पालकमंत्र्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा
पालकमंत्र्यांनी घेतला जल जीवन मिशनचा आढावा पाणी पुरवठा योजनेतून प्रत्येक गावांना पिण्याचे पाणी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर जिल्ह्याचे उद्दिष्ट विहित मुदतीत पूर्ण करा 1588 गावांसाठी 4 लाख 56 हजार 621 कार्यात्मक नळजोडणी अमरावती , दि. 31 : केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन राबविण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या मिशनच्या अंमलबजावणीतून राज्यातील सर्व ग्रामीण कुटुंबांना सन 2024 पर्यंत वैयक्तिक नळ जोडणीव्दारे दरडोई प्रति दिन किमान 55 लिटर गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या मिशन अंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 1 हजार 588 गावांसाठी एकूण 4 लाख 56 हजार 621 कार्यात्मक नळजोडणी करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सुरळीत नियोजन करुन पाणी पुरवठा योजनांची कामे विहित मुदतीत पूर्ण करा , असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संबंधित यंत्रणांना दिले. या माध्यमातून जिल्ह्यातील प्रत्येक गावाला नियमितपणे पिण्याचे पाणी उपलब्ध होऊन पाणी टंचा