Friday, December 29, 2017

‘बेटी पढाओ’च्या नावाखाली फसवणूकीच्या घटना
नागरिकांनी तक्रार नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे आवाहन

अमरावती, दि. 29 : अस्तित्वात नसलेल्या ‘बेढी पढाओ’ योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी नागरिकांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. असा प्रकार घडत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तहसीलदार, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले आहे.
वरुड परिसरात बेटी पढाओ  योजना अस्तित्वात असल्याचे दाखवून त्याचा फॉर्म भरुन शुल्क वसूल करण्याच्या घटना घडल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. केंद्र व राज्य शासनाची अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. चुकीची माहिती देऊन काही लोकांकडून नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणारी व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तहसीलदार, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. नागरिकांनी याप्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी केले आहे.
00000

Thursday, December 28, 2017

दाजीसाहेब पटवर्धनांचे कार्य समाजासाठी सतत प्रेरणादायी
-  पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
अमरावती, दि. 28 : शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांनी कुष्ठरुग्णांच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. तपोवन संस्थेच्या माध्यमातून त्यांनी केलेली रुग्णसेवा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे  प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे केले.
डॉ. शिवाजीराव उपाख्य दाजीसाहेब पटवर्धन यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या डाक तिकीट अनावरणाचा समारंभ तपोवनात झाला. त्यावेळी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अतुल आळशी अध्यक्षस्थानी होते. खासदार आनंदराव अडसूळ, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रवी राणा, भारतीय टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरिष अगरवाल,  नागपूर विभागाच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती मरियम्मा तोमस, संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. सुभाष गवई, झुबीन दोटीवाला, डॉ. नितीन धांडे व विवेक मराठे आदी मान्यवर उपस्थित होते.
            श्री. पोटे- पाटील म्हणाले की, दाजीसाहेबांचे कणखर व नि:स्पृह व्यक्तिमत्व पुरस्कारांच्या पलीकडे जाणारे होते. त्यांची कार्यावरील निष्ठा अविचल होती. त्यांच्या या त्यागातून विदर्भ महारोगी सेवा मंडळ- तपोवनसारखी भव्य सेवाभावी संस्था उभी राहिली. त्यांचे कार्य पुढील पिढ्यांना स्फूर्ती देत राहील.
श्री. अडसूळ म्हणाले की, चांगल्या कार्याची समाज सतत नोंद घेत असतो. कालांतराने सरकारलाही ही नोंद घ्यावी लागते. आज दाजीसाहेबांच्या जीवनकार्याचे डाक तिकीट अनावरण ही आनंददायी घटना आहे. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या आग्रहास्तव दाजीसाहेबांनी पद्मश्री स्वीकारली खरे; पण तपोवनातील एक मुलगी दत्तक घेण्याची अटही त्यांनी तत्कालीन राष्ट्रपतींना घातली. त्यांची ध्येयनिष्ठा त्यातून दिसून येते.
डॉ. बोंडे, श्री. राणा, श्री. अगरवाल यांनीही मनोगत व्यक्त केले.  यावेळी अनेक मान्यवरांनी  डॉ. पटवर्धनांच्या जिवनावर प्रकाश टाकला. डॉ. गवई यांनी प्रास्ताविकातून दाजीसाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. अब्दुल रशीद यांनी सूत्रसंचालन केले. वसंत बुटके यांनी आभार मानले.
                                                                        00000



Wednesday, December 27, 2017

खेळातून व्यक्तिमत्व घडवा
                                        -शिक्षण मंत्री विनोद तावडे
          अमरावती, दि. 27 : खेळामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक, बौद्धिक विकास अधिक प्रभावीपणे होतो. हे लक्षात घेऊन शासनाने खेळांना प्रोत्साहनपर अनेक उपक्रम सुरु केले आहेत, असे सांगतानाच, विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत खेळांसाठीही पुरेसा वेळ द्यावा. खेळांतून व्यक्तिमत्व घडवा, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण, क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी आज विद्यार्थ्यांना केले.
येथील अंबिकानगर शाळेच्या प्रांगणात शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार सर्वश्री अनिल बोंडे, रवि राणा, स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, उपमहापौर संध्याताई ठाकरे, मनपा आयुक्त हेमंत पवार यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारी आदी उपस्थित होते.
क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केल्यानंतर श्री. तावडे यांनी व्यासपीठावरुन भाषण न करता थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. विद्यार्थी कुठले खेळ खेळतात, याची प्रत्येकाकडे विचारपूस त्यांनी केली. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी क्रिकेटसह खो-खो, कबड्डी, कुस्ती असे पारंपरिक खेळही खेळावे.  स्वत:त ‘स्पोर्टस् स्पिरीट’ निर्माण करावे. व्हिडीओ गेम, मोबाईलपेक्षा मैदानी खेळांसाठी वेळ काढावा. त्यामुळे शरीराचा व्यायाम होऊन चैतन्य निर्माण होते.व बौद्धिक क्षमताही वाढते.
खेळाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा म्हणून शिक्षण विभागाकडून खेळाडूंना वार्षिक परीक्षेत अतिरिक्त गुणांची तरतूद, तसेच उत्कृष्ट खेळाडूंना नोकरीसाठी आरक्षण दिले आहे, असेही त्यांनी सांगितले.  क्रीडा स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी महापालिका प्रशासनाचे अभिनंदन केले. खेळामध्ये नैपुण्य मिळवणा-या संजय तिरथकर, निखील सारवान ( कुस्ती ), विजय भुयार (विदर्भ स्तरीय शरीरसौष्ठव), गोकुल येवले (धावपटू) आदी प्रशिक्षक व विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्‍ह देऊन गौरव यावेळी करण्यात आला.
समारंभात भरतनाट्यम नृत्य सादर करणा-या मनपा शाळा क्र.17 चे विद्यार्थी, लेझीम नृत्य सादर करणा-या मनपा शाळा क्र. 14, तसेच सायकल मल्लखांब प्रात्यक्षिक सादर करणा-या एकलव्य गुरुकुल शाळेच्या (नांदगाव खंडेश्वरच्या विद्यार्थ्यांचे शिक्षणमंत्री श्री. तावडे यांनी अभिनंदन केले.
महानगरपालिका शालेय क्रीडा महोत्सव हा 27 व 28 डिसेंबर दोन दिवस चालणार आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या 80 टक्के शाळा डिजीटल झाल्या आहेत. स्काऊट गाईडद्वारा मनपा शाळेतील विद्यार्थी अमेरिकेत प्रात्यक्षिके सादर करणार आहेत, अशी माहिती शिक्षण सभापती चेतन गावंडे यांनी प्रास्ताविकातून यावेळी दिली.
00000





दर्जेदार शिक्षण सर्वदूर पोहोचविण्यासाठी 'व्हर्च्युअल सी४' उपयुक्त
                - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे
अमरावती, दि. 27: अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देऊन  शिक्षणाची गुणवत्ता वाढवत ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार शिक्षण  पोहोचविण्यासाठी 'व्हर्च्युअल सी४'  उपयुक्त ठरेल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात व्हर्च्युअल कॅम्पस टू काॅलेज अँड कम्युनिटी सेंटर (व्हर्च्युअल-सी४), तसेच विद्यापीठाच्या नव्या अद्ययावत संकेतस्थळाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार डॉ. अनिल बोंडे, प्र-कुलगुरु डॉ. राजेश जयपूरकर, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी, महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय  आदी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले की, महाराष्ट्राचा सम्यक विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. विदर्भासह सर्व भागात नवनव्या उद्योगांच्या उभारणीसह कुशल मनुष्यबळनिर्मितीसाठी अनुकूल अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. 'व्हर्च्युअल सी४' च्या माध्यमातून विद्यापीठाशी विविध महाविद्यालये थेट जोडली जाऊन सामाजिक व विविध विषयांवरील गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वदूर पोहोचू शकेल.
         डॉ. चांदेकर यांनी
  'व्हर्च्युअल सी ४'बाबत माहिती दिली. यावेळी कुलगुरुंच्या हस्ते मंत्री श्री. तावडे यांना संत गाडगेबाबांचे चरित्र भेट देण्यात आले.




00000
डॉ. पंजाबराव देशमुख जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे अभिवादन कार्यक्रम

रोजगारक्षम शिक्षणातून समाजाचा विकास
                                                                   उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे
अमरावती, दि. 27: स्थानिक परिसरातील विकासप्रक्रियेशी अभ्यासक्रम जोडून रोजगारक्षम शिक्षणावर राज्य शासनाकडून भर दिला जात आहे. गुणवत्तापूर्ण व रोजगारक्षम शिक्षणातून समाजाचा विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.
         डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 119 व्या जयंती निमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार अशोक उईके, जि. प. बांधकाम सभापती जयंतराव देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, माजी अध्यक्ष अरूण शेळके आदी उपस्थित होते.
 
        श्री. तावडे म्हणाले की,
 भाऊसाहेबांनी शिक्षण प्रसारासह शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठीही प्रयत्न केले. शासनाकडून शिक्षणात काळानुरुप बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या भागातील विकासप्रक्रियेत येथील मनुष्यबळ सामावून घेण्यासाठी त्यांच्यात कौशल्य विकसित करणारे अभ्यासक्रम शैक्षणिक संस्थांनी सुरु केले पाहिजेत. शासनाकडून अशा रोजगारक्षम शिक्षणावर भर दिला जात आहे. गुणवत्तापूर्ण व रोजगारक्षम शिक्षणातून बहुजन समाजाचा विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.  श्रीशिवाजी शिक्षण संस्थेचे कार्य मोठे असून, संस्थेने स्वायत्त विद्यापीठाची मान्यता घेतल्यास त्यांना स्थानिक संदर्भ लक्षात घेऊन अभ्यासक्रम सुरु करता येतील.  त्यासाठी शासनाकडून संस्थेला संपूर्ण साह्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.  
       श्री. पोटे-पाटील म्हणाले की, भाऊसाहेबांनी मोठ्या त्यागातून संस्थेची उभारणी व विस्तार केला. बहुजनांसाठी ज्ञानगंगा  आणली. भारत कृषक समाजाच्या माध्यमातून शेतक-यांसाठी मोठे कार्य केले. संस्थेच्या विद्यार्थ्यांनी जगभरात विविध पदे मिळवून उज्ज्वल कामगिरी केली आहे व करत आहेत.
हे भाऊसाहेबांचे मोठे योगदान आहे.
       दहावी अनुत्तीर्णांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून त्यांना तत्काळ पुन्हा परीक्षेची संधी देण्यात आली. त्याचा लाभ ३५ हजार विद्यार्थ्यांना झाला. असे अनेक नवे निर्णय शिक्षण क्षेत्रात लोकाभिमुख बदल घडवत आहेत, असेही ते म्हणाले.
श्री. देशमुख म्हणाले की, भाऊसाहेबांनी त्याग, कष्ट व तळमळीतून बहुजन समाजापर्यंत शिक्षण पोहोचविले. त्यांचा आदर्श घेऊन सामाजिक बांधीलकीतून संस्था वाटचाल करत आहे.
संस्थेतर्फे डिजिटलायझेशन आदी अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.
वीर उत्तमराव मोहिते यांनी लिहिलेल्या भाऊसाहेबांच्या चरित्राचा इंग्रजी अनुवाद, भाऊसाहेबांच्या विविध भाषणांचा संग्रह, तसेच संस्थेच्या दैनंदिनीचे प्रकाशन यावेळी झाले. संस्थेचे सचिव शेषराव खाडे यांनी आभार मानले.
00000













Tuesday, December 26, 2017

‘मागेल त्याला शेततळे’चे उद्दिष्ट तात्काळ पूर्ण करावे
-       जिल्हाधिकारी अभिजित बांगर
अमरावती, दि. 26 : ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेंतर्गत भरीव कामे होण्यासाठी कृषी सहायकांना उद्दिष्ट निश्चित करुन दिलेली आहेत. तथापि, काही तालुक्यांत पुरेशी कामे नाहीत. निश्चित उद्दिष्ट  पूर्ण न झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी आज येथे सांगितले.
शेततळे व गटशेती योजनेबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. श्री. बांगर म्हणाले की, खारपाणपट्ट्यातील तालुक्यांत भौगोलिक स्थिती लक्षात घेऊन प्रत्येक कृषी सहायकामागे 50, तर इतर तालुक्यात 20 शेततळ्यांचे उद्दिष्ट दिले आहे. कृषी अधिका-यांसह उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनाही या कामाबाबत निर्देश देण्यात आले आहेत. काही तालुक्यांमध्ये कार्यारंभ आदेश देण्यात आले; पण प्रत्यक्षात कामे सुरु झाली किंवा कसे, याची माहिती द्यावी व कामे तत्काळ पूर्ण करावी. 
गटशेतीचे प्रस्ताव परिपूर्ण असावेत
शेतकरी गट कंपन्यांच्या प्रकल्प विकास आराखड्यात क्षेत्र, नकाशे, खर्च, त्याची सामुदायिक व वैयक्तिक विभागणी असा सुस्पष्ट उल्लेख असावा. शेती क्षेत्र शक्यतो सलग असावे.  नकाशावर शेतीचे क्षेत्र सर्वे क्रमांकासह स्पष्ट असावे. आराखडा मंजूर झाल्यानंतरच काम सुरु करावे. अनुदानाच्या मर्यादेत सहली आ‍दी अतिरिक्त खर्च करावा. प्रशिक्षणही उत्पादनवाढ, विपणन आदींसाठी उपयुक्त असले पाहिजे.
या बैठकीला जिल्हा कृषि अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी उदय काथोडे, आत्माचे प्रकल्प संचालक ए.के. मिसाळ व अनेक तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते.
00000

Thursday, December 7, 2017

सामाजिक विकृतींना आळा घालण्याची सर्वांची जबाबदारी
-         पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील
अमरावती, दि. 7 :   समाजातील विकृतींना आळा घालण्याची जबाबदारी कायदा व सुव्यवस्था यंत्रणेइतकीच  आपली सर्वांची आहे. सुदृढ व सुरक्षित समाजासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.
पोलीस आयुक्तालयातर्फे  ‘जागर तरुणाईचा, सामाजिक बांधीलकी व उत्तरदायित्व कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेला शहरातील विविध शाळा- महाविद्यालयांतील दोन हजारहून अधिक विद्यार्थीनींची उपस्थिती होती. यावेळी उपमहापौर संध्या टिकले, सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, राजश्री कौलखेडे, डॉ. मोना चिमोटे, डॉ. वर्षा देशमुख, डॉ. स्मिता देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. पोटे- पाटील म्हणाले की, कुटुंबात मिळालेल्या स्वातंत्र्याचा पाल्यांकडून दुरुपयोग होऊ नये यासाठी पालकांनीही त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची काळजी घेतली पाहिजे. मुलांमध्ये व्यसनाधीनता येता कामा नये. अद्ययावत तंत्रज्ञानाने उपलब्ध करुन दिलेली मोबाईल आदी साधने म्हणजे आधुनिकता नव्हे. ती विचारांत असली पाहिजे. या साधनांमध्ये किती वेळ गुंतून पडायचे, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. मुली व महिलांनी धीट होऊन गैरवर्तणुकीचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस व शासन कटिबद्ध आहे. श्री. मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. 
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले. आभार पोलीस उपायुक्त चिन्मय पंडीत यांनी मानले. कायद्यांची माहिती असलेल्या घडिपत्रिकेचे वितरण यावेळी करण्यात आले.


पालकमंत्र्यांनी घेतला शहरातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा
गुन्हेगारी प्रवृत्तींवर वचक बसवावा
                                    -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
अमरावती, दि. 7 : शहरात वारंवार गुन्हेकारक घटना घडत आहेत. अशा घटना घडू नयेत म्हणून गुन्हेगारी प्रवृत्ती वेळीच ठेचली गेली पाहिजे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवैध धंद्यांवर लक्ष केंद्रित करुन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे दिले.
          पालकमंत्री श्री. पोटे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कायदा व सुव्यवस्थाविषयक बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, पोलीस अधिक्षक अभिनाश कुमार आदी उपस्थित होते.
          पालकमंत्री श्री. पोटे- पाटील म्हणाले की, शहरातील गुन्हेगारी घटनांचे प्रमाण पाहता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून काम केले पाहिजे. अवैध धंद्यावर लक्ष केंद्रित करुन गुन्हेगारांवर वचक निर्माण करावा. तरुणांमध्ये शिस्त आणण्यासाठी त्यांना नियमांची जाणीव करुन देण्याची गरज आहे. सुसाटवेगाने दुचाकी चालवणाऱ्या युवकांना समज देऊन त्यांच्या आईवडलांना कल्पना द्या. शहरात शाळा-महाविद्यालय परिसरात साध्या वेशातील पोलीस अधिकारी- कर्मचारी नियुक्त करावेत.  शिस्तीचे पालन न करणा-यांना खाकीची पॉवर कळू द्या.   काही रिक्षाचालक महिलांशी गैरवर्तणुक करत असल्याच्या तक्रारी होत आहेत. अशा ठिकाणी साध्या वेशातील कर्मचारी नेमावेत.  

श्री. मंडलिक म्हणाले की,  महिलांच्या सुरक्षेकरिता दामिनी पथक कार्यरत आहे. 195 शाळा-महाविद्यालयांत तक्रार पेटी बसविण्यात आली आहे. शहरातील महिला वसतिगृहांकरिता महिला पोलीस उपनिरीक्षकांकडून नियमित भेट देण्यात येते. तक्रारी असतील तर त्यावर कार्यवाही केली जाते. कायदा व सुव्यवस्थेसाठी  लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टीने पोलीस मित्र, शांतता समिती, मोहल्ला समिती, सामाजिक सुरक्षा समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे.  
          शहरातील एटीएममधून पैसे चोरी होत असल्याच्या तक्रारींवर सायबर विभागाच्या कामगिरीमुळे सर्व आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.  
00000

पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची
रक्कम तत्काळ जमा करण्याचे आदेश
एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून
वंचित राहणार नाही: मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई, दि. : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवल्यानंतर आतापर्यंत 41 लाख शेतकरी खात्यांसाठी19,537 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून आता बँकांनी ही रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी तत्काळ कारवाई करावीअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
या ऑनलाईन प्रक्रियेत एकूण 77 लाख खाते राज्य सरकारला प्राप्त झाले. पुन्हा पुन्हा आलेले अर्ज तसेच इतर त्रुटी दूर करून सुमारे 69 लाख खात्यांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. शासनाने आतापर्यंत सुमारे 41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी 19 हजार 537 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. यात वन टाईम सेटलमेंटसाठी 4673 कोटी रुपये आहेत. कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी बँकांना शाखानिहाय देण्यात आली असून बँकांनी ही रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करावीत्यासाठी बँकांनी आपली स्थानिक यंत्रणा अधिक सक्षम करावीतसेच या सर्व खातेदारांना रब्बी हंगामासाठी कर्ज देण्याचीही व्यवस्था करावीअसे  आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृहात आज राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशीवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेशकुमार जैनमाहिती तंत्रज्ञान सचिव एस.व्ही.आर श्रीनिवास यांच्यासह बँकर्स समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस पुढे म्हणाले की, 41 लाख खातेधारकांशिवाय आता उर्वरित खातेधारकांच्या अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी बँकांनी विशेष चमू गठीत कराव्यात आणि या प्रक्रियेत अधिकाधिक शेतकऱ्यांना लवकरात लवकर फायदा मिळण्यासाठी सहकार्य करावे. सरकारच्या वतीने बँकासोबत समन्वयासाठी तीन चमू गठीत करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत बँकांनी मोठे सहकार्य केल्याबद्दल त्यांनी आभारही मानले. यापुढे सुद्धा असेच काम करून एकही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी बँकांनी हे काम पंधरा दिवसात पारदर्शकपद्धतीने पूर्ण करावेत्यांना सहकार विभागाचे तालुका आणि जिल्हास्तरीय अधिकारी मदत करतील. शेवटच्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळेपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया अशीच सुरु राहीलअसेही ते म्हणाले.
वन टाईम सेटलमेंट योजनेअंतर्गत बँकांनी कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना हप्ते पाडून द्यावेतजेणेकरून अधिक शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतील. त्यासाठी शेतकऱ्यांशी बँकांनी संवाद साधावा व त्यातून नावीन्यपूर्ण अशी योजना आखावी व खातेदाराचे बँक खाते पुर्नजीवित करावे. महाराष्ट्राने आतापर्यंत कर्जमाफीचे काम देशाला पथदर्शी ठरावे इतक्या पारदर्शकपद्धतीने केले आहेपुढेही ते याचपद्धतीने पुर्णत्वाला न्यावेअशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची अंमलबजावणी करतांना बँकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षाही त्यांनी जाणून घेतल्या.
00000
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम
महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा 2017 चा निकाल जाहीर
मुंबईदि. 7 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने आयोजित महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा 2017 चा निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत प्रथम क्रमांक वेदांत कुलकर्णी (कोल्हापूर)द्वितीय क्रमांक दीपक कुंभार (कोल्हापूर) तर तृतीय क्रमांक अंशुमन पोयरेकर(मुंबई) यांनी पटकावला आहे.
या स्पर्धेतील पाच उत्तेजनार्थ पारितोषिकांसाठी प्रशांत खरोटे (नाशिक)राजेंद्र धाराशिवकर (उस्मानाबाद)सुनिल बोर्डे (बुलढाणा)उमेश निकम(पुणे)सुशिल कदम(नवी मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे.  माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी आज निकाल जाहीर केला. प्रथमद्वितीयतृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रकारांना अनुक्रमे 25 हजार, 20 हजार, 15 हजार तर उत्तेजनार्थ पाच पारितोषिकांसाठी प्रत्येकी तीन हजार रूपये प्रदान केले जाणार आहेत. 
            महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीनऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी 3,210 छायाचित्रे प्राप्त झाली होती. त्यातील दर्जेदार छायाचित्रांचे राज्यभरात प्रदर्शन भरविण्यात येणार असून प्रदर्शनाची सुरूवात नागपूर येथून होणार आहे.
            प्राप्त छायाचित्रातून विजेत्यांची निवड आणि प्रदर्शनासाठी दर्जेदार छायाचित्रांची निवड करण्यासाठी माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कामकाज पाहिले. या समितीत संचालक (प्रशासन) अजय अंबेकरसंचालक (माध्यम समन्वयक) शिवाजी मानकरज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकरज्येष्ठ छायाचित्रकार नितीन सोनवणेसंजय पेठेअनिल छड्डा यांचा समावेश होता.
            राज्यभरात लवकरच या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार असून  याचा लाभ सर्वांनी घ्यावाअसे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
००००

Tuesday, December 5, 2017

पर्यटक निवासातून मिळेल मेळघाटातील पर्यटन व रोजगाराला चालना
अमरावती, दि. 5 : निसर्गरम्य मेळघाटमध्ये पर्यटकांच्या सोयीसाठी नानाविध सुविधा उभारण्याचे प्रयत्न राज्य शासनाकडून होत आहेत. याच अंतर्गत डिजीटल व्हिलेज हरिसालमध्ये पर्यटक निवास उभारण्यासाठी स्थानिकांना मदत देण्यात आली असून, त्यातून पर्यटनाला चालना व रोजगार निर्मितीही होणार आहे.
रोजगार निर्मितीसाठी पर्यटक निवास व्यवस्था उभारण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपयांची मदत हरिसालमध्ये पाचजणांना देण्यात आली आहे. त्यानुसार हे काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. पर्यटक याठिकाणी राहून निसर्गपर्यटनाचा आनंद घेऊ शकतील.  पर्यटकांना स्थानिक संस्कृतीचा परिचय व्हावा म्हणून हरिसालमध्ये स्थानिक 15 कलावंतांचे पथकही निर्माण करण्यात आले आहे.  त्यामुळे पर्यटनाच्या आकर्षण केंद्रांत भरच पडली आहे. या योजनेमुळे स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होत आहे.
लोकराज्य डिसेंबर अंक प्रकाशित
महापरिनिर्वाण दिन आणि विदर्भ विशेष

मुंबई5 :  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाराविदर्भातील विकासकामांचा आढावा घेणारा लोकराज्य डिसेंबरचा अंक प्रकाशित झाला आहे.
या अंकात प्रा. दत्ता भगतडॉ. कमल गवईनागसेन कांबळेकृष्णा इंगळेमिलिंद मानकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या लेखांची विशेष पुरवणी समाविष्ट केली आहे.
गेल्या तीन वर्षात विदर्भामध्ये झालेल्या विकासकामांची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. यात नागपूर मेट्रोमाहिती तंत्रज्ञानगोसीखुर्द प्रकल्पजलयुक्त शिवारकृषी पंपांना वीज पुरवठास्मार्ट नागपूरऔद्योगिक गुंतवणूक,  शैक्षणिक प्रगतीआरोग्य सुविधामत्स विकासखनिज संपत्ती आणि विविध जिल्ह्यातील नव्या उपक्रमांचा आढावा आहे. विदर्भातील बहुविध पर्यटन स्थळांचा रंजक वेध घेणाऱ्या लेखाचाही या अंकात समावेश करण्यात आला आहे. या अंकाची किंमत 10 रुपये आहे. हा अंक स्टॉलवर सर्वत्र उपलब्ध आहे.
००००
जिल्हा वार्षिक योजनेतील विविध विकासकामांचा
लघु गट समितीकडून आढावा
अमरावती, दि. 5 : जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक योजनेत विविध कार्यालयांना प्राप्त गत वर्षातील निधी व खर्च, तसेच पुढील वर्षाचे नियोजन यांचा आढावा लघु गट समितीतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात घेण्यात आला. 
आमदार अनिल बोंडे व जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह विविध अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात मदर डेअरीतर्फे दूध संकलन सुरु असले तरी ते सर्वत्र नाही. शासकीय दुग्धशाळेची मोर्शी, परतवाडा आदी शीतकरण केंद्रे बंद आहेत. ती सुरु करण्यासाठी कार्यालयांनी प्रयत्न केला पाहिजे, असे डॉ. बोंडे यांनी सांगितले. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात गावांचे क्लस्टर निर्माण करुन मदर डेअरीतर्फे संकलन केंद्र सुरु करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. पशुसंवर्धन विभागाच्या नादुरुस्त दवाखान्यांबाबत माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
मत्स्यसंवर्धनाच्या अनुषंगाने संबंधित कार्यालयाच्या मत्स्यबीजवाटप आदी कामांबाबत तक्रारी येत आहेत. यासंबंधी याच आठवड्यात योग्य ती कार्यवाही करुन अहवाल द्यावा, असे निर्देश डॉ. बोंडे यांनी दिले.
जलयुक्त शिवार योजना राज्याची कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी महत्वाची ठरत आहे. या योजनेतील कामांना गती मिळण्यासाठी वनविभागाने सहकार्य करावे, असे निर्देश देण्यात आले. उपलब्ध पाणीसाठ्याच्या सुयोग्य वापरासाठी प्रत्येक ठिकाणी पाणीवापर संस्था निर्माण कराव्यात, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
बोंडअळीबाबत शेतक-यांकडून 6500 हजार तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार पाहणी करण्यात येत असल्याचे जिल्हा कृषी अधिक्षक अधिका-यांनी सांगितले. या कामाला प्राधान्य देऊन दैनंदिन कार्यवाहीची माहिती घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
रोही, रानडुक्कर, हरीण आदी वन्य प्राण्यांमुळे शेतीसह वनविभागाच्या रोपवाटिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यासाठी जंगलात कृत्रीम पाणवठे तयार करावे, वनांजवळील गावात दक्षता घ्यावी, अशी सूचना आमदार डॉ. बोंडे यांनी केली.
ठिबक व तुषार सिंचन अनुदानासाठी 4448 आवेदने प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी यांनी दिली.
औद्योगीक प्रशिक्षण संस्थांच्या वसतिगृहात आवश्यक सोयी- सुविधा नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा डॉ. बोंडे यांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांकडे प्रशासनाने संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले. याप्रकरणी 7 दिवसात कार्यवाही करुन तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
 00000



Monday, December 4, 2017

जिल्ह्यातील विकासकामांबाबत
विभागीय आयुक्तांकडून आढावा अपूर्ण कामांना गती द्यावी
          - विभागीय आयुक्त पीयुष सिंह
अमरावती, दि. 4 : जिल्ह्यातील विकासकामांबाबत वस्तुनिष्ठ माहिती सादर करावी, तसेच अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी विविध विभागांच्या अधिका-यांना दिले.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गत हिवाळी अधिवेशनात नागपूर येथे बैठक घेऊन जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेतला होता. या बैठकीतील निर्देशांवर झालेली कार्यवाही आढावा व मुख्यमंत्र्यांसमोर करावयाचे सादरीकरण याबाबत विभागीय आयुक्त श्री. सिंह यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 मागील कामांचा आढावा घेतानाच गत वर्षातील प्रश्न, निर्णय व अंमलबजावणीचा आढावा यावेळी घेण्यात आला. राष्ट्रीयकृत बँकांनी केलेल्या खरीप कर्जवाटपाच्या तुलनेत यंदा जिल्हा सहकारी बँकेचे कर्जवाटपाचे प्रमाण अधिक आहे.  रब्बी कर्जवाटपाच्या कामांनाही  गती द्यावी. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत गतवर्षी व यंदाच्या उद्दिष्टानुसार किती काम झाले, याचा तपशीलवार गोषवारा सादर करण्याचे निर्देश श्री. सिंह यांनी दिले. ते पुढे म्हणाले की, गावठाण विस्ताराच्या कामाला गती द्यावी. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी यासंबंधी एकत्रित बसून नियोजन करावे.
 स्वच्छ भारत अभियानात 50 हजार कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित विशेषत: धारणी तालुक्यातील कामे तत्काळ पूर्ण करावीत, असेही ते म्हणाले.
समृद्धी महामार्गासाठी येत्या आठवडाभरात 40 टक्के भूसंपादनाचे नियोजन आहे. दि. 31 डिसेंबरपर्यंत हे काम 55 टक्क्यांपर्यंत जाईल, अशी माहिती श्री. बांगर यांनी दिली. मेक इन महाराष्ट्रांतर्गत सामंजस्य करार करण्यात आलेल्या उद्योगांपैकी 8 उद्योग सुरु झाले आहेत. 9 उद्योगांचे बांधकाम सुरु आहे. बसक्या पुलांचे उंच पुलात रुपांतर करण्याची 36 कामे सार्वजनिक  बांधकाम विभागाने केली आहेत. आदिवासी जिल्हा उपयोजनेत 28 पुलांचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती अधिका-यांनी दिली. 
    कर्जमाफीची अंमलबजावणी, स्वच्छ भारत योजना, पं. दीनदयाळ उपाध्याय भूखंड खरेदी योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, पीक विमा, धामक येथील पुनर्वसन आदी विविध कामांविषयी यावेळी चर्चा झाली.
00000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...