महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन
सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत राबविले जागरूकता अभियान
अमरावती, दि. 02 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 150 व्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी संजय पवार यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, स्नेहल कनिचे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांचेसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण आदरांजली वाहिली.
स्वच्छता अभियान राबवून दिला सिंगल प्लास्टिक यूज ला गुडबाय करण्याचा संदेश
तत्पूर्वी, महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवून सिंगल प्लास्टिक यूज ला गुडबाय करण्याचा संदेश देण्यात आला. या अभियानात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी हिरेरीने आपला सहभाग नोंदविला.
00000
Comments
Post a Comment