‘कॅच द रेन’
सर्व विभागांनी समन्वयाने जलशक्ती अभियान यशस्वी करावे
अमरावती, दि. 17 - जलशक्ती अभियानातून जलपुनर्भरण व जलस्त्रोतांचे संवर्धन करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन अभियानाचे संचालक विश्वजीत कुमार यांनी केले.
अभियानाच्या अंमलबजावणीबाबत आढावा घेण्यासाठी संचालक अमरावती दौ-यावर आहेत. त्यानिमित्त त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विविध विभागप्रमुखांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा व अनेक अधिकारी उपस्थित होते.
उपक्रमात ग्रामपंचायतींचा सहभाग मिळविणे आवश्यक आहे. पाण्याचे दुर्भिक्ष दूर करण्यासाठी जलपुनर्भरण व जलस्त्रोतांचे संवर्धन गरजेचे असून, सर्व विभागांनी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी विविध उपक्रमातून अभियान यशस्वी करावे, असे आवाहन विश्वजीत कुमार यांनी केले. जिल्हाधिकारी श्रीमती कौर, श्री. पंडा यांनीही मनोगत व्यक्त केले. संचालक श्री. कुमार हे उद्या कोलकास, वडाळी, चिरोडी आदी ठिकाणी भेट देऊन तेथील कामांची पाहणी करणार आहेत.
०००
No comments:
Post a Comment