जिल्हा माहिती कार्यालय,अमरावती
Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Sunday, July 19, 2026
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' निकषात सुधारणा शेतकऱ्यांना ऐतिहासिक दिलासा. 2 लाख रूपयापर्यंत संपूर्ण कर्जमाफी. 56 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ. पारदर्शक आणि डिजीटल अंमलबजावणी
DIO NEWS AMRAVATI 19.07.2026
आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांची चिखलदरा कन्या आश्रमशाळा
तसेच मुलींच्या वसतिगृहास भेट
अमरावती, दि. 19 (जिमाका):चिखलदरा येथे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी नुकतीच भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी चिखलदरा दौऱ्यादरम्यान शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा तसेच टेंब्रूसोंडा मुलींच्या वसतिगृहास येथे भेट दिली.
यावेळी भेटीदरम्यान त्यांनी उपस्थित विद्यार्थिनींशी संवाद साधत महाविद्यालय व वसतिगृहाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच शिक्षणाचा दर्जा, वसतिगृहातील सुविधा आणि विद्यार्थिनींना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
याप्रसंगी आमदार केवलराम काळे, अपर आयुक्त संदीप गोलाइत, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, मुख्याध्यापक श्री. पुंडकर, शिक्षकवृंद तसेच कर्मचारी उपस्थित होते.
00000000
Saturday, July 18, 2026
मेळघाटातील आदिवासींचा विकास करण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करावे - आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके
मेळघाटातील आदिवासींचा
विकास करण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करावे
-
आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके
अमरावती, दि.
18 (जिमाका): मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू दूर करणे हे शासनाचे मुख्य
उद्दिष्ट असून यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. येथील सामाजिक संस्थांनी
जिल्हा प्रशासनासोबत योग्य समन्वय साधून याबाबत कार्य करण्याचे निर्देश आदिवासी विकास
मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी दिले. आरोग्य प्रशिक्षण केंद्र चिखलदरा येथे आदिवासी
विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या अध्यक्षतेखाली धारणी व चिखलदरा तसेच इतर
क्षेत्रातील विविध विषयांचा आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
आमदार केवलराम
काळे, माजी आमदार प्रभुदास भिलावेकर, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी
सत्यम गांधी, प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त
संदीप गोलाईत, आदिवासी महामंडळाच्या महाव्यवस्थापक श्रीमती जयरेखा, उपसंचालक सुशील
वाकचौरे आधी यावेळी उपस्थित होते.
आदिवासी विकास
मंत्री श्री. उईके म्हणाले, मेळघाटामध्ये बालविवाहामुळे माता आणि बालकांच्या कुपोषणासारख्या
आरोग्य तक्रारी निर्माण होतात. तसेच दोन मुलांमध्ये पुरेसे अंतर नसणे हे देखील कुपोषणाचे
कारण आहे. यासाठी प्रशासनासोबतच अंगणवाडी सेविका आणि आशावर्कर कार्य करीत असतात. यावर
अधिक भर देऊन बालविवाह थांबवण्यासाठी सर्वांनी सामाजिक दायित्व सांभाळून मिशन मोडवर
याबाबत जनजागृती करावी. मेळघाटामध्ये पुरेसा औषधसाठा नसल्यामुळे कोणाच्याही प्रकृतीला
धोका निर्माण होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाने दक्षता बाळगावी. या भागामध्ये जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना
सक्षमपणे राबवावी, असे आदिवासी विकास मंत्री. डॉ. उईके म्हणाले.
मेळघाटातील आदिवासींचे
जीवनमान उंचावण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपाय योजना राबविण्यात येतात. याच धर्तीवर
येथील सामाजिक संस्था देखील कार्य करीत असतात. परंतु त्या स्वतंत्रपणे काम करीत असतात.
यापुढे प्रशासनाच्या पूर्वपरवानगी व समन्वय साधून
सामाजिक संस्थांनी काम करावे तसेच या क्षेत्रात जनजागृतीसाठी वापरण्यात येणाऱ्या
प्रचार साहित्याचे शासनामार्फत प्रमाणीकरण करण्यात यावे. आदिवासी बहुल क्षेत्राचा विकास
साधण्यासाठी शासनासमवेत सामाजिक संस्थांनी समन्वय साधून काम करावे.
यावेळी श्री. उईके यांनी महिला व बालकल्याण विभाग
व त्यांच्या योजना, पाणीपुरवठा व्यवस्थापन, आरोग्य विभाग या विषायांवर संबंधितांशी
चर्चा केली. शासन आणि प्रशासनाच्या सहकार्याने या भागातील कुपोषण हटवायचे आहे. आदिवासी
विकास विभाग योजनेअंतर्गत विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे, हे लक्षात घेता आश्रम शाळेतील पाणी प्रश्न, आरोग्य
प्रश्न, विद्यार्थ्यांच्या समस्या या तातडीने सोडवण्यावर भर द्यावा, अशा सूचना संबंधितांना
दिल्या.
यावेळी शबरी
आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिक यांच्या धारणी शाखा कार्यालयामार्फत
राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेसाठी लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते धनादेशाचे
वाटप करण्यात आले. नियोजन अधिकारी वरूण कळसकर यांनी प्रास्ताविक केले. दिपश्री देशमुख
यांनी संचलन तर शिक्षण विस्तार अधिकारी अनुश्री राऊत यांनी आभार मानले .
00000
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' निकषात सुधारणा
Friday, July 17, 2026
DIO NEWS AMRAVATI 17.07.2026
उगवणक्षमता नसलेली सोयाबीन बियाणे विक्री केल्यासंबंधी संबंधित बियाणे कंपन्यांवर तात्काळ गुन्हा नोंदवा
-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
* जिल्हा नियोजन समितीतील 2026 -27 या आर्थिक वर्षातील सर्व प्रशासकीय मान्यता 15 सप्टेंबरपर्यंत घ्याव्यात
*लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन विकास कामे करा
अमरावती, दि. 17 (जिमाका): उगवणक्षमता नसलेली सोयाबीन बियाणे विक्री केल्यासंबंधी संबंधित कंपन्यांवर तात्काळ गुन्हा नोंदवा. कृषी अधिकाऱ्यांनी आपआपल्या तालुक्यात आजच पाचही बियाणे कंपन्यांवर गुन्हे दाखल करा. चौदाही तालुक्यात हे गुन्हे दाखल करण्यात यावे. पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घेऊन तात्काळ या गुन्ह्यांची नोंद करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
खासदार बळवंत वानखडे, अमर काळे, डॉ. अनिल बोंडे, आमदार संजय खोडके, प्रवीण पोटे-पाटील, ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू, सुलभा खोडके, रवी राणा, प्रतापदादा अडसड, राजेश वानखडे, प्रवीण तायडे, उमेश उर्फ चंदू यावलकर, गजानन लवटे, केवलराम काळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, मनपा आयुक्त मंगेश गोंदवले, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक निकेतन कदम, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, लोकाभिमुख पारदर्शी आणि गतिमान सरकार हे आपले उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांची बियाण्यांच्या बाबतीत फसवणूक करणाऱ्या बूस्टर कंपनी, इनोवेज कंपनी, रवी सीड्स, पार्श्व कंपनी, श्री श्री सीड्स तसेच ग्रीन गोल्ड या कंपन्यांवर तात्काळ गुन्हे नोंदवा. त्या गुन्ह्यांची प्रत उद्या जिल्हाधिकारी महोदयांकडे सादर करा. पोलीस अधीक्षकांनी यावर तात्काळ कार्यवाही करण्याबाबत पोलीस विभागाला निर्देश द्यावे. तसेच या कंपन्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात यावे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांना माफी मिळणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
कृषी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी भेटू शेतकऱ्यांची परिस्थिती वेळीच अवगत करणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधीशी समन्वय साधून विकास कामे करण्यात यावी. सर्व विभागांनी वृक्ष लागवडीचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. सध्याची परिस्थिती तसेच पुढील वर्षीचा विचार करता दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा. शिवकालीन बंधारे मजबूत करण्यात यावे. जुन्या विहिरी, ब्रिटिश तलाव पुनर्जीवित करण्यात यावे. जिल्हा नियोजन समितीचा प्रस्ताव सादर करताना यंदा एकही सिमेंट रस्त्याचे बांधकाम करू नये. जलसंधारणाच्या कामावर भर द्यावा, जल साठे वाढविणे, जमिनीत पाणी मुरविणे यासह मृदा संधारण सामाजिक वनीकरण यावर द्यावा. आवश्यकता असल्यासच शेत रस्त्यासाठी डांबरीकरण किंवा खडीकरण करण्यात यावे. सर्वांनी बचतीचे धोरण अवलंबावे. महावितरणाची वीज न वापरता सौर उर्जेचा वापरावर भर द्यावा. सौर ऊर्जेवर चालणारे दिवे लावावे. सर्व संबंधित विभागांनी क्षेत्रीय भेटीवर भर द्यावा. लोकप्रतिनिधी व शासन यांनी एकत्रित येऊन लोकाभिमुख प्रशासन राबविण्यावर भर द्यावा, असे पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले.
या बैठकीत जिल्ह्याच्या विकासकामांचा आणि खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रामुख्याने आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील विविध योजनांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत मंजूर ५२७ कोटी रुपये आणि विशेष घटक योजनेचे १०२ कोटी रुपये १०० टक्के वितरित झाले आहेत. तसेच आदिवासी उपयोजनेचा १२१.५३ कोटींपैकी ९९.९९ टक्के निधी वितरित करण्यात आला असून, प्रशासकीय मंजुरीनंतर या तिन्ही योजनांचा निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले.
यासोबतच चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या नियोजनावरही चर्चा झाली. नवीन वर्षासाठी सर्वसाधारण योजनेअंतर्गत ६०५ कोटी रुपये, विशेष घटक योजनेसाठी १०० कोटी रुपये तर आदिवासी उपयोजनेसाठी १३३.२८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जून २०२६ अखेरपर्यंत या नवीन निधीमधील आदिवासी उपयोजनेअंतर्गत ३९.३५ कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्ष खर्च झाला आहे, तर इतर योजनांच्या प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी जिल्ह्याचा विकास वेगाने साधण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उपलब्ध निधीचा वापर वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने करावा, अशा सूचना दिल्या.
यावेळी शहरातील शाळा, रस्ते, क्रीडांगण, शहरातील वाढीव पाणीपुरवठा, वन्यप्राण्यांचा त्रास, अवैध बांधकाम, आरोग्य व्यवस्था शहरातील न्याय व सुरक्षा व्यवस्था याबाबत आढावा घेऊन संबंधितांना निर्देश देण्यात आले.
जिल्ह्यातील नागरिकांचे रक्षण करणे आणि नागरिकांच्या मालमत्तेचे रक्षण करणे या संविधानाने प्रशासनाला दिलेल्या प्रमुख जबाबदाऱ्या आहेत. शहरात सर्वत्र सीसीटीव्ही एआयच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्था अचूक करण्यात येणार आहे .ग्रामीण भागातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे. कोणत्याही विभागाचे खाजगी बँकेत खाते नसावे, केवळ लीड बँकेतच खाते असावे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने शेतकऱ्यांचे शेतीमालांनी भरलेले ट्रॅक्टर, ट्रक अडवू नये. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांच्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजनांचा त्यांना त्वरित लाभ मिळवून देण्यात यावा, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले.
सुरवातीला जिल्हा नियोजन समितीच्या नवनियुक्त सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर निधी अंतर्गत मंजूर पोर्टेबल टॉयलेट व रेनकोट या साहित्याचे पोलीस विभागास वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा क्रीडा निधी अंतर्गत नूतनीकरण करण्यात आलेल्या पोलीस आधुनिक व्यायाम शाळेचे ई-उद्घाटन करण्यात आले. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य कौशल्य कार्यक्रमामार्फत पोलिसांसोबत प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण मिळणाऱ्या उमेदवारांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रामार्फत धनुर्विद्येमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीबाबत खेळाडू कुमकुम अनिल मोहोड हिला पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
00000000
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पूर्वीची मर्यादा ₹५०,००० आता मिळणार ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील
लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा !
पूर्वीची मर्यादा ₹५०,०००
आता मिळणार ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती
#कर्जमुक्ती
#कर्जमुक्तीयोजना२०२६
Thursday, July 16, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' निकषात सुधारणा शेतकऱ्यांना ऐतिहासिक दिलासा. 2 लाख रूपयापर्यंत संपूर्ण कर्जमाफी. 56 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ. पारदर्शक आणि डिजीटल अंमलबजावणी
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' निकषात सुधारणा शेतकऱ्यांना ऐतिहासिक दिलासा. 2 लाख रूपयापर्यं...
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
ग्रामीण भागात कलम 37(1) व (3) लागू अमरावती, दि. 7 (जिमाका) : जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासा...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)






.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
