Thursday, September 17, 2026

जिल्ह्यात लोकसंवाद उपक्रमास सुरुवात


शासकीय योजनांना लोकसहभागाचे बळ हवे; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
जिल्ह्यात लोकसंवाद उपक्रमास सुरुवात

अमरावती, दि. 17 (जिमाका): राज्य शासनाचा मृद व जलसंधारण विभागाने माती व पाण्याच्या संवर्धनाचे विविध उपक्रम योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागही तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून कार्य करीत आहे. या सर्व उपक्रमांची माहिती मिळाल्याचे समाधान व्यक्त करून शहरातील ऐतिहासिक आझाद हिंद गणेशोत्सव मंडळात दर्शनासाठी आलेल्या नागरिकांनी व्यक्त करत शासनाच्या या स्तुत्य कार्यास जन सहभागाचेही बळ हवे, अशा उत्स्फूर्त भावना मांडल्या निमित्य होते जिल्हा माहिती कार्यालयाद्वारे बुधवार, 16 सप्टेंबर पासून सुरू करण्यात आलेल्या 'लोकसंवाद' उपक्रमाचे. 

No comments:

Post a Comment

रेवसा गावात 'लोकसंवाद';

  रेवसा गावात 'लोकसंवाद'; पथनाट्यातून सावकारीविरोधात जनजागृती   कर्जमुक्ती योजनेसह कृषी विभागाच्या योजनांचाही संदेश