जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून संत्रा शेती व मूल्यवृद्धी प्रकल्पाची पाहणी
जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून संत्रा शेती व मूल्यवृद्धी प्रकल्पाची पाहणी अमरावती, दि. 30 : संत्रा हे जिल्ह्यातील महत्वाचे फळपीक आहे. संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच संत्रा फळपीक मूल्यवृद्धी व निर्यातवृद्धीसाठी प्रयत्न व्हावेत. शेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्य साखळीतील सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी आज वरूड तालुक्याचा दौरा करून फळपीक शेतीची पाहणी व कृषी प्रकल्पांना भेटी दिल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते आदी उपस्थित होते. जिल्हाधिका-यांनी आज बेनोडा, जरूड, वरूड आदी ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतकरी गटामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी व ई- पीक पाहणी कार्यक्रमात सहभाग घेतला. बेनोडा येथे संत्रा उत्पादक शेतक-यांनी खडका धरण येथून पाईपलाईन आणून फुलवलेल्या संत्रा