Thursday, August 4, 2022

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या गुणवंत विद्यार्थ्याना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचंअर्ज सादर करण्यास मुदतवाढ

 

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या गुणवंत विद्यार्थ्याना परदेशात शिक्षणासाठी 

शिष्यवृत्तीचंअर्ज सादर करण्यास मुदतवाढ

अमरावती, दि.4: इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत मुला-मुलींना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश मिळालेल्या महाराष्ट्रातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व विशेष मागासवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशामध्ये उच्च शिक्षणा करिता शिष्यवृत्ती निवडीसाठी दिनांक  5 ऑगस्ट 2022  पर्यत अर्ज सादर करण्यासाठी विभागा कडुन मुदत वाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विमुक्त जाती,  भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग व  विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्याना परदेशामध्ये उच्च शिक्षण घेण्या करिता शिष्यवृत्ती देण्यात येते. या करिता विद्यार्थी विजाभज, इमाव व विशेष मागास प्रवार्गातील व महाराष्ट्रातील रहिवासी असावा, पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी वय वर्ष 35 व पीएचडीसाठी 40  वर्ष ही कमाल वयो मर्यादा असावी.कुटुंबाचं वार्षीक उत्पन्न रु.8  लाखां पेक्षा जास्त नसावे. तसेच या पुर्वी इतर कोणत्या ही राज्य अथवा केंद्र शासना कडुन परदेश शिष्यवृत्ती अंतर्गत ज्या विद्यार्थ्यानी परदेशात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम व पीएचडी अभ्यासक्रम पुर्ण करण्यासाठी योजनेचा लाभ घेतला आहे. असे विद्यार्थी पात्र असणार नाही. पुर्णवेळ अभ्यासक्रमाचे प्रवेशित विद्यार्थ्यानाच हि योजना लागु असेल. विद्यार्थ्यानी प्रवेश घेतलेली शिक्षण संस्था ही जगातील क्रमवारीत THE(Times/HigherEducation) किंवा OS (OuacquareiliSymodes) Ranking 200 च्या आत असावी. शिष्यवृत्ती द्या वयाच्या एकुण जागां पैकी 30 टक्के जागा मुलीसाठी राखीव असतील. अन्य अटि व शर्ती  या सविस्तर जाहीरतीमध्ये  तसेच विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग शासन निर्णय दिनांक 11 ऑक्टोबर 2018 मध्ये नमुद केल्याप्रमाणे लागू राहतील.   अर्जाचा नमुना शासन निर्णय शिष्यवृत्तीसाठी पात्रतेच्या अटि व  शर्ती तसेच इतर सविस्तार माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला भेट द्यावी. सा वेबसाईट वरुन अर्ज डाऊन लोड करून तो परिपुर्ण व आवश्यक त्या कागदपत्रासह दिनांक 5 ऑगस्ट 2022 पर्यत सादर करावेत. या योजनेच्या माध्यमातुन विद्यार्थ्याना विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पुर्ण रक्कम दिली जाते. वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता परदेशातील संबंधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT  विभागाने ठरवून  दिलेल्या  दराप्रमाणे अथवा महाराष्ट्र  शासनाने  वेळोवेळी  जाहिर केलेल्या दराप्रमाणे रक्कम निवार्ह भत्ता म्हणुन अनुज्ञेय असेल. विद्यार्थ्यास परदेशात जातांना व  अभ्यासक्रम यशस्वीरित्या पुर्ण केल्यानंतर परत येतांना विमान प्रवासा चा खर्च अनुज्ञेय असेल. तेव्हा या शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थ्यानी दि. 5 ऑगस्ट 2022 पर्यत आपले अर्ज सादर करुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी या योजनेचा लाभ घ्यावा.

असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग श्री. सुनिलवारे यांनी केलेआहे.

000

 

No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...