Saturday, December 10, 2022

पर्यटन वाढीसाठी तज्ज्ञ व व्यावसायिकांच्या चांगल्या संकल्पनांचा उपक्रमात समावेश - पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

 



पर्यटन वाढीसाठी तज्ज्ञ व व्यावसायिकांच्या चांगल्या संकल्पनांचा उपक्रमात समावेश  

-         पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा

 

अमरावती, दि. 10 : पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक सुविधा उभारण्याच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणेबरोबरच समितीच्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध घटकांचे सहकार्य मिळविण्यात येईल जेणेकरुन क्षेत्रात आवश्यक सुविधा व नवीन संकल्पनांचा विभागाच्या योजना उपक्रमात सहभाग असेल, असे प्रतिपादन राज्याचे पर्यटन, कौशल्य विकास, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले.

विविध कार्यक्रमांच्या अनुषंगाने मंत्री श्री. लोढा यांचे आज सायंकाळी हॉटेल ग्रँड महफिल येथे आगमन झाले त्यावेळी त्यांनी पर्यटन विभागाची बैठक घेऊन विविध कामांचा आढावा घेतला. खासदार डॉ. अनिल बोंडे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई, निवेदिता चौधरी यांच्यासह पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक व तज्ज्ञ उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, लोकसहभागातून योजना उपक्रमांची परिणामकारकता वाढते हे लक्षात घेऊन पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिक, उद्योजक व तज्ज्ञ मंडळींचे सहकार्य मिळविण्यात येत आहे. समितीच्या माध्यमातून हे काम पुढे नेले जाईल. जिल्ह्यातील महत्वाच्या पाच पर्यटन स्थळांमध्ये पायाभूत सुविधा व इतर सोयी उभारल्या जातील. नव्या संकल्पनांचा समावेश करुन चिखलदरा महोत्सवाचा उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविला जाईल. हा महोत्सव अधिकाधिक उत्तम व मोठ्या प्रमाणात व्हावा यासाठी पर्यटन विभागातर्फे आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. याबाबत आवश्यक ते नियोजन करुन पुढील डिसेंबर पासून हा महोत्सव व्यापक स्वरुपात साजरा केला जाईल.

 मेळघाटातील होलिकोत्सवाचे महत्व लक्षात घेऊन दि. 10 व 11 मार्च रोजी महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन आहे त्यासाठी पर्यटन विभागातर्फे 5 लक्ष रुपये निधी देण्यात येईल.  

ते पुढे म्हणाले, अमरावती ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा, प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज अशा संतांची भूमी आहे. श्री क्षेत्र कौंडण्यपूर, रिद्धपूर, मुक्तागिरी अशी अनेक पौराणिक, धार्मिक महत्वाची स्थळे या भूमीत आहेत. तेथे आवश्यक पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येईल. त्याचप्रमाणे रखडलेली कामे गतीने पूर्णत्वास नेण्यात येतील.

मेळघाटात पर्यटकांच्या सुविधेसाठी गाईड तयार करण्यासाठी स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करावे. पर्यटन वाढीच्या दृष्टीने तज्ज्ञ, व्यावसायिक, उद्योजकांनी समितीच्या माध्यमातून शासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी. समितीच्या नियमित बैठका व्हाव्यात. त्यातील चांगल्या संकल्पना व सूचनांची अंमलबजावणी व्हावी तसेच पर्यटन विकासाच्या दृष्टीने काम पुढे जाईल यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.   

0000

 

Wednesday, December 7, 2022

ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ; यंदा 1 कोटी 10 लक्ष रूपये उद्दिष्ट ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करावी - जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

ध्वजनिधी संकलनाचा शुभारंभ; यंदा 1 कोटी 10 लक्ष रूपये उद्दिष्ट

ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करावी

-  जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आवाहन

 

अमरावती, दि. 7 : सैनिक बांधव जीवाची बाजी लावून देशाचे संरक्षण करतात. अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. त्यांच्या हौतात्म्याचे मोल जाणून ध्वजदिन निधीसाठी सढळ हातांनी मदत करावी. यंदा ध्वजनिधी संकलनाचे 1 कोटी 10 लक्ष रूपये उद्दिष्ट निश्चित केले असून, ते प्रजासत्ताक दिनापूर्वी पूर्ण करावे, असे आवाहन ध्वजनिधी संकलन समितीच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे केले.

 सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त ध्व












जदिन 2022 निधी संकलनाचा शुभारंभ जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत नियोजनभवनात आज झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. मेजर आनंद पाथरकर, कर्नल लक्ष्मणराव गाले, शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव विजय ठाकरे, उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनीषकुमार गायकवाड, माजी सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकर चरडे, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

युध्द अथवा युध्दजन्य परिस्थीतीत तसेच अतिरेकी कारवायांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी वीरमरण आलेल्या भारतीय लष्करातील पराक्रमी जवानांच्या बलिदानाची आठवण म्हणून 7 डिसेंबर हा सशस्त्र सेना ध्वजदिन म्हणून संपूर्ण देशात साजरा होतो. सैनिकांच्या ऋणाचे मोल जाणून त्यांच्या कुटूंबियांचे, अवलंबितांचे पुनर्वसन करण्यासाठी  ध्वजदिन निधी संकलनातून मदत करण्यात येते.

 सन 2021-22 या वर्षासाठी जिल्ह्याने 1 कोटी 27 लक्ष रू. ध्वजनिधी संकलन करून उद्दिष्टाहून अधिक रक्कम संकलित झाली. सन 2022-23 साठी 1 कोटी 10 लक्ष रुपयांचे उद्दिष्ट असून, ते निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हाधिका-यांनी व्यक्त केला. माजी सैनिकांचे निवृत्तीवेतन, शिष्यवृत्ती आदी काही प्रलंबित प्रश्न असतील तर ते प्राधान्याने सोडविण्यात येतील. सैनिक कल्याण कार्यालयासाठी नवीन विभागीय प्रशासकीय इमारतीत जागा मिळवून देऊ, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.

सैन्यदलातील कामगिरीबद्दल सेना पदक प्राप्त मेजर पाथरकर यांना यावेळी गौरविण्यात आले. वीरपत्नी, वीरमाता, गुणवंत पाल्यांचाही गौरव यावेळी झाला. तहसीलदार अभिजित जगताप यांनी अग्नीवीर योजनेच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. श्री. चरडे, श्री. गाले यांनीही मनोगत व्यक्त केले. श्री. ठाकरे यांनी शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे 16 लाख रूपयांचा धनादेश जिल्हाधिका-यांकडे सुपुर्द केला.

 श्री. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. वैभव निमकर यांनी सूत्रसंचालन केले. सैनिक बांधव व त्यांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***** 

वाळूगटांच्या ‘डीएसआर’बाबत आक्षेप, सूचना पाठविण्याचे आवाहन

वाळूगटांच्या ‘डीएसआरबाबत

आक्षेप, सूचना पाठविण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 7 : जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे अमरावती जिल्ह्यातील वाळूगटांबाबत राज्यस्तरीय पर्यावरण समितीची अनुमती मिळण्यासाठी अर्ज सादर करण्यात येणार आहे. 

जिल्ह्यातील वाळूगट निश्चित करण्यात आले असून, त्याचा प्रारुप जिल्हा सर्वेक्षण अहवाल (डिस्ट्रिक्ट सर्व्हे रिपोर्ट) तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाच्या सूचनेनुसार हा प्रारुप अहवाल नागरिकांच्या माहितीसाठी व अभिप्राय नोंदविण्यासाठी www.amavati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

            या अहवालातील रेतीघाटांच्या लिलावाच्या अनुषंगाने कोणताही आक्षेप, अभिप्राय, सूचना असल्यास आपले म्हणणे तीन प्रतींसह जिल्हा खनिकर्म विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे किंवा dmoamravati१@gmail.com या मेलवर 30 दिवसाच्या आत नोंदवावे, असे आवाहन जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांनी केले आहे.

000000


समता पर्वाचा समारोप

 

समता पर्वाचा समारोप

अमरावती, दि. 7 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे 26 नोव्हेंबरपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत समता पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप मंगळवारी झाला.

सामाजिक न्याय विभागामार्फत  विविध  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त इर्विन चौकस्थित  डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय सभागृहात महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष लक्ष्मण राऊत, प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत, समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजेंद्र जाधवर, विशेष अधिकारी राजेंद्र भेलावू, संशोधन अधिकारी दिपा हेरोळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त तेजस्विनी पिलात्रे या दिव्यांग चिमुकलीने तर तालुका समन्वयक, समता दूत तसेच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी गीत सादर केले.

                                               विभागस्तरीय संविधान जनजागृती कार्यशाळा

            ‘सशस्त भारतीय राष्ट्र निर्मितीमध्ये भारतीय संविधानाची भूमिका व अधिक सशक्त भारत राष्ट्रासाठी करावयाच्या उपाययोजना’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आली होती. डॉ. पी.आर. राजपूत, डॉ. दिलीप काळे, सुदर्शन जैन, डॉ. प्यारेलाल सुर्यवंशी, गजानन देशमुख, प्रा. अंबादास मोहिते, डॉ. प्रदिप दंदे, श्याम मक्रमपुरे, रविंद्र लाखोडे तसेच समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये समाज कल्याण विभागातील लाभार्थ्यांच्या यशोगाथा असलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले.

सामाजिक न्याय विभागामार्फत समता पर्वांतर्गत विविध उपक्रम, व्याख्यानमाला, कार्यशाळा, शिबिर, विविध स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. समता पर्वानिमित्त अकरा दिवस चालणाऱ्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते यावेळी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन लघु टंकलेखक राजेश गरुड तर आभार राजेंद्र भेलावू यांनी मानले.

00000

Tuesday, December 6, 2022

'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ' हा चित्रपट

 भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांचा जीवन संघर्ष व त्यांचे समाजोद्धाराचे कार्य समजून घेण्यासाठी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द अनटोल्ड ट्रुथ' हा चित्रपट पाहा. केंद्रीय सामाजिक न्याय विभाग आणि

यांनी या चित्रपटाची संयुक्तरित्या निर्मिती केली आहे.

https://twitter.com/i/broadcasts/1djxXPzqAEkxZ

#बाबासाहेबआंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांच्या लाईव्ह फुटेजचे चित्रीकरण

 भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांच्या लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश असलेला ‘बाबासाहेब आंबेडकर’ हा दुर्मिळ माहितीपट पाहा. या माहितीपटाची निर्मिती भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ने केली आहे.

https://twitter.com/i/broadcasts/1ZkKzXoNkLwJv

‘बाबासाहेब आंबेडकर’ हा दुर्मिळ माहितीपट

 भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांच्या लाईव्ह फुटेजच्या चित्रीकरणाचा समावेश असलेला ‘बाबासाहेब आंबेडकर’ हा दुर्मिळ माहितीपट पाहा. या माहितीपटाची निर्मिती भारत सरकारच्या ‘फिल्म्स डिव्हिजन’ने केली आहे.https://twitter.com/i/broadcasts/1mnGedbdLPEKX

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक

अमरावतीतील वाघिणीच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाची यंत्रणा अधिक सक्षम करा – वनमंत्री गणेश नाईक मुंबई, दि. ९ : अमरावती वन विभागातील ...