Friday, October 6, 2017

महाराष्ट्र खाजगी रक्षक कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी
-आमदार डॉ. सुनिल देशमुख

          अमरावती, दि.6 : महाराष्ट्र खाजगी रक्षक कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत शासनाने जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना केली आहे. या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश आमदार डॉ.सुनील देशमुख यांनी दिले.
           जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह जिल्हा कामगार अधिकारी, मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
          आमदार डॉ. देशमुख म्हणाले की,  शासकीय, निमशासकीय व खाजगी आस्थापनांनी सुरक्षारक्षकांची नियुक्ती ही मंडळामार्फत नोंदणीकृत व्यक्तींमधूनच करणे बंधनकारक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मान्यता घेऊन सुरक्षारक्षक मंडळाकडून सुरक्षारक्षकांच्या नियुक्त्या कराव्या. संचालक मंडळाने या बाबतीत टाळाटाळ केल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत या कायद्याची अंमलबजावणी करावी, असेही ते यावेळी म्हणाले.
00000

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...