जिल्हा माहिती कार्यालय,अमरावती
Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Sunday, September 20, 2026
जलयुक्त व गाळयुक्त शिवार योजना बनी किसानों के लिए राहत लोकसंवाद कार्यक्रम में लाभर्थियों ने साझा किए अपने अनुभव
Saturday, September 19, 2026
रेवसा गावात 'लोकसंवाद';
रेवसा गावात
'लोकसंवाद'; पथनाट्यातून सावकारीविरोधात जनजागृती
कर्जमुक्ती योजनेसह कृषी विभागाच्या योजनांचाही संदेश
रेवसा गावात 'लोकसंवाद'; पथनाट्यातून सावकारीविरोधात जनजागृती कर्जमुक्ती योजनेसह कृषी विभागाच्या योजनांचाही संदेश
रेवसा गावात
'लोकसंवाद'; पथनाट्यातून सावकारीविरोधात जनजागृती
कर्जमुक्ती योजनेसह कृषी विभागाच्या योजनांचाही संदेश
अमरावती, दि.१९ (जिमाका) : कमी पाऊस,
नापिकी आदी समस्यांमुळे सावकारांकडून कर्ज काढत शेती व संसाराचा गाडा हाकणारा शेतकरी
हा सावकारी पाशात कसा अडकतो व त्याचा कुटुंब व समाजावर होणारा विपरीत परिणाम चफकलपणे मांडून जिल्हा उप निबंधक कार्यालयाच्या अधिकारी-
कर्मचाऱ्यांनी रेवसा येथील शिवतांडव गणेशोत्सव
मंडळात आयोजित 'लोकसंवाद' कार्यक्रमात गावकऱ्यांचे
प्रबोधन केले.
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी
होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना',या योजनेचा गावकऱ्यांनी घेतलेला लाभ,त्यांना येत असलेल्या
अडचणी आदींबाबत त्यांच्या मनातील भावना जाणून घेण्यात आल्या. अडचणींच्या सोडवणुकीसाठी
उपलब्ध कार्यालये, यंत्रणा व संकेतस्थळ, पोर्टल आदींची माहिती देण्यात आली.
तत्पूर्वी, जिल्हा माहिती
कार्यालयाचे माहिती अधिकारी रितेश भुयार यांनी सेवासंकल्प मोहिमे अंतर्गत माहिती व
जनसंपर्क विभागाद्वारे राज्यभर राबविण्यात येत असलेल्या 'लोकसंवाद' कार्यक्रमाची माहिती
उपस्थित गावकऱ्यांना दिली.
यानंतर जिल्हा उपनिबंधक
कार्यालयाच्या सहाय्यक निबंधक स्वाती गुडधे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक निबंधक अनिरुद्ध
राऊत आणि छाया देशमुख व अन्य कर्मचारी अशा एकूण १५ जणांच्या चमूने 'सावकारी पाश' हे
पथनाट्य सादर केले. सादरीकरणानंतर प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधून महाराष्ट्र सावकारी
(नियमन) अधिनियम,२०१४ हा महाराष्ट्रातील गरिबांचे, शेतकऱ्यांचे आणि सर्वसामान्यांचे
बेकायदेशीर व अनिर्बंध सावकारीच्या जाचातून व आर्थिक शोषणातून संरक्षण करण्यासाठी लागू
करण्यात आलेल्या महत्त्वाच्या कायद्याविषयी माहिती देण्यात आली.
कृषी विभागाच्या वतीने
रेवसा येथील सहाय्यक कृषी अधिकारी छाया देशमुख यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना,
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, मागेल त्याला शेततळे,नमो
शेतकरी महासन्मान निधी योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,नानाजी देशमुख
कृषी संजीवनी योजना,राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व फलोत्पादन विकास आदींबाबत शेतकऱ्यांना
माहिती दिली.
रेवसा गावच्या पोलीस
पाटील छाया वानखडे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले व 'लोकसंवाद' उपक्रमाच्या
माध्यमातून जनतेला देण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या माहितीबद्दल समाधान व्यक्त केले.शिव
तांडव गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वानखडे,मंडळाचे पदाधिकारी, महिला,पुरुष
व तरुण-तरुणी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे
संपूर्ण राज्यभर जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून १६ ते २४ सप्टेंबर या कालावधीत
'लोकसंवाद' उपक्रम राबविण्यात येत आहे.
००००००
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी
गेल्या महिन्याभरात जिल्ह्यात पावसाचा खंड पडल्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर या पिकांच्या परिस्थिती सुधारली नाही. परिणामी उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आज तिवसा तालुक्यातील किशोर पिंपळे, राजू बहाद्दरपुरे यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली.
रेवसा गावात लोकसंवाद पथनाट्यातून सावकारीविरोधात जनजागृती
#अमरावती रेवसा गावात #लोकसंवाद पथनाट्यातून सावकारीविरोधात जनजागृती #गणेशोत्सव #लोकसंवाद२०२६
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खरीप पीक कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा - पालकमंत...



.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)
.jpg)