Friday, October 26, 2018

नोंदणी न झालेल्या मतदारांनी लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी अभिजित बांगर

मतदार नोंदणीसाठी रविवारी विशेष मोहिम
रविवारी सर्व मतदान केंद्रावर बीएलओ असणार
अमरावती, दि.26: पात्र असूनही मतदार नोंदणी न झालेल्या नागरिकांनी रविवारी (ता. 28) आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत मतदान केंद्रावर जाऊन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 1 जानेवारी 2019 रोजी मतदार म्हणून नोंदणीस पात्र असूनही मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या व्यक्तींची नोंदणी तसेच मतदार यादीतील नोंदणी तसेच मतदार यादीतील नोंदीची दुरुस्ती करण्यात येत आहे.
          दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादी संबंधी दावे व आक्षेप दाखल करण्याची मुदत दि. 31 ऑक्टोबर 2018 रोजी संपत आहे. तत्पूर्वी जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी दिनांक 28 ऑक्टोबर 2018  रोजी संपूर्ण अमरावती जिल्ह्यात याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओ हजर राहणार आहेत.
 नागरिकांनी या दिवशी मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही याची पडताळणी करुन घ्यावी तसेच ज्या व्यक्तींनी पात्र असूनही मतदार यादीत नाव नोंदविलेले नाही, त्यांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन बीएलओकडे नमुना 6 भरुन देऊन सहकार्य करावे व या राष्ट्रीय कार्यात मनापासून सामील व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी केले आहे.
०००

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार