Wednesday, September 11, 2019

पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने होणार संत्रा फळबागांचे पुनरुज्जीवन



            सहा कोटी रूपयांचा जिल्ह्यात निधी मंजूर

अमरावती, दि. 11 : अपुरा पाऊस व तापमानामुळे नष्ट होत चाललेल्या जिल्ह्यातील संत्रा बागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 
 कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्या निर्देशानुसार ६ कोटी रुपये निधी ला फलोत्पादन विभागाने मंजूरी दिली असून त्यातून जुन्या बागा वाचविण्यासाठी विविध उपाय अंमलात येणार आहेत. बदलते पर्यावरण, अपुरा पाऊस व तापमानामुळे जिल्ह्यातील जुन्या संत्रा बागाचे नुकसान होऊन जिल्ह्यातील संत्रा बागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तर काही बागा वाळलेल्या आणि अर्धवट जळालेल्या स्थितीत आहेत. त्यामुळे या बागा वाचविण्यासाठी रोग ग्रस्त फांद्या कापून काढणे, बोर्डो पेस्ट लावणे, रासायनिक खत देणे, बुरशीनाशक व कीटकनाशक फवारणी करणे आदी बाबींचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला एक हेक्टर मर्यादेत लाभ देण्यात येणार आहे.
राज्याचे कृषीमंत्री डॉ अनिल बोंडे यांनी यापूर्वीच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि मनरेगा अंतर्गत पुन्हा बागनिर्मिती करीता मागेल त्याला मंजूरी ही प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. 
जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांनी या निर्णयाबद्दल पालकमंत्री डॉ. बोंडे यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...