Saturday, February 25, 2017

चिखलदऱ्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करू
                                                    - प्रविण पोटे
·        चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन
          अमरावती, दि 25 (जिमाका) : निसर्गाचं वरदान लाभलेले, विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचीत असलेले चिखलदरा, पर्यटनाच्या बाबतीत  मात्र माघारले आहे. या थंड हवेच्या ठिकाणाची देशभर उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी चिखलदरा पर्यटन महोत्सवा सोबतच येथे चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देऊ अशी हमी पालकमंत्री प्रविण पोटे यांनी दिली.
          चिखलदरा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन आज चिखलदरा येथे खासदार आनंदराव अडसूळ यांचे हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून श्री.पोटे बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार सर्वश्री प्रभुदास भिलावेकर, डॉ.अनिल बोंडे, रमेश बुंदिले, नगराध्यक्ष राजेंद्रसिंह सोमवंशी, विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, धारणी उपविभागीय अधिकारी शण्‍मुखराजन, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक प्रशांत सवाई, नगरपरिषद मुख्याधिकारी राहुल कर्डीले उपस्थित होते. 
         चिखलदरा पर्यटन महोत्सव पुन्हा सुरु करण्याची प्रेरणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले. मेळघाट मधील व्याघ्र प्रकल्पातील 15 गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. चिखलदरा शहराची पाण्याची समस्या दूर करण्यासाठी 432 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना राज्य शासनाने मंजूर केली आहे. 132 कोटी रुपये खर्च करून सबस्टेशन सुरु केल्यामुळे आतापर्यंत अंधारात जीवन जगणाऱ्या मेळघाटमधील 120 गावांना वीज पुरवठा सुरू झाला आहे. मेळघाटमध्ये उत्तम रस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी 5 हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात चिखलदरा पर्यटन स्थळ म्हणून देशभर नावारूपास येईल यात शंका नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. 
          चिखालदऱ्यामध्ये रस्ते, पाणी, वीज आणि राहण्याची उत्तम व्यवस्था निर्माण झाली तर पर्यटकांची संख्या वाढून येथील युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभागाने योग्य काम करणे आवश्यक असल्याचे मत खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केले. येथे उत्पादित होणाऱ्या मध, स्ट्रॉबेरी, बांबूच्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
          येथे लावलेल्या विविध विभागाच्या तसेच महिला बचत गटाच्या स्टॉलचे फित कापून मान्यवरांनी उद्घाटन केले. चिखलदरा पर्यटन वार्षिकांकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते पार पडले. तसेच मुख्याधिकारी राहुल कर्डीले आणि  सूर्यकांत पिदूरकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
          या कार्यक्रमाचे संचालन गजानन देशमुख यांनी केले तर आभार राहूल कर्डीले यांनी मानले. यावेळी नगरसेवक, चिखलदरा पर्यटन महोत्सव समितीचे सदस्य, अधिकारी, आदिवासी बांधव उपस्थित होते.
00000

सावळे/झिमटे/खंडारकर/दि.25-02-2017/18-34 वाजता



















Sunday, February 19, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात
 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

      अमरावती, दि.19 (जिमाका): छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात आज साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
          याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी कर्मचारी यांनी ही पुष्प वाहुन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले.
00000
वाघ/सागर/दि.19-02-2017/14-40 वाजता



Thursday, February 16, 2017

सालबर्डी यात्रेच्या पूर्वतयारीचा
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

       अमरावती, दि. 16 (जिमाका) : महाराष्ट्र मध्यप्रदेश सिमेवरील सालबर्डी येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त सालबर्डी यात्रा असते. यावर्षी 24 फेब्रुवारी ते 2 मार्च 2017 दरम्यान ही यात्रा होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा आज जिल्हाधिकारी किरण गित्ते, बैतुल जिल्हाधिकारी शशांक मिश्र, बैतुल पोलीस अधिक्षक राकेश जैन, अतिरिक्त पोलीस अधिक्षक एम.एम. मकानदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन.आभाळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
          यात्रेकरुंना यात्रेसाठी  जाण्यासाठी पोचरस्त्याची देखभाल दुरुस्ती करण्यात यावी, पोलीस स्टेशन, दवाखाने, विद्युत व्यवस्था, परिवहन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आ‍दी सेवा अमरावती जिल्हा परिषदच्या यात्रा व्यवस्थानामार्फत करण्यात याव्या, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी  दिले.
 दापोरी, डोंगरयावली ते सालबर्डी या 6 किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात यावे, तर डोंगरयावली ते हिवरखेड या 3 कि.मी. रस्त्याचे काम जिल्हा परिषदेने करावे. यात्रेच्या जागेची गटविकास अधिकारी व उपविभागीय अधिकारी मुलताई यांनी संयुक्त पाहणी करावी. या यात्रेदरम्यान जिल्हापरिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशूप्रदर्शनीचे आयोजन करण्यात येणार आहे.
सालबर्डीला क तिर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त्‍ आहे तेव्हा येथील सोयीसुविधा वाढवून  ब दर्जासाठी य हा तिर्थक्षेत्र विकास आढावा सादर करावा असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सालबर्डी येथे यात्रेकरुंसाठी  सभागृह व विश्रामगृह बांधण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी दोन्ही जिल्हयातील अधिकाऱ्यांनी यात्रास्थळाची पाहणी केली.
000000

वाघ/बारस्कर/सागर/16-02-2017/19-20 वाजता







मागेल त्याला शेततळे योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी
प्रशिक्षणासाठी  300 ट्रॅक्टर चालकांची नोंदणी

       अमरावती, दि. 16 (जिमाका) : शेतकरी व शेतीचा विकास हा शासनाचा अग्रक्रम आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार योजना यशस्वी ठरली आहे.मात्र खारपाणपट्यात जमीनाचा पोत नरम असल्याने या भागातील शेतकऱ्यांनी मागेल त्यांना शेततळे योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.
          जलयुक्त शिवार योजना व प्रमोद महाजन कौशल्य व उदयोजकता विकास अंतर्गत  प्रभा मंगलम कार्यालय, अंजनगाव येथे आयोजित ट्रॅक्टर चालक प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, उपसंचालक कौशल्य विकास महेश देशपांडे,  सहायक संचालक कौशल्यविकास अशोक पाईकराव ,तहसिलदार पुरुषोत्तम भुसारी उपस्थित होते.
           जिल्हयात सदय परिस्थीतीत शेततळे तयार करण्यासाठी राजस्थानी लोक येतात.स्थानिकांना त्याप्रमाणे कौशल्य प्राप्त नसते.स्थानिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी ट्रॅक्टर डॉयव्हरना प्रशिक्षण देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.                         
          अंजनगाव दर्यापूर व भातकुली या तालुक्यामध्ये खारपाणपट्टा आहे. 22 गावातील खारपाणपट्टयातील गावांना शेततळ्याची गरज आहे. जिल्ह्यात 4500 शेततळयाचे उदिष्ट्ये असून त्यापैकी 2500 हे अंजनगाव दर्यापूर तालुक्यामध्ये करायचे आहे. वैज्ञानिक पद्धतीने शेततळे केले तर जास्तीत जास्त  अर्धा एकर पर्यंत शेत जाऊ शकते. मात्र त्यातून उर्वरित  शेताला संरक्ष‍ित सिंचन देऊन पिकाची उत्पादकता वाढवता येते. रामागड  व नरदोडा या गावांमध्ये शेततळ्यांच्या माध्यमातून हरबऱ्याच्या पिकात लक्षणिय वाढ झाली आहे. जिल्ह्यात 506 गावामध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात आली असून येत्या एप्रिल मध्ये 250 गाव आणखी जलयुक्त शिवार मध्ये घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात 2500 विहिरी धडक सिंचन मोहिमेत घेण्यात आल्या आहेत. मार्च 2016 अखेरपर्यंत विज जोडणीसाठी जवळपास 1700 शेतकऱ्यांना विज जोडणी देण्यात आली आहे. अशी माहिती या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
 या कार्यक्रमात जिल्ह्यातील पहिला डिजीटल स्वाक्षरी असलेला सात बारा दोन शेतकऱ्यांना देण्यात आला. तर  शेततळ्याची निर्मिती करुन वाढीव उत्पन्न घेणाऱ्या विलास टाले नरदोडा व विजय लांजूळकर या दोन शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आशुतोष गोळे या शेतकऱ्याला ट्रॅक्टरची चावी जिल्हाधिकारी महोदयांच्या हस्ते देण्यात आली.
शेततळे तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याने त्यासाठी ट्रॅक्टर सह कुशल मनुष्यबळ तयार करणे हे सुध्दा आवश्यक आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातुन प्रशिक्षीत टॅक्ट्रर डॉयव्हर तयार झाल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. या कौशल्य विकास कार्यक्रमात 300 ट्रॅक्टर चालकांची नोंदणी झाली.
                    या कार्यशाळेत कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता विभागाचे अधिकारी महेश अग्रवाल संचालक, करिअर कॅम्प्युटर ॲन्ड टेक्नीकल इन्स्टीटयुट दर्यापुर व तसेच कार्यशाळेत तालुक्यातील महसुल विभागाचे लिपीक, तलाठी मंडळ अधिकारी उपस्थित होते.
000000

वाघ/बारस्कर/सागर/16-02-2017/19-05 वाजता







Saturday, February 11, 2017

धारणी तालुक्यातील 163 गावे प्रकाशमय

132 केव्ही नेपानगर-धारणी आंतरराज्यीय एकल परिपथ वाहिनी सुरू

अमरावती, दि.11 :  धारणी  येथे 132 केव्ही  वीजेचे उपकेंद्र व या उपकेंद्राला विज पुरवठा करण्याकरीता लागणारी 132 केव्ही नेपानगर-धारणी आंतरराज्यीय एकल परिपथ वाहिनी 60 किमी विद्युत वाहीनी कालपासुन सुरू झाली. मेळघाटच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या अशा या प्रकल्पामुळे धारणी तालुक्यातील एकुण 163 गावे व एकुण 11063 घरगुती वीज ग्राहकांना व 3181 कृषी पंपाना वीज उपलब्ध होणार आहे. यामुळे मेळघाट परिसरातील विजेचा काळोख दुर होणार आहे. 132 केव्ही धारणी उपकेंद्र कार्यान्वीत झाल्याने हा प्रकल्प धारणी परिसरातील विकासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
धारणी उपकेंद्र यशस्वी पुर्ण करण्याकरीता नेहा कन्स्ट्रकशंन नागपूर व प्रतिभा इलेक्टीकल्स पुणे या एजन्सीनी काम केले.महाराष्ट्र पारेषण कंपनीचे मुख्य अंभियता सुरेश पाटील, अतीउच्च दाब प्रकल्प अधिक्षक अभियंता वंदनकुमार मेंढे, अधिक्षक अभियंता चाचणी मंडळ रुपेश फरकाडे, अधिक्षक अभियंता स्थापत्य अविनाश कसबेकर, कार्यकारी अभियंता प्रमोद पखाले, कार्यकारी अभियंता प्रकाश किनगावकर,कार्यकारी अभियंता विकास दलाल,अतिरिक्त कार्यकारी  अभियंता विशाल इंगळे यांनी परीश्रम घेतले.
00000

वाघ/सागर/11-02-2017/16-22 वाजता




DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...