Friday, June 14, 2024

कृषी पुरस्कारः 31 जुलैपर्यंत प्रस्ताव मागविले

 

कृषी पुरस्कारः 31 जुलैपर्यंत प्रस्ताव मागविले

 

            अमरावती, दि. 14 (जिमाका): कृषी विभागामार्फत कृषी व कृषी पूरक क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था, अधिकारी व कर्मचारी यांना डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषी भूषण, जिजामाता कृषी भूषण, कृषी भूषण (सेंद्रिय शेती), वसंतराव नाईक  शेतीमित्र, उद्यान पंडित पुरस्कार, वसंतराव नाईक शेती निष्ठ शेतकरी पुरस्कार व युवा शेतकरी पुरस्कार देऊन दरवर्षी  गौरविले जाते.

 

सन 2023 व 2024 या वर्षासाठी पुरस्काराचे प्रस्ताव कृषी विभागाने मागविले असून प्रस्ताव दि. 31 जुलै 2024 पर्यंत पाठवावयाचे आहेत. शेतकऱ्यांनी पुरस्कार प्रस्ताव सादर करण्याकरिता व अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक किवा नजीकच्या मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा  अधीक्षक  कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...