मेळघाटातील आदिवासी महिलांना मिळाले आरोग्य कवच भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम अमृत आहार योजना
Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
मेळघाटातील आदिवासी महिलांना मिळाले आरोग्य कवच भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम अमृत आहार योजना
मेळघाटातील भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दूल कलाम अमृत आहार योजने ने फुंकरले आदिवासी महिलांच्या जीवनात नवे चैतन्य...
मेळघाटातील भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दूल कलाम अमृत आहार योजने ने फुंकरले आदिवासी महिलांच्या जीवनात नवे चैतन्य...
मेळघाटातील भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दूल कलाम अमृत आहार योजने ने फुंकरले आदिवासी महिलांच्या जीवनात नवे चैतन्य...
मेळघाटातील भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दूल कलाम अमृत आहार योजने ने फुंकरले आदिवासी महिलांच्या जीवनात नवे चैतन्य...
जिल्हा पोलिस दलाला आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण
*47 आपत्ती प्रतिसाद किटचे वाटप
अमरावती, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यात उद्भवणाऱ्या आपत्तीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आणि जिल्हा शोध व बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी श्री. आशिष येरेकर यांच्या निर्देशानुसार, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून जिल्ह्यासाठी 'आपत्ती प्रतिसाद किट' उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या उपक्रमांतर्गत ग्रामीण आणि शहर पोलीस दलाला 47 आपत्ती प्रतिसाद किट वाटप करण्यात आली आहे. या संदर्भात गुरूवार, दि. 16 एप्रिल रोजी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिर पार पडले. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे अध्यक्षस्थानी होते.
पोलिस कर्मचाऱ्यांना आपत्ती काळात अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यात आपत्ती व्यवस्थापन किट हाताळणे, मोठी व मध्यम आकाराचे स्ट्रेचर, लाईफ जॅकेट, हॅडग्लोज, गमबूट, सेप्टी नेट, 30 मीटर रॅपलिंग रोप आणि किट स्टोरेज बॉक्सचा वापर करण्याबाबत प्रात्यक्षिक देण्यात आले. तसेच वैद्यकीय प्रथमोपचार सीपीआर, आपत्तीमध्ये जखमींना उचलण्याच्या पद्धती आणि प्राथमिक उपचार, यासह विविध आपत्तींचा सामना, पूर, आग, वीज कोसळणे, भूकंप आणि उष्माघातासारख्या परिस्थितीत घ्यावयाची काळजी व कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आली. या नाविन्यपूर्ण प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास निवासी उपजिल्हाधिकारी श्री. काकडे यांनी व्यक्त केला.
सदर प्रशिक्षणात मार्गदर्शक म्हणून क्रिएटिव न्यू टेक लिमीटेडचे प्रा. डॉ. विलास बैले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ अनुराग पचौरी, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन भारसाकडे, श्री. कढाणे आणि संतोष कविठकर उपस्थित होते. सुरेंद्र रामेकर यांनी प्रास्ताविक केले, सचिन धरमकर, विशाल निमकर, आकाश निमकर, कौस्तुभ वैद्य आणि सुमीत बांबल यांनी प्रशिक्षणासाठी सहकार्य केले.
000000
आज रंगणार बुद्ध-भीम गीतांची बहारदार मैफील
*समाज कल्याण विभागाचा पुढाकार
अमरावती, दि. 16 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून आयोजित 'सामाजिक समता सप्ताहा' निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. समाज कल्याण विभाग, अमरावतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे बुद्ध-भीम गीतांच्या बहारदार मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात शुक्रवार, दि. 17 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते समता, न्याय आणि बंधुतेचे प्रणेते होते. समाजातील अस्पृश्यता, जातीयता आणि भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. महिला आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन करत त्यांनी कायद्याच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची चळवळ उभी केली. अशा या थोर युगपुरुषाच्या विचारांचे स्मरण करणे आणि त्यांच्या कार्याला संगीतमय मानवंदना देणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
समाज कल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त माया केदार, सहाय्यक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी नागरिकांना या प्रबोधनात्मक सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.
0000000
आधारभूत खरेदी योजनेतंर्गत ज्वारी, मका खरेदीची नोंदणी प्रक्रिया सुरु
*शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन
अमरावती, दि. 16 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये रब्बी हंगाम 2025-26 अंतर्गत ज्वारी, मका खरेदी करण्यासाठी किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत दहा खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे.
अचलपूर, मोर्शी, वरूड, नांदगाव खंडेश्वर, चांदुर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूर रेल्वे, तिवसा, धामणगाव या केंद्राच्या तालुका खरेदी विक्री संघाचा समावेश राहील. हमी भावाने खरेदीसाठी नोंदणी कालावधी 30 एप्रिल 2026 पर्यंत राहील. तसेच तुर, चना पिकाच्या खरेदीसाठी आवश्यक बारदाना लवकरच उपलब्ध केल्या जाईल व खरेदी केंद्र पूर्ववत कार्यान्वित होतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्यादित मुंबईचे संचालक नितीन हिवसे यांनी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.
0000000
मेळघाटातील आदिवासी महिलांना मिळाले आरोग्य कवच भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दूल कलाम अमृत आहार योजना # नारीशक्तीवंदन # महिला _ सक्षमीकरण #NariSha...