Tuesday, March 5, 2019

सत्तर गाव पाणीपुरवठा योजना गतीने कामे करण्याचे पाणी पुरवठा मंत्री यांचे आदेश मंत्रालयात चर्चा




अमरावती, दि. 5 : सत्तर गाव पाणीपुरवठा योजनेबाबत सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज मुंबई येथे दिले.सत्तर गाव पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्यासाठी आज मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री प्रविण पोटे पाटील ,आमदार डॉ अनिल बोंडे उपस्थित होते. शासन निर्णयाप्रमाणे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
जिल्ह्यातील अपर वर्धा धरणात पाणी साठा कमी असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश  पालकमंत्री श्री पोटे पाटील यांनी दिले. ते म्हणाले की सत्तर गाव पाणीपुरवठा योजनेतून लवकरच  गावांना पाणी उपलब्ध होणार आहे,नागरिकांना पिण्याचे पाणी विनासायास मिळावे असे शासनाचे धोरण आहे.लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सत्तरगाव पाणीपुरवठा योजना मार्गी लावावी. मंत्रालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...