Friday, October 21, 2022

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अधिकाधिक प्रस्ताव मंजूर करा - विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

 



प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अधिकाधिक प्रस्ताव मंजूर करा

-          विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे

अमरावती, दि. 21 : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत अधिकाधिक प्रस्तावांना मंजुरी देऊन प्रकल्प उभे राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे दिले.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेत खरेदीदार- विक्रेता मेळावा येथील बचतभवनात बुधवारी झाला. त्याचे उद्घाटन करताना डॉ. पांढरपट्टे बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, योजनेचे राज्य नोडल अधिकारी सुभाष नागर, स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी राहूल सातपुते, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जितेंद्र झा, महिला आर्थिक विकास महामंडळाचे सुनील सोसे, संदीप चंदनशिवे, गजाजन देशमुख आदी उपस्थित होते.  

खरेदीदार व विक्रेते एकाचठिकाणी आल्याने उत्पादन दर्जा, ग्राहक पसंती, मूल्य आदींबाबत विचारांचे आदान-प्रदान होते. त्यामुळे अशा उपक्रमांत सातत्य ठेवावे जेणेकरून उत्पादने अधिक दर्जेदार होतील व बाजारपेठ उपलब्ध होईल, असे डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी सांगितले. प्रस्ताव मंजुरीत बँकांची भूमिका महत्वाची आहे. बँकांनी प्रस्ताव मंजूर सुटसुटीत प्रक्रिया राबवावी व अधिकाधिक प्रस्ताव मंजूर करावेत, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. श्री. नागर, श्री. खर्चान यांचीही भाषणे झाली.

वाशिम जिल्ह्यातील संशोधन व्यक्ती गोपाळ मुधाळ, अर्चना वाढिवे, अमरावती जिल्ह्यातील दीपक झंवर यांना यावेळी गौरविण्यात आले. राहूल ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले.

०००

Thursday, October 20, 2022

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यास प्रारंभ अमरावती येथे 55 शेतकरी बांधवांचे प्रातिनिधीक स्वरूपात स्वागत

 





महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्यास प्रारंभ

अमरावती येथे 55 शेतकरी बांधवांचे प्रातिनिधीक स्वरूपात स्वागत

 

अमरावती, दि. २०: नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम जमा करण्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण नियोजनभवनात करण्यात येऊन प्रातिनिधीक स्वरूपात अमरावती जिल्ह्यातील 55 शेतकरी लाभार्थ्यांच्या खात्यात रकमा जमा होऊन या सर्वांचे स्वागत जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये ही कार्यवाही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत. त्यानुसार मोठ्या प्रमाणावर खात्यांमध्ये रकमा जमा होण्यास आरंभ झाला आहे.

 

 

शासनातर्फे आज एकाच वेळी राज्यातील ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे २५०० कोटी रुपये जमा करण्यात आले. अशा प्रकारे एकाचवेळी थेट खात्यात रक्कम जमा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाने खचून जाऊ नये राज्य सरकार पाठीशी असल्याची ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. दरम्यान, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे उपग्रह आधारीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतानाच त्याची भरपाई ऑटोपायलट मोडच्या माध्यमातून देण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांच्या आधारक्रमांकाचे प्रमाणीकरण करण्यात आले असून सध्या सुमारे ८ लाख शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाचे प्रमाणीकरण झाले आहे. त्यापैकी ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज थेट रक्कम जमा करण्यात आल्याचे सहकार मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.  

 

 

नियोजनभवनात जिल्ह्यातील ५५ शेतकरी बांधवांच्या खात्यात रक्कम जमा करून त्यांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक डॉ. महेंद्र चव्हाण, लीड बँक व्यवस्थापक जितेंद्रकुमार झा सहायक निबंधक भालचंद्र पारिसे, स्वाती गुडधे आदी उपस्थित होते.

  

 

00000

 

 

 

 

 

 

हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप; अमरावतीच्या युवकाचे संशोधन महाराष्ट्र स्टार्टअप कार्यक्रमात कुशकुमार ठाकरे राज्यात सर्वप्रथम

 



हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप; अमरावतीच्या युवकाचे संशोधन

महाराष्ट्र स्टार्टअप कार्यक्रमात कुशकुमार ठाकरे राज्यात सर्वप्रथम

 

अमरावती, दि. 20 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता कार्यक्रमात अमरावतीचा कुशकुमार मनोहर ठाकरे हा युवक आरोग्य क्षेत्रातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. हृदयविकाराबाबत कल्पना देणारे ‘पर क्ल्यू’ हे स्टेथॅस्कोपसारखे साधन कुशकुमार याने तयार केले असून, या शोधाबद्दल त्याला राज्यस्तरावरील एक लक्ष रूपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात समारंभपूर्वक पुरस्कार कुशकुमार यांना प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधान सचिव मनिषा वर्मा,  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर व आयुक्त डॉ. रामास्वामी आदी उपस्थित होते. राज्यस्तरावर 21 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यात कुशकुमार यांना आरोग्यहेल्थकेअर सेक्टरमध्ये प्रथम पुरस्कार देवून राज्यपाल यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.  

कुशकुमार हा अमरावतीच्या शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याने ‘पर-क्ल्यू’ हे स्टेथॅस्कोपचे काम करणारे साधन निर्माण केले आहे. या संशोधनाला मनीष कुथरन यांचे सहकार्य व डॉ. शारदा देवरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ज्याप्रमाणे घरच्या घरी शर्करापातळी मोजण्यासाठी ग्लुकोमीटरचा वापर होतो, त्याचप्रमाणे ‘पर-क्ल्यू’ (परफेक्ट क्ल्यू) हे साधन वापरून हृदयाचे ठोके मोजण्याबरोबरच हृदयविकाराची पूर्वकल्पनाही मिळणार आहे. त्यामुळे रुग्णाला तातडीने उपचार घेता येतील. या साधनात रक्तदाबाची दैनंदिन नोंद होऊन त्याचा महिनाभराचा डेटाही सेव्ह व्हावा, यादृष्टीने आम्ही ते अधिक अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे कुशकुमार यांनी सांगितले. त्यामुळे डॉक्टरांकडे तपासणीसाठी जाताना या माहितीचा उपयोग होऊ शकेल.    

अमरावती येथे विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचा शुभारंभ झाला. यात्रेत दि. 29 ऑगस्टपर्यंत प्रत्येक तालुका स्तरावर भेटी देऊन नाविन्यपूर्ण संकल्पना, त्याचे इतर पैलू याबाबतची माहिती, मार्गदर्शन व नोंदणी करण्यात आली. त्यानंतर दि. 14 ऑक्टोबरला गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ येथे जिल्हास्तरीय सादरीकरण स्पर्धा झाली. त्यात प्रथम क्रमांक मिळालेल्या कुशकुमारने राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धेतही हेल्थ केअर सेक्टरमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.  

या यशाबद्दल जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी कुशकुमार यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल शेळके,  इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक स्वाती शेरेकर, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य व्ही. आर. मानकर, कौशल्य विकास अधिकारी वैशाली पवार आदी उपस्थित होते.

00000

 

 

 

Monday, October 17, 2022

ओबीसी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा

 ओबीसी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज

परतावा योजनेचा लाभ घ्यावा

 

अमरावतीदि. 17: तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रशेखर श्रीखंडे यांनी केले.

राज्यदेशांतर्गत व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बँकेमार्फत मंजूर केलेल्या रूपये 20 लक्षपर्यंत कर्ज रमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिकआर्थिक  दृष्ट्या सक्षम करणे व त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे हा योजनेचा उद्देश आहे.

लाभार्थींच्या पात्रतेच्या अटी व शर्ती

        अर्जदाराचे वय 17 ते 30 वर्षे असावे व तो इमाव प्रवर्गातीलमहाराष्ट्राचा रहिवासी असावा. अर्जदाराची कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण व शहरी भागाकरिता रूपये लक्ष पर्यंत असावी. अर्जदार इयत्ता 12 वी 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या व्दितीय वर्षे व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी 60 टक्के गुणांसह पदविका उत्तीर्ण असावेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी किमान 60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा. केवळ पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमाकरिता शासन मान्यता प्राप्त संस्थेमध्ये प्रवेश घेतलेले विद्यार्थीं. बँकेने मंजूर केलेली संपूर्ण रक्कम अर्जदारास वितरीत केल्यानंतर अर्जदार व्याज परतावा योजनेसाठी पात्र राहील. राज्य व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक शुल्कपुस्तकेसाहित्य खरेदी व अर्जदाराच्या राहण्याचा व भोजनाचा खर्च समावेश राहिल. परदेशी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरिता फक्त शैक्षणिक शुल्कपुस्तकेसाहित्य खरेदीचा समावेश राहिल. अर्जदाराचा सिबील क्रेडिट स्कोअर 0,-1 (म्हणेजच यापूर्वी त्याने कर्ज घेतलेले नसावे) किंवा 500 पेक्षा जास्त असावा.

व्याजाचा परतावा

        महामंडळ केवळ बँकेकडून वितरीत केलेल्या रक्कमेवरील जास्तीत जास्त 12 टक्के पर्यंत रक्कमेचा व्याज परतावा नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना करेल.

कर्ज प्रस्तावासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे

        अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जातीचा दाखलाउत्पन्नाचा दाखलामहाराष्ट्राचा रहिवासी दाखलाअर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्डज्या अभ्यासक्रमाकरिता शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे. त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिकाअर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट आकारातील छायाचित्रअर्जदाराचा जन्माचावयाचा दाखलाशैक्षणिक शुल्क संबंधित पत्रशिष्यवृत्तीशैक्षणिक शुल्क माफी पात्रतेबाबतचे प्रमाणपत्रमान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावाआधार संलग्न बँक खाते पुरावा. (संपर्क दूरध्वनी 0721-2550339)

00000


मानसिक आरोग्य पंधरवड्यानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती

 मानसिक आरोग्य पंधरवड्यानिमित्त रॅलीद्वारे जनजागृती 

       अमरावती, दि. 17 : जागतिक मानसिक आरोग्य पंधरवड्यानिमित्त आरोग्य विभागातर्फे शहरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी हिरवी झेंडी दाखवून जिल्हा रूग्णालयातून रॅलीची सुरूवात केली. नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी त्यात सहभाग घेतला.

 रॅलीला अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. अमोल गुल्हाने, डॉ. स्वाती सोनोने, प्रमोद भक्ते, भावना पुरोहित, सुनील कळतकर, श्रीमती सारा उमर, सायली डंभे, सचिन टवलारे, श्रध्दा हिरकंचे, विधूत पापळकर, शुभम झळके, निलेश मते, लोकेश पवार, श्रीमती अनुष्का ठाकरे, श्याम खोडवे, रवि गाढवे, स्पूर्ती डाखोडे, वैष्णवी सकरवार, दीक्षा रामटेके, अनुजा पाथरकर, सिमरण पठाण, दिपाली कडू, संदया मालधुरे, स्वाती चिंचोले, प्रीती चव्हाण, मुगल मॅडम, सरस्वती नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थी यांच्या सह रूग्णालयीन कर्मचारी, अधिकारी, रूग्णाचे नातेवाईक, नर्सिंग कॉलेज प्राध्यापक उपस्थित होते.

00000

सर्व विभागांनी समन्वयाने जलशक्ती अभियान यशस्वी करावे

 




‘कॅच द रेन’

सर्व विभागांनी समन्वयाने जलशक्ती अभियान यशस्वी करावे

अमरावती, दि. 17 - जलशक्ती अभियानातून जलपुनर्भरण व जलस्त्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन अभियानाचे संचालक विश्वजीत कुमार यांनी केले.

अभियानाच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी संचालक अमरावती दौ-यावर आहेत. त्यानिमित्त त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विविध विभागप्रमुखांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा व अनेक अधिकारी उपस्थित होते.

उपक्रमात ग्रामपंचायतींचा सहभाग मिळविणे आवश्यक आहे. पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी जलपुनर्भरण व जलस्त्रोतांचे संवर्धन गरजेचे असून, सर्व विभागांनी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध उपक्रमातून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन विश्वजीत कुमार यांनी केले. जिल्हाधिकारी श्रीमती कौर, श्री. पंडा यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालक श्री. कुमार हे उद्या कोलकास, वडाळी, चिरोडी आदी ठिकाणी भेट देऊन तेथील कामांची पाहणी करणार आहेत.

०००

Friday, October 14, 2022

मधुरा, पुर्वशा व सांजली ला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त

 मधुरा, पुर्वशा व सांजली ला राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त

       अमरावती,दि. 13 : गुजरात येथे आयोजित 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत एकुण 36 क्रीडा प्रकारात महाराष्ट्र राज्याने सहभागी होवून 140 पदके प्राप्त करून महाराष्ट्र तालीकेमध्ये द्वितीय स्थान मिळविलेले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये अमरावती येथील जलतरण खेळाडू सांजली राजेंद्र वानखडे तर धनुर्विद्या खेळाडू पुर्वशा शेंडे व मधुरा धामणगावकर यांनी 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करतांना सुवर्ण पदक प्राप्त केले. सांजली वानखडे या खेळाडूने जलतरण या क्रीडा प्रकारात वॉटरपोलो या बाबीमध्ये सुवर्णा पदक प्राप्त केले आहे. यापुर्वी सुध्दा सांजली वानखडे या खेळाडूने 5 वेळेस राष्ट्रीय स्पर्धेत तर 2 वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 8 वी आशियन एज ग्रुप बॅकॉक येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत सहभागी झालेली होती. तसेच साऊथ ऐशियन जलतरण स्पर्धा श्रीलंका येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केलेले होते. सांजली ही खेळाडू नियमितपणे श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे जलतरण तलावावर नियमितपणे सराव करीत असते. तिला प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रा.डॉ. लक्ष्मीकांत खंडागळे, प्रा. डॉ. योगेश निर्मळ, प्रतिभा भोंडे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सद्यस्थितीत सदर खेळाडू ही श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय अमरावती येथे शिकत असून प्रा. डॉ. अंजली ठाकरे, यांचे सुध्दा प्रोत्साहन सांजली वानखडे प्राप्त झालेले आहे.

            धनुर्विद्या या क्रीडा प्रकारातील कंपांऊड या बाबीमध्ये पुर्वशा शेंडे या खेळाडुने 36 व्या राष्ट्रीय क्रीडा  स्पर्धेत धनुर्विद्या सांघीक या क्रीडा प्रकारात महाराष्ट्रचे प्रतिनिधीत्व  करून सुवर्ण पदक प्राप्त केले. या पूर्वी 19 वेळा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केलेले आहे. तसेच जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा, साऊथ आशियाई स्पर्धा, एशियन स्पर्धा, युथ वर्ड चॉम्पियनशिप इ. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये 17 वेळा सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केलेले आहे. पुर्वशाच्या यशात तिचे वडील श्री. सुधिर शेंडे  यांच्या मार्गदर्शनात ती सराव करीत आहे.

            धनुर्विद्या या खेळात कंपांऊड या क्रीडा प्रकारात मधुरा धामणगावकर या खेळाडूने सुध्दा 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत धनुर्विद्या सांघीक या खेळात सुवर्ण पदक प्राप्त केले. या पुर्वी मधूराने 9 वेळा राष्ट्रीय स्पर्धा, आखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धामध्ये सहभागी होऊन प्राविण्य प्राप्त केले आहे. तसेच 3 वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आशियाकप, युथवर्ड चॉम्पीयनशिप, वर्ल्ड कप चॉम्पीयनशिप मध्ये सहभागी झालेली आहे.खेळाडूंना भारतीय धनुर्विद्या संघटनेचे प्रमोद चांदुरकर, महाराष्ट्र ऑलम्पीक संघटनेचे प्रशांत देशपांडे,गुरूकुल अकादमीचे तुषार भारतीय, प्रशिक्षण पवन तांबट, गणेश विश्र्वकर्मा, नितेश मागरूळकर, प्रफुल डांगे यांचे सुध्दा मार्गदर्शन लाभत आहे.

            अमरावती जिल्ह्यातील 3 ही खेळाडूांचे  जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, विजय संतान, जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्था,एकविध खेळ संघटना, शारीरिक शिक्षण संघटना यांनी पुढील वाटचालीसाठी तसेच भविष्यात स्पर्धाकरीता शुभेच्छा देण्यात आल्या.

00000

--

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना लाभार्थ्याला 2 लाखाचा धनादेश वितरीत




 प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना

लाभार्थ्याला 2 लाखाचा धनादेश वितरीत

 

अमरावती, दि. 13 : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही मुदत स्वरुपाची विमा योजना आहे. कुटूंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात कुटूंबियांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागु नये यासाठी ही योजना राबविण्यात येते. त्यात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातुन नुकतेच पत्निचा आधार गमावलेल्या लाभार्थ्याला या योजनेअंतर्गत आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला. रायपुरच्या पांढरी येथील गजानन दवंगे यांना त्यांच्या पत्नि अलका दवंगे यांच्या मृत्यूपश्चात 2 लाख रुपये विम्याची रक्कम या योजनेअंतर्गत प्रदान करण्यात आली. श्री दवंगे वार्षिक 456 रुपये हफ्ता अदा करत होते. त्यांच्या विम्याची रक्कम दोन लाख रुपये असुन धनादेश स्वरुपात देण्यात आली.

स्टेंट बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक संजोग भागवतकर यांनी श्री दवंगे यांना 2 लाख रुपयांचा धनादेश वितरीत केला. यावेळी सहायक महाप्रबंधक प्रवीणकुमार, मुख्य प्रबंधक लीलाधर नेवारे, प्रबंधक अमोल चावरे, कौस्तूभ राऊत, मीनाक्षी अबरुक आदी उपस्थित होते.

या योजनेअंतर्गत विमा धारकांना दरवर्षी 330 रुपये किंवा त्याहुन अधिक विमा भरावा लागतो. 330 रुपयांच्या प्रिमियमवर 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. विमाधारक व्यक्तिचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास दाव्याची 2 लाख रुपयांची रक्कम कुटूंबियांना दिली जाते. ही योजना एलआयसी मार्फत सुरु करता येत असून बॅकेत देखील याबाबतची माहिती घेता येते. 18 ते 50 वर्ष वयोगटातील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी बॅकेत खाते असणे गरजेचे आहे, अशी माहिती श्री नेवारे यांनी दिली.

0000000

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी -जिल्हाधिकारी पवनीत कौर

                 


       

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी

-जिल्हाधिकारी पवनीत कौर

 

अमरावती दि. 13 : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना ही महत्त्वाकांक्षी योजना शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे . या योजनेच्या 16 हजार 193 लाभार्थ्यांची यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी त्वरित आपले आधार प्रमाणीकरण करून घ्यावे,असे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे .

            बँकांनी योजनेच्या पोर्टलवर अपलोड केलेल्या माहितीचे ऑनलाइन प्रणालीद्वारे संस्करण करून पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली आहे. या याद्या संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, विविध कार्यकारी संस्था कार्यालय , संबंधित बँक शाखा, तहसीलदार कार्यालय , सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालय या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

            पात्र लाभार्थ्यांच्या यादीमध्ये समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्र’ येथे भेट देऊन आपल्या विशिष्ट क्रमांकाच्या अनुषंगाने कर्ज खात्याचा आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी जाताना आपले आधारकार्ड, विशिष्ट क्रमांक, बँक पासबुक अशी आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावी. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र संचालकामार्फत लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. आधार प्रमाणीकरण करताना लाभार्थ्यांना अडचणी येत असल्यास, त्याबाबत ऑनलाईन तक्रार प्रणालीद्वारे पोर्टलवर आपली तक्रार दाखल करता येईल.

लाभार्थ्यांना त्यांचा विशिष्ट क्रमांकासमोर नमूद आधार क्रमांक, तसेच लाभाची रक्कम अमान्य असल्यास ऑनलाइन प्रणालीद्वारे जिल्हास्तरीय समितीकडे तक्रार दाखल करता येईल. लाभार्थ्यांना त्यांच्या अंगठ्याचे ठसे येत नसल्यास अथवा आधार प्रमाणीकरण करणे शक्य होत नसल्यास त्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे तालुकास्तरीय समितीकडे तक्रार दाखल करता येईल.

            जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समितीकडे दाखल केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यांच्या तक्रारी या ऑनलाइन पद्धतीने निकाली काढण्यात येतील. बँकांनी अपलोड केलेल्या माहितीप्रमाणे योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र लाभार्थ्यांच्या याद्या नजीकच्या काळात प्रसिद्ध करण्यात येणार असून योजनेच्या निकषानुसार पात्र असणारा कोणताही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी दिली आहे.

00000

Tuesday, October 11, 2022

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जिल्हा पुरस्कार योजनेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज आमंत्रित

 जिल्हा उद्योग केंद्रामार्फत

जिल्हा पुरस्कार योजनेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज आमंत्रित

 

अमरावती, दि. 11 (जिमाका) : उद्योग संचालनालयामार्फत लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा पुरस्कार योजना 2022 साठी पात्र उद्योजकांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी पात्र उद्योजकांनी 31 ऑक्टोबरपूर्वी जिल्हा उद्योग केंद्रात अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापकांनी केले आहे.

लघु उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली आहे. अर्जाचा विहित नमुना महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, अमरावती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत विनामुल्य उपलब्ध आहे.

जिल्हा पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी लघु उद्योजकांनी काही अटींची पुर्तता करणे आवश्यक आहे. यानुसार लघु उद्योग घटक हा जिल्हा उद्योग केंद्रात 1 जानेवारी 2019 पुर्वी स्थायी नोंदणी / उद्योग आधार नोंदणी झालेला असावा. मागील तीन वर्षात सलग उत्पादन करणारे लघु उद्योग घटक या योजनेसाठी पात्र ठरतील. उद्योग घटक कुठल्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच महिला उद्योजकास यास विशेष गुण दिले जातील. यासाठी जास्तीत जास्त लघु उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.  

00000

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत एकदिवसीय बदल

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सवानिमित्त

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीत एकदिवसीय बदल

 

अमरावती दि. 11 (जिमाका) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 54 वा पुण्यतिथी महोत्सव शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी मोझरी येथील गुरुदेव नगर येथे साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त दरवर्षीप्रमाणे मौन श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे एक ते दीड लाख भक्तगण समाधीस्थळी जमतात. या कार्यक्रमादरम्यान होणारी गर्दी पाहता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतुक व्यवस्थेत एकदिवसीय बदल करण्यात आला आहे. यानुसार अमरावतीकडून तिवसा तालुक्यातील मोझरी - गुरुदेव नगर मार्गे नागपूरकडे जाणारी वाहतूक (एसटी बसेस, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन वगळून) नांदगाव पेठ पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून मोर्शीमार्गे नागपूरकडे वळविण्यात येत आहे.

            नागपूरकडून अमरावतीकडे येणारी वाहतूक (एसटी बसेस, रुग्णवाहिका व अग्निशमन वाहन वगळून) तिवसा शहरातील पंचवटी चौकातून कुऱ्हा मार्गे अमरावतीकडे वळविण्यात येत आहे. ही वाहतूक व्यवस्था दि. 14 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत वरील मार्गाने वळविण्यात येत आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द मोटार वाहन कायदा व मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाअधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

00000

तात्पुरते फटाका दुकानांना परवाना देण्यासाठी नियमावली जाहिर

 तात्पुरते फटाका दुकानांना

परवाना देण्यासाठी नियमावली जाहिर

 

अमरावती, दि. 11 (जिमाका) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाके दुकानांसाठी तात्पुरता परवाना देण्याचे अधिकार उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. विस्फोटक अधिनियम व नियमांचे पालन करुनच परवाने वितरित करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

त्यानुसार तात्पुरते फटाके दुकाने यांचेकडील दुकानांमध्ये फटाके ठेवण्यासाठी लाकडी साहित्य तसेच कापडी पडद्यांचा वापर करण्यात येऊ नये. फटाके दुकानांमध्ये सुरक्षित अंतरावर ठेवावी. जेणेकरुन आग लागण्याच्या दुर्घटनांवर वेळीच प्रतिबंध करता येईल. फटाके सुरक्षित आणि ज्ज्वलनशील नसलेल्या सामग्रीच्या शेडमध्ये ठेवण्यात यावे. फटाके विक्रीसाठी असलेली तात्पुरती दुकाने ही एकमेकांपासून तीन मीटर अंतरावर आणि संरक्षित ठिकाणांपासून 50 मीटर अंतरावर राहतील, याची दक्षता घ्यावी. फटाके विक्रीसाठी असलेली तात्पुरती दुकाने समोरासमोर लावण्यात येऊ नये.

तात्पुरते फटाके दुकानांमध्ये प्रकाशासाठी कोणत्याही प्रकारचे तेल दिवे, गॅस दिवे अथवा उघडे असलेले विद्युत दिवे लावण्यात येऊ नये. जर कोणत्याही विद्युत वाहिनीचा उपयोग करण्यात आला असेल तर तो भिंतीव्दारे किंवा छतावर लावण्यात यावे. उघड्यावर विजेच्या तारा लोंबकळत असू नये. अशा विजेच्या दिव्यांसाठी लागणारे स्विच हे भिंतीवर लावण्यात यावे तसेच अशी विद्युत वाहिनी जर एकाच रांगेतील दुकानासाठी असेल तर त्यासाठी मास्टर स्विच लावण्यात यावे. फटाके दुकानांच्या 50 मीटर परिसरामध्ये फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. कोणत्याही ठिकाणी एका जागेवर एकाच ठिकाणी पन्नासपेक्षा अधिक फटाके विक्री दुकाने यांना परवाना देण्यात येऊ नये. तसा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी विवेक घोडके यांनी निर्गमित केला आहे.

00000

Monday, October 10, 2022

सर्व आस्थापनांनी ई-आर 1 विवरण सादर करावे

 सर्व आस्थापनांनी ई-आर 1 विवरण सादर करावे

          अमरावती, दि. 10 : कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्या कडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत. या सुविधा ऑनलाईन मिळणार असून त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. तसेच उद्योजक / आस्थापना यांनी सेवायोजना कार्यालय (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणार) कायदा 1959 व नियमावली 1960 कलम 5 (2) अन्वये त्रैमासिक ई- आर 1 ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे.  सप्टेंबर 2022 अखेर संपणाऱ्या त्रैमासिक करिता ई- आर 1 या प्रपत्राची माहिती वरील संकेतस्थळावर सर्व शासकीय,निमशासकीय,खाजगी उद्योजक,आस्थापना यांनी त्यांचे युजर आयडी व पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून ऑनलाइन सादर करावयाची आहे. व त्याबाबतचे प्रमाणपत्र संकेतस्थळावरून प्राप्त करून घ्यावयाचे आहे. ऑनलाइन ई- आर 1 सादर करताना काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा दूरध्वनी क्र. 0721- 2566066 या क्रमांकावर संपर्क साधावा. ई आर 1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर  आहे. ई-आर 1 ऑनलाइन सादर न करणाऱ्या कसुरदार आस्थापनावर विहीत नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे याची कृपया नोंद घेण्यात यावी, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रफुल एस. शेळके यांनी केले आहे.

0000

बेरोजगार युवक युवतींना नामांकित कंपनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

 


बेरोजगार युवक युवतींना नामांकित

कंपनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी

अमरावती, दि. 10 (जिमाका) : सुशिक्षित उमेवारांना शासकीय नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यामुळे खाजगी क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधीचा शोध घेऊन बेरोजगारांना त्या उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, गाडगे नगर, व्ही.एम.व्ही. रोड, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी महाराष्ट्र स्टार्ट अप, रोजगार व उद्योजकता सप्ताह निमित्त पंडीत दिनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवार दि. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, गाडगे नगर, व्ही.एम.व्ही. रोड, अमरावती येथे करण्यात आले आहे.

या मेळाव्यामध्ये उमेदवारांची मुलाखतीव्दारे प्राथमिक निवड होणार असून अंदाजित 1094 पदे उपलबध आहेत. सदर मेळाव्यामध्ये लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अमरावती या उद्योजक कंपनीसाठी इन्शुरन्स ॲडव्हायझर एकुण 100 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता एस.एस.सी. व वयोमर्यादा 18 ते 45 आहे.

नवभारत फर्टिलायझर प्रा.लि. नागपूर या उद्योजक कंपनीसाठी सेल्स ट्रेनी एकुण 31 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता पॉलिटेक्निक डिप्लोमा/पॉलिटेक्निक पदवी/एस.एस.सी./एच.एस.सी./पदवीधर व वयोमर्यादा 18 ते 45 आहे. तसेच सेल्स एच.आर आणि रिक्रुटमेंट ऑफिसर एकुण 2 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता एम.बी.ए./एम.एस.डब्लू/बी.एस.डब्लू व वयोमर्यादा 22 ते 45 आहे. व मार्केट डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह एकुण 5 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता ॲग्रीकल्चर डिप्लोमा/ॲग्रीकल्चर पदवी व वयोमर्यादा 21 ते 45 आहे. ज्युनिअर अकाऊंटंट एकुण 5 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता बी.कॉम. पदवी व वयोमर्यादा 21  ते 45 आहे.

धुत ट्रान्समिशन प्रा.लि. औरंगाबाद या उद्योजक कंपनीसाठी ई.पी.पी. ट्रेनी एकुण 100 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता एस.एस.सी./एच.एस.सी./पदवीधर/डिप्लोमा व वयोमर्यादा 18 ते 28 आहे.

गोल्डन फायबर लि. अमरावती या उद्योजक कंपनीसाठी वर्कर एकुण 100 पदांपैकी स्त्रीसाठी 100 पदे व पुरुषकरीता 50 पदे उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता दहावी पास/नापास व वयोमर्यादा 25 ते 35 आहे.

रुचा इंजिनियरिंग प्रा.लि. औरंगाबाद या उद्योजक कंपनीसाठी टर्नर, वेल्डर, फिटर एकुण 75 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर, आय.टी.आय. (टर्नर, वेल्डर, फिटर) व वयोमर्यादा 18 ते 28 आहे.

इंण्डोरन्स टेक्नॉलॉजी, औरंगाबाद या उद्योजक कंपनीसाठी टर्नर, वेल्डर, फिटर एकुण 75 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर, आय.टी.आय. (टर्नर, वेल्डर, फिटर) व वयोमर्यादा 18 ते 28 आहे.

बडवे इंजिनियरिंग प्रा.लि. औरंगाबाद या उद्योजक कंपनीसाठी टर्नर, वेल्डर, फिटर एकुण 75 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर, आय.टी.आय. (टर्नर, वेल्डर, फिटर) व वयोमर्यादा 18 ते 28 आहे.

महिंन्द्रा ॲन्ड महिंन्द्रा प्रा. लि. औरंगाबाद या उद्योजक कंपनीसाठी टर्नर, वेल्डर, फिटर एकुण 75 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, डिप्लोमा, पदवीधर, आय.टी.आय. (टर्नर, वेल्डर, फिटर) व वयोमर्यादा 18 ते 28 आहे.

रेडियंट सुपरस्पेशालिटी  हॉस्पिटल सावन्स हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड, अमरावती या उद्योजक कंपनीसाठी नर्सिंग एकुण 6 पदे स्त्रीयांसाठी उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता बी.एस.सी./जी.एन.एम. व वयोमर्यादा 18 ते 40 असून अटेंडन्स एकुण 5 पदे पुरुषांसाठी उपलब्ध असून शैक्षणिक पात्रता बी.एस.सी./जी.एन.एम. वयोमर्यादा 18 ते 30 आहे.

पी.जी. इलेक्ट्रॉनिक्स, पुणे या उद्योजक कंपनीसाठी असेम्बली ऑपरेटर एकुण 50 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, आय.टी.आय. व वयोमर्यादा 18 ते 35 आहे.

फ्रटलाईन ग्रृप ऑफ कंपनीज, पुणे या उद्योजक कंपनीसाठी ड्रायवर एकुण 50 पदे स्त्री/पुरुषकरीता उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 8 वी पास व वयोमर्यादा 18 ते 40 आहे.

थिंजी एच.प्रा. आर. अमरावती लि. या उद्योजक कंपनीसाठी सेविंग मशीन ऑपरेटर एकुण 100 पदे स्त्रीयांसाठी उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, आय.टी.आय. व वयोमर्यादा 18 ते 30 आहे.

टेक्नोक्राफ्ट प्रा.लि. अमरावती या उद्योजक कंपनीसाठी वेल्डर, इलेक्ट्रीशन एकुण 100 पदे स्त्रीयांसाठी उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, आय.टी.आय. (वेल्डर इलेक्ट्रीशन) व वयोमर्यादा 18 ते 26 आहे.

निल मेटल प्रा.लि. (जे.बी.एस.ग्रृप, चाकण) या उद्योजक कंपनीसाठी ट्रेनी एकुण 90 पदे पुरुषांसाठी उपलब्ध्य असून शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, आय.टी.आय. (वेल्डर, फिटर) व वयोमर्यादा 18 ते 40 आहे.

दहावी, बारावी पदविधर, आय.टी.आय. (दोन वर्षाचे), पॉलिटेक्निक डिप्लोमा/पॉलिटेक्निक पदवी व इतर शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांनी www.rojgar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ज्या कंपनीकडे मुलाखत द्यावयाची आहे त्या कंपनीची निवड करुन ऑनलाईन अप्लाय करावा. जिल्ह्यातील सुशिक्षीत बेराजगार उमेदवारांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त, प्रफुल्ल शेळके, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी केले आहे.

00000

संत्रा फळबागधारकांना सहभागासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

 संत्रा फळबागधारकांना सहभागासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत 

आंबिया बहारासाठी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

अमरावती, दि. 10 - विभागातील पाचही जिल्ह्यांत आंबिया बहारासाठी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येत आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी बांधवांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. नुकसानीच्या परिस्थितीत आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी अधिकाधिक शेतकरी बांधवांनी योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी केले आहे.

यंदा आंबिया बहारासाठी संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष, प्रायोगिक तत्वावर स्ट्रॉबेरी व पपई या नऊ फळपीकांसाठी विमा योजना लागू आहे. फळपीकासाठी २० हेक्टरहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र असलेल्या महसूल मंडळांना अधिसूचित करून ही योजना राबवली जाते. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षण लागू होते. त्यानुसार फळपिकाचे उत्पादनक्षम वय संत्रा व मोसंबी पीकाचे ३ वर्ष, डाळिंब व द्राक्ष पिकाचे २ वर्ष व आंबा पिकाचे ५ वर्ष असणे आवश्यक आहे. 

अमरावती, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी, अकोला जिल्ह्यासाठी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. व बुलडाणा जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी  नियुक्त करण्यात आली आहे.

                       संत्रा फळबागधारकांना सहभागासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

संत्रा फळपीकासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांचा समावेश आहे. संत्र्यासाठी प्रतिहेक्टर विमा संरक्षित रक्कम नियमित हवामान धोक्यासाठी 80 हजार रू., तर गारपीटीसाठी 26 हजार 667 रू. असून, हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 6 ते 14 हजार आणि गारपीटीसाठी 1 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. संत्रा फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 30  नोव्हेंबर आहे.

मोसंबीसाठी बुलडाणा, अमरावती व अकोला या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. मोसंबीसाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 80 हजार रू. व गारपीटीसाठी  26 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 4 हजार आणि गारपीटीसाठी 1 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. मोसंबी फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे.

डाळिंबासाठी बुलडाणा, वाशिम व अकोला या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. डाळिंबासाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 1 लाख 30 हजार रू. व गारपीटीसाठी  43 हजार 333 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर साडेसहा हजार ते 28 हजार 600 रू., आणि गारपीटीसाठी 2 हजार 167 रू. हप्ता भरावयाचा आहे. डाळिंब फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 14 जानेवारी आहे.

केळीसाठी बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. केळीसाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 1 लाख 40 हजार रू. व गारपीटीसाठी  46 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 7 हजार ते 9 हजार 100 रू., आणि गारपीटीसाठी 2 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. केळी फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे.

 

आंब्यासाठी बुलडाणा व वाशिम या 2 जिल्ह्यांचा समावेश आहे. आंब्यासाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 1 लाख 40 हजार रू. व गारपीटीसाठी  46 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 15 हजार 400 ते 16 हजार 100 रू., आणि गारपीटीसाठी 2 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. आंबा फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे.

द्राक्षासाठी केवळ  बुलडाणा जिल्ह्याचा समावेश आहे. द्राक्षासाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 3 लाख 20 हजार रू. व गारपीटीसाठी  1 लाख 6 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 16 हजार रू., आणि गारपीटीसाठी 5 हजार 333 रू. हप्ता भरावयाचा आहे. द्राक्ष फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर आहे.

 

पपईसाठी अमरावती व वाशिम या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. पपईसाठी प्र. हे. विमा संरक्षित रक्कम हवामान धोक्यासाठी 35 हजार रू. व गारपीटीसाठी  11 हजार 667 रू. आहे. हवामान धोक्याबाबत शेतक-याने भरावयाचा विमा प्रति हेक्टर 1 हजार 750 रू., आणि गारपीटीसाठी 583 रू. हप्ता भरावयाचा आहे. पपई फळबागधारकांसाठी योजनेत सहभागाची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर आहे.

 

 

 

 

या योजनेत अधिसूचित क्षेत्रातील कुळाने, भाडेपट्टीने शेती करणारा शेतक-यांसह सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.  एकापेक्षा अधिक फळपीकांसाठी सहभाग घेता येतो. एका वर्षात एका फळपिकासाठी एका क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामासाठी अर्ज करता येईल. एक शेतकरी चार हेक्टर मर्यादेत विमा संरक्षण घेऊ शकतो. आंबिया बहारातील फळपिकांची विमा नोंदणी करिता विमा पोर्टल(https://pmfby.gov.in)या संकेतस्थळास भेट द्यावी. सीएससी सेंटरमार्फत अर्ज करता येईल. रिलायन्स विमा कंपनीचा संपर्क क्र. (022) 68623005 व ग्राहक सेवा क्र. 1800 1024 0888 असा आहे. एचडीएफसी ॲग्रो विमा कंपनीचा संपर्क क्रमांक (022)  62346234 व टोल फ्री क्रमांक 1800 266 0700 असा आहे. भारतीय कृषी विमा कंपनीचा संपर्क क्र. (022) 61710912 व टोल फ्री क्र. 1800 116 5515 असा आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन श्री. मुळे यांनी केले.

000

अनुदान तत्वावर मिनी ट्रॅक्टर मिळण्यासाठी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांसाठी योजना

अनुदान तत्वावर मिनी ट्रॅक्टर मिळण्यासाठी गटांनी अर्ज करण्याचे आवाहन

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांसाठी योजना


अमरावती, दि. 10 - अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या बचत गटांना अनुदान तत्वावर  साडेतीन लाख रू. मर्यादेत किमान 9 ते 18 अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व रोटाव्हेटर, ट्रेलर मिळण्यासाठी समाजकल्याण कार्यालयाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

योजनेत 90 टक्के शासकीय अनुदान व 10 टक्के स्वयंसहायता बचत गटाचा हिस्सा अशी तरतूद आहे. बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य, तसेच अध्यक्ष, सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील असावेत,  गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.  मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांची खरेदी मर्यादा साडेतीन लाख रू. असेल. या मर्यादेच्या रकमेच्या 10 टक्के (35 हजार रू.)  स्वहिस्सा गटाने भरल्यावरच उर्वरित 90 टक्के हिस्सा अर्थात कमाल 3.15 लाख रू. शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. प्राप्त अर्जांचा आढावा घेऊन लॉटरी पद्धतीने सोडत होईल.  यापूर्वी पॉवर टिलरचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

 इच्छूक गटांनी दि. 20 ऑक्टोबरपूर्वी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदूर रेल्वे मार्ग, अमरावती येथे संपर्क साधून विहित अर्ज  कार्यालयीन वेळेत सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

०००

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...