Saturday, July 1, 2017

4 कोटी वृक्षलागवड अभियानाची पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्साहात सुरुवात

लोकसहभागातून 4 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण होईल
-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील



                  - जिल्ह्यात आठवडाभरात लावणार साडेआठ लाख झाडे 
                  - वृक्षलागवड कार्यक्रमात जिल्ह्यातील 40 हून अधिक यंत्रणांचा सहभाग
                  -  जिल्ह्यात 22 लाख रोपे उपलब्ध
                  -  जिल्ह्यात सुमारे 30 हजारापेक्षा अधिक लोकांची हरित सेना नोंदणी पूर्ण

        अमरावती, दि. 1 : वन विभागाने गतवर्षी राबविलेल्या मोहिमेत 2 कोटींहून अधिक झाडे लावण्याचे कार्य लोकसहभागातून पूर्ण झाले. त्यामुळे यंदा 4 कोटी झाडे लावण्याचा निर्धार शासनाने केला व त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता यंदा राज्यात चार कोटींहून अधिक वृक्षारोपण होईल, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
       वनविभागातर्फे चार कोटी वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ जिल्ह्यात पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते वडाळी राखीव वनक्षेत्रात वृक्षारोपणाद्वारे झाला. त्यावेळी ते बोलत होते.  खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. सुनील देशमुख, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, मुख्य वनसंरक्षक डॉ. प्रवीण चौहान, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांच्यासह अनेक पदाधिकारी, अधिकारी –कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
      श्री. पोटे- पाटील म्हणाले की, राज्यातील वनक्षेत्र वाढविण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनिश्चित पर्जन्यमान, प्रदूषण, वन्यजीवांनी जंगल सोडून शहरात शिरणे अशा विपरीत गोष्टींवर वनांच्या निर्मितीतून मात करता येईल. त्यासाठी वनविभागाकडून चांगले प्रयत्न होत आहेत. नागरिकांनीही पर्यावरणाप्रती आपली जबाबदारी या कार्यात अधिकाधिक योगदान दिले पाहिजे.
श्री. अडसूळ म्हणाले की, शासनाच्या गतवर्षीच्या अभियानातील वृक्षलागवडीतील 80 टक्क्यांहून अधिक झाडे जगली.  अभियानातून मोठे वनक्षेत्र  निर्माण होत आहे, हे सुचिन्ह आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन घरोघरी गॅस उपलब्ध करुन देण्यासारखे अनेकानेक लोकहिताचे व पर्यावरणपूरक निर्णय घेत आहे. 
       जनतेच्या मनात वृक्षलागवड करण्याची मानसिकता निर्माण करणे व ती जीवनपद्धतीचा भाग बनविणे, हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे, असे श्री. बांगर यांनी सांगितले. उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, सामाजिक वनीकरण वनसंरक्षक रवींद्र वानखडे, कार्य आयोजन विभागाचे वनसंरक्षक अमित कळसकर,    तहसीलदार गजेंद्र मालठाणे, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर, वनराईचे विश्वस्त मधुभाऊ घारड, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, नगरसेविका सपना ठाकूर, आशिष गावंडे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी- कर्मचारी, अनेक सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
उत्कृष्ट कर्मचा-यांचा सत्कार

 जंगलात पाण्यासाठी फिरणारी बिबट्याची मादी व दोन बछड्यांसाठी स्वयंप्रयत्नातून पाणवठा निर्माण करणा-या वन कर्मचारी श्री. कदम यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट कर्मचारी नरेंद्र कछुवाह यांचाही सत्कार झाला.
  
           जिल्ह्यात दि. 7 जुलैपर्यंत सुमारे साडेआठ लाखांहून अधिक झाडे लावण्यास सुरुवात झाली असून, त्यानुसार खड्डे, रोपवाटप आदी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विभागाकडे 22 लाख रोपे उपलब्ध असून, यंदा 10 लाख रोपे लागवडीसाठी देण्यात येत आहेत. वडाळी वनपरिक्षेत्रात 25 हेक्टर जागेत 27500 झाडे लावण्यास सुरुवात झाली आहे.
   


शिवटेकडीवर पालकमंत्र्यांच्या हस्ते वृक्षारोपण


महापालिकेच्या वृक्षारोपण अभियानाची सुरुवात पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांच्या हस्ते शिवटेकडीवर वृक्षारोपणाद्वारे झाली. यावेळी खासदार श्री. अडसूळ, आयुक्त श्री. पवार आदी उपस्थित होते.

00000

15 Attachments
 
 











Friday, June 30, 2017

चार कोटी वृक्षलागवड अभियानाचा शनिवारी प्रारंभ
वृक्षदिंडीत मोठा प्रतिसाद; नागरिकांनी केला वृक्षसंवर्धनाचा निर्धार
             अमरावती, दि. 30 :  शासनाच्या 4 कोटी वृक्षलागवड अभियानाला उद्यापासून (दि. 1 जुलै) प्रारंभ होत असून, त्यानिमित्त आज वनविभागातर्फे शहरात वृक्षदिंडी काढण्यात आली. जिल्ह्यातील विविध संस्थांचे कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिकांनी या दिंडीत उत्स्फूर्तपणे सहभागी होत वृक्षसंवर्धनाचा निर्धार केला.   
जिल्हाधिकारी कार्यालयापासून या वृक्षदिंडीची सुरुवात झाली. प्रारंभी महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्या हस्ते वृक्षपूजन करण्यात आले. त्यानंतरदापोरी येथील संत तुकडोजी महाराज भजन मंडळीच्या कार्यकर्त्यांनी गायिलेल्या भजनाच्या तालासुरावर दिंडी इर्विन चौकाकडे मार्गस्थ झाली.          
पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांचाही सहभाग
इर्विन चौकात पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील हेही दिंडीत सहभागी झाले. पालकमंत्र्यांनी दिंडी खांद्यावर घेत नागरिकांचा व प्रशासनाचा उत्साह वाढवला. ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’, ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी’अशा घोषणा देत ही दिंडी पुढे रेल्वेस्थानक चौकात आली. त्यानंतर आणखी नागरिक दिंडीत सहभागी होत वातावरण अधिक उल्हसित झाले.
 मोर्शी येथील विद्याधर कोरे यांनी संत गाडगेबाबांच्या वेशभूषेत चित्ररथावर आरुढ होऊन वृक्षप्रेमाचा संदेश दिला. वृक्षदिंडीत ज्ञानमाता विद्यालय, शिवाजी मराठा विद्यालय, आरडीआयके शाळा, मणिभाई गुजराती शाळा, शासकीय तंत्रनिकतेन आदी शाळांचे विद्यार्थी उत्साहात घोषणा देत वृक्षसंगोपनाचा संदेश देत होते. पुढे बसस्थानक चौक- पोलीस पेट्रोल पंप- गर्ल्स हायस्कूल चौक असा दिंडीचा मार्ग होता. तिथून सगळे वृक्षप्रेमी बचतभवनाजवळ येऊन दिंडीचा समारोप झाला.  वनसंरक्षक हेमंतकुमार मीना,  उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम, वनसंरक्षक रवींद्र वानखडे, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. पडगव्हाणकर, सहायक वनसंरक्षक अशोक कविटकर, कार्य आयोजन विभागाचे वनसंरक्षक अमित कळसकर, मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, डॉ. गजानन वाघ, प्रा. राजेश चिधडी आदी यावेळी उपस्थित होते.
00000 



















Wednesday, June 28, 2017

वनविभागातर्फे जिल्ह्यात लावणार साडेआठ लाख झाडे
             वृक्षारोपण अभियान सायकल रॅलीला मोठा प्रतिसाद   
             
           अमरावती दि.28:  ‘चला वृक्षारोपण करुया, महाराष्ट्राचे भविष्य हरित करुया’, ‘वृक्ष लावा दारोदारी, समृद्धी येईल घरोघरी’ अशा अनेक घोषणा देत विद्यार्थ्यांनी आज वृक्षारोपणाचा संदेश दिला. निमित्त होते वृक्षलागवड अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे आयोजिलेल्या सायकल फेरीचे!
वन विभागातर्फे दि. 1 ते 7 जुलै दरम्यान राज्यात 4 कोटी वृक्षलागवड होणार आहे. अमरावती जिल्ह्यात सुमारे साडेआठ लाख झाडे लावण्यात येणार आहेत. या अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे सर्व विभागांच्या सहकार्याने सायकल रॅली काढण्यात आली. त्यात विविध क्षेत्रातील नागरिकांसह विद्यार्थीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.  
          विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) डॉ. प्रवीण चौहान, उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अरुण राऊत, सामाजिक वनीकरण उपसंचालक पी. डी. मसराम यांच्यासह अनेक मान्यवर रॅलीत सहभागी झाले होते.
मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयापासून मोठ्या उत्साहात सायकल रॅलीची सुरुवात झाली. रोपटी व फुलांनी सुशोभित चित्ररथ व त्यापाठोपाठ सायकलस्वार अधिकारी- कर्मचारी, नागरिक व विद्यार्थी असे या रॅलीचे स्वरुप होते. पोलीस आयुक्त शहर कार्यालय – मालटेकडी- बसस्थानक- रेल्वेस्थानक- राजकमल चौक- जयस्तंभ चौक- इर्विन चौक- गर्ल्स हायस्कूल चौक या मार्गे रॅली बचतभवनात येऊन तिचा समारोप झाला. 
अनेक शाळा, महाविद्यालये, अशासकीय व सामाजिक संघटनांच्या एकत्रित सहभागातून वृक्षलागवड मोहिम यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही ही मोहिम यशस्वी करण्यात येईल, असे श्री. मीना यांनी यावेळी सांगितले.वनसंरक्षक रवींद्र वानखडे, श्री. कळसकर, सहायक वनसंरक्षक श्री. कविटकर, श्री. पडगावकर आदी यावेळी उपस्थित होते.
                                       शुक्रवारी वृक्षदिंडी व वृक्षपूजन
       अभियानाच्या प्रसारासाठी वनविभागातर्फे शुक्रवार, दि. 30 जूनला सकाळी नऊला वृक्ष दिंडी व वृक्ष पूजनाचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे.  वृक्षदिंडीची जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरुवात होऊन ती इर्विन चौक- रेल्वेस्थानक चौक बसस्थानक चौक- पोलीस पेट्रोल पंप- गर्ल्स हायस्कूल चौक मार्गे जाऊन बचतभवनात समारोप होणार आहे. 
                                     000000









Monday, June 26, 2017

 उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे अमरावती राज्यात अव्वल ठरेल
- पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

पालकमंत्र्यांकडून विकास कामांची पाहणी
   अमरावती दि.26: जिल्हा न्यायालय, न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा यांच्या अद्ययावत सुविधा असलेल्या प्रशस्त इमारती शहरात आकारास आल्या आहेत. शहरातील उड्डाण पूल, रस्ते आदी विकासकामेही लवकरच पूर्ण करण्यात येतील. या उत्कृष्ट नागरी सुविधांमुळे अमरावती शहर राज्यात अव्वल ठरेल, असा विश्वास पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.    
शहरात उभारण्यात आलेल्या जिल्हा न्यायालय, न्याय सहायक वैद्यकीय प्रयोगशाळा, सुपर स्पेशालिटी रुग्णालय आदी इमारती, राजापेठ उड्डाण पूल, बेलोरा विमानतळ आदी विविध विकास कामे व प्रकल्पांची पालकमंत्र्यांनी आज पाहणी केली. यावेळी खासदार आनंदराव अडसूळ, महापौर संजय नरवणे, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, शहरात सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा व भविष्यातील विकासाच्या शक्यता पडताळण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी-कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन या कामांची पाहणी केली आहे. या पाहणीत सर्वांच्या संकल्पना जाणून घेतल्या व शक्य तिथे विकास कामांत त्यांचा समावेशही केला जाईल.  राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ज्या ज्या विभागांच्या नव्याने इमारती उभारल्या जात आहेत,  त्या विभागांच्या अधिका-यांच्या संकल्पना जाणून घेऊन इमारतींना आकार देण्यात येत आहे. ही सर्व कामे गतीने पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
  विमानतळावरील एअर स्ट्रीपची लांबी 1800 मीटरहून 2200 मीटर पर्यंत वाढविल्यास मोठी विमानेही उतरू शकतील. त्यामुळे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे श्री. पोटे- पाटील यांनी यावेळी सांगितले. ही मागणी पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे खासदार श्री. अडसूळ म्हणाले. विमानतळाच्या कुंपण भिंतीला मान्यता मिळाली आहे. लवकरच ते काम सुरु होणार आहे.


महापालिकेसाठी नवीन इमारत
यावेळी पालकमंत्र्यांनी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी प्रस्तावित जागेची पाहणी केली. ही जागा तपोवन परिसरात महामार्गालगत असून लवकरच हे काम मार्गी लावण्यात येईल. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे, असे श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महापालिकेने निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी दिली.
जिल्हा क्रीडा संकुल
 जिल्हा क्रीडा संकुलासाठी प्रस्तावित 7 एकर जागेची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. या ठिकाणी आर्चरी रेंज, बॅडमिंटन, ज्युडो हॉल, तरणतलाव आदी  सुविधा उभारण्यात येणार आहेत.  या जागेची तत्काळ मोजणी करून घ्यावी व कामाला गती द्यावी, असे निर्देश श्री. बांगर यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
                             वडाळी गार्डन तलावाचे सौंदर्यीकरण
वडाळी गार्डन येथील तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे. तलावाची स्वच्छता करुन त्या भोवती चांगल्या दर्जाचे कुंपण उभारावे, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
त्यानंतर त्यांनी जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत, प्रादेशिक न्यास सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे भेट देऊन या तिन्ही इमारतींच्या प्रत्येक कक्षाची पाहणी केली. चित्रा चौक ते मालवीय पुल, राजापेठ उड्डाणपूल येथील कामांची पाहणी करुन या कामांना तत्काळ गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.  या प्रकल्पांमुळे नागरी सुविधांत भर पडून विकासाला गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
                                                              00000








Wednesday, May 24, 2017

खनिज विकास प्रतिष्ठान निधीतून
शिक्षण,स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य द्यावे.
                                               पालकमंत्री प्रविण पोटे –पाटील यांचे निर्देश
              अमरावती दि. 24 : जिल्हयातील खनिज विकास प्रतिष्ठानमार्फत खनिजबाधित क्षेत्रातील  विकासकामे करताना  पायाभुत सुविधेपेक्षा सामाजिक क्षेत्रातील  शिक्षण,पिण्याचे पाणी  व स्वच्छता या   कामांना  प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी आज दिले.
                जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट कार्यकारी परिषदेच्या  बैठकीत ते बोलत होते.यावेळी आमदार रमेश बुंदिले,जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.शिरीष नाईक व खनिज कार्यकारी परिषदेचे  सर्व सदस्य उपस्थित होते.
            दर्जेदार शिक्षणानेच  तळागाळातील लोकांचा विकास करता येईल .या साठी शाळेच्या इमारतींचे बांधकाम,स्वच्छतागृहे, पिण्याचे शुध्द पाणी ,अतिरिक्त वर्गखोल्यांचे बांधकाम आदी सुविधांचे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र योजनेतून प्राधान्याने काम व्हावे.शाळाच्या बांधकामासंबंधीचे प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडुन मागविण्यात यावेत,अशी सुचनाही त्यांनी केली.बरेचदा शाळामध्ये  स्वच्छतागृहे नसल्याने आरोग्याविषयक तक्रारी उदभवू शकतात.विशेषत:मुलींसाठी स्वच्छतागृहे असावीत. शाळांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवुन ती पूर्ण करावीत. शाळेतील कलावर्गात  भिंतीची कलात्मक व शैक्षणिक माहिती देणाऱ्या बाबींचा समावेश करावा .मुख्यमंत्री महोदयांच्या निर्णयानुसार डिसेंबर 2018 पर्यत राज्यातील सर्व शाळा डिजीटल करावयाचे आहेत .याच अनुषंगाने जिल्हयातील खनिज बाधित क्षेत्रातील शाळांमध्ये देखील स्मार्ट बोर्ड,ऑनलाईन शिक्षण तसेच वाचनालय,सुसज्ज्‍ा  प्रयोगशाळा असले पाहीजे.तसेच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गटशेतीचा प्रकल्प प्रायोगीक तत्वावर सुरू करुन तो यशस्वी  होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
                    जिल्हयातील 1811 गावांचा समावेश खनिज बाधीत क्षेत्रात आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली.या खनिजबाधित क्षेत्रातील गावांच्या विकासासाठीच 1 सप्टेंबर 2016च्या निर्णयानुसार जिल्हास्तरावर जिल्हा खनिज प्रतिष्ठानची स्थापना केली आहे.
              एप्रिल 2017 अखेर जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीमध्ये 1 कोटी 68 हजार रुपयांचा निधी  असुन त्यातील प्रशासकीय कामाकरीता 5 टक्के (5 लक्ष), या निधीतील दोन तृतीयांश निधी प्रत्यक्ष बाधित क्षेत्रासाठी (67 लक्ष) निधीतील पायाभुत सुविधेसाठी 27 लक्ष तर शिक्षण ,आरोग्य,महिला व बालकल्याण,पिण्याचे पाणी पुरवठा  या सामाजिक क्षेत्राकरीता 40 लक्ष अशी राखीव तरतुद आहे. तर एक तृतीयांश निधी अप्रत्यक्ष बाधीत क्षेत्रासाठी (33 लक्ष) असुन त्यातील सामाजिक क्षेत्र (20 लक्ष) तर पायाभुत सुविधेकरीता (13 लक्ष) अशी तरतुद केली आहे.
                  जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान कार्यालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जागा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी केली.यावेळी वार्षिक जिल्हास्तरीय कार्यकारी परिषदेच्या सर्व सदस्यांनी आराखडयाला मान्यता दिली.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे उदिष्ट-
·        जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत खनिज बाधीत क्षेत्राचा विकास व कल्याणासाठी कार्यक्रम राबविणे
·        खाणकाम करतांना व त्यानंतर झालेल्या कृतीमुळे तेथील जनतेवर झालेले पर्यावरण,आरोग्य ,व सामाजिक व आर्थिक परिस्थीतीवरील आघात ,परिणाम कमी करणे व त्यावर उपाययोजना करणे.




अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...