Thursday, July 28, 2016

विभागातील अमरावती, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टी
24 तासात सरासरी 28 मि.मी. पाऊस 
       अमरावती, दि.28 : अमरावती विभागातील अमरावती, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यामध्ये 65 मि.मी. व त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्यास या भागात अतिवृष्टी झाल्याची नोंद घेण्यात येते. त्यानुसार  अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात दि.28 जुलै, 16 रोजी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार 77.2 मि.मी., बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा मध्ये 93 मि.मी., मेहकर मध्ये 69 मि.मी. तर सिंदखेडराजा मध्ये 196 मि.मी., वाशिम जिल्ह्यातील मालेगाव मध्ये 75 मि.मी पाऊस झाला आहे.
अमरावती विभागात आतापर्यत सरासरी 562 मि.मी.पाऊस झाला असून मागील 24 तासात सरासरी 28 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
            विभागातील जिल्हानिहाय आज झालेला आणि आतापर्यंतचा पाऊस पुढीलप्रमाणे. अमरावती 22 (626) मि.मी., अकोला 31 (558), यवतमाळ 17 (572), बुलडाणा 47 (483), वाशिम 24 (571) मि.मी. पाऊस झाला आहे.
            अमरावती विभागाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 779.9 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 72.2 टक्के म्हणजे 562 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
वृत्त क्र.776                                                        दिनांक 28-7-2016
जिल्ह्यातील शहानुर प्रकल्पाचे 2, पूर्णाचे 9 तर सपन प्रकल्पाचे 4 गेट उघडले
* सिंचन प्रकल्पात 72.51 टक्के जलसाठा

       अमरावती, दि.28 : अमरावती जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून झालेल्या सततधार पावसाने येथील धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये क्षमतेनुसार पाण्याची साठवण झाल्याने चार मध्यम प्रकल्पातील तीन प्रकल्पाचे गेट उघडण्यात आले. उर्ध्व वर्धा प्रकल्प मंडळ, अमरावती येथील अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या वतीने मिळालेल्या माहिती नुसार खबरदारी उपाययोजना म्हणुन शहानुर मध्यम प्रकल्पाचे 2 गेट 5सें.मी. नी उघडण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5.22 घ.मी.प्र.से. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याशिवाय पूर्णा प्रकल्पाचे 9 गेट 10 सेंमी उघडल्यामुळे 53.41 घ.मी.प्र.से. तर सपन प्रकल्पाचे 4 गेट 10 सें.मी. ने उघडल्यामुळे 13.92 घ.मी.प्र.से. विसर्ग सुरु आहे.
 जिल्ह्यात एक उर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प, शहापूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सपन हे चार माध्यम प्रकल्प आणि 77 लघु प्रकल्प असे एकुण 82 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा उपयुक्त पाणी साठा क्षमता 905.15 द.ल.घ.मी. आहे. दि.28 जुलै, 16 पर्यंत जिल्ह्यात 625 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 72.51 टक्के म्हणजे 656.31 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे. उर्ध्व वर्धा प्रकल्पात 80.82 टक्के, शहानुर 70.05 टक्के, चंद्रभागा 56.07 टक्के, पुर्णा 50.18 टक्के, सपन 66.99 टक्के आणि 77 लघु प्रकल्पात 56.41 टक्के भरले आहे.
00000
वृत्त क्र.777                                                        दिनांक 28-7-2016
अमरावती विभागातील 4 मध्यम व 59 लघु प्रकल्पामध्ये 100 टक्के जलसाठा
अमरावती, यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांचे गेट उघडले
       अमरावती, दि.28 : अमरावती विभागात काही दिवसापासुन सुरु असलेल्या सततधार पावसाने येथील सिंचन प्रकल्पाच्या पाण्याची पातळी वाढविण्यास मदत झाली आहे. विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील 3 व बुलडाणा जिल्ह्यातील एक मध्यम प्रकल्पासोबतच 59 लघु प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणी साठा निर्माण झाला आहे. विभागातील मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्यात झालेल्या वाढीमुळे अमरावती जिल्ह्यातील शहानुर, पूर्णा, सपन, यवतमाळ जिल्ह्यातील बोरगांव व नवरगांव तसेच बुलडाणा जिल्ह्यातील मस मध्यम प्रकल्पाचे गेट उघडण्यात आले आहे.
            विदर्भ पाटबंधारे विकास महामंडल, नागपुर येथील मिळालेल्या माहिती नुसार अमरावती जिल्ह्यातील शहानुर मध्यम प्रकल्पाचे 2 गेट 5सें.मी. नी उघडण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन 5.22 घ.मी.प्र.से. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. याशिवाय पूर्णा प्रकल्पाचे 9 गेट 10 सेंमी उघडल्यामुळे 53.41 घ.मी.प्र.से. तर सपन प्रकल्पाचे 4 गेट 10 सें.मी. ने उघडल्यामुळे 13.92 घ.मी.प्र.से. विसर्ग सुरु आहे.
            यवतमाळ जिल्ह्यातील अधरपुस या मध्यम सिंचन प्रकल्पाचे 9 गेट 25सेंमी उघडल्यामुळे 243 घ.मी.प्र.से., सायखेडा प्रकल्पाचे 18 सें.मी. गेट उघडल्यामुळे 39.64 घ.मी.प्र.से. विसर्ग सुरु आहे. याच जिल्ह्यातील बोरगांव प्रकल्पाचे 2 सें.मी. गेट उघडल्यामुळे 0.68 घ.मी.प्र.से. तसेच नवरगांव प्रकल्पाचे 2 सें.मी. गेट उघडल्यामुळे 0.12 घ.मी.प्र.से.  पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
            बुलडाणा जिल्ह्यातील एक मध्यम प्रकल्प मस याचे 2 सें.मी. गेट उघडल्याने येथुन 0.51 घ.मी.प्र.से. पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
अमरावती विभागातील 9 मोठे प्रकल्प, 23 मध्यम प्रकल्प आणि 448 लघु प्रकल्प असे एकुण 480 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पाची उपयुक्त पाणी साठा क्षमता 3205.11 द.ल.घ.मी. आहे. दि.28 जुलै, 16 पर्यंत विभागात 562 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 50.32 टक्के म्हणजे 1612.96 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.
            मोठे प्रकल्पात अमरावती जिल्हा उर्ध्व वर्धा प्रकल्पात 80.82 टक्के, यवतमाळ जिल्हा-पुस प्रकल्प 61.17 टक्के, अरुणावती 46.65 टक्के, बेंबळा 34.82 टक्के, अकोला जिल्हा-काटेपूर्णा 38.69 टक्के, वाण 83.12 टक्के, बुलडाणा जिल्हा -नळगंगा 13.59 टक्के, पेणटाकळी 15.44 टक्के, खडकपूर्णा 5.05 टक्के, साठा निर्माण झाला आहे.
            मध्यम प्रकल्पात अमरावती जिल्हा - शहानूर 70.05 टक्के, चंद्रभागा 56.07 टक्के, पूर्णा 50.18 टक्के, सपन 66.99 टक्के. यवतमाळ जिल्हा - अधरपुस 79.39 टक्के, सायखेडा 100 टक्के, गोकी 94.05 टक्के, वाघाडी 85.21 टक्के, बोरगाव 100 टक्के, नवरगांव 100 टक्के. अकोला जिल्हा - निर्गूणा 53.90 टक्के, मोर्णा 33.86 टक्के, ऊमा 49.40 टक्के, अडाण 44.95 टक्के. वाशिम जिल्हा - सोनल 29.85 टक्के, एकबुर्जी 73.93 टक्के. बुलडाणा जिल्हा - ज्ञानगंगा 31.48 टक्के, पलढग 24.23 टक्के, मस 100 टक्के, कोराडी 32.01 टक्के, मन 49.12 टक्के, तोरणा 29.53 टक्के, उतावळी 66.50 टक्के आणि 448 लघु प्रकल्प 37.33 टक्के भरले आहे.
00000




वृत्त क्र.778                                                        दिनांक 28-7-2016
अमरावती जिल्ह्यात धारणी तालुक्यात सर्वाधिक 892 मि. मी. पावसाची नोंद
*जिल्ह्यात आतापर्यंत 626 मि.मी.पाऊस
*24 तासात सरासरी 22 मि.मी. 
       अमरावती, दि.27 : अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यात आतापर्यत सरासरी 892 मि. मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात धारणी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असुन 24 तासात 32 मि. मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 626 मि.मी.पाऊस झाला असून मागील 24 तासात सरासरी 22 मि.मी. पाऊस झाला आहे.
          अमरावती 5 (523), भातकुली 3 (499), नांदगाव खंडेश्वर 8 (523), चांदुर रेल्वे 43 (617), धामणगाव रेल्वे 7 (576), तिवसा 5 (607), मोर्शी 3 (744), वरुड 19 (494), अचलपूर 15 (662), चांदुर बाजार 27 (584), दर्यापूर 23 (645), अंजनगाव सुर्जी 47 (548), चिखलदरा 77 (851), मि.मी. पाऊस झाला आहे. (कंसातील आकडेवारी  यावर्षी आतापर्यंतच्या सरासरी  पावसाची आहे.).
          जिल्ह्यात वार्षिक सरासरी पर्जन्यमान 814.5 मि.मी. आहे. आजपर्यंत सरासरी च्या 76 टक्के म्हणजे 626 मि.मी. पाऊस झाला आहे.
00000
वृत्त क्र. 779                                                                दिनांक 28-07-2016
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रहाटकर आज शहरात
* ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत साधणार संवाद
       अमरावती, दि.28 : महाराष्ट्र राज्य आयोगाच्या अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा प्राप्त) श्रीमती विजया रहाटकर दि.29 जुलै, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यत शासकीय विश्रामगृह येथे महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत  त्या जनतेशी संवाद साधणार आहेत. ज्या महिलांच्या काही समस्या असतील, तक्रारी असतील,  त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
          महिलांचा घरात होणारा छळ, समाजातून होणारे अपमानास्पद प्रसंग अशा अनेक अनुभवात तक्रार केली तर आपलीच बदनामी होते म्हणुन महिला तक्रार करण्याचे टाळतात. राज्य महिला आयोग त्यांच्यासाठी काम करते, मात्र महिला आयोगाचे कार्यालय मुंबई येथे असल्याने व अनेक महिलांना आयोगाची माहिती नसल्याने महिला आयोगापर्यंत पोहोचता येत नाही. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर ह्या अमरावती दौऱ्यावर येणार असुन अशा महिलांशी संवाद साधतील.
00000
काचावार/कोल्हे/राजपुत/दि.28-07-2016/15-40 वाजता


No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...