Monday, February 5, 2018

सूत गिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून
देण्यासंबंधी समिती स्थापन करा
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 5 : वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी सूत गिरण्यांना सध्याच्या दरापेक्षा कमी दराने वीज उपलब्ध करून दयावी. यासाठी महाऊर्जा व संचालक वस्त्रोद्योग यांच्या समन्वयाने समिती स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वस्त्रोद्योग विभागाच्या बैठकीत दिली. यावेळी  वस्त्रोदयोग मंत्री सुभाष देशमुख हे उपस्थित होते
वस्त्रोद्योग विभागातर्फे सचिव वस्त्रोद्योग अतुल पाटणे यांनी यावेळी विस्तृत  सादरीकरण केले.
राज्यात 132 सूत गिरण्या असून वस्त्रोद्योगाचा मुख्य घटक असलेल्या सूत गिरण्यांना कमी दराने वीज उपलब्ध करून दिल्यास त्या अधिक सक्षमपणे चालू शकतात. पारंपरिक ऊर्जेसोबतच सौर उर्जा व अन्य स्त्रोतांव्दारे वीज उपलब्ध्‍ा करून देण्यासंदर्भात समितीने अहवाल सादर करावा. सूत गिरण्या, साखर उद्योग, रेशीम विकास यांना लागणाऱ्या कुशल व तांत्रिक प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध्‍ा करून देण्यासाठी स्वतंत्र संवर्ग करण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी वस्त्रोद्योग विभागाला दिले.
कापुस उत्पादक जिल्ह्यातच वस्त्रोद्योग वाढीला प्रोत्साहन देण्यात यावं. तसेच पारंपारिक धागा निर्मितीसोबतच अंबांडी, केळी, बांबू यापासून तयार होणाऱ्या धागा निर्मिती संदर्भात ही संशोधन करण्यात यावे. तसेच टेक्सटाईल युनिव्हसिर्टी बाबत देखील यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डी. के. जैन, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल,उर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह उपस्थित होते.
००००

मुख्यमंत्री साहेब आज मला न्याय मिळाला..!
लोकशाही दिनातमिळाली उत्स्फूर्त प्रतिक्रिया

मुंबई, दि. 5 : मंत्रालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या ऑनलाईन लोकशाही दिनात राज्यातील सामान्य नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यावर तातडीने मार्ग काढला जातो. असाच अनुभव आज झालेल्या लोकशाही दिनात सोलापूरच्या चनबसप्पा घोंगडे यांना आला. त्यांच्या तक्रारीवर कार्यवाही झाल्यानंतर त्यांच्या तोंडून "मुख्यमंत्री साहेब आज मला आपल्याकडून न्याय मिळाला..खाली न्याय मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे"अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोकशाही दिनात आज 12 जणांच्या तक्रारींची दाखल घेऊन त्यावर सुनावणी करण्यात आली. त्यावेळी श्री. घोंगडे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
श्री. घोंगडे यांची लोहारा जिल्हा उस्मानाबाद येथे जमीन आहे. त्यांच्या मालकीच्या जमिनीवर बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉटची नोंद झाल्याबाबत त्यांनी तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात केलेल्या कारवाईबाबत महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी माहिती देताना सांगितलेयाप्रकरणी केलेल्या चौकशीत तथ्य आढल्याने फेरफार रद्द करण्यात आले असून गाव नमुन्यावर चुकीच्या नोंदी घेणाऱ्या ग्रामसेवक व उपसरपंचा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे, आपल्या तक्रारीवर झालेली कार्यवाही ऐकून  श्री. घोंगडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आणि तालुकास्तरावरच न्याय मिळाल्यास चांगले होईल अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून व्यक्त केली.
वांद्रे येथील श्रीमती शिलू ननवाणी यांनी घराजवळील नाल्यावर बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाचा त्रास होत असल्याबाबत तक्रार केली होती. यावर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मार्फत स्थळ पाहणी करावी व त्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
कुसुंबा जिल्हा धुळे येथील ट्रॉमा केअरचे काम मार्गी लागले असून जागेअभावी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी त्याचे काम सुरू करण्यात येईल,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या ट्रॉमा केअरच्या कामाबाबत गणेश सूर्यवंशी यांनी तक्रार दाखल केली होती.
आज झालेल्या लोकशाही दिनात लातूर, नांदेड, पालघर, वाशीम, सिंधुदुर्ग, धुळे, रायगड, जळगाव येथील नागरीकांच्या तक्रारींवर सुनावणी करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर, महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह,नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मनीषा म्हैसकर आदी अधिकारी उपस्थित होते.

००००


बालनाट्य चळवळीच्या अध्वर्यू हरपल्या
- मुख्यमंत्री

मुंबईदि. 5 : बाल रंगभूमीच्या विकासासाठी समर्पित भावनेने आयुष्य वेचलेल्या ज्येष्ठ नाट्यनिर्मात्या सुधा करमरकर यांच्या निधनाने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहेअशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतातकुटुंबातूनच नाट्यसेवेचा वारसा घेऊन आलेल्या सुधाताई या क्षेत्राशी पूर्णत: समरस झाल्या होत्या. मराठी रंगभूमीने प्रारंभीच्या वाटचालीत दुर्लक्षित केलेल्या बालकांसाठीच्या स्वतंत्र रंगभूमीचा त्यांनी प्राधान्याने विचार केला. अमेरिकेत जाऊन त्यांनी बाल रंगभूमी संकल्पनेचा विशेष अभ्यास केला होता. बालनाट्य चळवळ रुजविण्यासाठी लिटिल थिएटर या संस्थेची स्थापना करून त्या माध्यमातून निष्ठेने प्रयत्न केले. या चळवळीच्या त्या खऱ्या अर्थाने अध्वर्यू होत्या. नाट्यलेखन,दिग्दर्शननिर्मितीअभिनय अशा सर्वच भूमिका पार पाडताना त्या जणू आयुष्यभर रंगभूमीशी अविभाज्यपणे जोडल्या गेल्या होत्या. दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये सुद्धा त्यांनी अभिनय केला असून अनेक कलावंतही घडवले आहेत.
-----000-----

Sunday, February 4, 2018

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
सोशल मीडिया महामित्र
केवळ तीन दिवसात दहा हजार समाजमाध्यमकारांचा सहभाग

मुंबई दि. 4 : आधुनिक युगातील वेगवान संपर्क साधनांचा विधायक उपयोग करुन घेण्यासाठी आणि तरुणांना अधिकाधिक वाव देऊन समाज अधिक विवेकी व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या सोशल मीडिया महामित्र’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळत असून, केवळ तीन दिवसात दहा हजार समाजमाध्यमकारांनी सहभाग नोंदवला आहे.
देशातील बहुतांश तरुण फेसबुकव्हॉट्सॲपट्विटरइन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग करीत असतात. ज्ञान आणि मनोरंजनाच्या साधनाबरोबरच लोकांची मने आणि मते घडविण्याची ताकद सोशल मीडियामध्ये असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. विधायक संदेशाची देवाण-घेवाण होत असेल तर विवेकी समाज तयार होतो हे सूत्र लक्षात घेऊन सकारात्मक बाबींसाठी समाजमाध्यमांचा प्रभावीपणे उपयोग करणाऱ्या समाजमाध्यमकारांचा गौरव करण्याच्या दृष्टिने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसाधारपणे प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे त्याभागातील प्रभावी समाजमाध्यमकारांची विविध निकषांच्या आधारे निवड करून त्यांना मा. मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे. सोशल मीडिया क्षेत्रातील प्रभावी व्यक्तींना भेटण्याचीप्रत्यक्ष संवाद  साधण्याचीसेल्फी घेण्याची संधीदेखील  मिळणार आहे.
या उपक्रमात विशेषता ग्रामीण भागातून उत्साहपूर्वक प्रतिसाद मिळत असून सर्व स्तरातून समाजमाध्यमकार सहभागी होत आहेत. यामध्ये युवक-युवती अग्रस्थानी आहेत. सकारात्मक व सौहार्दपूर्ण महाराष्ट्र बनविण्यात आपला हातभार लावण्यासाठी सोशल मीडिया-महामित्र’ उपक्रमात राज्यातील तरुणांसह महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
या उप्रकमासाठी 1 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरु झाली असून ती 18 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. गुगल प्ले स्टोअर’ अथवा ॲपलच्या ‘’ॲप स्टोअर वरुन महामित्र (Maha Mitra)हे ॲप्लीकेशन डाऊनलोड करुन नोंदणी करता येणार आहे. या उपक्रमात राज्यातील 15 वर्षावरील कोणीही रहिवासी विनाशुल्क सहभागी होऊ शकेल.
प्रत्येक तालुक्यातून (क्षेत्रातून) प्रत्येकी 10 ‘सोशल मीडिया महामित्र’ निवडले जाणार असून त्यांना जिल्हास्तरावर विशेष कार्यक्रमासाठी आमंत्रित केले जाईल. या महामित्रांची जिल्हाधिकारीजिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपोलिस आयुक्तपोलिस अधीक्षक यांच्या समवेत समाज माध्यमाच्या सदुपयोगाबाबत गटचर्चा आयोजित करण्यात येईल. या गटचर्चेअंती तालुक्यातील (क्षेत्रातील) प्रत्येकी 1 महामित्राची राज्यस्तरावर होणाऱ्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या राज्य स्तरावरील कार्यक्रमात समाज माध्यम क्षेत्रात प्रभावी अशा विविध क्षेत्रातील प्रतिष्ठितांना आमंत्रित करण्यात येईल. या कार्यक्रमात निवडलेल्यांनासोशल मिडिया महामित्र’ पुरस्कार देण्यात येईल तसेच त्यांना मान्यवरांशी संवाददेखील साधता येणार आहे.
विविध मॅसेजिंग ॲपच्या सर्वाधिक टॉप पाच ग्रुपमधील कॉन्टॅक्ट्सची संख्याफोनबुकमधील एकूण कॉन्टॅक्ट्सची संख्याकिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म/मॅसेजिंग ॲप्लीकेशन उपयोगात आणण्यात येत आहेतसहभागी व्यक्तीला त्याच्या स्नेहीजनांनी दिलेली मतेसोशल मीडियातील प्रभाव आजमावण्यासाठी सहभागी व्यक्तीला पाठविलेल्या संदेशापैकी किती संदेश त्यांनी वितरित केले आहेतआलेल्या संदेशाचे पाठविलेल्या संदेशाशी गुणोत्तर. या आधारे महामित्र निवडण्यात येतील. या निकषांना मिळणाऱ्या गुणांकनाच्या आधारे आपले स्थान (रँक) काय आहे हे त्या सहभागी व्यक्तीला दिसेल.  निकषात असलेल्या 75 गुणांच्या आधारे प्रत्येक तालुक्यातील (क्षेत्रातील) टॉप 20 सहभागी व्यक्तींची प्राथमिक फेरीत निवड करण्यात येईल. सहभागी व्यक्तीने या मोहिमेकरिता एक संदेश (मजकूरॲनिमेशनग्राफिक्स आदी) तयार करावा व तो ॲपमार्फत आयोजकांना पाठवावा. या संदेशाच्या आधारे 20 मधून 10 जणांची गट चर्चेसाठी  निवड करण्यात येईल. गटचर्चेतील सहभागाआधारे 15 पैकी गुण देऊन या 10 व्यक्तींपैकी एकाची राज्यस्तरावरील कार्यक्रमासाठी निवड करण्यात येणार आहे.
0000
उमरेड येथे औष्णीक विद्युत प्रकल्पाच्या
निर्मितीसंदर्भात सकारात्मक
- देवेंद्र फडणवीस

नागपूरदि.4 :   उमरेड येथे औष्णीक विद्युत प्रकल्पासाठी आवश्यक असलेला विपुल प्रमाणात कोळसा तसेच वीज उत्पादनाचा खर्च कमी होण्यासोबतच या परिसरातील सुमारे दहा हजार लोकांना रोजगार निर्माण होत असल्यामुळे उमरेड वीज प्रकल्पाच्या मंजुरीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईलअशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उमरेड येथे दिली.
उमरेड नगर परिषदेतर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवन तसेच पंडीत दीनदयाल उपाध्याय शॉपींग मल्टीपर्पज हॉल (नाटयगृह) चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कृपाल तुमानेविकास महात्मेआमदार सुधीर पारवे आदी उपस्थित होते.
उमरेड नगर परिषदेच्या पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी यापूर्वी 10 कोटी रुपयाचा निधी देण्यात आला असून आणखी 15 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कीदेशातील स्वच्छ शहर म्हणून शहराचा विकास करा. उमरेडला राज्यस्तरावर हागणदारीमुक्त शहर म्हणून गौरविण्यात आले असल्याचे सांगतांना शहरातील प्रत्येक गरीब कुटुंबांना घर देण्यासाठी प्रस्ताव तयार करा. यासाठी आवश्यक निधी देण्यात येईलअशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
नागपूर नागरीक रेल्वेसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सांगतांना मुख्यमंत्री म्हणाले कीनागपूर-उमरेड या सिमेंट मार्गासोबतच रस्त्याचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. गोसेखुर्द प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी दिला असून पुनर्वसनासाठीही आवश्यक असलेला संपूर्ण निधी देण्यात येईलपरंतु आदर्श पुनर्वसन कराअशा सूचना यावेळी त्यांनी दिल्यात.
ग्रामीण व शहरी भागातील चांगली आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना तसेच मुख्यमंत्री जनआरोग्य कक्षाच्या माध्यमातून दूर्धर आजारावरील उपचारासाठी तसेच शस्त्रक्रियेसाठी निधी देण्यात आला असल्याचे सांगतांना ते पुढे म्हणाले कीप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठी जनआरोग्य योजना जाहीर केली असून 50 कोटी लोकांना खाजगी रुग्णालयात 5 लक्ष रुपये खर्चापर्यंत मोफत उपचार मिळणार आहे. आरोग्यशिक्षणपिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटीबध्द असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांनी व्यक्त केली कृतज्ञता
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत उमरेड तालुक्यातील सुमारे 11 हजार 836 शेतकऱ्यांना 65 कोटी रुपयाची शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शालश्रीफळ तसेच नांगराची प्रतिकृती भेट देवून कृतज्ञता व्यक्त केली.
गोरगाव कलांद्री येथील केशव शंकर बानाईतमांढळ येथील रामकृष्ण निरगुळकर व सिलेपार येथील संभाजी घरड व राजू बाळबुधे आदी शेतकऱ्यांनी कर्जमाफी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत 39 हजार 492 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याचे सांगतांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,राज्यातील 30 वर्षापेक्षा जास्त औष्णीक वीज प्रकल्प नियमानुसार बंद करण्यात येणार असून नव्याने उमरेड येथील वीज प्रकल्पाला मंजुरीचा प्रस्ताव आहे. नागनदीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करुन 1200 मेगावॅटचे दोन प्रकल्प सुरु होवू शकतात.
शेतकऱ्यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज उपलब्ध राहणार आहे. उपसासिंचनासाठी दिवसा 12 तास ही सौरऊर्जेच्या माध्यमातून तर 12 तास औष्णीक ऊर्जेच्या माध्यमातून मिळणार आहे. चिंचघाट उपसासिंचनामुळे साडेसहा हजार शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी मिळू शकेल. आतापर्यंत 5 लाख शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच शहराचे जिओ मॅपींग करण्याचे काम सुरु झाले असल्याचे त्यांनी सां‍गितले.
आमदार सुधीर पारवे यांनी यावेळी उमरेड मतदारसंघातील सुरु असलेल्या विविध विकास कामांच्या प्रगतीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली. मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन द्यावाअशी मागणी केली.
उमरेड नगराध्यक्षा श्रीमती विजयलक्ष्मी भदोरिया यांनी आपल्या प्रास्ताविकातून शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांमध्ये विविध मूलभूत सुविधासार्वजनिक आरोग्यस्वच्छता अभियान यामध्ये नगर परिषदेने उत्कृष्ठ काम केले आहे. त्यामुळे राज्यातील पहिले हागणदारीमुक्त शहर म्हणून राज्य शासनाकडून गौरविण्यात आले. नगर परिषदेच्या या विविध विकास कामांमध्ये रस्तेमैदानमुलींचे वसतीगृहतलावाचे सौंदर्यीकरणासाठी नगर परिषदेला 25 कोटीच्या निधीची मागणी केली.
00000000


कृषी प्रदर्शन शेतक-यांसाठी दिशादर्शक
-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 4 : शेती, पशुपालन व पूरक व्यवसायांचे अद्ययावत तंत्रज्ञान व माहिती यामुळे कृषी प्रदर्शनांसारखे उपक्रम शेतक-यांसाठी दिशादर्शक ठरतात, असे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे सांगितले.
        श्रद्धा आर्टस् सोसायटीतर्फे सायन्सकोर मैदानावर आयोजित कृषी, पशुपक्षीप्रदर्शनाला भेट देऊन तेथील विविध कक्षांची पाहणी केली. श्रद्धा आर्टस् सोसायटीच्या ज्योती तोटेवार, पालकमंत्र्यांचे स्वीय सचिव अनिल भटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी यावेळी प्रदर्शनातील प्रत्येक कक्षास भेट देऊन तेथील उत्पादनांची माहिती घेतली व लघुउद्योजकांना प्रोत्साहित केले. अद्ययावत तंत्रज्ञान, संशोधन शेतक-यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाकडून कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे, पूरक व्यवसायांसाठी प्रोत्साहनपर अनेक योजना राबविल्या जातात. कृषी उत्पादनांचे विपणन सर्वदूर व्हावे यासाठी प्रदर्शन , असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
00000










इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे उद्घाटन
        नव्या पिढीतून संशोधक घडविण्यासाठी शिक्षकांनी योगदान द्यावे
                                                                      -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
अमरावती दि. 4 : संशोधनाला चालना मिळून देशाच्या विकासप्रक्रियेला गती मिळावी यासाठी शासनाने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. नव्या पिढीतून संशोधक घडविण्यासाठी शिक्षक व पालकांनीही मुलांच्या चिकित्सक वृत्तीला वाव देत योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे केले.
अमरावती व यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या सहकार्याने ज्ञानमाता विद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.  जिल्हापरिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार श्रीकांत देशपांडे, जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, शिक्षण सभापती जयंत देशमुख, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती नंदिनीताई दरणे, शिक्षणाधिकारी(माध्यमिक) निलीमा टाके, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर. डी. तुरणकर, ज्ञानमाता विद्यालयाचे मुख्याध्यापक फादर अ. आरोक्य सामी, राष्ट्रीय संशोधन संस्थेचे मनीष भोयर आदी उपस्थित होते.
श्री. पोटे म्हणाले, विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळविण्यासाठी इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासारखे उपक्रम शासनाकडून राबविले जात आहेत. विद्यार्थ्यांमधील कुतुहल टिकून राहावे म्हणून शिक्षक व पालकांनीही त्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. माझ्या वर्गातून शिक्षित होणारा विद्यार्थी हा यशस्वी व्यक्ती व आदर्श नागरिक झाला पाहिजे, अशा ध्येयाने शिक्षकांनी अध्यापन केले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अनेक महत्वाचे निर्णय अमलात आणले आहेत. उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर करुन व्यवस्थापनावरील खर्च कमी करुन तो शैक्षणिक  बाबींवर खर्च करणे, असा शासनाचा प्रयत्न आहे. विज्ञानाचे प्रयोग सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनुदान देऊन प्रोत्साहित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रत्येकाने एका गरीब मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचे आवाहन मी अधिकारी व समाजातील मान्यवरांना केले होते. या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळून आज हजारो मुले त्या माध्यमातून शिकत आहेत. लोकसहभागातून कामे कशी यशस्वी होतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे, असेही त्यांनी सांगितले. 
श्री. गोंडाणे, आमदार श्री. देशपांडे, श्री. ढोमणे, श्रीमती दरणे यांनीही मनोगत व्यक्त केले. खरे विज्ञान चिकित्सेतून सुरु होते. त्यामुळे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतील या उपक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाचा उपयोग करुन नवनवीन मॉडेल तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते, असे शिक्षण सभापती श्री. देशमुख यांनी सांगितले.
 या प्रदर्शनात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील अनेक विद्यालयांतून सव्वाशेहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले असून, त्यांना त्यासाठी शासनाकडून 10 हजार रुपये अनुदान देण्यात आले, असे श्रीमती टाके यांनी सांगितले. फादर सामी यांनी आभार मानले.
00000




अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...