Friday, October 17, 2025

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                       जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी

अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकशाही दिन सोमवार, दिनांक 27 ऑक्टोबर, 2025 रोजी (महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी)  सकाळी  11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. तरी संबंधितांनी अहवालासह व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

00000

ग्रामीण भागात  कलम 37(1) व (3) लागू

          अमरावती, दि. 17 (जिमाका) :  जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस अधीक्षक (ग्रामीण), अमरावती  यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

 

            सदर प्रतिबंधात्मक आदेश जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात लागू करण्यात आला असून दि. 23 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. या कलमाचा भंग करणाऱ्या व्यक्तीविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी  अनिल भटकर  यांनी कळविले आहे.

0000

तलावावर संस्था नोंदणी करण्याबाबत आवाहन

स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त, महिला यांना संधी

अमरावती, दि. 17 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील अमरावती तालुक्यातील 500 हेक्टरखालील पाटबंधारे जलसंधारण विभागाचे धानोरा दिग्रस तलाव (44 हे) हा तलाव मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे. या तलावावर शासन निर्णयानुसार संस्था नोंदणी करावयाची आहे. यासाठी तलाव परीसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व महिला यांना संधी मिळणार आहे. तरी धानोरा दिग्रस तलाव (44 हे) या तलावावर संस्था नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व मच्छिमार महिला यांनी सहाय्यक निबंधक, (सहकारी संस्था), अमरावती या कार्यालयाशी संपर्क साधून बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत संस्था नोंदणी करीता प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन  सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय एम. एम. मेश्राम यांनी केले आहे.

000000

थेट कर्ज योजनेतील लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड

अमरावती, दि. 17 (जिमाका) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत थेट लाभाची योजना राबविण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांची ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार आहे. ही सोडत मंगळवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता काढण्यात येणार आहे.

यात 125 लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड करण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये 63 पुरुष व 62 महिला लाभार्थी राहणार आहेत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये आहे. या योजनेंतर्गत एकूण 175 कर्ज मागणी अर्जापैकी 173 अर्ज पात्र झाले आहेत. त्यामध्ये 119 पुरूष व 54 महिला आहेत. यातील 63 पुरूष आणि 62 महिला लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

ही सोडत दि. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्त कार्यालयामागे, कॅम्प, अमरावती काढण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एम. टी. खडसे यांनी दिली आहे.

0000

राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 17 (जिमाका): समाजातील आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारण्यास मदत करणाऱ्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर यांसारख्या कमी उत्पन्न असलेल्या श्रेणीतील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी किंवा पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी परदेशात उच्च शिक्षण घेता यावे यासाठी ही योजना राविण्यात येते आहे.

अर्जदार हा अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती किंवा भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर या घटकातील असावा. विद्यार्थी भारताचा रहिवासी असावा. निवड वर्षासाठी एप्रिलच्या पहिल्या दिवशी वय ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक आहे. पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान ६० टक्के गुण आवश्यक आहे.

परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत ५०० च्या आत असावी. या योजनेत पात्र विद्यार्थ्यांना विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम, निर्वाह भत्यामध्ये अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी १५,४०० डॉलर वार्षिक, यू. के. साठी ९,९०० पाऊंड वार्षिक, तसेच आकस्मिक खर्च म्हणून पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चासाठी अमेरिका व इतर देशांसाठी १,५०० डॉलर, यू. के. साठी १,१०० पाऊंड देण्यात येतात. विद्यार्थ्यांना आरोग्य विमा आणि व्हिसा शुल्क अनुज्ञेय असणार आहे. परदेशात जाताना आणि अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना प्रवासाचा खर्च देण्यात येतो.

या योजनेसाठी अर्ज ऑनलाइन उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी nosmsje.gov.in या संकेतस्थळावरून अर्जाचा नमुना आणि अधिक माहिती मिळवावी. योजने संबंधित अधिक माहितीसाठी योगेश तनेजा, अवर सचिव, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, नवी दिल्ली-११०००१. फोनः ०११-२३३८४०२३ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माया केदार यांनी केले आहे.

00000

 


Thursday, October 16, 2025

DIO NEWS AMRAVATI 16-10-2025



जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला प्रकल्पग्रस्तांचा सकारात्मक प्रतिसाद

स्थलांतरणाला पूर्ण सहकार्य करण्याचे सरपंचांचे आश्वासन

अमरावती, दि. 16 (जिमाका): निम्न पेढी प्रकल्पामध्ये बाधीत झालेल्या गावांचे दर्जेदार पुनर्वसन करण्यात येत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन त्या मान्य केल्या आहेत. निम्न पेढी प्रकल्पाच्या घळभरणीला शासनाने मान्यता दिल्याने या कामास सुरवात करण्यात आली आहे. त्यामुळे बाधित गावातील नागरिकांनी पुनर्वसित गावात तातडीने स्थलांतरीत व्हावे, या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आवाहनाला बाधीत गावाच्या सरपंचांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज निम्नपेढी प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी श्रद्धा उदावंत, प्रसेनजित चव्हाण यांच्यासह बाधीत गावातील प्रतिनिधी निलेश मानकर, गौतम खंडारे, प्रविण तायडे उपस्थित होते. उपस्थितांना निम्न पेढी प्रकल्पातील पुनर्वसनाबाबत शासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात आली. तसेच लोकप्रतिनिधींच्या शंकांचे समाधान करण्यात आले.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी पुनर्वसित गावात रस्ते, दिवाबत्तीची सोय करण्यात आली आहे. तसेच 150 घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. तसेच स्थलांतरणासाठी देण्यात येणारा दोन लाख रूपयांचा भत्ता एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले. तसेच पुनर्वसित गावांमधील सोयीसुविधांसाठी 57 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून गावाच्या मागणीप्रमाणे इतर योजनांमधून सुविधा उभारण्यात येतील. प्रकल्पामुळे 12 हजार हेक्टर क्षेत्रात सिंचनाची सुविधा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी पर्यायी रस्ते करून दिले जाणार आहे, असे सांगितले.

शासनाने निम्न पेढी प्रकल्पाच्या घळभरणीची परवानगी दि. 14 ऑक्टोबर रोजी दिली आहे. त्यामुळे तातडीने हे काम हाती घेण्यात आले आहे. घळभरणीचे काम फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत प्रकल्पात पाणी साठण्यास सुरवात होणार असल्याने हा पाणीसाठा बाधीत गावात येणार आहे. त्यामुळे अद्यापही स्थलांतरीत झाले नसलेल्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांचे स्थलांतर करावे, अशा सुचना देण्यात आल्या. बाधित गावातील नागरिकांना प्राधान्याने घरकुल मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाची निवाऱ्याशिवाय गैरसोय होणार नाही. निम्न पेढी प्रकल्प प्रधानमंत्र्यांच्या प्राधान्याचा प्रकल्प असल्याने यास गती देण्यात आली आहे. सरपंचांनी सकारात्मक पावले उचलून नागरिकांचे पुनर्वसित गावात स्थलांतरीत करावे, असे आवाहन केले.

निम्न पेढी प्रकल्पातील सर्व गावांचे पुनर्वसन होण्यासाठी पारदर्शकता राखण्यात आली. विशेष पॅकेज देण्यात आल्याने प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींशी सातत्याने संवाद राखला. त्यांच्या प्रयत्नातील सातत्याने प्रकल्पबाधीत पुनर्वसित गावात जाण्यास तयार झाले आहेत. प्रकल्पबाधितांच्या मागण्या आणि देण्यात येणाऱ्या सुविधांमुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

…..

प्रकल्पग्रस्तांची घरकुल आणि दर्जेदार पुनर्वसनाची मागणी मान्‍य करण्यात आली आहे. पुनर्वसनाच्या कामात पारदर्शकता, तसेच खारपाणपट्टा असल्याने शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली आहे. महत्वाचे प्रश्न मार्गी लागल्याने पुनर्वसनाला वेग आला आहे. स्मशानभूमी स्थलांतर आणि ओपन जिमची मागणी मान्य झाली आहे. तसेच इतरही प्रश्न येत्या काळात मार्गी लागतील. त्यामुळे नागरिकांच्या स्थलांतरणासाठी प्रयत्न करण्यात येतील.

निलेश मानकर, कुंड सर्जापूर

…..

गेल्या कालावधीत दर्जेदार पुनर्वसनाची कामे गतीने झाली आहेत. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले आहे. घराच्या बांधकामासाठी मदत मिळणार आहे. तसेच स्थलांतरणासाठी दोन लाख रूपयांची रक्कम एकत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे पुनर्वसित गावात स्थलांतरण होणार आहे. पुनर्वसनाबाबत शासनाने मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे स्थलांतरणासाठी सहकार्य करण्यात येईल.

गौतम खंडारे, अळणगाव

..…

प्रकल्पबाधीत गावांतील नागरिकांना भूखंडांचा लाभ देण्यात येत आहे. तसेच कुंड खुर्द, सावरखेड, ततारपूर येथील रस्त्यांचा विषय मार्गी निघाला आहे. पुनर्वसित गावात विकासकामांचा निधी मंजूर झाला आहे. नवीन स्मशानभूमी आणि ओपन जीमची मंजूरात मिळाली आहे. त्यामुळे येत्या 15 दिवसांत संपूर्ण गावाच्या स्थलांतरण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

सुजाता तायडे, कुंड सर्जापूर

00000



अवैध सावकारी व्यवहारात शेतकरी व त्यांचे कुटुंबीयांनी निर्भिडपणे तक्रार करावी

-अॅड. निलेश केशवराव हेलोंडे पाटील

अमरावती, दि. 16 (जिमाका): कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अॅड. निलेश केशवराव हेलोंडे पाटील यांनी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 अंतर्गत अवैध सावकारी तक्रारी संबंधात नुकताच आढावा घेतला. विदर्भ व मराठवाडा विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बाधंवांचे अतोनात नुकसान झालेले असल्यामुळे शेतकरी व त्यांचे कुटुंबीय आर्थिक  विवचंनेत आहेत. शेतकरी व त्यांचे कुटुंबीयांची अवैध सावकारी व्यवहारात पिळवणुक होऊ नये यासाठी त्यांनी शेतकरी बांधवांनी व व त्यांचे कुटुंबीयांनी निर्भिडपणे तक्रार करावी ,असे आवाहन केले आहे.

अवैध सावकारी व्यवहारात शेतकरी व त्यांचे कुटुंबियांचे फसवणूक, पिळवणूक होत असल्यास त्यांनी अमरावती सहकार विभागात अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराविरूध्द तक्रार संबंधीत जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक, सरकारी संस्था याचे कार्यालयात तसेच अमरावती जिल्ह्याकरीता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अमरावती व उपनिबंधक सहकारी संस्था, तालुका अमरावती सहकार संकूल, कांतानगर अमरावती -444602कार्यालयीन ईमेल क्रमांक ddr_amr @rediffmail.com/dyr.amr.amravati@gmail.com यावर करण्यात याव्यात तसेच तालुका  स्तरावरील सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयातही तक्रार नोंदवू शकतात.

जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार, उपनिबंधक सुधीर खंबायत,सहायक निबंधक गजानन डावरे, कार्यालय अधीक्षक अनिरुद्ध राऊत,  सत्यजीत पोले,  दिपक गासे, प्रशांत ढोके, सचिन शहाकार, सतिश समर्थ व कार्यालयीन कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

000000

मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज; शाळांना नोंदणीचे निर्देश

अमरावती, दि. 16 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज भरण्याकरिता शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी ऑनलाईन महाडीबीटी प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. इयत्ता 9 वी, 10 वी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, तसेच 5 वी ते 10 वी मधील अनुसूचित जातीच्या विद्यार्थीनींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती यांसारख्या महत्त्वाच्या योजनांचा यात समावेश आहे.

या योजनांची ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरिता शाळेतील मुख्याध्यापकांनी http://prematric.mahait.org/Login/Login- या महाडीबीटी प्रणाली वेब लिंकवर मुख्याध्यापक लॉगीन वापरून शाळेचे, मुख्याध्यापकांचे व लिपीकांचे प्रोफाइल तसेच विद्यार्थ्यांचे वैयक्तिक व शैक्षणिक माहितीचे प्रोफाइल तातडीने अद्ययावत करावे. या अनुषंगाने, महाडीबीटी प्रणालीमध्ये पात्र असलेल्या सर्व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांच्या अर्जाची नोंदणी मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील महाडीबीटी प्रणालीवर नोंदणीकृत सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील योजनांचे ऑनलाईन अर्ज तात्काळ भरण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी ज्ञानबा पुंड यांनी केले आहे.

0000000

कौशल्य विकास केंद्राच्या रोजगार मेळाव्यात 168 तरुणांचा सहभाग;

62 जणांची प्राथमिक निवड

अमरावती, दि. 16 (जिमाका): जिल्हा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि मॉडेल करिअर सेंटर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन नुकतेच करण्यात आले. या रोजगार मेळाव्यामध्ये जिल्ह्यासह परिसरातील विविध तालुक्यांमधून 168 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.

 उमेदवारांसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दुहेरी पद्धतीने नोंदणीची सोय उपलब्ध करण्यात आली होती. मेळाव्यात दहावी, बारावी, पदविका धारक, पदवीधर तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळावा यासाठीएकूण  6 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. यामध्ये रेमंड लक्झरी कोटन प्रा.लि. अमरावती, सहयोग मल्टी बँक लि. अमरावती, प्लास्टी सिमैक आय टी, प्लास्टी सर्ज अमरावती, जाधव गियर्स प्रा.लि. आणि सत्या माइक्रो फायनान्स प्रा.लिअमरावती यांसारख्या कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांनी विविध क्षेत्रातील एकूण 128 पदांसाठी मुलाखत प्रक्रिया राबवली. विविध कंपन्यांचे प्रतिनिधी थेट मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी 126 उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेतली. या प्लेसमेंट ड्राईव्हद्वारे 62 उमेदवारांची प्राथमिक निवड आणि 3 उमेदवारांची अंतिम निवड जागेवरच करण्यात आली.

0000000

क्रीडा साहित्य अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन

संस्थांना 14 लाखांपर्यंत अर्थसहाय्य

 अमरावती, दि. 16 (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत राज्य, जिल्हास्तरावर क्रीडा विकासाचे उपक्रम राबविण्यासाठी तसेच गुणवंत गरजू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाअंतर्गत क्रीडा विकासासाठी 14 लक्ष मर्यादेपर्यंत अर्थसहाय क्रीडा साहित्य व व्यायाम साहित्य अनुदान देण्यासाठी शैक्षणिक संस्था क्रीडा संघटना मंडळे शासकीय संस्था यांचेकडून तीन प्रतीत प्रस्ताव सादर करण्याबाबत कळविण्यात येत आहे.

व्यायाम साहित्याकरीता 500 चौरस फुट हॉल असणे आवश्यक आहे. व तसेच क्रीडा साहित्यासाठी प्रत्यक्ष क्रीडागंणासाठी राखीव जागा असणे आवश्यक आहे. सदरची जागा ही स्वमालकीची 7/12, 8 अ अथवा दीर्घ मुदतीचा करारनामा असावा. लाभार्थी संस्थांना क्रीडा व व्यायाम साहित्य प्रचलीत दर करारानुसार पुरवठा करण्याबाबतची कार्यवाही संचालनालयाचे सहमतीने करण्यात येईल.

शैक्षणिक संस्था यामध्ये राज्यातील खाजगी अनुदानातील विनाअनुदानीत प्राथमिक माध्यमिक विद्यालय आश्रम शाळा तसेच क्रीडा संघटना मंडळे यांच्यासाठी नोंदणीकृत असलेल्या एकविध खेळाच्या संघटना, खाजगी क्लब, क्रीडा मंडळ, युवक मंडळ यांना अर्ज करता येईल. तसेच शासकीय विभाग, पोलीस विभाग, स्पोर्ट क्लब, ऑफीसर्स क्लब आणि शासकीय महाविद्यालय हे अनुदानासाठी पात्र असतील. राज्य क्रीडा विकास निधीतून अर्थ सहाय्यासाठी अर्ज नमुना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात उपलब्ध असून त्यानुसार आवश्यक कागदपत्रासह परीपुर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

0000000

शेतकऱ्यांसाठी डिजीटल सहकारी

महाविस्तार एआय ॲप लाँच; हवामान, बाजारभावाची माहिती जागेवर

            अमरावती, दि. 16 (जिमाका): शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हानाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून कृषि विभागाने महाविस्तार एआय हे अँप लाँच केले आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या साहाय्याने हे ॲप लाँच केले आहे. कृत्रिम बुध्दिमत्तेच्या साहाय्याने हे ॲप शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित सर्व गरजा पुर्ण करण्यासाठी एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून देते. मराठी भाषेत उपलब्ध असलेले हे ॲप शेतकऱ्यांना रिअल टाइम माहिती, तज्ज्ञांचा सल्ला आणि आधुनिक शेती पध्दतींचे मार्गदर्शन करणार आहे.

            महाविस्तार एआय ॲपमधील एआय चॅटबॉट शेतकऱ्यांच्या प्रश्रांना त्वरीत उत्तरे देतो. रिअल टाइम हवामान अंदाज स्थानिक पातळीवरील हवामान अंदाजामुळे शेतकरी पेरणी, कापणी आणि खतांचा वापर यांचे नियोजन करू शकतात. स्थानिक आणि राष्ट्रीय बाजारपेठेतील पिकांचे भाव रिअल टाइममध्ये दाखविले जात आहे. या ॲपवर कृषि विभागाच्या विविध कृषि योजनांची माहिती, अनुदान, कर्जमाफी आणि विमा योजनांचे तपशील एकाचा ठिाकणी मिळु शकतील. ॲपमध्ये मराठीत व्हिडीओ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पिकांची लागवड, खतांचा वापर, कापणी आणि जैविक शेती याबाबत तपशीलवर मार्गदर्शन मिळेल. ॲपमधील एआय तंत्रज्ञान मध्ये शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करून पिकांवरील रोग आणि किडींचे निदान करून उपाय मिळू शकतात. शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य बनवण्यासाठी अनेक फायदे या ॲपमध्ये आहे. त्यामुळे सल्ला त्यांच्या मोबाईलवर मिळतो, ज्यामुळे वेळ वाचतो. चुकीच्या खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर टाळून शेतकरी उत्पादन खर्च कमी करू शकतात. बाजारभाव माहिती आणि हवामान अंदाजामुळे शेतकरी योग्य वेळी पिकांची विक्री आणि नियोजन करू शकता, यामुळे त्यांच्या  उत्पन्नात वाढ होऊ शकते.

            गुगल प्ले स्टोअरवर जाऊन आजच महाविस्तार एआय ॲप डाउनलोड करा. शेतीत डिजीटल क्रांतीचा भाग व्हा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

000000

--

Wednesday, October 15, 2025

DIO NEWS AMRAVATI 15-10-2025


                                   

जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन

अमरावती, दि. 15 (जिमाका) : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, प्रसेनजित चव्हाण, श्रद्धा उदावंत, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, सहायक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, अधीक्षक निलेश खटके, तहसिलदार रूपेश खंडारे आदी उपस्थित होते.

माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस 15 ऑक्टोबर हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. वाचन संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुषंगाने जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. सुरज मडावी यांनी यावेळी केले.

00000

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन

अमरावती, दि. 15 (जिमाका): माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपजिल्हाधिकारी विवेक जाधव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, नगरपालिका प्रशासन सहआयुक्त विकास खंडारे आदी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनीही पुष्प वाहून डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

००००

पुर्णा मध्यम प्रकल्प  ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी सात पाणीपाळ्या प्रस्तावित

शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 15 (जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी  पाणीसाठा उपलब्ध असून सात पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

       उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून   किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या  5.00 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी  पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार  ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे.

नोव्हेंबर ते मार्च दरम्यान सात वेळा पाणी मिळेल.

       कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7अ, 7ब कोरे फॅार्म संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10  नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. रब्बी हंगामात  नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत  या कालावधीत मागणीप्रमाणे पाच पाणी पाळ्या देण्यात येतील.

लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक

            इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी. उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.

             मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के  दर लागू असेल.

पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.

शेतचारा स्वच्छ ठेवा

कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छतेअभावी पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाफ्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही व तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. मंजूरीपेक्षा जादा क्षेत्र भिजविल्यास व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास नियमाप्रमाणे पंचनामा करुन दंडनीय आकारणी करण्यात येईल. मंजूर न केलेल्या क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.

     लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील.

थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही.   वितरिका पाणी पाळीमध्ये पाणी चालू असताना लाभधारक वितरिकेचा दरवाजा  वेळी-अवेळी कमी-जास्त प्रमाणात उघडतात. त्यामुळे त्या वितरिकेवरील चालू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊन ‘टेल टू हेड’ सिंचनावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्या वितरिकावरील पिकांना संचलनाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रस्तावित पाणी पाळी कालावधीत वाढ होते.

 

पुर्णा मध्यम प्रकल्पांतर्गत रब्बी हंगाम 2025-26 संभाव्य पाणी पाळी नियोजन

कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी  दि. 15 नोव्हेंबर  ते 24 नोव्हेंबर 2025  (10 दिवस) तर  कालवा बंद कालावधी  25 नोव्हेंबर  ते 1 डिसेंबर 2025 राहील. दि. 2 डिसेंबर 2025 ते  11  डिसेंबर 2025 कालव्यात  (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 12 ते 18  डिसेंबर 2025  कालवा बंद राहील. दि. 19 डिसेंबर ते  दि. 28 डिसेंबर 2025 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026  कालवा बंद राहील.  दि. 5 जानेवारी ते  दि. 14  जानेवारी 2026 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर  दि. 15 ते दि. 21 जानेवारी 2026  कालवा बंद राहील. दि. 22 ते 31 जानेवारी 2026 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल. तर  1 ते 7 फेब्रुवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 8 ते 17 फेब्रुवारी 2026 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 18 ते 24 फेब्रुवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 (10) पाणी सोडण्यात येईल तर कालवा पुर्णत: बंद राहील.    कालव्यात एकूण 70 दिवस पाणी सोडण्यात येईल.

जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन मध्यम व लघु पाटबंधारे  विभागामार्फत करण्यात आले आहे.

000000

 चारगड लघु प्रकल्प  ‘उर्ध्व वर्धा’तून रब्बी सिंचनासाठी सात पाणीपाळ्या प्रस्तावित

शेतक-यांना अर्ज करण्याचे आवाहन

       अमरावती, दि. 15 (जिमाका): उर्ध्व वर्धा प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी  पाणीसाठा उपलब्ध असून सात पाणी पाळ्या देण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी लाभक्षेत्रातील शेतकरी बांधवांनी 10 नोव्हेंबरपूर्वी संबंधित शाखा कार्यालयास अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

       उजवा मुख्य कालव्याच्या आरंभापासून   किमीपर्यंत व डावा मुख्य कालव्याच्या  3.48 किमीपर्यंतच्या लाभक्षेत्रातील सर्व वितरिका, जलाशयावरील अधिसूचित नदीनाल्यांवरील लाभधारकांना रब्बी हंगामासाठी  पाणी देण्यात येईल. वितरण व्यवस्थेद्वारे जिथे सुलभपणे पाणी जाऊ शकते तिथपर्यंत कालवा संचलन कार्यक्रमानुसार  ‘पुच्छ भागाकडून ते मुखाकडे’ (टेल टु हेड) या तत्त्वानुसार सिंचन होणे आवश्यक आहे.

नोव्हेंबर ते मार्च दरम्यान सात वेळा पाणी मिळेल.

       कालव्याचे प्रवाही किंवा कालव्यावरील, नदी-नाल्यांवरील मंजूर उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचनासाठी पाणी घ्यावयाचे असल्यास पाणी मागणी अर्ज नमुना क्र. 7अ, 7ब कोरे फॅार्म संबंधित शाखा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहेत. ते भरून 10  नोव्हेंबरपर्यंत तिथेच सादर करावेत, असे आवाहन उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. रब्बी हंगामात  नोव्हेंबर 2025 अखेरपर्यंत  या कालावधीत मागणीप्रमाणे पाच पाणी पाळ्या देण्यात येतील.

लाभधारकांनी नियम पाळणे आवश्यक

            इच्छुक लाभधारकांनी त्यांच्याकडील थकबाकीची एक तृतीयांश व चालू हंगामाची अग्रिम पाणीपट्टी भरावी. उपसा सिंचन लाभधारकांनी नळमार्गावर पाणी मोजमाप यंत्र बसवावे. पिकांचे मागणी क्षेत्र 20 आर या पटीत असावे. पाणी अर्ज मंजूर करुन घेऊनच उपसा सिंचनासाठी पाणी वापर करावा.

             मंजूर क्षेत्रासाठी कालव्याचे पाणी घेण्यात येणारी शेतचारी व विहिरीवरील शेतचारी यात तीन मीटरचे अंतर असावे. पाटबंधारे अधिनियमानुसार प्रवाही सिंचनाच्या मूळ दराच्या 50 टक्के  दर लागू असेल.

पाणीपट्टी न भरणा-या लाभधारकास सिंचनासाठी पाणी देणे या कार्यालयावर बंधनकारक राहणार नाही. व त्यांचा पाणीपुरवठा केव्हाही बंद करण्यात येईल व थकबाकीवर शासन निर्णय नियमानुसार द.सा.द.शे. 10 टक्के दरान विलंब आकारण्यात येईल.

शेतचारा स्वच्छ ठेवा

कालव्याचे पाणी शेतात नेण्यासाठी असलेली शेतचारी स्वच्छ व व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी लाभधारकांची आहे. शेतचारी स्वच्छतेअभावी पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय आल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही. उडाफ्याचे क्षेत्रास पाणीपुरवठा करण्यात येणार नाही व तसेच लाभधारकांनी मंजूर क्षेत्राचे मर्यादेपर्यंत कालवा व नदी-नाल्याच्या पाण्याचा वापर करावा. मंजूरीपेक्षा जादा क्षेत्र भिजविल्यास व अनधिकृतपणे पाणी घेतल्यास नियमाप्रमाणे पंचनामा करुन दंडनीय आकारणी करण्यात येईल. मंजूर न केलेल्या क्षेत्रास पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी या कार्यालयावर राहणार नाही.

     लाभधारकाने दिवस व रात्री पाणी घेणे बंधनकारक आहे. अडचणी असल्यास कोणत्याही प्रकारची आगाऊ सूचना न देता पाणी पाळी पत्रकात बदल करण्याचे अधिकार कार्यकारी अभियंता यांना राहतील.

थकबाकीदार लाभधारक व थकबाकीदार पाणीवापर संस्थांना पाणी देणे बंधनकारक राहणार नाही.   वितरिका पाणी पाळीमध्ये पाणी चालू असताना लाभधारक वितरिकेचा दरवाजा  वेळी-अवेळी कमी-जास्त प्रमाणात उघडतात. त्यामुळे त्या वितरिकेवरील चालू असलेल्या पाण्याचा विसर्ग कमी जास्त होऊन ‘टेल टू हेड’ सिंचनावर विपरीत परिणाम होतो व त्यामुळे त्या वितरिकावरील पिकांना संचलनाप्रमाणे पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे प्रस्तावित पाणी पाळी कालावधीत वाढ होते.

 

चारगड लघु प्रकल्पांतर्गत रब्बी हंगाम 2025-26 संभाव्य पाणी पाळी नियोजन

कालव्यात पाणी सोडण्याचा कालावधी  दि. 15 नोव्हेंबर  ते 24 नोव्हेंबर 2025  (10 दिवस) तर  कालवा बंद कालावधी  25 नोव्हेंबर  ते 1 डिसेंबर 2025 राहील. दि. 2 डिसेंबर 2025 ते  11  डिसेंबर 2025 कालव्यात  (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 12 ते 18  डिसेंबर 2025  कालवा बंद राहील. दि. 19 डिसेंबर ते  दि. 28 डिसेंबर 2025 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 29 डिसेंबर 2025 ते 4 जानेवारी 2026  कालवा बंद राहील.  दि. 5 जानेवारी ते  दि. 14  जानेवारी 2026 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर  दि. 15 ते दि. 21 जानेवारी 2026  कालवा बंद राहील. दि. 22 ते 31 जानेवारी 2026 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल. तर  1 ते 7 फेब्रुवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 8 ते 17 फेब्रुवारी 2026 (10 दिवस) पाणी सोडण्यात येईल तर दि. 18 ते 24 फेब्रुवारी 2026 कालवा बंद राहील. दि. 25 मार्च ते 3 एप्रिल 2026 (10 दिवस ) पाणी सोडण्यात येईल तर कालवा पुर्णत: बंद राहील. कालव्यात एकूण 70 दिवस पाणी सोडण्यात येईल.

जर लाभधारकांनी संचलन कार्यक्रमाप्रमाणे टेल टू हेड रात्रंदिवस शेजपाळीपध्दतीने पिकांना पाणी घेतले तर संभाव्य पाणीपाळीचा कालावधी कमी होवून पाण्याचा अधिकाधिक लाभ होईल. संपूर्ण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात शेतकऱ्यांनी कोठेही दारे स्वतः उघडून टेल टू हेड सिंचन प्रकारात अडथळा आणल्यास पाण्याचा नाश तर होतोच शिवाय पाणीपाळी कालावधी वाढतो. उर्ध्व वर्धा प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभधारकांनी या बाबत योग्य ते सहकार्य करावे, असे आवाहन मध्यम व लघु पाटबंधारे  विभागामार्फत करण्यात आले आहे.

000000




शासकीय विभागीय ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

अमरावती, दि. 15 (जिमाका): वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञानसंपन्न व माहिती समृध्द समाज घडविण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार व विकास होणे आवश्यक आहे. भारताचे माजी राष्ट्रपती  डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करुन त्यांना आदरांजली अर्पण  करण्यासाठी  आणि विदयार्थ्यांमध्ये व समाजाच्या इतर घटकांना वाचनांची आवड व प्रेरणा निर्माण करणे व वाचनाचे महत्त्व जाणून घेणे  यासाठी दरवर्षी भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा (15ऑक्टोंबर) हा जन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात येत असतो. 

 त्यानिमीत्याने विविध साहित्यकृती, ग्रंथांचे प्रदर्शन शासकीय विभागीय ग्रंथालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या हस्ते या ग्रंथ प्रदर्शनाचेउद्घाटन करण्यात आले. 

तहसीलदार विजय लोखंडे, सहाय्यक ग्रंथालय संचालक डॉ. राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी  तसेच ग्रंथालय कर्मचारी,  विदयार्थी व वाचक वर्ग  उपस्थित होते.

श्री. अनिल भटकर यांनी भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रकाश टाकून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री. विजय लोखंडे . यांनी . मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेश पाटील यांनी तर आभार डॉ. सूरज मडावी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ग्रंथालयाचे कर्मचारी गजानन कुरवाडे, दीपक गेडाम, अजय इंगळे, शेषराव भिरडे, राजाराम देवकर, श्री.  वानखेडे, श्री.  मिश्रा, योगेश घवडे इत्यादी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

00000




 रा. सू. गवई स्मारक उद्घाटनासाठी सज्ज

*अमरावतीत उभे राहिले भव्य स्मारक

*जिल्हाधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा

अमरावती, दि. 15 (जिमाका) : रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे काम गतीने पूर्ण करण्यात आले आहे. दादासाहेबांचा पुतळा, संग्रहालय आणि सभागृहाचे काम पूर्णत्वास आले असून हे भव्य स्मारक उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी आज स्मारकस्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. तसेच स्मारकाबाबत महत्वपूर्ण सुचना केल्या.

दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन दि. 30 ऑक्टोबर रोजी नियोजित आहे. उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे.

उद्घाटनाच्या अनुषंगाने सर्व परवानगी आणि ना-हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहेत. तसेच उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. स्मारक ठिकाणी वीज, पाणी आणि स्वच्छतेची कामे प्राधान्याने करण्यात आली आहेत. याबाबींचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. वीज वितरण सुरळीत सुरू राहावी, पाण्याचा पुरवठा व्यवस्थित राहावा, तसेच स्वच्छतेसाठी मनुष्यबळ नेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सुचनांचा आढावा घेण्यात आला. वीज जोडणी आणि त्याचे देयक, पाणी पुरवठा योग्य दाबाने होण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेण्यात आली. स्मारकाचे योग्य देखभाल होण्यासाठी याठिकाणी तीन व्यक्तींची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्याकडून इमारत आणि परिसराची देखभाल करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्याकडून दादासाहेब गवई यांच्याबद्दल माहिती देण्यात येईल. महापालिकेने दोन पाळीमध्ये चार सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.

उद्घाटन समारंभाला महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असल्याने याठिकाणी सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करावे. तसेच नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यासाठी वाहनतळाची सुविधा करावी. कार्यक्रमाला न्यायिक अधिकारी उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यासाठी वाहनतळाची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सुचना पोलिस विभागाला यावेळी देण्यात आल्या. दादासाहेब गवई यांचा जीवनपट येथे येणाऱ्या नागरिकांना कळावा, यासाठी चित्रफिती तयार करण्यात याव्यात. तसेच त्यांच्या उपयोगातील वस्तू याठिकाणी ठेवण्यात याव्यात, अशा सूचना करण्यात आल्या.

भेटी दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, मुख्य अभियंता गिरीश जोशी, कार्यकारी अभियंता प्रतिक गिरी, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.


DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...