Friday, September 18, 2026

लोकसंवाद उपक्रम ; निळकंठ गणेशोत्सव मंडळात नागरिकांनी मांडले स्वानुभव


जलयुक्त शिवार आणि गाळयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना दिलासा; लाभार्थ्यांची प्रतिक्रिया लोकसंवाद उपक्रम ;

निळकंठ गणेशोत्सव मंडळात नागरिकांनी मांडले स्वानुभव


 

जलयुक्त शिवार आणि गाळयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना दिलासा; लाभार्थ्यांची प्रतिक्रिया लोकसंवाद उपक्रम ;










जलयुक्त शिवार आणि गाळयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना दिलासा; लाभार्थ्यांची प्रतिक्रिया लोकसंवाद उपक्रम ;

निळकंठ गणेशोत्सव मंडळात नागरिकांनी मांडले स्वानुभव

 

अमरावती, दि. 18 (जिमाका) : जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने अंबागेटमधील निळकंठ व्यायाम मंडळ गणेशोत्सवात आयोजित 'लोकसंवाद' कार्यक्रमात शेतकरी जयंत सगणे यांनी 'जलयुक्त शिवार' योजनेच्या माध्यमातून जमिनीत वाढलेला जलस्तर तसेच 'गाळयुक्त शिवार' योजनेद्वारे जलसाठ्यांची पाणी साठवण क्षमता वाढून शेतातील माती सुपीकतेत झालेला सुधार याबद्दल आपला अनुभव कथन केला.

 

 गौरव केवले यांनी छतावरील पावसाचे पाणी शोच खड्ड्यात मुरविण्याचा केलेला अभिनव प्रयोग कथन केला.महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम शहरातील प्रदीर्घकालाची गौरवशाली परंपरा असणाऱ्या निळकंठ व्यायाम गणेशोत्सव मंडळात आयोजित केला.

 

जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी रितेश भुयार यांनी गणरायांच्या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना 'लोकसंवाद' कार्यक्रमाविषयी माहिती दिली. त्यानंतर मृद व जलसंधारण विभागाचे प्रतिनिधी भूषण जावकर यांनी विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. यानंतर उपस्थित नागरिकांनी या योजनांच्या माहितीबद्दल आणि विभागाच्या कार्याबद्दल देण्यात आलेल्या माहितीसाठी समाधान व्यक्त केले. कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रतिनिधी आशिष येवले यांनी विभागाच्या वतीने बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याबद्दल माहिती दिली.

 

दोन्ही विभागांची माहिती ऐकून घेत नागरिकांनी आपले उत्स्फूर्त मतही मांडली. विविध योजनांच्या माध्यमातून शासन जनतेपर्यंत पोहोचते जनतेला त्याचा फायदाही होत आहे.यावेळी लोकसंवाद कार्यक्रमात योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला आणि लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसोबतच निळकंठ व्यायाम मंडळ गणेशोत्सवाचे अध्यक्ष अनंत साऊकर,सचिव ऐश्वर्य खेडकर, मार्गदर्शक दीपक उंडीकर, अभिनंदन पेंढारी, निळकंठ व्यायाम मंडळाचे अध्यक्ष दीपक गुल्हाने, पंकज लुंगीकर यांनीही यावेळी विचार मांडताना गणेशोत्सवात 'लोकसंवाद' उपक्रमातमत व्यक्त करून सक्रिय सहभाग घेतला. माहिती व जनसंपर्क विभागाद्वारे संपूर्ण राज्यभर जिल्हा माहिती कार्यालयांच्या माध्यमातून 16 ते 24 सप्टेंबर या कालावधीत 'लोकसंवाद' उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

०००००० 

Thursday, September 17, 2026

जिल्ह्यात लोकसंवाद उपक्रमास सुरुवात


शासकीय योजनांना लोकसहभागाचे बळ हवे; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
जिल्ह्यात लोकसंवाद उपक्रमास सुरुवात

अमरावती, दि. 17 (जिमाका): राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभागाने माती व पाण्याच्या संवर्धनाचे विविध उपक्रम योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागही तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून कार्य करीत आहे. या सर्व उपक्रमांची माहिती मिळाल्याचे समाधान व्यक्त करून शहरातील ऐतिहासिक आझाद हिंद गणेशोत्सव मंडळात दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त करत शासनाच्या या स्तुत्य कार्यास जन सहभागाचेही बळ हवे, अशा उत्स्फूर्त भावना मांडल्या निमित्य होते जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे बुधवार, 16 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आलेल्या 'लोकसंवाद' उपक्रमाचे. 

शासकीय योजनांना लोकसहभागाचे बळ हवे; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना जिल्ह्यात लोकसंवाद उपक्रमास सुरुवात

 










शासकीय योजनांना लोकसहभागाचे बळ हवे; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना

 

जिल्ह्यात लोकसंवाद उपक्रमास सुरुवात

 

       अमरावती, दि. 17 (जिमाका): राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभागाने माती व पाण्याच्या संवर्धनाचे विविध उपक्रम योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागही तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून कार्य करीत आहे. या सर्व उपक्रमांची माहिती मिळाल्याचे समाधान व्यक्त करून शहरातील ऐतिहासिक आझाद हिंद गणेशोत्सव मंडळात दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त करत शासनाच्या या स्तुत्य कार्यास जन सहभागाचेही बळ हवे, अशा उत्स्फूर्त भावना मांडल्या निमित्य होते जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे बुधवार, 16 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आलेल्या 'लोकसंवाद' उपक्रमाचे.

 

     महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाने ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम शहरातील 99 वर्षांची गौरवशाली परंपरा असणाऱ्या आझाद हिंद गणेशोत्सव मंडळापासून प्रारंभ केला.

 

         येथे गणरायांच्या दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना 'लोकसंवाद' कार्यक्रमाच्या माध्यमातून मृद व जलसंधारण विभागाचे प्रतिनिधी धनंजय रोझे यांनी विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली. यानंतर उपस्थित नागरिकांनी या योजनांच्या माहितीबद्दल आणि विभागाच्या कार्याबद्दल देण्यात आलेल्या माहितीसाठी समाधान व्यक्त केले. कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाचे प्रतिनिधी आशिष येवले यांनी विभागाच्या वतीने बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या रोजगार मेळाव्याबद्दल माहिती दिली. दोन्ही विभागांची माहिती ऐकून घेत  नागरिकांनी आपले उत्स्फूर्त मतही मांडली. विविध योजनांच्या माध्यमातून शासन जनतेपर्यंत पोहोचते तसेच नागरिकांनी यात सहभागदेत या कार्याला बळ द्यावा असे विचारही मांडले. 

 

     लोकसंवाद कार्यक्रमात योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यात आला आणि लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.

 

     गणरायाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसोबतच माजी महापौर तथा आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष विलास इंगोले यांनीही यावेळी विचार मांडताना गणेशोत्सवात लोकांवाद उपक्रमाद्वारे शासकीय योजनांची माहिती देण्याची संकल्पना कौतुकास्पद असल्याचे सांगितले. मंडळाचे सचिव दीपक कलंत्री, सदस्य सर्वश्री संजय मुचळंबे,प्रवीण चौधरी, अजय पुसतकर, राजेश ढोले यांनीही या लोकसंवाद कार्यक्रमात आपले मत व्यक्त करून सक्रिय सहभाग घेतला.

 

       जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात  आझाद हिंद गणेशोत्सव मंडळापासून झाली. उपक्रमाच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार 17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता रेवसागाव येथील राजश्री प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळात लोकसंवाद उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.या उपक्रमांतर्गत कृषी विभाग आणि सहकार व पणन विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.

 

000000

भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी टास्क फोर्स दीर्घकालीन मसुदा तयार करणार


 अमरावती विभागातून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त

 –अपर मुख्यसचिव व्ही. राधा

 

भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी टास्क फोर्स दीर्घकालीन मसुदा तयार करणार

 

अमरावती, दि. 17 (जिमाका) : भरती प्रक्रिया सुधारणा करण्यासंदर्भात अमरावती विभागातील हितधारकांकडून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त झाल्या आहेत. राज्यातील सर्व महसुली विभागातून प्राप्त सूचनांचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह (एमपीएससी) अन्य परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक,परिक्षार्थीस्नेही व सुटसूटित करण्यासाठी निर्धारीत कालावधीत उच्चस्तरीय स्टास्क फोर्स दीर्घकालीन मसुदा तयार करेल,अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्यसचिव तथा उच्च स्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्ष व्ही. राधा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

DIO NEWS AMRAVATI 17.09.2026

 










                              

  अमरावती विभागातून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त

                                             –अपर मुख्यसचिव व्ही. राधा

 

भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी टास्क फोर्स दीर्घकालीन मसुदा तयार करणार

 

अमरावती, दि. 17 (जिमाका) : भरती प्रक्रिया सुधारणा करण्यासंदर्भात अमरावती विभागातील हितधारकांकडून अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त झाल्या आहेत. राज्यातील सर्व महसुली विभागातून प्राप्त सूचनांचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगासह (एमपीएससी) अन्य परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक,परिक्षार्थीस्नेही व सुटसूटित करण्यासाठी निर्धारीत कालावधीत उच्चस्तरीय स्टास्क फोर्स दीर्घकालीन मसुदा तयार करेल,अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्यसचिव तथा उच्च स्तरीय टास्क फोर्सच्या अध्यक्ष व्ही. राधा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

 

            श्रीमती राधा यांच्या अध्यक्षतेखालील भरती प्रक्रिया सुधारणेसाठी नियुक्त उच्चस्तरीय टास्क फोर्सने पहिल्या सत्रात येथील नियोजन भवनात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, लोकप्रतिनिधी व नागरिक आदी हितधारकांकडून अभिप्राय व सूचना ऐकूण घेतल्या. त्यानंतर महसूल भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्सव्यवसाय विभागाचे सचिव तथा टास्क फोर्सचे सदस्यसचिव डॉ.एन.रामास्वामी , विभागीय आयुक्त नयना गुंडे,जिल्हाधिकारी आशिष येरेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी ,अपरआयुक्त (सा.प्र.)संजय जाधव यावेळी उपस्थित होते.

 

            सरळसेवेबाबत अत्यंत सखोल व अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचनांसह पोलीस उपनिरीक्षक पदभरती प्रक्रिये विषयी, एमपीएससीद्वारे घेण्यात येणाऱ्या परिक्षेसाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) असावी, या परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक असावे, या परिक्षांसाठी वार्षिक शुल्क आणि नोंदणी असावी,परीक्षांचे वेळेत निकाल लागावे, प्रश्नपत्रिका सुरक्षित राहण्यासाठी प्रसंगी डिजीलॉकरचा उपयोग व्हावा,परिक्षार्थींच्या अडचणी सोडविण्यासाठी एमपीएससीचा विशेष कक्ष स्थापन करणे ,राज्यात विभागवार एमपीएससीचे कार्यालय उभारणे  आदी महत्वाचे विषय अमरावती विभागातील हितधारकांकडून प्राप्त झाले. यापूर्वी पुणे आणि नागपूर विभागाला टास्क फोर्सने भेट दिली असून अमरावती विभागात तुलनेने अधिक अभ्यासपूर्ण अभिप्राय व सूचना प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले.अमरावती विभागात ईमेल व प्रत्यक्ष निवेदनाद्वारे मोठया प्रमाणात सूचना प्राप्त झाल्या आहेत आज प्रत्यक्ष हितधारकांनीही सूचना मांडल्या आहेत. यानंतर पुढील तीन महसूल विभागाला टास्क फोर्स भेट देणार असून तेथील अभिप्राय व सूचना ऐकूण घेणार आहे.

 

            राज्यातील परीक्षार्थींना आपले मत शासनापर्यंत अधिक चांगल्या पद्धतीने पोचवता यावे व भरती प्रक्रियेत  सुधारणा करण्यासाठी टास्क फोर्स प्रत्यक्ष हितधारकांशी चर्चा करून त्यांची मत जाणून घेत आहे. राज्यातील सर्व विभागांतून प्राप्त माहितीचा सखोल अभ्यास करण्यात येईल. प्रसंगी केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी),अन्य राज्यांच्या लोकसेवा आयोगांना भेटी देवून त्यांच्याकडे कार्यान्वीत उत्तम पद्धतींचा अभ्यास करून राज्यात एमपीएससीसहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परीक्षा व अन्य महत्वाच्या समकक्ष परीक्षा पद्धतीतील आवश्यक सुधारणांचा दीर्घकालीन मसुदा तयार करून शासनाला सादर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.शासनाच्या विविध विभागांकडून करण्यात येणारी भरती प्रक्रिया तसेच एमपीएससीकडून या विभागाची पदे भरताना येणाऱ्या अडचणी,यासंदर्भातील प्रचलीत पद्धती व त्यात आवश्यक बदल करण्यासंदर्भात सखोल अभ्यास करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

 

००००००

सोमवारी जिल्हा महिला लोकशाही दिन

अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

00000


मतदारयादी निरीक्षकांचा मंगळवारी दौरा

*जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांना थेट तक्रारी मांडण्याची संधी

अमरावती, दि. 17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाद्वारे देशभरात राबवण्यात येत असलेल्या 'विशेष सखोल पुनरीक्षण' मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मतदारयादी निरीक्षक तथा अमरावती विभागीय आयुक्त यांचा मंगळवार, दि. २२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात प्रथम दौरा आयोजित करण्यात आला आहे. दुपारी ४.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे ही बैठक पार पडणार आहे.

या दौऱ्यादरम्यान विभागीय आयुक्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मतदार नोंदणीविषयक तक्रारी, आक्षेप व समस्या थेट ऐकून घेतील. मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांच्या माहितीची घरोघरी जाऊन पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. एकही पात्र नागरिक सुटणार नाही आणि एकही अपात्र नागरिक समाविष्ट होणार नाही, या ध्येयाने ही मोहीम राबवली जात आहे. गणनापत्रक जमा न केलेल्या ३ लाख ५३ हजार २८२ मतदारांची नावे ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप यादीत समाविष्ट केलेली नाहीत. मृत मतदार वगळता एकही पात्र नागरिक यादीतून वंचित राहू नये, यासाठी ही यादी जिल्ह्याच्या amravati.gov.in या संकेतस्थळावर तसेच राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदारयादीवरील दावे आणि हरकतीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांचा हा दौरा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मतदार नोंदणीविषयक थेट तक्रारी, आक्षेप आणि समस्या मांडाव्यात, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी केले आहे.

000000



पीएम विश्वकर्मा योजनेत जिल्हा राज्यात अव्वल

*कर्जमंजुरी, टूलकिटचे वाटप

अमरावती, दि. 17 (जिमाका) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवासंकल्प अभियानात बचत भवन येथे ‘विश्वकर्मा लाभार्थी मेळावा उत्साहात पार पडला. यात पीएम विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना कर्जमंजुरी पत्रे आणि टुलकिटचे वाटप करण्यात आले.

खासदार डॉ. अनिल बोंडे अध्यक्षस्थानी होते, यावेळी आमदार प्रवीण तायडे, पीएम विश्वकर्मा समितीचे अध्यक्ष दिलीप आकोटकर, पीएम विश्वकर्मा योजना जिल्हा समितीचे सदस्य सोपान गुढदे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, टपाल खात्याचे अधीक्षक पी. ए. गेडाम, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नरेश हेडाऊ उपस्थित होते.

पीएम विश्वकर्मा योजनेत जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे. यात २४ हजार लाभार्थी नोंदणी करण्यात आली असून  २१ हजार लाभार्थींनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यात १८ हजार लाभार्थींनी टूलकिटचे वाटप करण्यात आले आहे. तसेच ६ हजार ६४० लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज मंजुरी झाली असून ५ हजार ४९५ लाभार्थ्यांना ४३ कोटी रुपये प्रत्यक्ष कर्ज वाटप वितरीत करण्यात आले आहे.

खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी ही योजना विकसित भारताच्या संकल्पनेला बळ देणारी असल्याचे सांगून नोंदणीकृत प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा फायदा पोहोचवण्याचे आवाहन केले. आमदार प्रवीण तायडे यांनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेचे कौतुक करीत पहिल्या कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या लाभार्थ्यांना तात्काळ दुसरे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर, खासदार डॉ. अनिल बोंडे आणि आमदार प्रवीण तायडे यांच्या मार्गदर्शनामुळे जिल्ह्याने प्रशिक्षण, टूलकिट वाटप आणि कर्ज मंजुरी या तिन्ही बाबींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १७ लाभार्थ्यांना कर्जमंजुरी पत्रे आणि १० लाभार्थ्यांना टूलकिट प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

00000



सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे सायबर जनजागृतीसाठी 'व्हॉकथॉन'

अमरावती, दि. 17 (जिमाका) : नागरिकांमध्ये दक्षता, पारदर्शकता, तसेच वाढत्या सायबर फसवणुकीबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 'व्हॉकथॉन' उत्साहात पार पडले.

या जनजागृती उपक्रमाचे नेतृत्व सेंट्रल बँक ऑफ इंडिया अमरावती विभागाचे विभागीय प्रमुख सुनील पांडेय यांनी केले. यावेळी उप क्षेत्रीय व्यवस्थापक प्रदीप जाधव, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक नरेश हेडाऊ, तसेच सतर्कता अधिकारी राहुल कुमार गोंड प्रमुख उपस्थित होते.

या व्हॉकथॉनमध्ये अमरावती विभागातील सर्व शाखांचे शाखा व्यवस्थापक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला. नागरिकांनी सतर्क राहून कोणत्याही प्रकारच्या सायबर फसवणुकीला बळी पडू नये, तसेच दक्ष आणि जबाबदार नागरिक म्हणून भूमिका बजावावी, असा संदेश या रॅलीद्वारे नागरिकांना देण्यात आला.

000000

 

 



राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची आढावा बैठक संपन्न

अमरावती, दि. 17 (जिमाका) : राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या सदस्या किरण महल्ले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. १६ सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय भवनात विविध शासकीय योजनांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण विभाग, आदिवासी विकास विभाग, तसेच महिला व बालविकास विभागांतर्गत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान अध्यक्ष श्रीमती महल्ले यांनी सर्व शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत आणि प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. चिखलदरा, मेळघाट, दिग्रस व दारव्हा यासारख्या दुर्गम भागातील नागरिकांना आधारकार्ड, रेशनकार्ड आणि जातीचा दाखला उपलब्ध व्हावीत यासाठी तालुका व जिल्हास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून लाभार्थ्यांना ही या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. विमुक्त जाती व भटक्या जमातीतील घटकांच्या रोजगारासाठी होणाऱ्या सततच्या स्थलांतरामुळे त्यांना जन्माचा दाखला मिळण्यात अडचणी येतात. यावर मात करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याचे आवाहन करण्यात आले.

बैठकीत प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर, आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, महिला व बालविकास विभाग विभागीय उपायुक्त ज्योती कडु, इतर मागास बहुजन कल्याणच्या सहायक संचालक सरिता बोबडे, तसेच अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांतील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

गणेशोत्सवाचा वारसा आता जागतिक डिजिटल संग्रहात

bappa.org’ वर अनुभव, परंपरा आणि आरती शेअर करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 17 (जिमाका) : गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, भक्ती, संस्कृती आणि लोकजीवनाचा वारसा जगभर पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत ‘bappa.org’ हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. गणेशभक्तांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या बाप्पाशी संबंधित आठवणी, परंपरा, पाककृती आणि आरतीचा ठेवा डिजिटल स्वरूपात जतन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सवाशी संबंधित विविध प्रकारची माहिती एका जागतिक डिजिटल संग्रहात संकलित केली जात आहे. नागरिकांना जिल्ह्यातील गणेशोत्सवातील अनुभव आणि आठवणी शेअर करण्याबरोबरच घरगुती किंवा सार्वजनिक गणेश मंडळातील आरती रेकॉर्ड करून अपलोड करण्याची संधी मिळणार आहे. तसेच आपल्या गणरायाचे छायाचित्रही या संग्रहात सहभागी करून घेता येणार आहे.

यासाठी नागरिकांनी ‘bappa.org’ या संकेतस्थळाला भेट देऊन ‘माहिती या पर्यायातून ‘तुमची कथा सांगा या विभागात प्रवेश करावा. येथे कथा, पाककृती, परंपरा आणि थेट आरती असे चार पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी आवश्यक पर्याय निवडून संबंधित माहिती भरावी. मोबाईलचे लोकेशन बंद असल्यास पिनकोड क्रमांक नोंदवावा.

bappa.org’ या संकेतस्थळावर गणपती बाप्पाच्या प्रसिध्द आरत्या व भक्तिगीते, गणेशोत्सवाच्या विविध परंपरा आणि नागरिकांचे अनुभव यांचा डिजिटल संग्रह उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची सांस्कृतिक ओळख आणि लोकपरंपरा पुढील पिढ्यांसाठी जतन करण्यास मदत होणार आहे. गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या घरातील, परिसरातील आणि मंडळातील गणेशोत्सवाच्या परंपरा ‘bappa.org’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून जगासमोर आणाव्यात, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

000000

सेवा हक्क आयुक्तांनी घेतली अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांची भेट

 

     अमरावती, दि. 17 (जिमाका): राज्य सेवा हक्क आयुक्त अरुण डोंगरे यांनी आज  शासकीय विश्राम भवन  येथे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्यसचिव व्ही. राधा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी  'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या' (सेवा हक्क कायदा) अंमलबजावणी व सुरू असलेल्या जनजागृती उपक्रमांबद्दल माहिती दिली.श्रीमती राधा यांनी या उपक्रमांचे आणि सेवा हक्क कायद्याबद्दल  जनजागृती वाढवण्यासाठी राज्य सेवा हक्क आयुक्त कार्यालय, अमरावती यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

 

     श्री. डोंगरे यांनी श्रीमती राधा यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाबाबतचे जनजागृती पत्रिका भेट दिली.पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. एन.रामास्वामी,विभागीय आयुक्त नयना गुंडे यावेळी उपस्थित होत्या.

 

००००००





जिल्हाधिकारी कार्यालयात प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन

अमरावती, दि. 17 (जिमाक) : केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंदा दानेज यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

 

Wednesday, September 16, 2026

DIO NEWS AMRAVATI 16.09.2026

                       भरती परीक्षा पद्धतीत सुधारणा : आज उच्च स्तरीय टास्क फोर्स शहरात

 

अमरावती  विभागातील सर्व घटकांना सक्रिय सहभाग नोंदविण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

अमरावती, दि. 16 (जिमाका) : अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय टास्क फोर्स गुरुवार, 17 सप्टेंबर रोजी भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना व अभिप्राय जाणून घेण्याकरिता अमरावती  विभाग दौऱ्यावर येत आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती  विभागातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन विभागीय आयुक्त नयना गुंडे आणि  जिल्हाधिकारी आशिष येरेकर  यांनी केले आहे.

 

             राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी  तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली  उच्चस्तरीय समिती गठीत केली आहे. ही समिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 5.30 अमरावती विभागातील हितधारकांच्या सूचना व अभिप्राय ऐकूण घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहे.

 

              विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा परीक्षार्थी, पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, अभ्यासिका चालक, लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून टास्क फोर्स समोर आपले विचार मांडण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात  प्रत्यक्ष  तसेच  ईमेलद्वारे सूचना, शिफारशी, हरकती व अभिप्राय यापूर्वीच मागविण्यात आले होते.

 

                जिल्हाधिकारी  कार्यालयामार्फत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचे संकलन करून उच्चस्तरीय टास्क फोर्सकडे सादर करण्यात येतील. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत अमरावती  विभागातील सर्व घटकांनी उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी  यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

०००००



                   गणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियान

 

आजपासून अमरावती जिल्ह्यात उपक्रमास सुरुवात

 

अमरावती, दि. 16 (जिमाका): महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनातील लोकसहभागाचा महत्त्वाचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि धोरणात्मक निर्णयांची माहिती जनतेपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय अमरावती  आजपासून ‘लोकसंवाद-2026’ हा विशेष जनजागृती उपक्रम शहरातील ऐतिहासिक आझाद हिंद गणेशोत्सव मंडळापासून प्रारंभ करीत आहे.

 

         राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव म्हणून घोषित केले असून, या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळाच्या ठिकाणी लोकसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.  शासनाच्या योजनांची माहिती देण्याबरोबरच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणे, आणि पात्र लाभार्थ्यांना संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन करणे, या प्रमुख उद्देशाने राज्यभर ‘लोकसंवाद-२०२६ हा विशेष जनजागृती उपक्रम 16 ते 24 सप्टेंबर 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. 

     

       जिल्ह्यात या उपक्रमाची सुरुवात अमरावती शहरातील बुधवारा येथील ऐतिहासिक आझाद हिंद गणेशोत्सव मंडळापासून होत आहे. या मंडळात 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता लोकसंवाद उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत मृद व जलसंधारण विभाग आणि जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,अमरावती यांच्या तर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यात येणार आहे.या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार आहे. विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.

 

    कौशल्य विकास क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षण, मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, स्वयंरोजगार कर्ज योजना आदीबाबत युवक व नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याशिवाय महाडीबीटी, सायबर सुरक्षा, माहितीचा अधिकार, आणि आपले सरकार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही जनजागृती करण्यात येणार आहे.

 

000000


सेवा संकल्प अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी

 

-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

 

अमरावती, दि. 16 (जिमाका): नागरिकांच्या सोयीसाठी आणि गरजूंना लाभ देण्यासाठी सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संसदीय कार्यकाळाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने हे अभियान एक महिनाभर राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या जीवनात बदल घडून येईल, अशा योजना या अभियानात राबविण्यात यावा, तसेच अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा संकल्प अभियानामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे, अतिरिक्त मुख्‍य कार्यकारी अधिकारी विनय ठमके आदी उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, जिल्ह्यात प्रामुख्याने वन हक्क पट्टे वाटपाचा कार्यक्रम धारणी आणि चिखलदरा तालुक्यात प्राधान्याने राबविण्याचे निर्देश दिले. दि. 17 ते 19 सप्टेंबरदरम्यान प्रत्येक गावात सभा घेऊन वनपट्टे वाटप निश्चित करावे. त्यानंतर दि. 20 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष कारवाई करावी. ग्रामसभा, उपविभाग आणि जिल्हास्तरीय समितीची मंजुरी घेऊन या अभियानात पट्टेवाटप अंतिम करण्यात यावे. तसेच नव्याने तयार करण्यात आलेला सात ई आणि बारा ईबाबत कार्यवाही करण्यात यावी.

 

अभियानात राशनबाबत कार्यवाही करण्यात यावी. यात लाभार्थ्यांशी संवाद साधून आवश्यक नसलेल्या नागरिकांना लाभ सोडण्याचे आवाहन करण्यात यावे. धान्य नको असलेल्या नागरिकांकडून लेखी घ्यावे, तसेच गरजूंची नावे समाविष्ठ करण्यात यावी. तसेच आयुष्मान कार्ड आणि वयोवंदन योजनेत प्राधान्याने कामे करण्यात येणार आहे. यासोबतच शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. मेळघाटात प्रामुख्याने ही शिबीरे आयोजित करण्यात येतील.

 

युवकांसाठी 29 सप्टेंबर रोजी सर्व तालुक्यात रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. यात 1800 जागा भरण्यात येणार असून यासाठी 56 कंपन्यांनी नोंद केली आहे. आतापर्यंत 5 हजार युवकांनी यासाठी नोंदणी केली आहे. त्यासोबतच समाज कल्याण आणि आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात करीअर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कामगार विभागातर्फे असंघटीत कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी आरोग्य शिबीर, विमा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना बँकेत पगार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

 

अभियान विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात येणार आहे. सर्व विभागांची जबाबदारीने कार्यक्रमाचे नियोजन करून राबवावे, तसेच याचा अहवाल सादर दर आठवड्याला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले.

000000

राज्य कामगार विमा योजना अतंर्गत सेवा संकल्प अभियानाचे आयोजन

 

             अमरावती, दि. 16 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली राज्य कामगार विमा योजना आयुक्तालयाच्या आदेशानुसार वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय अमरावती अंतर्गत सर्व सेवा दवाखान्यामार्फत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबविले जाणार आहे. या अंतर्गत विमाधारक व त्यांच्या कुटुंबीयांना या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत आरोग्य तपासणी उपचार, जनजागृती तसेच विविध आजाराविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

 

               यात प्रामुख्याने वृक्षारोपण, रक्तदान व अवयवदान जागरुकता शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, योग व ध्यान शिबिर, स्वच्छता शिबिर, व्यसनमुक्त भारत जनजागृती शिबिर, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, पोषण व ॲनिमिया जनजागृती शिबिर, बालरोग शिबिर अशा विविध उपक्रमांचा समावेश या सेवा संकल्प अभियानामध्ये आहे.

 

            वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. प्रिती काटे, प्रशासन अधिकारी डॉ.राजनारायण गोमासे, सर्व सेवा दवाखान्यातील प्रभारी विमा वैद्यकीय अधिकारी, तसेच वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालयातील श्रीमती स्नेहा बारसागडे (अधिपरिचारीका), श्री. योगेश कोल्हे (वरिष्ठ लिपिक) व इतर कर्मचारी या संपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन पार पाडणार आहेत. सदर सेवा संकल्प अभियानाचा लाभ सर्व विमाकामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय प्रशासन अधिकारी कार्यालय, अमरावती तर्फे करण्यात आले आहे.

 

०००००


लोकसंवाद उपक्रम ; निळकंठ गणेशोत्सव मंडळात नागरिकांनी मांडले स्वानुभव

जलयुक्त शिवार आणि गाळयुक्त शिवार योजनेचा शेतकऱ्यांना दिलासा; लाभार्थ्यांची प्रतिक्रिया लोकसंवाद उपक्रम ; निळकंठ गणेशोत्सव मंडळात नागरिकांन...