‘बेटी पढाओ’च्या नावाखाली फसवणूकीच्या घटना
नागरिकांनी तक्रार नोंदविण्याचे जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांचे आवाहन

अमरावती, दि. 29 : अस्तित्वात नसलेल्या ‘बेढी पढाओ’ योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी नागरिकांकडून बेकायदेशीरपणे शुल्क वसूल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. असा प्रकार घडत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तहसीलदार, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले आहे.
वरुड परिसरात बेटी पढाओ  योजना अस्तित्वात असल्याचे दाखवून त्याचा फॉर्म भरुन शुल्क वसूल करण्याच्या घटना घडल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. केंद्र व राज्य शासनाची अशी कोणतीही योजना अस्तित्वात नाही. चुकीची माहिती देऊन काही लोकांकडून नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. अशी चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणारी व्यक्ती आढळल्यास नागरिकांनी तत्काळ तहसीलदार, तसेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. नागरिकांनी याप्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. बांगर यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती