आधुनिक तंत्रज्ञान व कर्तव्यनिष्ठेने टी.बी.वर मात करू
जिल्हाधिकारी
अमरावती, दि. 24 : आधुनिक तंत्रज्ञान व टीबी निर्मुलनासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची कर्तव्यनिष्ठा यांनेच आपण टीबी रोगावर मात करू शकतो असे मत जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी मांडले. स्थानिक क्षयरोग रुग्णालय परिसरात आयोजित जागतीक क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुळकर्णी, समाजसेवक गोंविद कासट, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.अरुण राऊत, डॉ.विलास जाधव,डॉ.नितीन भालेराव डॉ.वसंत लुंगे, क्षयरोग अधिकारी डॉ.निकोसे, डॉ विनोद देशमुख उपस्थित होते. सुरूवातीला क्षयरोग निर्मुलनाकरीता लसीचे संशोधक रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला हारार्पण केले. टि.बी निर्मुलनाकरीता पथनाट्य सादर करण्यात आले. त्यांनतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते टी.बीच्या माहिती देणाऱ्या स्टॉलचे व पोस्टर प्रदर्शनीचे उदघाटन करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुळकर्णी यांनी रेबीज,देवी,पोलीओ यासारखाच टीबी आता निर्मुलनाच्या उंबरठयावर असल्याचे सांगीतले.
यावेळी बोलतांना डॉ किरण गीत्ते म्हणाले की आशिया खंडातील 6 देशात क्षयरोगाचा प्रसार सर्वाधिक झालेला आहे. भारतात ही 1 लाख 70 हजार रूग्ण क्षयरोगाने ग्रस्त आहेत. टी.बी.हा संसर्गजन्य व जीवनशैलीशी संबंधीत रोग असल्याने तो प्रतीबंधानेच कमी होऊ शकतो यासाठी आपल्या परिसरात स्वच्छता राखणे, उच्च प्रथिनयुक्त आहाराचे सेवन करणे या आरोग्यविषयक चांगल्या सवयी आपण लावल्या पाहिजेत.
प्रास्ताविक क्षयरोग तज्ञ डॉ.निकोसे यांनी तर संचालन उमेश आगरकर यांनी केले. कार्यक्रमाला परीचर्या विद्यालयाच्या विद्यार्थीनी उपस्थित होते.
00000
Comments
Post a Comment