उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलनात मूल्यसाखळीबाबत चर्चा
उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलनात मूल्यसाखळीबाबत
चर्चा
अमरावती, दि. १६ : मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन
(स्मार्ट) प्रकल्पांतर्गत विभागीय अंमलबजावणी कक्षातर्फे विभागीय उत्पादन तंत्रज्ञान
व बाजार संमेलन (टेक मार्केट मीट) नुकतेच येथे झाले. त्यात मूल्यसाखळीबाबत चर्चा करण्यात
आली.
मूल्यसाखळी, तिच्या विकासाच्या शक्यता
व आवश्यकता याबाबत कार्यशाळेत सादरीकरण करण्यात आले. सोयाबीन पिकाच्या मूल्यसाखळीबाबत
गटचर्चा होऊन खरेदीदार, निर्यातदारांच्या अडचणी व अपेक्षांवर विचारमंथन करण्यात आले.
विभागीय कृषी सहसंचालक अध्यक्षस्थानी किसन मुळे अध्यक्षस्थानी होते.
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान,
दुर्गापूरच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ पी. एस. जायले, नोडल अधिकारी राहुल सातपुते आदी उपस्थित होते.
प्रथम सत्रात स्मार्ट प्रकल्प व मूल्य
साखळीच्या अनुषंगाने सादरीकरण राहूल ठाकरे यांनी केले. प्रशांत गिरी यांनी निंजा मार्केटिंग
ॲपबाबत माहिती दिली. डॉ. किशोर दुबे यांनी पतंजली समूहाच्या फळ प्रक्रियेसंदर्भात माहिती
दिली. नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनचे हेमंत चिमूरकर यांनी उत्पादन प्रक्रियेसंदर्भात सविस्तर
सांगितले.
दुपारच्या सत्रात ई-नाम या कंपनीचे
स्टेट हेड योगेश कातकडे यांनी कृषी माल व बाजारभावाबाबत
माहिती दिली. उमेश दहिकर यांनी आवेष्टन रचनेबाबत, तर जयंत नालगे यांनी बेसिक फायनान्ससंदर्भात
माहिती दिली.
समारोपप्रसंगी श्री. मुळे, श्री. खर्चान, श्री. जायले यांची भाषणे झाली.
हिवरा येथील नानाजी देशमुख फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे संचालकांनी मनोगत व्यक्त
केले. विभागीय अंमलबजावणी कक्षाचे समाज विकास तज्ज्ञ आर.आर. पठाण यांनी सूत्रसंचालन केले. सनियंत्रण
मूल्यमापन तज्ज्ञ मिलिंद वानखडे यांनी आभार
मानले.
कार्यशाळेला नोडल अधिकारी, पुरवठा व मूल्य साखळीतज्ज्ञ उमेद, माविम
यांचे अधिकारी, कर्मचारी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, खरेदीदार आदी सर्वांचा मोठा प्रतिसाद होता.
00000
Comments
Post a Comment