Thursday, June 11, 2026

DIO NEWS AMRAVATI 11.06.2026


                        'सारथी'तर्फे गाविलगड आणि असदगड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम;

सिडबॉलद्वारे वृक्षारोपण उपक्रम

अमरावती, दि. 11 (जिमाका): मराठा, कुणबी व कुणबी-मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी कार्यरत असलेल्या 'सारथी' संस्थेच्या वतीने राज्यातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. 'सारथी'चे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नुकताच हा उपक्रम पार पडला. छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीचे प्रतीक असलेल्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करणे आणि शाहू महाराजांच्या लोककल्याणाचा विचार पुढे नेणे, हा यामागचा मुख्य उद्देश होता.

या मोहिमेत अमरावती विभागांतर्गत चिखलदरा येथील गाविलगड आणि अकोला येथील असदगड किल्ल्यावर 'सारथी'च्या संशोधन अधिछात्रवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गाविलगड येथे उपव्यवस्थापकीय संचालक सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थी शंकर गोरे, रूपेश पडघन, सदाशिव आरसोड, योगेश भोयर, पवन मापारी आणि कर्मचारी किरण चाफाले, देवानंद सोळंके व कुलदीप सूरकर यांनी परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेसोबतच विद्यार्थ्यांनी स्थानिक प्रजातींच्या बिया, माती, शेण व बाविस्टीन पावडरचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार केलेले 'सिडबॉल' चिखलदरा परिसरात टाकले, जेणेकरून पावसाळ्यात उत्तम वृक्षनिर्मिती होईल.

तसेच, अकोला येथील असदगड किल्ल्यावर अक्षय बांगर, अनिरुद्ध दळवी, अमोल धोत्रे, अजय काळे, सूरज पारस्कर आणि प्रिया शेटे या संशोधक विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवले. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वाटचालीतील गड-किल्ल्यांचे योगदान अधोरेखित करण्यात आले असून, नागरिकांनी या वास्तूंचे पावित्र्य राखावे व स्वच्छता ठेवावी, असे आवाहन 'सारथी' संस्थेने केले आहे.

000000000



मान्सूनपूर्व पूर आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज;

मालखेड तलावावर रंगीत तालीम संपन्न

अमरावती, दि. 11 (जिमाका): आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उद्भवू शकणाऱ्या पूर परिस्थितीचा यशस्वी मुकाबला करण्यासाठी अमरावती जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आशिष येरेकर यांच्या आदेशाने  मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ ) नागपूर आणि जिल्हा शोध व बचाव पथक, जिल्हाधिकारी कार्यालय , अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने या थरारक प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते.

 

            निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वे तालुक्यातील मालखेड तलाव येथे जिल्हास्तरीय पूर आपत्ती व्यवस्थापन रंगीत तालीम (मॉकड्रिल) पार पडली.  या रंगीत तालीमीदरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे, त्यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवणे आणि पूर परिस्थितीमुळे घरांची पडझड किंवा इतर आपत्ती ओढवल्यास शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून जीवितहानी कशी टाळायची, याचे थेट सादरीकरण करण्यात आले. विशेषतः ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास ती स्थानिक पातळीवर कशी हाताळावी, याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण एनडीआरएफ नागपूर आणि जिल्हा शोध व बचाव पथकातील तज्ज्ञांनी विविध प्रात्यक्षिकांद्वारे दिले. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत महसूल, पोलीस आणि आरोग्य विभागातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या काय असाव्यात, याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या मोहिमेत चांदूर रेल्वे तालुक्यातील महसूल विभाग, गटविकास अधिकारी, संबंधित कर्मचारी आणि आरोग्य यंत्रणेने सक्रिय सहभाग घेतला.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर, चांदूर रेल्वेचे नायब तहसीलदार अनिल चौरे, पोलीस निरीक्षक श्री. मिश्रा, पोलीस निरीक्षक श्री. यादव, एनडीआरएफ नागपूरचे डॉ. झा, मुंबई मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ अनुराग कचोरी, महसूल अधिकारी प्रमोद शिरसाठ, तलाठी दीपक चव्हाण, आरोग्य यंत्रणेचे डॉ. अविनाश पवार, प्रीती पवार, सौरव पाठक, मनोज माकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सचिन धरमकर, विशाल लिमकर, आकाश निमकर, कौस्तुभ वैद्य, सुमित बांबल, प्रतिक कडू, नारायण दवंगे, अशोक निंबरते तसेच 'आपला मित्र' संस्थेचे तुषार गोंडाणे व अमोल गोंडाणे यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून शौर्यपूर्ण बचावकार्याची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांनी केले.

00000000

Wednesday, June 10, 2026

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

 शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन

अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्यक आहे. ही समस्या ती सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समस्यांशी निगडीत असल्यामुळे नागरिकांमध्ये सजगता आणण्यासाठी 12 जुन रोजी जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिवस साजरा करण्यात येतो.

जिल्ह्यात सन 2021 ते सन 2026 पर्यंत 58 धाडसत्राचे करण्यात आले. यात 181 आस्थापनांना भेटी देऊन 25 बालक, बालकामगार मुक्त केले आहेत. यामध्ये 14 वर्षाचे आतील 10 बालकामगार आहे. तसेच 14 वर्षावरील 15 बालक आहे. बालकामगार कामावर ठेवलेल्या 8 मालकावर बालकामगार अधिनियम, 1986 अंतर्गत न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. मुक्त केलेल्या बालकामगारांच्या शैक्षणिक पुनर्वसनाकरीता शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद व महापालिका यांच्‍यामार्फत 14 वर्षाखालील बालकामगाराचे पुनर्वसन करण्यात येते. बालकामगार या अनिष्ठ प्रथेतून राज्य मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या कृतीदलाची बैठक घेण्यात येते.

तसेच केंद्र शासनाच्या बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कोणत्याही व्यवसाय, प्रक्रियेत कामावर ठेवणे, तसेच 14 वर्ष पुर्ण परंतू 18 वर्ष पूर्ण न झालेल्या किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे गुन्हा आहे. जर मालकाने, नियोक्त्याने बाल अथवा किशोरवयीन मुलांना कामावर ठेवल्यास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत कारावास किंवा 20 हजार ते 50 हजार  रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्हीही अशी शिक्षा होऊ शकते.

भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण आणि आरोग्य बालकांचे मुलभूत अधिकारी आहेत. बालकाचे हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बालमजुरी प्रथा कायमस्वरुपी नष्ट होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने हे मान्य केले असून 14 वर्षाखालील मुलांना बालमजुरी करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुद्ध जबर शिक्षेची तरतूद केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापनाधारक, उद्योजकांनी बाल व किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये, असे आवाहन कामगार विभागाने केले आहे.

00000000

सन २०१४ मध्ये २१,८०१ किमी असलेले रेल्वे विद्युतीकरण हे सन २०२६ मध्ये ६९,८७३+ किमीपर्यंत पोहोचले आहे.


सन २०१४ मध्ये २१,८०१ किमी असलेले रेल्वे विद्युतीकरण हे सन २०२६ मध्ये ६९,८७३+ किमीपर्यंत पोहोचले आहे. या अभूतपूर्व प्रगतीमुळे देशातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत झाला असून, कार्बन उत्सर्जनात घट, कार्यक्षमतेत वाढ आणि शाश्वत विकासाला चालना मिळत आहे. वेगवान, हरित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. From 21,801 km of electrified railway tracks in 2014 to 69,873+ km in 2026, India’s rail network has witnessed a remarkable transformation. This rapid expansion is enhancing connectivity, reducing carbon emissions, improving operational efficiency. #LongestServingElectedPMModi
 

दरडोई उत्पन्नात २०१४ मधील ₹८६,६४७ वरून २०२६ मध्ये ₹२,४३,१८० पर्यंतचा प्रवास हा आर्थिक समावेशन, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पुरावा आहे. . .


 दरडोई उत्पन्नात २०१४ मधील ₹८६,६४७ वरून २०२६ मध्ये ₹२,४३,१८० पर्यंतचा प्रवास हा आर्थिक समावेशन, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा पुरावा आहे.

. . From ₹86,647 in 2014 to ₹2,43,180 in 2026, India's journey reflects a strong commitment to financial inclusion, economic growth, and improved opportunities for every citizen. #LongestServingElectedPMModi

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे.



प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा प्रवासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. या काळात देशाने स्वच्छ, शाश्वत आणि हरित ऊर्जेच्या दिशेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. . . In 4,399 days, PM Modi's vision accelerated India's clean energy journey. #LongestServingElectedPMModi

 

एक्सप्रेसवेच्या २०१४ मधील १,००० किमी जाळ्यापासून ते २०२६ मध्ये ७,३३२+ किमी पर्यंतचा प्रवास हा भारताच्या पायाभूत विकासाचा वेग दर्शवतो.


 

एक्सप्रेसवेच्या २०१४ मधील १,००० किमी जाळ्यापासून ते २०२६ मध्ये ७,३३२+ किमी पर्यंतचा प्रवास हा भारताच्या पायाभूत विकासाचा वेग दर्शवतो. वाढती कनेक्टिव्हिटी, कमी होणारा प्रवासाचा कालावधी, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक विकास यांना या एक्सप्रेसवे क्रांतीने नवी गती दिली आहे. . . From just 1,000 km of expressways in 2014 to 7,332+ km in 2026, India's road infrastructure has witnessed unprecedented growth. Connecting regions, boosting economic activity, reducing travel time, and bringing opportunities closer to every citizen — the expressway revolution is transforming the nation. #LongestServingElectedPMModi

२०१४ मध्ये मोजक्याच स्टार्टअप्सपासून सुरू झालेला प्रवास आज १.४ लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्सपर्यंत पोहोचला आहे.


२०१४ मध्ये मोजक्याच स्टार्टअप्सपासून सुरू झालेला प्रवास आज १.४ लाखांहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्सपर्यंत पोहोचला आहे. नव्या पिढीतील नवोन्मेषकांच्या बळावर भारत आज जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था म्हणून उदयास आला आहे. . . From a handful of startups in 2014 to more than 1.4 lakh registered startups today, India has emerged as the world's third-largest startup ecosystem, powered by a new generation of innovators. . . भारत की स्टार्टअप क्रांति देश की युवा पीढ़ी के बढ़ते आत्मविश्वास की कहानी है। 1.4 लाख से ज्यादा रजिस्टर्ड स्टार्टअप्स के साथ भारत आज दुनिया का तीसरा सबसे बड़ा स्टार्टअप इकोसिस्टम है, जहाँ हमारे युवा देश को आगे बढ़ा रहे हैं। #LongestServingElectedPMModi

 

DIO NEWS AMRAVATI 11.06.2026

                              'सारथी'तर्फे गाविलगड आणि असदगड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम; सिडबॉलद्वारे वृक्षारोपण उपक्रम अमरावती, दि....