्याची शक्यता असते. अशा मतदारांनी सध्या ते जेथे वास्तव्यास आहेत किंवा ज्या ठिकाणी त्यांना मतदानाचा हक्क हवा आहे, तेथील नाव कायम ठेवावे. तर दुसऱ्या ठिकाणचे नाव कमी करण्यासाठी मतदार नोंदणी अधिकारी किंवा संबंधित बीएलओंकडे 'नमुना अर्ज क्र. 7' सादर करावा, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

मतदान प्रक्रियेत सुलभता आणि अचूकता आणण्यासाठी नागरिकांनी आपल्या बीएलओंची भेट घेऊन मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच दुबार नावांच्या सुधारणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिल भटकर आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार विजय लोखंडे यांनी केले आहे.

0000000


Monday, May 25, 2026

DIO NEWS AMRAVATI 25.05.2026

 बाल स्वास्थ्य कार्यक्रमात 879 बालकांना जीवदान

*4 हजार 547 इतर शस्त्रक्रिया यशस्वी

अमरावती, दि. 25 (जिमाका) : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम हा जिल्ह्यातील हजारो बालकांना आशेचा किरण ठरला आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमात गंभीर आजारग्रस्त असलेल्या बालकांना नवजीवन देण्यात आले आहे. मागील काही वर्षांत जिल्ह्यात 879 हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आल्या आहे. याशिवाय 4 हजार 547 इतर शस्त्रक्रिया करून गरजू कुटुंबांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. या सर्व शस्त्रक्रियांसाठी बालकांच्या पालकांना एक रुपयाही खर्च करावा लागलेला नाही.

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. अंगणवाडी ते शाळा स्तरावरील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचून संपूर्ण बालकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. दुर्गम भागातही आरोग्य सेवा पोहोचवून आजारांचे वेळेत निदान करणे ही या योजनेची खरी ताकद ठरली आहे.

योजनेत जन्मजात हृदय रोग, जन्मजात नेत्र रोग, जन्मजात कर्णदोष, दुभंगलेले ओठ व टाळू, हर्निया व हायड्रोसील, डोळ्यांचा तिरळेपणा, दंतरोग, फायमोसीस, हाडांचे इतर आजार आणि टॉन्सिल्स या प्रमुख शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या मोहिमेत नामवंत रुग्णालयांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. यात अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. पाटील कान, नाक, घसा हॉस्पिटल, आचार्य विनोबा भावे रुग्णालय, सावंगी, कोकिळाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई, एसआयसीसी चिल्ड्रन हॉस्पिटल, मुंबई, नेल्सन हॉस्पिटल, नागपूर, किम्सवे हॉस्पिटल, नागपूर, स्वास्थम हॉस्पिटल, नागपूर आणि संजीवनी हॉस्पिटल, मुंबई यांनी प्रमुख शस्त्रक्रिया केली.

जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या पथकांमार्फत तालुकास्तरावर बालकांना मोफत सेवा पुरविली जात आहे. जिल्ह्यातील बालकांना दुर्धर आजार असल्यास या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी केले आहे.

0000000

सोमवारी 'डाक अदालत'चे आयोजन

अमरावती, दि. 25 (जिमाका): भारतीय डाक खात्याच्या वतीने अमरावती विभागातील ग्राहकांच्या प्रलंबित तक्रारींचे निवारण करण्यासाठी सोमवार, दि. 2 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयात 'डाक अदालत' आयोजित करण्यात आले आहे.

या डाक अदालतीमध्ये प्रामुख्याने स्पीड पोस्ट, नोंदणीकृत पार्सल, काऊंटर सेवा, बचत बँक खाते आणि मनीऑर्डर यांसारख्या सेवांशी संबंधित तक्रारी विचारात घेतल्या जातील. विशेषतः अशा तक्रारी, ज्यांचे निवारण सहा आठवड्यांच्या आत झाले नसेल किंवा ज्यांना विभागाकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा प्रकरणांची दखल येथे घेतली जाणार आहे.

तक्रारदारांनी आपला अर्ज सादर करताना त्यामध्ये मूळ तक्रार केल्याची तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पद, आणि तक्रारीचा संपूर्ण तपशील नमूद करणे आवश्यक आहे. हे अर्ज 'प्रवर अधीक्षक डाकघर, अमरावती विभाग, अमरावती - 444602' यांच्या नावे पाठवावेत. सर्व संबंधित अर्ज 1 जूनपूर्वी कार्यालयात पोहोचणे अनिवार्य आहे, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

0000000

लाभार्थ्यांनी ह्यात प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र

30 सप्टेंबरपूर्वी सादर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 25 (जिमाका) : भातकुली तालुक्यामधील विविध विशेष सहाय्य योजनांच्या सर्व लाभार्थ्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी ह्यात प्रमाणपत्र आणि दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र वेळेत सादर करावे, असे आवाहन भातकुलीचे तहसीलदार अक्षय मंडवे यांनी केले आहे.

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी वर्षातून एकदा ह्यात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. केंद्र पुरस्कृत योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारने बेनिफिशरी सत्यापन ॲप विकसित केले आहे.

लाभार्थी स्वतःच्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करून ऑनलाइन पद्धतीने ह्यात प्रमाणपत्र मोफत सादर करू शकतात. स्वतःचा मोबाईल नसल्यास लाभार्थी आपल्या नातेवाईकांमार्फत किंवा गावातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायतमधील संगणक परिचालक, कर्मचारी यांच्या मदतीने हे काम पूर्ण करू शकतील. लाभार्थ्यांना सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र किंवा नागरी सेवा केंद्रावर जाऊनही हे प्रमाणपत्र सादर करता येईल. येथे प्रक्रिया केल्यास 50 रूपये सेवा शुल्क द्यावे लागणार आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या नियमानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना वैश्विक ओळखपत्र प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अनेक दिव्यांगांनी अद्याप प्रमाणपत्र मिळालेले नसल्याची बाब लक्षात घेऊन, दिव्यांग सक्षमीकरण विभागाने या प्रक्रियेला दि. 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

तालुक्याबाहेरील आणि स्थानिक पात्र लाभार्थ्यांनी कोणत्याही तांत्रिक अडचणी किंवा मानधनात खंड पडू नये, यासाठी बेनिफिशरी सत्यापन ॲपवरून ह्यात प्रमाणपत्र त्वरित नोंदवावे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र सादर करावे, असे आवाहन भातकुली तहसिलदार यांनी केले आहे.

00000

मतदारयाद्यांची 'विशेष सखोल पुनरिक्षण' मोहीम

*जूनपासून प्रत्यक्ष पडताळणीला सुरुवात

अमरावती, दि. 25 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण देशात मतदार याद्यांचे 'विशेष सखोल पुनरिक्षण' घेण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर झाला आहे. यात महाराष्ट्राचा समावेश आहे. या मोहिमेत राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

देशात यापूर्वी 1952 ते 2004 दरम्यान विविध वर्षांमध्ये अशी मोहीम राबवण्यात आली होती. मात्र, मागील 20 वर्षांत केवळ 'विशेष संक्षिप्त पुनरिक्षण' घेण्यात आले असून 'विशेष सखोल पुनरिक्षण' झालेले नाही. या काळात झपाट्याने झालेल्या शहरीकरणामुळे लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झाले. अनेक मतदारांनी नवीन ठिकाणी नाव नोंदवले, पण जुन्या ठिकाणचे नाव वगळले नाही. परिणामी मतदारयाद्यांमध्ये दुबार नावे वाढली असण्याची शक्यता असल्याने ही पडताळणी केली जात आहे.

राज्यातील क्षेत्रीय यंत्रणा सध्या जनगणनेच्या कामात व्यस्त असल्याने निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वेळापत्रक निश्चित केले आहे. ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबर 2026 मध्ये पूर्ण होईल. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि बीएलओ यांचे प्रशिक्षण. 30 जून ते 29 जुलै दरम्यान 'बीएलओ' घरोघरी जाऊन गणना अर्ज वाटप करतील व भरलेले अर्ज परत घेतील. 5 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान प्रारुप यादीवर दावे व हरकती नोंदवणे. 3 ऑक्टोबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढणे. 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

राज्यातील एकूण 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1 लाख 253 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत 'बीएलओ' घरोघरी जाऊन आधीच माहिती भरलेले 'गणना प्रपत्र' मतदारांना देतील. यात मतदाराची सध्याची माहिती तसेच 2002-2004 मधील जुनी माहिती भरलेली असेल किंवा ती मतदाराला स्वतः भरता येईल. मतदारांना ही जुनी माहिती निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळावरूनही मिळवता येईल. मतदारांना हे गणना प्रपत्र ऑनलाइन पद्धतीनेही भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. गृहभेटीदरम्यान घर बंद आढळल्यास अधिकारी किमान 3 वेळा भेट देतील. आजमितीस राज्यात 72.04 टक्के जुन्या नोंदींचे मॅपिंग पूर्ण झाले आहे.

मतदार यादीतील व्यक्ती भारतीय नागरिक आहे, याची खातरजमा करण्याची जबाबदारी आयोगावर आहे. मतदारयादीत नोंदी जुळल्या नाहीत तर संबंधित मतदारांना नोटीस पाठवून कागदपत्रे सादर करण्यास सांगितले जाईल. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 'आधार' हे केवळ ओळख पुरावा म्हणून वापरले जाते. आधार अ‍ॅक्ट, 2026 च्या कलम 9 प्रमाणे आधार कार्ड हे नागरिकत्वाचा पुरावा म्हणून मानले जाणार नाही, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात येणारे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी सहकार्य करणार आहेत. यामुळे दुबार व मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे सोपे होईल. राज्यात सध्या राजकीय पक्षांनी फक्त 1 लाख 13 हजार 558 'बीएलए' नेमले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त प्रतिनिधी नियुक्त करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

जिल्हा सामान्य रुग्णालयात 'जागतिक स्झिझोफ्रेनिया दिन' साजरा

अमरावती, दि. 25 (जिमाका) : जिल्हा सामान्य रुग्णालयात 'जागतिक स्झिझोफ्रेनिया दिन' साजरा करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. रुपिकेश होले, भावना पुरोहित, प्रमोद भक्ते, सुनील कळतकर, विशाल झामरे, सायली डंभे उपस्थित होते.

डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. अमोल गुल्हाने आणि भावना पुरोहित यांनी 'स्झिझोफ्रेनिया' या गंभीर मानसिक आजाराविषयी मार्गदर्शन केले. आजाराची लक्षणे, त्याचे वेळेवर निदान कसे करावे आणि उपलब्ध उपचार पद्धती कोणत्या आहेत, याबाबत माहिती दिली. विशाल झामरे यांनी सूत्रसंचालन केले. सायली डंभे यांनी आभार मानले.

00000000

भातकुली तहसिल कार्यालयात

आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

अमरावती, दि. 25 (जिमाका): भातकुली जैन तहसिल कार्यालयात दि. 1 जूनपासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने पावासाळ्याचे कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हवा, वादळी पाऊस, सतत पाऊस, अतिवृष्टी, ढगफुटी, पूर इत्यादी कारणामुळे पशूहानी, जिवीत हानी उद्भवल्यास, त्याबाबतची माहिती तहसिल कार्यालय, भातकुली येथील दूरध्वनी क्रमांक 0721-2389001 वर तात्काळ कळवावी, असे आवाहन भातकुलीचे तहसिलदार अक्षय मंडवे यांनी कळविले आहे.

00000

समाज कल्याणच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

अमरावती, दि. 25 : सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनातर्फे सर्व सोयी-सुविधा पूर्णपणे मोफत पुरविल्या जातील.

शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये इयत्ता आठवी ते दहावी (शालेय), कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट डाऊनलोड करावी. डाऊनलोड केलेली प्रिंट घेऊन संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

मुलांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. १, २, ३ आणि निंभोरा), संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह (निंभोरा), तसेच मुलींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (कॅम्प, जेल रोड युनिट क्र. ४, आणि १२५वी जयंती वसतिगृह) प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. तसेच तालुकास्तरावरही आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांसाठी अर्ज संबंधित वसतिगृहात सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शालेय अभ्यासक्रम आठवी ते दहावीसाठी ३० जून, कनिष्ठ महाविद्यालयासाठी १५ जुलै, अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १५ जुलै, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्रपणे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी ०७२१-२६६१२६१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा समाज कल्याण आयुक्त कार्यालयात संपर्क साधावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

0000000

समाज कल्याणच्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

अमरावती, दि. 25 : सामाजिक न्याय विभागाच्या जिल्ह्यातील मागासवर्गीय मुला-मुलींच्या शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या वसतिगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनातर्फे सर्व सोयी-सुविधा पूर्णपणे मोफत पुरविल्या जातील.

शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये इयत्ता आठवी ते दहावी (शालेय), कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन अभ्यासक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट डाऊनलोड करावी. डाऊनलोड केलेली प्रिंट घेऊन संबंधित वसतिगृहामध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

मुलांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (युनिट क्र. १, २, ३ आणि निंभोरा), संत गाडगे महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह (निंभोरा), तसेच मुलींसाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह (कॅम्प, जेल रोड युनिट क्र. ४, आणि १२५वी जयंती वसतिगृह) प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. तसेच तालुकास्तरावरही आठवी ते दहावी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांसाठी अर्ज संबंधित वसतिगृहात सादर करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शालेय अभ्यासक्रम आठवी ते दहावीसाठी ३० जून, कनिष्ठ महाविद्यालयासाठी १५ जुलै, अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी १५ जुलै, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी स्वतंत्रपणे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे.

अधिक माहितीसाठी ०७२१-२६६१२६१ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा समाज कल्याण आयुक्त कार्यालयात संपर्क साधावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.

0000000


Friday, May 22, 2026

DIO NEWS AMRAVATI 22.05.2026












                                महसूल विभागाने जबाबदारी घेऊन कार्य करावे

-अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे

*महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी

अमरावती, दि. 22 (जिमाका) : महसूल विभाग हा समाजासाठी कार्य करणारा विभाग आहे. त्यामुळे विविध परिस्थितीमध्ये अनपेक्षित जबाबदाऱ्या या विभागावर येतात. मात्र जनतेसाठी कार्य करावयाचे असल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जबाबदारी घेऊन कार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज श्री. खारगे यांनी महसूलच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. यावेळी विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज आदी अधिकारी उपस्थित होते.

श्री. खारगे यांनी महसूलमधील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस दौरा करावा. यामुळे प्रशासनावर पकड मजबूत करण्यास मदत होणार आहे. दौरा करताना विविध विकासकामांची तपासणी केल्यास तथ्य जाणून घेण्यास मदत मिळणार आहे. त्यासोबतच जनतेशी भेटावे. त्यांनी दिलेल्या निवेदनांवर सकारात्मक कारवाई करावी. निवेदनावर केलेली कारवाई कळवावी. यामुळे नागरिकांच्या अडचणी लक्षात येतात. हे सर्व करीत असताना अधिनस्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधून समस्याही जाणून घ्याव्यात. प्रशासनाने नागरिकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी व्यवस्था निर्माण करावी. त्यांच्या तक्रारींचा मागोवा घ्यावा. शासनने ईज ऑफ डुइंग बिझनेसचे धोरण स्विकारले आहे. त्यानुसार 12 दुरूस्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्ह्याची संक्षिप्त माहिती दिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणारे विविध उपक्रमांची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रामुख्याने जिल्ह्यात लोकसहभागातून निर्माण करण्यात येणाऱ्या पांदन रस्त्याची माहिती दिली. तसेच रहिवासी जमिन नियमानुकूल करणे, पट्टेवाटप करणे, मिळकत पत्रिका वाटप करणे याबाबत माहिती दिली.

दरम्यान श्री. खारगे यांनी सकाळी अमरावती उपविभागीय अधिकारी कार्यालय, अमरावती तहसील कार्यालय, सहनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालय, वडाळी मंडळ अधिकारी कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी कार्यरत कर्मचारी यांच्याकडून कामकाजाची माहिती घेतली.

000000

Thursday, May 21, 2026

DIO NEWS AMRAVATI 21.05.2026

 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात 453 मतदार, 7 मतदान केंद्र

विभागांनी समन्वयाने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

अमरावती, दि. 21 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी सोमवार, दि. 25 मे रोजी अधिसुचना प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 453 मतदार असून उपविभागीय अधिकारी स्तरावर मतदान केंद्र राहणार आहे, निवडणुकीसाठी अल्प कालावधी असल्याने सर्व विभागांनी समन्वाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणूक निमित्ताने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे निवडणुकीशी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी लागणारी आचारसंहिता जशीच्या तशी लागू करण्यात आली आहे. याची नोंद निवडणुकीशी संबंधितांनी घ्यावी. मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी उपविभागीय स्तरावर मतदान केंद्र राहणार आहे. मतदारांची ड्राफ्ट यादी तयार झाली असून सर्व राजकीय पक्षांना ती पाठविण्यात येईल. यावरील हरकतीनंतर मतदारयादी अंतिम करण्यात येणार आहे. आचारसंहितेसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती नेमणे आवश्यक आहे. त्यानुसार कारवाई करण्यात यावी.

आचारसंहितेच्या कालावधीत कामे प्रस्तावित करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती स्थापन करण्यात आली आहे. कामे प्रस्तावित करणे आवश्यक असल्यास या समितीकडे पाठविण्यात याव्यात. मतदार कमी असल्याने त्यांना प्रलोभन देण्याचे प्रकार होण्याची शक्यता असल्याने याबाबत काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली.

00000000

पसंतीच्या दुचाकी क्रमांकासाठी सोमवारी अर्ज करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 21 (जिमाका) : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे परिवहनेत्तर (दुचाकी) संवर्गातील वाहनांसाठी नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत आहे. या मालिकेतील आवडते किंवा पसंतीचे क्रमांक मिळवण्यासाठी इच्छुक वाहनधारकांनी सोमवार, दि. 25 मे रोजी अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयात 25 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंतच खिडकी क्रमांक 25 अर्ज स्वीकारले जातील. यासाठी वाहन ज्या व्यक्तीच्या नावावर आहे, त्या व्यक्तीच्या नावाचा अर्ज, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक अर्जावर नमूद करणे अनिवार्य आहे. पसंती क्रमांकाचे विहित शुल्क अमरावती कॅम्प ब्रँच, ट्रेझरी ब्रँच कोड नं. 003866 करिता देय असलेल्या डिमांड ड्राफ्टद्वारे भरणे आवश्यक आहे.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज असेल किंवा एकापेक्षा जास्त अर्ज आले असतील, अशा क्रमांकाची यादी 25 मे रोजीच सायंकाळी 4 वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावली जाईल. एकाच क्रमांकासाठी दोन किंवा अधिक अर्ज आले असल्यास 26 मे रोजी दुपारी 1.30 वाजेपर्यंत मूळ शुल्काव्यतिरिक्त जादा रकमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात खिडकी क्र. 25 वर जमा करावा लागणार आहे. दुपारी 3 वाजता प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात लिफाफे उघडले जातील. सर्वाधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट असलेल्याला पसंती क्रमांक दिला जाईल. उर्वरित अर्जदारांचे डीडी परत केले जातील, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी कळविले आहे.

000000

दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शपथ कार्यक्रम

अमरावती, दि. 21 (जिमाका) : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 21 मे रोजी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’साजरा केला जातो. यानिमित आज जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी गोविंदा दानेज यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ दिली. 

 दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

 

00000000

DIO NEWS AMRAVATI 21.05.2026


 

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात 453 मतदार, 7 मतदान केंद्र

विभागांनी समन्वयाने काम करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

 

       अमरावती, दि. 21 (जिमाका) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी सोमवार, दि. 25 मे रोजी अधिसुचना प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 453 मतदार असून उपविभागीय अधिकारी स्तरावर मतदान केंद्र राहणार आहे, निवडणुकीसाठी अल्प कालावधी असल्याने सर्व विभागांनी समन्वाने कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

     स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणूक निमित्ताने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे निवडणुकीशी संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, उपजिल्हाधिकारी दुर्गा देवरे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित होते.

      जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी लागणारी आचारसंहिता जशीच्या तशी लागू करण्यात आली आहे. याची नोंद निवडणुकीशी संबंधितांनी घ्यावी. मतदान प्रक्रिया सुलभ होण्यासाठी उपविभागीय स्तरावर मतदान केंद्र राहणार आहे. मतदारांची ड्राफ्ट यादी तयार झाली असून सर्व राजकीय पक्षांना ती पाठविण्यात येईल. यावरील हरकतीनंतर मतदारयादी अंतिम करण्यात येणार आहे. आचारसंहितेसाठी जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती नेमणे आवश्यक आहे. त्यानुसार कारवाई करण्यात यावी.

     आचारसंहितेच्या कालावधीत कामे प्रस्तावित करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. त्यानुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती स्थापन करण्यात आली आहे. कामे प्रस्तावित करणे आवश्यक असल्यास या समितीकडे पाठविण्यात याव्यात. मतदार कमी असल्याने त्यांना प्रलोभन देण्याचे प्रकार होण्याची शक्यता असल्याने याबाबत काळजी घेण्याची सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली.

00000

Wednesday, May 20, 2026

DIO NEWS AMRAVATI 20.05.2026

 


स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांची निवडणूक उपविभागीय स्तरावर होणार

*राजकीय पक्षांच्या बैठकीत जिल्हाधिकारी यांची माहिती

अमरावती, दि. 20 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. ही निवडणूक उपविभागीय अधिकारीस्तरावर होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या निवडणूक निमित्ताने जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबतच बैठक घेतली. बैठकीसाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे उपस्थित होते.

बैठकीत स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी जाहीर करण्यात आलेला कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. तसेच निवडणूक काळात आदर्श आचारसंहिता राहणार असून त्याचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उमेदवार, प्रचार करणारे व्यक्ती आणि निवडणुकीशी संबंधितांसाठी मार्गदर्शक सूचना आहेत, त्यानुसार कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. मंत्री आणि लोक प्रतिनिधी यांच्यासाठी वाहनाचा वापर किंवा प्रचारासाठी नियम ठरवून देण्यात आले आहे. तसेच प्रचार साहित्य तपासून देण्यासाठी माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती नेमण्यात आली असल्याचे सांगितले.

राजकीय पक्षांना मतदारांची ड्राफ्ट यादी देण्यात येणार असून यावर काही हरकती असल्यास त्या नोंदविण्यात याव्यात. सात दिवसानंतर या याद्यांना अंतिम स्वरूप देण्यात येणार असून याद्या मतदानकेंद्रनिहाय पुरविण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिली. बैठकीला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

0000000

--

DIO NEWS AMRAVATI 26.05.2026

  विद्यार्थ्यांनी बँक खात्यांची अचूक माहिती द्यावी शाहू महाराज पुरस्कारासाठी 31 मेपर्यंत संधी अमरावती, दि. 26 (जिमाका) : राजर्षी छत्रपती शाह...