Saturday, August 31, 2019

फळपीकासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले वाणच लावावे - कृषी विभागाचे आवाहन




अमरावती, दि. 31 : फळपीकाची लागवड करताना कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या वाणाचीच लागवड व्हावी. अन्य वाण लावल्यास फळधारणा न होण्याचा धोका होऊ शकतो, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
चांगल्या उत्पन्नाचा स्त्रेात म्हणू राज्यात शेतकरी बांधव फळबाग लागवडीकडे मोठया प्रमाणावरवळत आहेत. तथापि, सुरुवातीच्या 3-5 वर्षाच्या फळधारणापूर्व कालावधीत मोठया प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करावी लागत असुन जोपर्यंत फळधारणा होत नाही तोपर्यंत वाणाच्या गुणवत्तेबाबत खात्री नसते.
        राज्यात अनधिकृत रोपवाटिकांमधुन कृषि विद्यापीठांनी शिफारस  केलेल्या सिताफळ वाणांची कलमे/रोपे उपलब्ध करुन दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याबाबत अवास्तव स्वरुपाचीप्रचार प्रसिद्धी करुन खरेदीची भुरळ घातली जात आहे.   कृषि विदयापीठांनी शिफारस केली नसल्यास अशावाणांच्या गुणवत्तेबाबत साशंकता असल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागूशकते.
        या पार्श्वभुमीवर, सीताफळ तसेच इतर सर्व फळपिकाकरिता कृषि विदयापीठांनी शिफारस केलेल्यावाणांचाच वापर करावा. द्य:स्थितीत बाजारात उपलब्ध असलेल्या ज्या फळपिक वाणाची कृषिविदयापीठांनी शिफारस केलेली नाही अशा वाणांचा शेतकरी बांधवानी वापर करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
                                000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...