नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीपणे राबवा - मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा
नव भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वीपणे राबवा - मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा अमरावती, दि. 31 (जिमाका) : नव भारत साक्षरता कार्यक्रम जिल्ह्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज केले. नव भारत साक्षरता कार्यक्रम 2022-2027 अंतर्गत गठित नियामक परिषद समिती व कार्यकारी समितीची दुसरी बैठक आज श्री. अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कक्षामध्ये आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या बैठकीमध्ये शिक्षणाधिकारी (योजना) सय्यद राजीक सय्यद गफ्फार यांनी प्रारंभी माहिती दिली. मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, जिल्हा व्यवसाय व कौशल्य विकास अधिकारी प्रांजली बारस्कर, डायट प्रतिनिधी विजय शिंदे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रभारी प्राचार्य एन.जी. देशमुख, जिल्हा सांख्यिकी अधिकारी संजय काळमेघ, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती आर.एस. राऊत, प्र. जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बुध्दभुषण सोनोने, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल कोल्