क्षयरुग्णांच्या मदतीसाठी बना ‘निक्षय मित्र’
क्षयरुग्णांच्या
मदतीसाठी बना ‘निक्षय मित्र’
अमरावती,
दि. 25 : केंद्र शासनाने प्रधानमंत्री क्षयरोग मुक्त भारत अभियान हा उपक्रम देशभर
सुरु केला आहे. सन 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट असून
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत या उपक्रमाबाबत जनजागृती होण्यासाठी
क्षयरुग्णांना वेगवेगळ्या पध्दतीने मदत देऊन त्यांना औषधोपचार मिळून देण्यात येत
आहे. क्षयरुग्णांना मदत म्हणून ‘निक्षय मित्र नोंदणी’ करण्याचे आवाहन जिल्हा
क्षयरोग अधिकारी डॉ. रमेश बनसोड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री
क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत देशातून क्षयरोग दुरीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले
असून ते पूर्ण करण्यासाठी नागरिक व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा आहे. समाजातील
विविध घटक जसे दानशूर व्यक्ती, राजकीय व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, सहकारी संस्था,
इतर कार्यालय व संस्था, औद्योगिक संस्था, राजकीय संस्था अशा नोंदणी केलेल्या
निक्षय मित्रांमार्फत आवश्यकतेनुसार क्षयरुग्णांच्या पोषक आहारात सहाय्य दिले
जाते. यासाठी जिल्हा क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत उपचार मिळणाऱ्या
क्षयरुग्णांना ‘निक्षय मित्र’ म्हणून सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य
विभागामार्फत करण्यात आले आहे.
‘निक्षय मित्र’
नोंदणी करण्यासाठी http://reports.nikshay.in/
अधिक
माहितीसाठी हेल्पलाईन नंबर 1800-11-6666 तसेच डॉ. रमेश बनसोड यांचा भ्रमणध्वनी
क्रमांक 9881102303 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्षयरोग
अधिकारी यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment