Thursday, November 28, 2019

जीवनात यशस्वितेसाठी खिलाडू वृत्ती आवश्यक - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

राज्यस्तरीय शालेय खो- खो क्रीडा स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ
                







·       राष्ट्रीय स्पर्धेचा बहुमानही अमरावतीलाच  
अमरावती, दि. 28 – जीवनात यशस्वितेसाठी खिलाडू वृत्ती, साहस, चिकाटी व उमदेपण या गुणांची गरज असते. खेळांतून हे गुण विकसित होतात. त्यामुळे सर्वांनीच खेळासाठी वेळ दिला पाहिजे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात क्रीडा विभागातर्फे चौदा वर्षांखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय खो- खो क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ आज श्री. नवाल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.  विभागीय क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख अध्यक्षस्थानी होत्या. मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, उपाध्यक्ष डॉ. श्रीकांत चेंडके, सचिव डॉ. माधुरी चेंडके, शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. के. देवनाथ, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू डॉ. नितीन चव्हाळे उपस्थित होते.
या स्पर्धेत राज्यातील आठ विभागांतून 16 संघाचे 192 विद्यार्थी व विद्यार्थिनी खेळाडू सहभागी झाले आहेत. त्यातून निवड झालेल्या संघांना राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग मिळणार असून, राष्ट्रीय स्पर्धेचा बहुमानही अमरावतीलाच मिळाला आहे. ही स्पर्धा जानेवारीत होईल.
खेळाडूंना खेळताना प्रतिस्पर्ध्यांचा खेळ पाहून तातडीने निर्णय घेणे व वेगवान हालचाली कराव्या लागतात. त्यामुळे खेळणा-या मुलांमध्ये शारीरिक बळाबरोबर निर्णयक्षमता, बुद्धिमत्ता विकासही होतो, असे श्रीमती देशमुख यांनी यावेळी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले पथसंचलन व मल्लखांब प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
श्री. जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. विजय पांडे यांनी सूत्रसंचालन केले. क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी आभार मानले. निवड समितीचे सदस्य प्रशांत पवार, गुरुदत्त चव्हाण, योगेश शिर्के, प्रा. विलास दलाल, संजय कथलकर, भास्कर घटाळे, अनिल बोरवार, संतोष विघ्ने, उमेश बडवे, संदेश गिरी, नितीन चवाळे, महेश अलोणे आदी उपस्थित होते.
                            000

Wednesday, November 27, 2019

पणन महासंघाने विविध प्रयोगांसाठी पुढाकार घ्यावा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

पहिल्या दिवशी 216. 55क्विंटल खरेदी
                शासकीय कापूस खरेदीचा जिल्ह्यात शुभारंभ
              






अमरावती, दि. 27 - पणन महासंघाने कापूस खरेदीच्या कामाप्रमाणेच शेतकरी बांधवांसाठी इतरही उपक्रमांसाठी पुढाकार घ्यावा. कापूस वेचणी यंत्र आदी साहित्य पुरविण्यासारखे वेगवेगळे प्रयोग करता येणे शक्य आहे. अशा कामांसाठी जिल्हा प्रशासन सदैव सहकार्य करेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केले.
 राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघातर्फे यंदाच्या हंगामासाठी शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या हस्ते आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. वलगाव येथील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी येथे हा शुभारंभाचा कार्यक्रम झाला. महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख अध्यक्षस्थानी होते. महासंघाचे उपाध्यक्ष ॲड. विष्णुपंत सोळंके, संचालक उषाताई शिंदे, प्रसेनजीत पाटील, सुरेशराव देशमुख,सुरेश चिंचोळकर, शिरीष धोत्रे, नामदेवराव केशवे, ययाती नाईक, भरत चामले, नरेंद्र ठाकरे, शिवाजीराव दसपुते  जिल्हा उपनिबंधक संदीप जाधव आदी यावेळी उपस्थित होते.  खरेदीच्या पहिल्याच दिवशी 216.55 क्विंटल खरेदी झाली आहे.
          श्री. नवाल म्हणाले की,  पणन महासंघ कापूस हमीभावाने खरेदी करत आहे. आता महासंघाने शेतक-यांच्या लाभासाठी शक्य ते सर्व प्रयोग करावेत. शेतक-यांचे सातबारा ऑनलाईन करण्यात आले आहेत.  तथापि, त्यावर पीकांची नोंद बरोबर आहे किंवा कसे, हे तपासून घ्यावे. तांत्रिक चूक राहू नये जेणेकरून विमा व इतर योजनांचा लाभ घेताना काहीही अडचण येणार नाही.  ग्रामीण परिसरासाठी पांदणरस्त्यांची योजना प्रभावीपणे राबवण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
  यावेळी महासंघाचे अधिकारी, कर्मचारी व परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.
                                       000

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करा - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याव्दारे पांदन रस्त्यांची पाहणी






अमरावती, दि. 27 : शेतकऱ्यांना शेतमाल, निविष्ठा, बीबियाणे शेतात ने-आण करणे सोईचे व्हावे, यासाठी मोठ्या संख्येने गुणवत्तापूर्ण व दर्जेदार पांदण रस्त्यांची निर्मिती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संबंधित विभागाला दिले. शेतकऱ्यांना पांदण रस्त्याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाशी संपर्क साधावा. त्यांच्या अडचणींचे व प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
मोर्शी तालुक्यातील विविध गावांच्या पांदण रस्त्यांची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्यासह संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हाधिकाऱ्यांनी नेरपिंगळाई येथील पिंगळादेवी देवस्थान व गडाची पाहणी केली. पिंगळादेवी येथील विकासकामांचा आढावा घेतला. मंदिराच्या विश्वस्थांशी चर्चा करुन पुढील विकासकामांच्या नियोजनाबाबत माहिती घेतली. या देवस्थानचा दर्जा ‘क’ वरुन ‘ब’ होण्यासाठीचा प्रस्ताव मंजूरीसाठी प्रयत्न करण्यात येईल. मंदिराच्या खुल्या परिसरात वृक्ष लागवड करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. मंदिर परिसरात भक्तनिवास उभारण्यासाठी प्रशासनातर्फे मदत करण्यात येणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी येरला ग्राम पंचायतीला भेट देऊन तेथील पालकमंत्री पांदन रस्ते योजनेतून निर्माण करण्यात आलेल्या मौजा येरला ते खानापूर रस्त्यांची पाहणी केली. या पांदण रस्त्या संदर्भात शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मौजे येरला ते लाडकी या पांदण रस्त्याचे काम सुरु करण्याच्या सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंतांना केल्या.
पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी मौजे वरुड ते भंगारा, चिंचोली गवळी ते रसुलपूर कोपरा या पांदण रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. तालुक्यातील सर्व पांदण रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्याच्या सूचना त्यांनी सार्व. बांधकाम विभागाच्या अभियंतांना दिल्या.
यानंतर त्यांनी मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार डोंगरे, तहसीलदार डॉ. सिध्दार्थ मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. दळवी यांच्याकडून पांदण रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. पुढील कामांच्या नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पाहणी दौऱ्यात संबंधित गावांचे सरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक व शेतकरी बांधव, गावकरी मंडळी उपस्थित होते.
00000

Tuesday, November 19, 2019

माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन





        अमरावतीदि. : 19-  माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी इतरही अधिकारी- कर्मचा-यांनी पुष्प अर्पण करुन माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना अभिवादन केले.  

राष्ट्रीय एकात्मता दिवसानिमित्त शपथही यावेळी घेण्यात आली. देशाचे स्वातंत्र आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित राखण्यासाठी व दृढ करण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची   शपथ घेण्यात आली.
00000

निवडणूक खर्चाचा ताळमेळ अचूकपणे नोंदवा - निवडणूक निरीक्षक रामकृष्ण बंडी






अमरावतीदि. 19 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीतील उमेदवारांची खर्चाची तपासणी व ताळमेळ प्रक्रिया सुरु आहे. हा प्रक्रियेचा शेवटचा टप्पा असून उमेदवारांनी सादर केलेला खर्च व खर्च तपासणी चमू या दोघांच्याही खर्चाच्या आकडेवारीत तफावत आढळल्यास त्याविषयी सुस्पष्ट माहिती घेऊन नेमका अचूक खर्च नोंदवावाअसे निर्देश निवडणूक निरीक्षक रामकृष्ण बंडी यांनी आज दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक खर्च ताळमेळासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होतीत्यावेळी ते बोलत होते. निवडणूक निरीक्षक जॉर्ज जोसेफनवनीतकुमारजिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवालउपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटीलखर्च तपासणी पथकाचे नोडल ऑफीसर तथा डेप्युटी कॅफो दत्तात्रय फिस्के तसेच उमेदवारांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
श्री. बंडी म्हणाले कीनिवडणूक लढविलेल्या उमेदवारांना आज तारखेपर्यंत निवडणूक खर्च शॅडो रजिस्टरमध्ये नोंदवून सादर करणे बंधनकारक आहे. रजिस्टरनुसार उमेदवारांनी दाखविलेल्या खर्च आणि खर्च तपासणी पथक यांचा खर्च या दोघांमध्ये तफावत आढळून आल्यास सबंधित सहायक खर्च निरीक्षकांनी दिवसनिहाय खर्चाची तपासणी करुन ताळमेळ करावा. ताळमेळ करताना जो खर्च अधिक असेल तो ग्राह्य धरुन निवडणूक आयोगाला सादर करावा. तसेच ज्या उमेदवारांकडून खर्चाचे शॅडो रजिस्टर सादर केले जाणार नाही त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या कलमान्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईलअसे त्यांनी सांगितले.
मुख्यत: वस्तुंचे दर व त्याचे प्रमाण या बाबीमध्ये फरक आढळून येत असल्यास आयोगाकडून ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसार दर ग्राह्य धरुन खर्च नोंदवावा. तपासणीअंती ज्या उमेदवारांना ग्राह्य खर्चाबाबत आक्षेप असल्यास त्यांनी योग्य पुराव्यानिशी स्पष्टीकरणासह उद्या (20 नोव्हेंबर ) होणाऱ्या जिल्हा खर्च देखरेख समितीच्या बैठकीत हजर राहण्याचे सूचना द्यावी. ज्या उमेदवारांना निवडणूक खर्च मान्य असेल त्यांचे खर्चाचे रजिस्टर फॉर्म-सी व फॉर्म-बी ईत्यादी कागदपत्रासह जिल्हा खर्च देखरेख समितीला सादर करावेअसेही त्यांनी सांगितले.
  ज्या मतदारसंघात निवडणूक खर्च संदर्भात काही विवाद असल्यास उमेदवारांनी योग्य स्पष्टीकरण जिल्हा खर्च देखरेख समितीसमोर मांडावे. प्रत्येक उमेदवाराचा दिननिहाय खर्चाचा ताळमेळ करावातसेच खर्चात काही तफावत किंवा विसंगती आढळून आल्यास खर्चाच्या सिध्दतेसाठी विहित पुरावे समितीला सादर करावेअशी सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. नवाल यांनी दिल्या.
बैठकीत निवडणूक निरीक्षक जार्ज जोसेफ व नवनीतकुमार यांनी सुध्दा निवडणूक खर्च नोंदणी प्रक्रिया याविषयी उमेदवारांच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.
00000

Saturday, November 16, 2019

जिल्हा प्रशासनातर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ स्पर्धा परीक्षा तयारीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहकार्य - जिल्हाधिकारी शैलेश नवाल










अमरावतीदि. 16:  स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी सकारात्मक विचारपरिश्रमशिस्त व चिकाटी यांची आवश्यकता असते. स्पर्धा परीक्षांत जिल्ह्याचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनातर्फे नियमित मार्गदर्शनासह सर्व सहकार्य करण्यात येईलअसे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे सांगितले.  
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगासह विविध स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनासाठी जिल्हा प्रशासनाने करिअर मार्गदर्शन उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा शुभारंभ आज येथील नियोजनभवनात झालात्यावेळी ते बोलत होते. सहायक जिल्हाधिकारी आयएएस अधिकारी वर्षा मीना यांचे विशेष व्याख्‌यान यावेळी झाले. स्पर्धेचे नोडल अधिकारी तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सूरज मडावीजिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवारविभागीय ग्रंथपाल राजेश पाटीलउपक्रमाचे समन्वयक अंशुल चवरेनेहा पाटील आदी उपस्थित होते.  
श्री. नवाल म्हणाले कीउपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महिन्याच्या तिस-या शनिवारी तज्ज्ञांकडून विशेष मार्गदर्शनसंवाद व शंकानिरसन करण्यात येईल. आवश्यकता वाटल्यास कार्यक्रम महिन्यातूनही दोनवेळा घेता येईल. विद्यार्थ्यांकडून होणारे प्रयत्न अचूक व योग्य दिशेने व्हावेतयासाठी मार्गदर्शन करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. याच उपक्रमात गावोगाव अभ्यासिका निर्माण करण्याचाही प्रयत्न आहे.  कुठल्याही परीक्षेची तयारी वाया जात नसते. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात उभे राहायला मदत होते.
सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम समजावून घेऊन  एकसंध नोटस् निर्माण करणे व त्या नोटस् मध्ये महत्वाच्या पुस्तकातील माहितीची भर घालणे आवश्यक असते. या नोटस् ची वारंवार उजळणी करावी. भाराभार साहित्य वाचू नये. एनसीईआरटीची पुस्तके वाचावीत. त्याची मांडणी चांगली असते.  प्रत्येक परीक्षेचे काही टप्पे असतात. मात्रविद्यार्थ्याने ही सगळी प्रक्रिया एकसंधपणे पाहून त्यानुसार तयारी ठेवली पाहिजे. पुढील परीक्षांचेही अभ्यास व नियोजन त्याने केलेले असावे. यावेळी श्री. मीना यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले.
श्री. चवरेश्रीमती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
00000

अतिक्रमण नियमानुकूलची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी - जिल्हाधिकारी शैलेश नवाल


प्रधानमंत्री आवास योजना


अमरावती, दि. 16 : नगर पालिका अंतर्गत येणारे नझूल पट्टयाचे वाटप व अतिक्रमण नियमानुकूल संदर्भातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करुन प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ गरजूंना द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रलंबित कामांचा  आढावा जिल्हयाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित होते.  
            श्री नवाल म्हणाले की, अतिक्रमण नियमानुकुल करण्यासंदर्भात नगर पालिकांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. यासाठी नगर पालिका प्रशासनाने व भूमी अभिलेख विभागाने  सर्वप्रथम नझुल शिटप्रमाणे संयुक्त पाहणी करावी. त्यानंतर नझुल पटृटे वाटप करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी तसेच अतिक्रमण नियमानुकुल करण्याची कार्यवाहीसुध्दा पूर्ण करावी.
            प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत प्रस्तावित घरकुलासाठी नवीन सविस्तर प्रकल्प नियोजन अहवाल तयार करुन राज्य शासनाच्या मंजूरीकरिता जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात यावा. या कामासाठी निधी तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
नगरपालिका क्षेत्रात जलपुनर्भरण योजना व स्वच्छ भारत मिशन प्रभावीपणे राबविण्यात यावे. या योजने अंतर्गत नगरपालिकेची इमारतीत मॉडेल स्वरुपात जलपुनर्भरण (रेन वॉटर हारवेस्टींग) यंत्रणा कार्यन्वित करावी. तसेच शहरातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालये व रहीवासी घरांना सुध्दा रेन वॉटर हारवेस्टींग यंत्रणा बसविण्याचे बंधनकारक करण्यात यावे. जेणेकरुन त्या त्या शहरात जलपुनर्भरण सुरळीत होऊन भूजल पातळीत वाढ होणार. नगरपालिकेने पाण्याचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जाणीव जागृती करावी. असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.
00000

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...