वरुड-टेंभुरखेडा-गव्हाणकुंड-बहादा-मांगरुळी-हातुर्णा रस्त्याचे भूमिपूजन शेतकरी बांधवांनी गट शेतीकडे वळावे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे





अमरावती, दि. १० :  शेतीच्या विकासासाठी गटशेती ही काळाची गरज असून, त्याकडे शेतकऱ्यांनी वळावे. गटशेतीमुळे एकत्रित , संघटित व्यवसायाचे लाभ मिळतात व शासनाचे  अनुदान व सवलतीचाही लाभ मिळतो, असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज गव्हाणकुंड येथे केले.
      वरुड-टेंभुरखेडा-गव्हाणकुंड-बहादा-जरुड-मांगरुळी-काचुर्णा-नांदगांव-हातुर्णा या १४५ कोटी ३२ लक्ष रुपयांच्या रस्ता बांधकामासह एकुण १४७ रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन राज्याचे कृषिमंत्री डॉ. बोंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
डॉ. बोंडे म्हणाले की, विविध उपक्रमांतून गव्हाणकुंड गावात अनेक विधायक बदल घडून आले. गव्हाण कुंडला ब वर्ग दर्जा मिळून २ कोटी रुपये मिळाले. सौर ऊर्जा प्रकल्प आला. लवकर हे काम सुरू होईल. शेकदरी धरणावरून पाईपलाईनने शेतापर्यंत पाणी जाईल. जिल्ह्याला २०० पॅक हाऊस लक्ष्यांक आहे. त्याचा लाभ अनेकांना मिळेल. 
हातूरणापासून ते टेंभुरखेडा वरुड रस्ता हायब्रीड ऍनुईटीतुन तयार होत आहे. आता शेतकरी बांधवांनी उद्योगप्रवण होणे गरजेचे आहे. त्यासाठी गटशेती हा योग्य मार्ग आहे. संघटित व्यवसायाचे लाभ त्यातून मिळतात. झपाट्याने विकसित होत असलेली नागपूर सारखी बाजारपेठ नजिक आहे. त्यामुळे
शेतीमालावर प्रक्रिया करून चांगला माल चढ्या भावाने विकता येईल. शासकीय मत्स्य विज्ञान महाविद्यालय, प्रॉम कारखाना, संत्रा प्रकल्प असे विविध प्रकल्प परिसरात आकारास येत आहेत.
          शेतकरी बांधवांसह शेतमजूर बांधवांसाठी विमा,शिक्षण, आरोग्य योजना कृषी विभागाकडून राबविण्याचे नियोजन आहे,  असे ही त्यांनी सांगितले.  सरपंच सुमित्रा ताई मुरूमकर यांच्यासह
प्रगती महिला संघाच्या महिला सदस्य उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती