Monday, January 29, 2018




 ‘शिवराज्याभिषेक सोहळाचित्ररथ  ठरला
प्रजासत्ताक दिन संचलनात देशात प्रथम

        नवी दिल्ली, 28 : महाराष्ट्राच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील पथ संचलनात सादर केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा' या विषयावरील चित्ररथाला देशात पहिला क्रमांक मिळाला आहे. संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांच्या हस्ते महाराष्ट्र सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक संजय पाटील यांनी आज हा पुरस्कार स्वीकारला.
राजपथावर  राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि आशियान देशांच्या 10 राष्ट्रप्रमुखांच्या उपस्थितीत भारताचा 69 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटात पार पडला. या निमित्त आयोजित पथसंचलनात देशातील विविध राज्यांची संस्कृती दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शित करण्यात आले. 14 राज्य व केंद्रीय मंत्रालयाचे 9 चित्ररथ यावर्षी प्रदर्शित झाले. यामध्ये महाराष्ट्राच्यावतीने सादर करण्यात आलेला 'छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा' या चित्ररथाची  पथसंचलनातील सर्वोत्तम चित्ररथ म्हणून निवड झाली. येथील कॅंन्टॉन्मेट भागातील रंगशाला शिबिरात आयोजित शानदार कार्यक्रमात संरक्षण मंत्री श्रीमती सितारमन यांच्या हस्ते  राज्याला गौरविण्यात आले.  मानपत्र आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रा. नरेंद्र विचारे, कला दिग्दर्शक नितीन देसाई आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आसाम राज्याने यावर्षी  दुसरा तर छत्तीसगड़ राज्याने तिसरा क्रमांक पटकविला. या राज्यांनाही यावेळी गौरविण्यात  आले.
शिवराज्याभिषेक सोहळा ठरला देशात पुन्हा प्रथम
       महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्टय दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपरा आहे. यापूर्वी 1980 मध्येही राज्याच्यावतीने शिवराज्याभिषे दर्शविणारा चित्ररथ प्रदर्शीत केला होता. यास प्रथम पारितोषिक मिळाले होते. 1983 मध्ये बैल पोळा या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला. यानंतर 1993 ते 1995 असा सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. 2015 मध्ये प्रदर्शित पंढरीची वारी या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला ही उल्लेखनीय बाब आहे.                            
यावर्षी 'शिवराज्याभिषेक सोहळा'  चित्ररथाची बांधणी जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली. चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती जे.जे.स्कूल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी तयार केले होते.  चित्ररथावर शिवराज्याभिषेक सोहळा दर्शविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सोयराबाई, संभाजी राजे आदी 10 भूमिका साकारण्यात आल्या. मुंबई येथील भैरी भवानी ग्रुपच्या कलाकारानी  या भूमिका साकारल्या.

नागपूरच्या दक्षिण-मध्य केंद्राला प्रथम पुरस्कार 
राजपथावरील पथ संचलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. यात राज्याचे सांस्कृतिक मंत्री अध्यक्ष असलेल्या नागपूर येथील दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्राला प्रथम पुरस्काराने आज गौरविण्यात आले. या केंद्राचे संचालक इंद्रजित ग्रोवर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या केंद्राच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्याचे बरेदी लोकनृत्य सादर करण्यात आले होते.
                          
००००
सुभाष नावंदे याला सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्ण पदक
नवी दिल्ली, 29 : पुण्यातील सुभाष नावंदे याला वायुदल विंगचा सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्ण पदक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी प्रधानमंत्री रॅली मध्ये आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
          दिल्लीतील छावनीभागातील करीअप्पा परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी  पंतप्रधान रॅलीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट कॅडेट्सना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी संरक्षणमंत्री निर्मला सितारमन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, वायुसेना प्रमुख ऍडमिरल सुनील लांभा, नौसेना प्रमुख चिफ मार्शल बिरेंद्र सिंग  धनोआ आदी मंचावर  उपस्थित होते
एसीसीच्या श्रेणी अंतर्गत  पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास वायुदल विंगचा सर्वोत्कृष्ट कॅडेटच सुवर्ण पदक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सर्वेश हा  १९ वर्ष असून तो  मॉडर्न कॉलेज पुणे येथे बी.एस.सी  द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक दिन 2018 च्या राजपथावरील पथसंचलनासाठी सहभागी होण्यासाठी पुणे येथे नाव नोंदविले.  नोव्हेंबर  2017 मध्ये पुणे विभागातून सर्वेश ची निवड पुढील शिबीरासाठी औरंगाबाद येथे झाली. यानंतर एनसीसी शिबीरामध्ये होणा-या विविध अंतर्गत स्पर्धांमध्ये तो उत्तीर्ण होत गेला. अंतिमत: तो प्रधानमंत्री रॅलीसाठी पात्र ठरला. सर्वेशची उत्कृष्ट कॅडेट म्हणून निवड झाली. त्याने भारतातून वायुदल विंग मध्ये सर्वोत्कृष्ट कॅडेटचे सुवर्ण पदकही  प्राप्त केले.   एनसीसीचे महासंचालक यांनीही सर्वेशचा ट्रॉफी देऊन सत्कार केला.
             प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी या कार्यक्रमात उपस्थित देशभरातील कॅडेटसना संबोधित केले.           कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रधानमंत्री यांना मानवंदना देण्यात आली. मानवंदना देण्या-या देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाच्या चार दलातील निवडक कॅडेटसचा समावेश होता. प्रधानमंत्री यांनी मानवंदना देणा-या एनसीसी पथकाची पाहणी केली. यानंतर शिबीरात सहभागी प्रत्येक राज्यांच्या निवडक पथकांचे पथ संचलन झाले.
        एनसीसी महासंचालनालय आणि दिल्ली संचालनालयाच्यावतीने येथील करीअप्पा परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील एनसीसी कॅडेटसाठी शिबिराचे आयोजन करयात येते. 6 जानेवारी पासून या शिबिराला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाट्न झाले. तर प्रधामंत्रीरॅलीने रविवारी या शिबिराची सांगता झाली. देशभरातील १७ एनसीसी संचालनालयाचे कॅडेट्स यात सहभागी झाले. महाराष्ट्रातील ११2 एनसीसी कॅडेटस या शिबिरात  सहभागी झाले. यातील काही कॅडेटसची  प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथसंचलनासाठी तर काही कॅडेटसची  प्रधानमंत्री रॅलीमधे मानवंदना देण्यासाठी  निवड झाली.   
            या शिबिरात दररोज पथसंचलनाचा सराव आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ड्रिल कॉम्पीटीशन, राष्ट्रीय एकात्मता जागृकता कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, राजपथ पथसंचलन निवड स्पर्धा, प्रधानमंत्री रॅलीसाठी मानवंदना निवड स्पर्धेत महाराष्ट्रातील कॅडेटसनी उत्तम कामगिरी बजावली.



Friday, January 26, 2018

शिवाजी पार्कच्या सोहळ्यात प्रजासत्ताक दिन साजरा
समृद्धबळकट महाराष्ट्र घडविण्याचा निश्चय करूया
राज्यपाल चे. विद्यासागर राव

मुंबईदि. 26 : संविधानाने घालून दिलेले आदर्श व मूल्ये यांच्याप्रती असलेली बांधिलकी आपण दृढ करूया आणि एक समृद्धबळकट महाराष्ट्र घडवण्याचा निश्चय करूयाअसेप्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेस शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रजासत्ताक दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे आयोजित मुख्य सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशिक्षण मंत्री विनोद तावडेमाजी मुख्यमंत्री मनोहर जोशीराज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिराजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवराविविध शासकीय विभागसेना दल,पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. 
भारताची प्रादेशिक एकात्मता जोपासताना आणि कायदा व सुव्यवस्था राखताना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा महाराष्ट्रातील शूर हुतात्म्यांना राज्यपालांनी याप्रसंगी आदरांजली अर्पण केली. ते पुढे म्हणाले शासनानेसमाजातील दुर्बल घटकांच्या शैक्षणिकसामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी अनेक निर्णय घेतले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक दर्जाची स्मारके उभारण्याचे काम अगोदरच सुरू झाले आहे. विमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग यांच्या कल्याणाची विशेष काळजी घेण्यासाठी शासनाने विमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण विभाग हा एक स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. विमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग आणि विशेष मागासप्रवर्गातील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा लाख रुपयांवरून लाख रुपये इतकी वाढविण्यात आली आहे. शासनाने छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना तयार केली असून या योजनेत 605 अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. आर्थिकदृष्ट्या मागासवर्गातील लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे भांडवल400 कोटी रुपयांपर्यंत वाढविले आहे.
टक्के सरासरी विकास दर गाठला
महाराष्ट्राने मागील वर्षांमध्ये टक्के इतका सरासरी वार्षिक विकास दर गाठलेला आहेहे सांगताना आपणास अभिमान वाटत असल्याचे राज्यपाल यांनी नमूद केले. राज्याच्या कृष व कृष संलग्न क्षेत्राने 12.5 टक्के इतका दोन अंकी विकास दर गाठलेला आहे. कृषिक्षेत्रातील गुंतवणूक 30 टक्क्यांपर्यंत वाढली असून महाराष्ट्राने संपूर्ण देशामध्ये कृषिक्षेत्राच्या विकासात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राष्ट्रीय कृष विकास योजनेअंतर्गत राष्ट्रीय दुग्धव्यवसाय विकास मंडळाच्या सहाय्याने विदर्भ आणि मराठवाड्याच्या 11जिल्ह्यांमध्ये विशेष दुग्धव्यवसाय प्रकल्प राबविण्यात येत आहे. या दुग्धव्यवसाय प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.


आतापर्यंत 47 लाख 86 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी
राज्यपाल श्री. राव म्हणाले कीकर्जबाजारी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा दिलासा देण्याच्या हेतूने शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. त्याद्वारे 23 हजार 102 कोटी रुपये इतकी रक्कम 47 लाख 86 हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये थेट हस्तांतरित करण्यात आली आहे.
11 हजाराहून अधिक गावे दुष्काळमुक्त
जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मागील दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातील 11 हजाराहून अधिक गावे दुष्काळमुक्त झाली आहेत.  त्या अभियानाअंतर्गत सुमारे लाख 25 हजार कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्याद्वारे 16.82 टीसीएम इतक्या क्षमतेचा जलसाठा निर्माण करण्यात आला आहे. "गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना" या अंतर्गत 31 हजार 549 धरणांमधील गाळ काढण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे हजार धरणांतून 92 लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आला आहे. "मागेल त्याला शेततळे" योजनेअंतर्गत 56 हजारांहून अधिक शेततळ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
1.3 लाख कोटी रुपये थेट विदेशी गुंतवणूक
राज्यपाल श्री. राव म्हणाले कीदेशी तसेच विदेशी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे सर्वात अधिक पसंतीचे राज्य राहिले आहे. एप्रिल 2016 ते मार्च 2017 मध्ये राज्याला 1.3लाख कोटी रुपये इतकी थेट विदेशी गुंतवणूक प्राप्त झाली आहे. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्य शासनाने अलिकडेच महिला उद्योजिकांना समर्पित औद्योगिक धोरणास मंजुरी दिली आहे. राज्याने फेब्रुवारी महिन्यात पहिली जागतिक गुंतवणूक शिखर परिषद मॅग्नेटिक महाराष्ट्र : कन्व्हर्जन्स 2018 आयोजित केली आहे. या शिखर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात गुंतवणुकीला चालना मिळेलगुंतवणूक प्रक्रिया सुलभ होईल आणि  मेक इन इंडिया कार्यक्रमाला प्रोत्साहन मिळणार आहे. उद्योजकांना प्रोत्साहन आणि निधी देण्याच्या हेतूने शासनाने अलिकडेच इनोवेशन अँड स्टार्ट - अप पॉलिसीला मान्यता दिली आहे.  कौशल्य भारत अभियानाअंतर्गत राज्याने आठ लाखांहून अधिक युवकांना कौशल्य प्रशिक्षण दिलेले आहे.
राज्यपाल श्री. राव म्हणाले कीनागरिकांच्या जीवनमानाच्या दर्जात सुधारणा होण्यासाठी संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्प राबविले जात आहेत. राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील 226 रेल्वेपूलांसह 742 उड्डाणपूलांची बांधकामे आणि 27 हजार 371 कि.मी. लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जवळपास 1,500 कि.मी.चे रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत. मुंबईनागपूर आणि पुणे या तीन महानगरांत लाख 42 हजार 306 कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीद्वारे सुमारे 350 कि.मी.मेट्रोमार्गाचे जाळे उभारण्याचे नियोजित केले आहे.  या मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून दररोज 11.1 दशलक्ष इतक्या प्रवाशांना मेट्रोची सेवा मिळणार आहे.
राज्यपाल श्री. राव म्हणाले कीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामास अगोदरच प्रारंभ झालेला आहे. याबरोबरच शासनाने आणखी 10 विमानतळे बांधण्याचे काम हाती घेतले आहे. अलिकडेच शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवाशी सेवा पूर्णत: सुरू झाली आहे.
महत्त्वाकांक्षी बृहत वृक्ष लागवड मोहिमेचा एक भाग म्हणून गेल्या पावसाळ्यात राज्यामध्ये 5.43 कोटी इतक्या रोपांची लागवड करण्याचा उच्चांक नोंदवला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ऑक्टोबर 2017 रोजी संपूर्ण नागरी महाराष्ट्रास हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहे. आतापर्यंत 22 हजार 793 ग्रामपंचायती व 212 तालुके हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
आदिवासी भागातील कुपोषण व पंडुरोगाची समस्या सोडविण्यासाठी "डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना" राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महिने ते 6वर्षे वयोगटाच्या मुलांना व त्याचबरोबर गरोदर महिला व स्तनदा मातांनाही पूरक पोषण आहार देण्यात येत आहे. शासनाने सर्वसाधारण प्रवर्गामधील सरकारी नोकऱ्यांमध्ये अनाथांकरिता एक टक्का इतके आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून हा  एक क्रांतिकारी निर्णय आहेअसे राज्यपाल श्री. राव म्हणाले.
विविध दलांचे संचलन
याप्रसंगी विविध दलांनी संचलन केले. भारतीय नौदलतटरक्षक दलकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलराज्य राखीव पोलीस बलबृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दलबृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकबृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दलमुंबई रेल्वे पोलीस दलसशस्त्र गृहरक्षक दलबृहन्मुंबई वाहतूक पोलीस दलराज्य उत्पादन शुल्क विभागमुंबई अग्निशमन दलबृहन्मुंबई महापालिका सुरक्षा दलवन विभागबृहन्मुंबई व ठाणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळराष्ट्रीय सेवा योजनासी कॅडेट कोअररोड सेफ्टी पेट्रोल (आरएसपी),भारत स्काऊट आणि गाईडसब्रास बँड पथकपाईप बँडबृहन्मुंबईतील वाहतूक पोलीस मोटार सायकल पथक आदी पथकांनी यावेळी संचलन केले. 
रक्षक बुलेटप्रुफ व्हॅनमार्क्समन बुलेटप्रुफ व्हॅनमहिला सुरक्षा पथक व्हॅनमहारक्षक बुलेटप्रुफ व्हॅनवरुण वॉटर कॅननअग्निशमन दलाचे जलद प्रतिसाद पथकअग्निसुरक्षा पालन कक्ष वाहन९० मीटर हायड्रोलिक प्लॅटफॉर्म आदी वाहनांचा संचालनात समावेश होता. 
चित्ररथातून विविध संदेश
राज्य शासनाच्या विविध विभागांनी त्यांच्या कामगिरीचे यावेळी चित्ररथाच्या माध्यमातून सादरीकरण केले. एसआरएमहानिर्मितीची मुख्यमंत्री सौर कृषी वहिनी योजना,भूजल पाण्याचे जतन आणि संवर्धन, 50 कोटी वृक्ष लागवडीचे ध्येयएसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास, 7 लाख कुटुंबाना घरे मिळवून देणारे म्हाडामेट्रो रेल्वे - प्रवास सुखाचा मुंबईकरांचामनरेगातून समृद्ध महाराष्ट्रमॅग्नेटिक महाराष्ट्रजाती विरहित महाराष्ट्रासाठी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहनउन्नत शेतीसमृद्ध शेतकरी या संकल्पनांवर आधारित चित्ररथांनी आपले सादरीकरण केले. राज्यपालांच्या भाषणाच्या मराठी अनुवादाचे वाचन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केले.





भारतीय प्रजासत्ताकाचा 68 व्या वर्धापनदिन सोहळा उत्साहात
          सर्वांगीण प्रगतीच्या दिशेने वाटचाल
                                      - पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 26 : शेतकरी हिताच्या विविध योजना, सर्वदूर पायाभूत सुविधांची निर्मिती, नव्या उद्योगांची सुरुवात व मोठी रोजगारनिर्मिती यामुळे अमरावती जिल्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले. विकासाची ही वाटचाल यापुढेही कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी जिल्ह्यातील समस्त नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.   
भारतीय प्रजासत्ताकाच्या 68 व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त ध्वजवंदन व संचलनासह मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांच्या उपस्थितीत जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. सोहळ्यात खासदार आनंदराव अडसूळ, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक सी. एच. वाकडे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधीक्षक अभिनाशकुमार, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.
          सोहळ्यात प्रारंभी ध्वजवंदन व राष्ट्रगीत झाले. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आपल्या भाषणातून जिल्ह्यातील विकासप्रक्रियेचा वेध घेतला. ते म्हणाले की, कृषी, उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा अशा सर्वच क्षेत्रात दिलेल्या उत्कृष्ट योगदानामुळे महाराष्ट्राने देशातील सर्वोत्तम राज्याचा लौकिक कायम राखला आहे. विकासाच्या या वाटचालीत अमरावती जिल्हाही राज्यात आघाडीवर आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेबरोबरच कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजना आणि खारपाणपट्टयातील परि‍स्थितीचा विचार करुन संपूर्ण कायापालटासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आणि अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी बळीराजा जलसंजीवनी योजना  राबविण्यात येत आहे.
ते पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियानामुळे 21 लाख हेक्टरहून अधिक सिंचन क्षमता त्यामुळे जिल्ह्यात निर्माण झाली. 21 हजारांहून अधिक कृषी पंप वीज जोडण्या, सौर पंप वितरण, मागेल त्याला शेततळे यासारख्या कल्याणकारी योजनेमुळे कृषी उत्पादकताही वाढली आहे. अभियानात 2015 ते 2017 या काळात 506 गावात कामे करण्यात आली. 2017-18 साठी 252 गावांमध्ये कामे सुरु आहेत.  शेतकरी सन्मान योजनेत आजमितीला सुमारे 474 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. उर्वरित काम गतीने सुरु आहे. शेतक-यांना सुमारे 468 कोटी  रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले असून, या प्रक्रियेलाही गती देण्यात आली आहे.  नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यात विविध योजनांसाठी 500 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

ते पुढे म्हणाले की, कडधान्य पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, उन्नत शेती- समृद्ध शेतकरी अभियान व  शेतक-यांना अवजार- यंत्रासाठी अनुदान, 2 लाखांहून अधिक मृद आरोग्य पत्रिकांचे  वितरण, शेतक-यांना प्रशिक्षण, महात्मा फुले जलभूमी अभियान, सामूहिक शेतीतून विकासासाठी गटशेती योजना,  कोरडवाहू क्षेत्र विकासासाठी पशुधन विकासावर भर,  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून पॉलिहाऊस, सामूहिक शेततळे, संत्रा पुनरुज्जीवन, सूक्ष्म सिंचन कार्यक्रम आदी योजनांची भरीव अंमलबजावणी शेतीच्या प्रगतीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी ठरत आहे.  
बळीराजा जलसंजीवनी योजनेतून जिल्ह्यातील 24 अपूर्ण प्रकल्प पूर्ण होऊन सिंचनक्षेत्रात मोठी वाढ होईल, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की,  जिल्ह्यातील 5 मध्यम आणि 19 लघु प्रकल्प यातून पूर्ण होऊन सिंचन क्षेत्र वाढून शेतक-यांचे जीवनमान आणखी उंचावणार आहे.
नव्या उद्योगांना आरंभ
ते पुढे म्हणाले की, नांदगावपेठ औद्योगिक वसाहतीत रेमंड, श्याम इंडोफॅबसारख्या 18 नामांकित वस्त्रोद्योगांची सुरुवात ही घटना अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल. तिथे इतर नवीन 12 उद्योगांना जागा देण्यात आली आहे. 19 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन 30 हजारहून अधिक लोकांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळाला आहे.  भविष्यात ही वाढ गतीने होऊन रोजगारनिर्मितीचा वेग वाढेल. ‘इज ऑफ डुईंग बिझनेस’अंतर्गत परवानग्यांची कमी केलेली संख्या आणि ‘मेक इन महाराष्ट्र’अंतर्गत नवीन उद्योगांची सर्वदूर पायाभरणी यामुळे राज्यातील गुंतवणूकीला मोठी गती मिळाली. उद्योजकता प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमातून युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, शेतक-यांना 12 तास वीज पुरवठ्याचा निर्णय शासनाने अंमलात आणला  आहे. मेळघाटातील  12 गावांना सोलर बँकेद्वारे वीजपुरवठ्याची प्रक्रिया होत आहे.  ग्रामीण भागात 23 व शहरी भागात 7 वीज उपकेंद्राची उभारणी होत आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, अमृत राष्ट्रीय पेयजल योजना व भुयारी गटार योजनेत 500 कोटी रुपयांची कामे होत आहेत.   ‘सर्वांसाठी घरे’ या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार प्रधानमंत्री आवास योजनेत 2022 पर्यंत प्रत्येक गरजूला घर मिळणार आहे.   स्वत:ची जागा नसलेल्यांसाठी पं. दीनदयाळ उपाध्याय भूखंड खरेदी योजनेत 50 हजार रुपये देण्यात येत आहेत. या योजनेची भरीव अंमलबजावणी होत आहे.
पायाभूत सुविधांबाबत ते म्हणाले की, जिल्ह्यात 15 हजार कोटी रुपयांच्या निधीतून विविध रस्त्यांची निर्मिती होत आहे. जिल्ह्यातील 243 किलोमीटर लांबीच्या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले, तसेच 267 लांबीच्या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर प्रस्तावित आहे. सुमारे 5000 किलोमीटर लांबीचे 923 पांदणरस्ते निर्माण करणारी पालकमंत्री पांदणरस्ते योजना अमरावती जिल्ह्यानंतर राज्यभर राबविण्यात येत आहे, अमरावती विमानतळ विकासाचे काम महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला देण्यात आले आहे. लवकरच येथून विमानसेवा सुरु होईल. अमरावतीत जिल्हा क्रीडा संकुलाचे काम होत आहे.
ते पुढे म्हणाले की, जिल्हापरिषदेमार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी 908 कोटी व कृषी विभागाच्या विविध योजनांना 174 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला.   मेळघाटातील कुपोषणाच्या प्रश्नावर मात करण्यासाठी स्थानिक  कर्मचारी  नागरिकांच्या मदतीने प्रभावी संपर्क यंत्रणा,तातडीची आरोग्य  सेवा, स्थलांतर रोखण्यासाठी रोजगारनिर्मिती  विविध यंत्रणांच्या समन्वयामुळे मातामृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. मेळघाटातील दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्यासाठी टेलिमेडिसीनव्दारे सुमारे 4 हजार रुग्णांना सल्ला व औषधोपचार करण्यात आले. तिथे मोटरबाईक रुग्णवाहिका ही कार्यान्वित होणार आहे. तेथील स्थलांतर रोखण्यासाठी रोजगारनिर्मितीही करण्यात येत आहे.
सामाजिक न्याय विभागाकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त अमरावती येथे 250 मुलींचे, तर दर्यापूर येथे 100 मुलींचे शासकीय वसतिगृह सुरु झाले.  डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेसह विविध योजनांतून झालेल्या कामांचाही त्यांना उल्लेख केला. खासदार आनंदराव अडसूळ यांच्या निधीतून रुग्णवाहिकेचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील गुणवंतांना गौरविण्यात आले.
उद्योजक पुरस्कारांचे वितरण
जिल्हा उद्योग कार्यालयातर्फे उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गुणवंत उद्योजकांना जिल्हा उद्योजक पुरस्कार देण्यात आला. उद्योजक समीर भरत शहा (शहा शांतीलाल मगनलाल अँड कंपनी, अमरावती) यांना प्रथम क्रमांक, तर उद्योजक राजेश गुलराज बजाज (बजाज फूड इंडस्ट्रीज) यांना द्वितीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
पोलीस पुरस्कार
नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कामगिरी पुरस्कार (पोलीस महासंचालकांतर्फे)- पंकज दाभाडे (पोलीस निरीक्षक), अशोक चवरे (प्रमुख यंत्रचालक), गोवर्धन निंबाळकर (रेडिओ यांत्रिकी), संजयकुमार पिंगे (वीजतंत्री).
पोलीस आयुक्तांतर्फे पुरस्कार- दिलीप वाघमारे (सहा. पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा)
वन विभागाचे पुरस्कार
अमरावती उपवनसंरक्षक विभागातर्फे पूर्व मेळघाट वनविभागातील आलाडोह संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकरराव खडके व वनरक्षक प्रभुदास चौधरी यांना 51 हजार रुपये रकमेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दुस-या क्रमांकाच्या पुरस्कारासाठी कारली येथील समितीचे अध्यक्ष सुखदेव भुसूम व वनपाल डी. एन. पवार यांनी 31 हजार रुपये रकमेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तिस-या क्रमांकाचा 11 हजार रुपयांचा पुरस्कार बोरी पश्चिम येथील समितीचे अध्यक्ष शिवाजी युवनाते, सचिव हर्षवर्धन सराटकर, वनक्षेत्रपाल डी. एस. काळे यांना देण्यात आला.

आरोग्य सेवा (हिवताप) पुरस्कार
 कीटकजन्य आजाराविषयी उत्कृष्ट कार्य- जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. सुरेश तरोडेकर. आरोग्य सहायक पदावर उत्कृष्ट कार्य- सुरेशचंद्र माणिकपूर (पळसखेड) आदिवासीबहुल क्षेत्रात आरोग्य शिक्षण व विविध उपक्रम राबविल्याबाबतजयंत औतकर (जिल्हा हिवताप कार्यालय).
क्रीडा पुरस्कारांचे वितरण
यावेळी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे गुणवंत खेळाडू व क्रीडा मार्गदर्शकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 10 हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
गुणवंत खेळाडू (मुली) - वैष्णवी सतीश श्रीवास (जलतरण), गुणवंत खेळाडू (दिव्यांग)- जुनेद खान सलीम खान- फुटबॉल, ममता कोळमकर (गोळाफेक व थाळीफेक), गुणवंत क्रीडा मार्गदर्शक- प्रा. मनोज तायडे (कुस्ती), गुणवंत क्रीडा कार्यकर्ता, संघटक- नितीन जाधव (क्रीडा प्रसारासाठी योगदान), विशेष पुरस्कार- दीक्षा प्रदीप गायकवाड (वेटलिफ्टिंग) व आयुष नवजीवन धोटे (रोलर स्केटिंग).
विविध पुरस्कार
राष्ट्रीय कुष्ठरोग परिषदेचा पुरस्कार- तुकाराम आऊलकर (सहायक संचालक, आरोग्य),
स्काऊट गाईड पुरस्कार- अभिषेक यादव, शंतनू इंगळे, कुणाल भोरे, वेदांत बुरंग, सोनाली मंडाळकर, निकिता वडे, साक्षी कुरील, आरती कुशवाह, साक्षी माहोरे, वृतिका ढगे, परिता दंड, वैदेही आळशी.
हरियाणा येथे भारताद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा पुरस्काराने सन्मानित- मनीष गवई, अमरावती.

चित्तथरारक कवायती
राज्य राखीव पोलीस दलाच्या पथकाने यावेळी चित्तथरारक मोटरसायकल प्रात्यक्षिके सादर केली. पी. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूलतर्फे बँड ड्रील, संत गाडगेबाबा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम कवायत आणि रामकृष्ण क्रीडा विद्यालय व आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी डंबेल्स कवायत सादर केली. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. बुलेटवर चित्तथरारक व रंजक कवायत सादर करुन महावीर वरहरे यांनी उपस्थितांना जिंकून घेतले.   

00000











अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...