मेळघाटातील 4 हजार कुटुंबांना अंत्योदय योजनेचा लाभ - जिल्हाधिकारी पवनीत कौर
चावडीवाचनानंतर अपात्र नावांची वगळणी; गरजूंचा समावेश मेळघाटातील 4 हजार कुटुंबांना अंत्योदय योजनेचा लाभ - जिल्हाधिकारी पवनीत कौर अमरावती, दि. 31 : मेळघाट क्षेत्रात गावोगाव शिधापत्रिका चावडीवाचनाचा धडक कार्यक्रम राबवून मृत व अपात्र व्यक्तींची नावे वगळण्यात आली आणि अंत्योदय योजनेत पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या या मोहिमेमुळे मेळघाटातील तब्बल 4 हजार कुटुंबांचा नव्याने अंत्योदय योजनेत समावेश होऊन त्यांना योजनेचा लाभ मिळाला. गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीच्या दरात धान्य मिळवून देण्यासाठी अंत्योदय योजना राबवली जाते. मेळघाटातील दुर्गम पाड्यापाड्यांवर या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या मार्गदर्शनानुसार चिखलदरा व धारणी तालुक्यातील गावांमध्ये शिधापत्रिका चावडीवाचनाचा धडक कार्यक्रम राबविण्यात आला. या मोहिमेत शिधापत्रिकेतील मृत सदस्यांची नावे वगळण्याबरोबरच राज्याबाहेर किंवा इतर जिल्ह्यांत गेलेल्या व्यक्तींच्या शिधापत्रिका कमी करण्यात आल्या. शासकीय नोकरीत असलेल