Wednesday, May 30, 2018

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 134 व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन दिमाखात
 राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे
छात्रसैनिक हे देशातील तरुणांचे आदर्श
-राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पुणे दि. 30 :  राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे सेवा परमो धर्म’ हे ब्रीद वाक्य आहे. छात्रसैनिकांनी या मंत्राचा कधीही विसर पडू देवू नये. मानवतेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहण्याचे वाहन करून राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्रसैनिक हेच देशातील तरुणांचे आदर्श असल्याचे गौरोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी  आज काढले.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) मैदानावर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 134 व्या तुकडीतील छात्रसैनिकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रमुख उपस्थितीत दिक्षांत संचलन केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी छात्रसैनिकांच्या संचलनाची मानवंदना स्वीकारली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणालेतुमच्या कठोर मेहनतीचे फळ आज तुम्हाला मिळत आहे. या यशात तुमच्या आई वडिलांचा सुद्धा महत्त्वाचा वाटा आहे. खडतर प्रशिक्षण हेच आपल्याला कठीणातील कठीण आव्हानासाठी सज्ज करत असते. शिस्तधाडसचिकाटी यांना पर्याय नाही. सशस्त्र सेना ही सर्वोत्कृष्ठता आणि समर्पणाचे प्रतिक आहे. येत्या आव्हानाच्या काळात सकारात्मक दृष्टिकोण हाच तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. आता तुम्ही प्रत्यक्ष फील्डवर काम सुरू करालअशावेळी एनडीएमध्ये मिळालेले प्रशिक्षण विसरू देऊ नका. देशाच्या लष्कराची मान उंचावण्यासाठी सदैव तयार रहा. सशस्त्र दलांचा सर्वोच्च कमांडर म्हणूनहा क्षण माझ्यासाठी खूप समाधानाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती पुढे म्हणाले60 पेक्षा अधिक वर्षांचा वारसा लाभलेल्या आणि देशासाठी उत्तमोत्तम अधिकारी दिलेल्या एनडीए सारख्या संस्थेमधून पदवी प्राप्त करणे ही स्नातकांसाठी अभिमान बाळगावा अशीच गोष्ट आहे.  कोणत्याही दलातील गणवेशधारी सैनिक हा संपूर्ण देशासाठी अभिमानाची गोष्ट असतोसैनिकांना प्रत्येक ठिकाणी सन्मानच मिळत असतो. देशाच्या सीमा सुरक्षित करण्याबरोबरच नैसर्गिक आपत्तीच्या वेळीही सैनिकांचे काम अव्दितीय असते. सैनिक केवळ शत्रूंशीच सामना करत नाहीततर सियाचीनलद्दाख सारख्या ठिकाणी निसर्गाशीही सैनिकांना सामना करावा लागतो. सर्व आपत्तींशी सामना करत देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचा सर्वांनाच अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अकॅडमी कॅडेट अक्षत राज याने सर्व शाखांमध्ये प्रथम येत राष्ट्रपतींच्या सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर छात्रसैनिक सोहेल इस्लाम याने सर्व शाखांमध्ये दुसरा येत रौप्य पदकाचा सन्मान मिळविला. अली अहमद चौधरी याने तिसरे स्थान पटकावत कांस्य पदक मिळविले. के’ स्क्वॉड्रनला चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ पुरस्कार मिळाला. विजेत्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी चेतक हेलिकॉप्टरने ध्वज सलामी देण्यात आली. सुखोई विमानांच्या तुकडीने आकाशात नयनरम्य प्रात्यक्षिके केली. यावेळी एनडीएचे कमांडन्ट एअर मार्शल आय. पी. बिपीन,डेप्युटी कमांडन्ट एस. के. ग्रेवालप्रबोधिनीचे प्राचार्य ओमप्रकाश शुक्लाविभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकरजिल्हाधिकारी नवल किशोर रामयांच्यासह सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी,निवृत्त अधिकारीराज्य शासनातील वरिष्ठ अधिकारीछात्रसैनिकांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0  0 0




पढो परदेश’ अंतर्गत महाराष्ट्रातील २३४ अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना लाभ
नवी दिल्लीदि. ३० : अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्जावर सूट देणा-या  केंद्र शासनाच्या पढो परदेश’ योजनेंतर्गत गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील २३४ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे.
 अल्पसंख्याक समाजातील गुणवान विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर शिक्षणएमफील व पीएचडी हे संशोधनात्मक अभ्यास पूर्ण करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने पढो परदेश’ योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वर्ष २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत देशभरातील ३६ राज्य व केंद्र शासित प्रदेशातील एकूण ३ हजार ६८७  विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. यात महाराष्ट्रातील २३४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राज्यातील जैन समाजाच्या ९९ विद्यार्थ्यांनी घेतला लाभ
परदेशात उच्च शिक्षण घेणा-या महाराष्ट्रातील मुस्लिमख्रिश्चनबौध्द ,जैनपारसी आणि शीख या अल्पसंख्याक समाजातील गुणवान मुला-मुलींना पढो परदेश’ योजनेंतर्गत शैक्षणिक कर्जाच्या व्याजातून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. राज्यात जैन समाजातील सर्वात जास्त ९९  विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. मुस्लिम समाजातील ५३ख्रिश्चन समाजातील ४४,शीख समाजातील २३बौध्द समाजातील ९ तर पारसी समाजातील ६ विद्यार्थ्यांनी  या योजनेचा लाभ घेतला आहे.
पढो परदेश’ योजनेंतर्गत देशातील अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी पदव्युत्तर शिक्षण, ‘एमफील व पीएचडी’ हे संशोधनात्मक अभ्यास पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने भरण्यात येते. मंत्रालयाच्यावतीने परदेशात शिक्षणासाठी ठरवून दिलेल्या एकूण ४१ विषयांमध्ये उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो. वर्ष २००६ मध्ये पढो परदेश’ योजनेला सुरुवात झाली असून बँक आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयामध्ये या योजनेसंदर्भात झालेल्या सामंजस्य करारानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येते.         



रुपी बँक संदर्भात
गुंतवणुकदारांचे हित सुरक्षित राहावे
- मुख्यमंत्री
मुंबई, दि.30  :रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाने गुंतवणुकदारांचे हित सुरक्षित राहावे या दृष्टीने रुपी बॅकेला मार्गदर्शन करावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
रूपी बॅकेच्या संदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख,आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन,आरबीआयचेकार्यकारी संचालक सुदर्शन सेन,मुख्य महाव्यवस्थापक नीरज निगम, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधू यासह रूपी बॅकेच्या प्रशासकीय मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रूपी बॅकेतील गुंतवणुकीदारांच्या ठेवी या सर्वसामान्यांच्या आहेत.त्यामुळे गुंतवणुकदारांचे हित सुरक्षित राहण्याला प्राथम्य देण्यात यावे, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

पेरणीयोग्य पावसाशिवाय पेरण्या करू नयेत!

मुंबईदि.२९: मान्सूनचे केरळात आगमन झाले असले तरी अद्याप तो महाराष्ट्रात आलेला नाही. त्याचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर सुद्धा पेरणीची घाई करू नयेअसे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.
१ जूननंतर विदर्भमराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी कोसळतीलअसा अंदाज आहे. परंतू कमाल तापमान अधिकच असेल. या कालावधीत मुंबई आणि कोकणात ढगाळी वातावरण आणि किरकोळ पाऊस पडेल. या कालावधीत विदर्भमराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळ आणि वीजांपासून नागरिकांनी आपले संरक्षण करावे आणि पुरेशी खबरदारी घ्यावीअसे आवाहन करण्यात येत आहे.
 या कालावधीत झाडांखालीमोकळ्या जागेतटिनाच्या शेडखालीवीजप्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित्रांनजीक आसरा घेऊ नयेतर सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावाअसेही आवाहन करण्यात येत आहे.
0000
पालकमंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन अधिकाऱ्यांशी चर्चा
तूर खरेदी केंद्रे सुरु करण्याबाबत तत्काळ कार्यवाही
-         पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
          अमरावती, दि.28 शेतक-यांची तूर खरेदी पूर्ण होण्यासाठी खरेदी केंद्रे सुरु करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली असून त्याबाबत तत्काळ कार्यवाही होईल, असे पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे सांगितले.
 तूर खरेदी केंद्रे सुरु करावीत व त्यापूर्वी खरेदी केलेल्या तुरीचे पैसे अदा करण्याच्या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर श्री.कडू यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या चर्चेनंतर श्री. कडू यांनी आंदोलन मागे घेतले. आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नितीन व्यवहारे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे आदी उपस्थित होते.
खरेदी केंद्रे सुरु करण्याबाबत पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांनी दूरध्वनीवरून मुख्यमंत्री श्री. फडणवीस, अप्पर मुख्य सचिव (पणन) जयकुमार यांच्यासह पणन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. तूर खरेदी प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून पणनमंत्र्यांच्या मान्यतेनंतर तूर खरेदी केंद्रे त्वरित सुरु करण्यात येतील, असे अप्पर मुख्य सचिव (पणन) जयकुमार यांनी दूरध्वनीवरील चर्चेत सांगितले.
 काही शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे बँक खात्याचे क्रमांक किंवा आयएफएससी कोड चुकीचे असल्याने परत गेले आहेत. त्यांची यादी जिल्हा विपणन अधिकारी यांच्याकडून प्राप्त करुन घेऊन कृषी विभागामार्फत गावोगावी प्रसिद्ध करुन अद्ययावत करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.
एकरकमी परतफेड योजनेत बँकांनी हिस्सा भरण्याच्या सूचना
कर्जमाफी प्रक्रियेमध्ये एकरकमी परतफेड योजना तसेच प्रोत्साहन योजना प्रकरणांमध्ये जिथे शेतकऱ्यांनी आपला हिस्सा भरलेला असेल, तेथे बँकेनेही आपला हिस्सा भरण्याच्या सुचना प्रशासनाने तत्काळ द्याव्यात. या सर्व लाभार्थ्यांना चालू वर्षात कर्जवाटपासाठी पात्र करुन तत्काळ विनाविलंब कर्ज वाटप होईल, असेही श्री. पोटे-पाटील यांनी सांगितले.
 ज्या प्रकरणांमध्ये पीक विमा रक्कम, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, तुर व हरभरा पीकांचे अनुदान तसेच इतर सर्व प्रकारच्या नुकसान भरपाईच्या अनुदानामधून बँकेकडून कपात केल्यास संबंधित बँकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच यापूर्वी ज्या शाखा प्रबंधकांनी यासाठी नोटीसेस काढल्या असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा अग्रणी बँकेला देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी सांगितले. उक्त चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्याचे विनंतीपत्र आमदार श्री. कडू यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले.
00000

Tuesday, May 22, 2018

घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती नाहीतरीही आवश्यक उपाययोजनांची पूर्तता
निपा विषाणू आजाराचा एकही रुग्ण महाराष्ट्रात नाही
आजारासंदर्भातील लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे
सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत
मुंबईदि. 22 : केरळमध्ये उद्भवलेल्या निपा विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही. याबाबत घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती राज्यात नाहीपण तरीही या आजारासंदर्भातील काही लक्षणे आढळल्यास रुग्णांनी डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावाअसे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे. राज्यात या आजाराचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना सूचित करण्यात आले आहे. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयासह राज्यातील प्रमुख शासकीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष (isolation ward) सुरु करण्याबाबत सूचित करण्यात आले आहेअशी माहिती डॉ. सावंत यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मंत्रालयात आज मंत्री डॉ. सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक झालीत्यात या आजारासंदर्भात घ्यावयाच्या खबरदारीच्या उपाययोजना निश्चित करण्यात आल्या,त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ. सावंत बोलत होते. बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यासराष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. संजिवकुमारआरोग्य संचालक डॉ. संजीव कांबळेसंसर्गजन्य रोग प्रतिबंधक समितीचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तवअतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतिश पवार आदि उपस्थित होते.
डॉ. सावंत म्हणालेरुग्णालयेडॉक्टर तसेच नर्सेस यांनी या आजारासंदर्भात घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजना यासंदर्भातील मार्गदर्शिका राज्यातील सर्व रुग्णालयांना पाठविण्यात येत आहे. निपा विषाणू आजारात विशेषत: तापअंगदुखीडोकेकुखीझोपाळलेपणामानसिक गोंधळ उडणेबेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळतात. विशेषत: केरळ भागातून प्रवास करुन आलेल्या व्यक्तिंमध्ये अशी लक्षणे आढळल्यास त्याबाबत तातडीने दखल घेण्यात यावी. अशा रुग्णांनी तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे. खासगी रुग्णालयातही अशा लक्षणांचे रुग्ण आढळल्यास त्याबाबत तातडीने सरकारी रुग्णालयास सूचित करण्यात यावे व सरकारी रुग्णालयात यासाठी सुरु असलेल्या विलगीकरण कक्षात (isolation ward) या रुग्णांना दाखल करण्यात यावे,असे आवाहन त्यांनी केले.
राज्यात या रोगासंदर्भात एकही रुग्ण आढळलेला नाही. पण तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयेजिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारीमहापालिका आयुक्तजिल्हा शल्यचिकित्सक यांना सूचित करण्यात आले आहेअशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. लोकांनीही खबरदारीचा उपाय म्हणून या विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या केरळमधील कोझीकोडे व इतर परिसरातील प्रवास टाळावाअसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
निपा विषाणूचा प्रसार
या विषाणुचा प्रसार मुख्यत्वे फळांवर जगणाऱ्या वटवाघळांमार्फत होतो. वटवाघळांनी अर्धवट खाल्लेली फळे हाताळल्याने अथवा खाल्ल्याने हा आजार होतो. डुक्कर आणि इतर पाळीव प्राणी यांना देखील याची बाधा होऊ शकते. निपा विषाणूची लागण माणसापासून माणसास होऊ शकते. रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय कर्मचारीरुग्णसेवा करणारे नातेवाईक यांना लागण होऊ शकते. त्यामुळे अशा रुग्णास विशेष विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक असते. 
प्रतिबंधात्मक खबरदारी
डॉक्टर आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्ण उपचार आणि शुश्रूषा करताना जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वत्रिक खबरदारी (universal precautions)नुसार आवश्यक काळजी घ्यावी. शेतातजंगलात अथवा इतरत्र पडलेली फळे खाणे टाळावे. निपा विषाणू आजाराच्या रुग्णास विशेष विलगीकरण कक्षात ठेवण्यात यावे.
00000


Monday, May 21, 2018


विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्वैवार्षिक निवडणूक
488 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
अमरावती, दि. 21 : विधानपरिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूकीत 489 मतदारांपैकी 488 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची एकूण टक्केवारी 99.80 इतकी आहे.
           तहसील कार्यालय स्तरावर एकूण 14 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली होती. सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळेत मतदान शांततेत पार पडले.
मतदार यादीत महापालिकेचे 92 सदस्य, जिल्हा परिषदेचे 59 सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती 14, नगर परिषद 249 सदस्य,  नगरपंचायत 75 असे एकूण 489 सदस्यांचा समावेश आहे. त्यापैकी 249 पुरुष मतदारांनी तर 239 स्त्री मतदारांनी अशा एकूण 488 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान केंद्रनिहाय आकडेवारी
          धारणी 25 पैकी 25 (100 टक्के), चिखलदरा 25 पैकी 25 (100 टक्के), अंजनगाव सुर्जी 34 पैकी 34 (100 टक्के), अचलपूर 50 पैकी 50 (100 टक्के), दर्यापूर 28 पैकी 28 (100 टक्के), चांदूर बाजार 27 पैकी 27 (100 टक्के), भातकुली 22 पैकी 21 (95.45 टक्के*), मोर्शी 30 पैकी 30 (100 टक्के), अमरावती 98 पैकी 98 (100 टक्के), वरुड 54 पैकी 54 (100 टक्के), नांदगाव खंडेश्वर 24 पैकी 24 (100 टक्के), तिवसा 23 पैकी 23 (100 टक्के), चांदूर रेल्वे 24 पैकी 24 (100 टक्के), धामणगाव रेल्वे 25 पैकी 25 (100 टक्के).
           मतमोजणी दिनांक 24 मे, 2018 रोजी सकाळी 8 वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होईल.
00000


DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...