Wednesday, May 24, 2017

खनिज विकास प्रतिष्ठान निधीतून
शिक्षण,स्वच्छतेच्या कामांना प्राधान्य द्यावे.
                                               पालकमंत्री प्रविण पोटे –पाटील यांचे निर्देश
              अमरावती दि. 24 : जिल्हयातील खनिज विकास प्रतिष्ठानमार्फत खनिजबाधित क्षेत्रातील  विकासकामे करताना  पायाभुत सुविधेपेक्षा सामाजिक क्षेत्रातील  शिक्षण,पिण्याचे पाणी  व स्वच्छता या   कामांना  प्राधान्य देण्याचे निर्देश पालकमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी आज दिले.
                जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट कार्यकारी परिषदेच्या  बैठकीत ते बोलत होते.यावेळी आमदार रमेश बुंदिले,जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ.शिरीष नाईक व खनिज कार्यकारी परिषदेचे  सर्व सदस्य उपस्थित होते.
            दर्जेदार शिक्षणानेच  तळागाळातील लोकांचा विकास करता येईल .या साठी शाळेच्या इमारतींचे बांधकाम,स्वच्छतागृहे, पिण्याचे शुध्द पाणी ,अतिरिक्त वर्गखोल्यांचे बांधकाम आदी सुविधांचे प्रधानमंत्री खनिज क्षेत्र योजनेतून प्राधान्याने काम व्हावे.शाळाच्या बांधकामासंबंधीचे प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडुन मागविण्यात यावेत,अशी सुचनाही त्यांनी केली.बरेचदा शाळामध्ये  स्वच्छतागृहे नसल्याने आरोग्याविषयक तक्रारी उदभवू शकतात.विशेषत:मुलींसाठी स्वच्छतागृहे असावीत. शाळांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवुन ती पूर्ण करावीत. शाळेतील कलावर्गात  भिंतीची कलात्मक व शैक्षणिक माहिती देणाऱ्या बाबींचा समावेश करावा .मुख्यमंत्री महोदयांच्या निर्णयानुसार डिसेंबर 2018 पर्यत राज्यातील सर्व शाळा डिजीटल करावयाचे आहेत .याच अनुषंगाने जिल्हयातील खनिज बाधित क्षेत्रातील शाळांमध्ये देखील स्मार्ट बोर्ड,ऑनलाईन शिक्षण तसेच वाचनालय,सुसज्ज्‍ा  प्रयोगशाळा असले पाहीजे.तसेच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गटशेतीचा प्रकल्प प्रायोगीक तत्वावर सुरू करुन तो यशस्वी  होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
                    जिल्हयातील 1811 गावांचा समावेश खनिज बाधीत क्षेत्रात आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली.या खनिजबाधित क्षेत्रातील गावांच्या विकासासाठीच 1 सप्टेंबर 2016च्या निर्णयानुसार जिल्हास्तरावर जिल्हा खनिज प्रतिष्ठानची स्थापना केली आहे.
              एप्रिल 2017 अखेर जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीमध्ये 1 कोटी 68 हजार रुपयांचा निधी  असुन त्यातील प्रशासकीय कामाकरीता 5 टक्के (5 लक्ष), या निधीतील दोन तृतीयांश निधी प्रत्यक्ष बाधित क्षेत्रासाठी (67 लक्ष) निधीतील पायाभुत सुविधेसाठी 27 लक्ष तर शिक्षण ,आरोग्य,महिला व बालकल्याण,पिण्याचे पाणी पुरवठा  या सामाजिक क्षेत्राकरीता 40 लक्ष अशी राखीव तरतुद आहे. तर एक तृतीयांश निधी अप्रत्यक्ष बाधीत क्षेत्रासाठी (33 लक्ष) असुन त्यातील सामाजिक क्षेत्र (20 लक्ष) तर पायाभुत सुविधेकरीता (13 लक्ष) अशी तरतुद केली आहे.
                  जिल्हा खनिज विकास प्रतिष्ठान कार्यालयासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जागा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी केली.यावेळी वार्षिक जिल्हास्तरीय कार्यकारी परिषदेच्या सर्व सदस्यांनी आराखडयाला मान्यता दिली.
जिल्हा खनिज प्रतिष्ठानचे उदिष्ट-
·        जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत खनिज बाधीत क्षेत्राचा विकास व कल्याणासाठी कार्यक्रम राबविणे
·        खाणकाम करतांना व त्यानंतर झालेल्या कृतीमुळे तेथील जनतेवर झालेले पर्यावरण,आरोग्य ,व सामाजिक व आर्थिक परिस्थीतीवरील आघात ,परिणाम कमी करणे व त्यावर उपाययोजना करणे.




Sunday, May 21, 2017

मुसळखेडा येथे ग्राऊंडवॉटर रिचार्ज शाफ्टचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जलसंधारण व वृक्षारोपणातून दुष्काळावर मात करु
-          पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

अमरावती, दि. 19 : भूजलपातळीत सुधारणा करण्याच्या हेतूने शासनाने मोठ्या प्रमाणावर जलसंधारण व वृक्षारोपणाची कामे हाती घेतली आहेत. शासन, प्रशासन, विविध संस्था- संघटना यांचा समन्वय व लोकसहभाग याद्वारे जिल्ह्यात ही कामे पूर्ण करुन दुष्काळावर मात केली जाईल, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज केले.
          भूजल सर्वेक्षण यंत्रणेतर्फे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मुसळखेडा येथील भूजल रिचार्ज शाफ्टचे उद्घाटन करताना श्री. पोटे- पाटील बोलत होते. आमदार अनिल बोंडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी- कर्मचारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

रिचार्ज शाफ्ट ही योजना भूजल पुनर्भरणासाठी उपयुक्त असल्याने ती मोठ्या प्रमाणात राबविणे आवश्यक आहे, असे सांगून श्री. पोटे-पाटील म्हणाले की, या उपाययोजनेद्वारे पहिल्या पावसाकत भूजल पुनर्भरण सुरु होते व परिसरातील पाणी साठ्यात वाढ होते. वरुडसारख्या डार्क झोनमधील तालुक्याला ही योजना निश्चितच उपयुक्त ठरेल.


 जमिनीतील पाणी पातळी वाढण्यासाठी प्रयत्नपूर्वक पाणी जमिनीच्या पोटात मुरविणे गरजेचे आहे. त्यासाठी  ही योजना उपयुक्त आहे, असे श्री. बोंडे यांनी सांगितले.
वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड यांनी यावेळी रिचार्ज यंत्रणेची माहिती दिली.
000

पालकमंत्र्यांकडून वरुड तूर खरेदी केंद्राची पाहणी

            अमरावती, दि. 19 :  जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आज वरुड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जाऊन तूर खरेदीची माहिती घेतली.
आमदार अनिल बोंडे यांच्यासह विविध विभागांचे  अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.                   
            यावेळी पालकमंत्र्यांनी खरेदी केंद्राला भेट देऊन माहिती घेतली. तुरीची  आवक,  केंद्रावरील उपलब्ध सुविधा याबाबत त्यांनी तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. व  रजिस्टरही तपासले. तूर विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार्य करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

0000000


 सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा

पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पत्रकारांनी केले श्रमदान

       
दुष्काळमुक्ती हेच खरे उद्दिष्ट – पालकमंत्री श्री. पोटे-पाटील



 अमरावती, दि. 19  : पानी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी वरुड तालुक्यातील अमडापूर व मुसळखेडा या गावांमध्ये श्रमदानासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी केलेल्या आवाहनाला पत्रकार बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी स्वत: पालकमंत्री व अनेक पत्रकार बांधवांनी श्रमदान करुन गावक-यांचा उत्साह वाढवला.  
 दुष्काळावर मात करण्यासाठी पानी फाऊंडेशन व शासनाच्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धेत सहभागी विविध गावांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. पालकमंत्री श्री. पोटे- पाटील हे पत्रकार बांधवांसह सकाळीच मुसळखेडा येथे दाखल झाले. आमदार अनिल बोंडे, अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह त्रिदीप वानखडे, विजय ओडे, संजय शेंडे, शशांक चवरे, राजेश सोनोने, संजय बनारसे, सुरेंद्र चापोरकर, प्रशांत कांबळे, अमोल खोडे, अंकुश गुडदे, मीनाक्षी कोल्हे, प्रवीण मनोहर, शशांक नागरे, स्वराज्य माहुरे, मनीष तसरे, अक्षय नागापुरे यांच्यासह अनेक वृत्तपत्र छायाचित्रकार व कॅमेरामन यांनी या कार्यात सहभाग घेतला.
पालकमंत्री व अमरावती येथून दाखल झालेले माध्यम प्रतिनिधी  स्वत: श्रमदानात सहभागी झाल्याने ग्रामस्थांमध्येही उत्साह संचारला. तलाव क्षेत्रातील माती भरावावर टाकण्यासाठी पालकमंत्र्यांसह पत्रकार व अधिका-यांची साखळी तयार करण्यात आली. ‘जल नही तो कल नही’, ‘कावळा करतो काव काव, एक तरी झाड लाव’ अशा घोषणा देत उन्हाची पर्वा न करता सर्वांनी समरसून श्रमदान केले.
मुसळखेडा येथील अनघड दगडी बांधांच्या कामातही दगड वाहून नेण्यासाठी साखळी करुन श्रमदान करण्यात आले. अमरावती जिल्हा पत्रकार संघाचे सर्व सदस्य, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम, उद्योग, पर्यावरण व खनिकर्म विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह गावकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक या कामात सहभागी झाले होते. 




दुष्काळमुक्ती हेच खरे उद्दिष्ट – पालकमंत्री श्री. पोटे-पाटील


स्पर्धेत कुणातरी एकालाच क्रमांक मिळणार असतो. त्यामुळे वॉटर कप स्पर्धेचा हेतू हा केवळ स्पर्धा  एवढाच नसून, दुष्काळमुक्ती हेच खरे उद्दिष्ट असल्याचे मत पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.  
ते म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना आहे. दुष्काळमुक्तीसाठीच्या या योजनेचा लोकसहभाग हाच आधार राहिला आहे. श्रमदानातून होणा-या कामांमागे लोकभावनेची ताकद असते. त्यामुळे ती यशस्वी होतात. हेच लक्षात घेऊन ही पानी फाऊंडेशनच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात व राज्यातही मोठ्या प्रमाणावर कामे होत आहेत. त्यामुळे इतर राज्यांनीही महाराष्ट्राचा आदर्श घेऊन अशा योजना अमलात आणल्या आहेत.
                  
योजना शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकारांचे योगदान
जलयुक्त शिवार योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे सांगून श्री. पोटे- पाटील म्हणाले की, आजही पत्रकार बांधवांनी स्वत: श्रमदानात सहभागी होऊन विधायक कार्याला प्रेरणा दिली आहे. श्रमदानात सहभागी सर्व पत्रकारांचे पालकमंत्र्यांनी अभिनंदन केले.

पालकमंत्र्यांकडून एक लाख रुपयांची मदत
यावेळी अमडापूर येथील जलयुक्त शिवार कामांसाठी पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली. या कामांत यापुढे कुठलीही अडचण आल्यास शासनाकडून पूर्ण सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वरुड तालुक्यातील भूजलपातळीतील घट चिंताजनक होऊन त्याचा डार्कझोनमध्ये समावेश झाला. ही स्थिती सुधारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तालुक्याची या योजनेसाठी निवड केली, असे सांगून श्री. बोंडे म्हणाले की, आता वरुड तालुका नाला खोलीकरणाच्या कामांत राज्यात आघाडीवर असून, या कामांमुळे भूजलपातळीत सुधारणा होईल. अमडापूर येथील सरपंच सारिका सोनारे, पानी फाऊंडेशनचे अतुल काळे, उज्ज्वल कराळे, गोवर्धन दापूरकर आदी यावेळी उपस्थित होते.
00000









Tuesday, May 9, 2017

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक

                अमरावती दि.9 - गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना ही योजना राबविण्यासाठी जलसंपदा,प्रांतअधिकारी,तहसीलदार,कृषी या यंत्रणाची बैठक आज नियोजन भवन येथे
जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुळकर्णी,कार्यकारी अभिंयता जलसंधारण तायडे,प्रभारी जिल्हा कृषी अधिक्षक खरचान,उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना ,रोहयो उपजिल्हाधिकारी रमेश  काळे उप‍स्थित हेाते.
             जलयुक्त शिवार या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी कार्यक्रमासोबतच जिल्हयात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबवावी. प्रांत अधिकाऱ्यांनी  या कार्यक्रमाचे नियोजन करावे .गावे हाती  घ्यावी तसेच ग्रामपंचायतीना सहभागी करावे.या कामासाठी फक्त एक महीना हातात आहे. 31 मे पर्यत तुर खरेदी,जलयुकत शिवार या कामासोबतच गाळमुक्त धरण  व गाळयुक्ता शिवार योजनेचे काम प्राधान्याने करावे अश्या सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.
6 मे च्या शासननिर्णयाचा अभ्यास सर्व अमंलबजावणी करणाऱ्या यंत्रणानी करावा असे ही त्यांनी सांगीतले.
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना
·        धरणात होणाऱ्या गाळाच्या संचयामुळे धरणाच्या  साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट होत आहे.हा गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुर्नस्थापीत होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ देखील होणार आहे.

*गाळ काढण्यासाठी  250 हेक्टरपेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या व पाच वर्षापेक्षा जुन्या तलावांना प्राधान्या देण्यात येईल  .तसेच या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असतील तर ते सहभागी होऊ शकतील.
*तसेच खाजगी व सार्वजनिक भागिदारीने हे गाळ काढण्यात येईल.
*अदयावत तंत्रज्ञानाचा वापर करून कामांचे स्वतंत्रपणे त्रयस्थ यंत्रणेमार्फत मूल्यमापन करण्यात येणार आहे.
गाळ उपसा करण्यास परवानगी मात्र वाळू उत्खननास पुर्णत बंदी असेल.
* याबाबतीतील शासननिर्णय्‍ दि.6 मे रोजी आला आहे.जिल्हास्तरीय समीतीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यीय समीती आहे.
00000



DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...