कोविडमुळे विधवा महिला, निराधार बालकांना ‘मिशन वात्सल्य’चा मायेचा आधार - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर





 कोविडमुळे विधवा महिलानिराधार बालकांना मिशन वात्सल्यचा मायेचा आधार

 महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

▪  काळजी नकोआता येणार 'शासन आपल्या दारी'

▪ अधिकारी-कर्मचारी घरी जाऊन घेणार शासकीय योजनांचे अर्ज   

▪ शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार

▪ सर्व तालुक्यात तालुकास्तरीय समन्वय समित्या

▪ कायदेशीरमालमत्तांमधील हक्क मिळवून देणार

          मुंबईदि. 28: कोविड-19 या संसर्गजन्य आजारामुळे दोन्ही पालकांचे निधन होवून अनाथ झालेल्या बालकांना व कुटूंबातील कर्त्या पुरुषाचे निधन होवून एकल किंवा विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी’ या संकल्पनेवर आधारित मिशन वात्सल्य’ राबवण्यात येणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

घरी जाऊन घेण्यात येणार योजनांचे अर्ज

          या मिशननुसार गावपातळीवर तलाठीग्रामसेवकप्राथमिक शिक्षकअंगणवाडी सेविका तसेच शहरी  क्षेत्रातील वार्ड निहाय पथकामध्ये  वार्ड अधिकारीतलाठीप्राथमिक शिक्षकअंगणवाडी सेविका यांची पथके तयार करण्यात येणार आहेत. ही पथके गावशहरातील एकलविधवा महिलाअनाथ  बालकांच्या  कुटुंबियांना भेट देवून शासनाच्या विविध योजनांची  माहिती देतील. तसेच विविध  योजनांचा लाभ उपलब्ध व्हावा यासाठी आवश्यक कागदपत्रे प्राप्त करुन परिपूर्ण प्रस्ताव तालुकास्तरीय समन्वय समितीकडे  सादर करतील.

          या मिशनच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील सर्व तालुक्यात तालुका समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष तहसीलदार हे असून तालुका शिक्षण अधिकारीतालुका विधी  सेवा प्राधिकरणनगरपारिषदेचे मुख्याधिकारीवरिष्ठ पोलिस निरिक्षक/ पोलीस निरिक्षकतालुका आरोग्य अधिकारीपंचायत समितीचे विस्तार अधिकारी (समाज कल्याण)तालुका कृषी अधिकारीपशुसंवर्धन अधिकारीआदिवासी उपयोजना क्षेत्रातील तालुक्यात उपयोजनेचे प्रकल्प अधिकारीतालुका संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)एकल/ विधवा महिला व अनाथ बालकांच्या पुनर्वसन क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचा प्रतिनिधी हे सदस्य तर बालविकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण/ शहरी) हे सदस्य सचिव असणार आहेत.

          यामध्ये कुटुंब निवृत्तीवेतन योजनाएलआयसी किंवा इतर विमा पॉलिसीचा लाभसंजय गांधी निराधार योजनाराष्ट्रीय कुटूंब लाभ योजनाश्रावण बाळ योजनाबालसंगोपन योजनाघरकुलकौशल्य विकासइंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनाइंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनाइंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजनाशुभ मंगल सामुहिक योजनाअंत्योदय योजनाआदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनाकृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना आदींशिवाय अन्य योजना तसेच स्वयंसेवी संस्थांमार्फत राबविण्यात येत असलेले उपक्रम यापैकी ज्या ज्या योजनांसाठी संबंधित महिला किंवा बालक पात्र असेल त्या योजनांचे अर्ज भरुन त्यांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहेत.

          याशिवाय अनाथ बालकांचे शालेय प्रवेश व शुल्क  यासंबंधीची कामे तसेच महिला व बालकांचा मालमत्ता विषयक हक्क अबाधित राखण्यासाठी मदत पुरवण्यात येणार आहे. याचबरोबर ज्यांच्याकडे शिधापत्रिकावारस प्रमाणपत्रबँक खातेआधार कार्डजन्म/ मृत्यू दाखलाजातीचे प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे नसतील ती मिळवून देण्यासाठी सर्व सहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

          राज्यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार मार्च2020 नंतर 18 हजार 304 बालकांनी आई- वडिलांपैकी एक पालक कोरोनामुळे गमावला आहे. त्यापैकी 16 हजार 295 बालकांनी वडिल गमावले असून त्यांच्या माता विधवा झाल्या आहेत. तसेच 2 हजार 9 बालकांच्या मातांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. तसेच 570 बालकांनी दोन्ही पालक गमावले आहेत. त्यापैकी 547 बालके 18 वर्षाखालील आहेत. त्यामुळे या विधवा महिला आणि अनाथ बालकांच्या पुनर्वसनाचे मिशन आम्ही हाती घेतले असून यंत्रणांच्या सहाय्यातून आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ असा विश्वास मंत्री ॲड. ठाकूर यांनी व्यक्त केला.

००००


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती