Tuesday, October 31, 2017

अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आजपासून जिल्हा दौरा
अमरावती, दि. 31 : अनुसूचित जमाती कल्याण समिती उद्या दि. 1 पासून दि. 3 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा दौ-यावर आहे. या दौ-यात अनुसूचित जमातीसाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणांकडून राबविण्यात येणा-या योजनांबाबत आढावा घेतला जाणार आहे.
समितीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 1 नोव्हेंबरला शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजनांबाबत अनौपचारिक चर्चा होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक कार्यालय, शिवाजी शिक्षण संस्था, जिल्हा परिषद व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आदी ठिकाणी समितीचे सदस्य जाऊन तेथील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी-कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी आदी बाबींची माहिती घेतील.
दि. 2 नोव्हेंबरला समितीचे सदस्य प्रकल्प कार्यालयांतर्गत येणा-या जिल्ह्यातील विविध आश्रमशाळा, वसतिगृहे व यंत्रणानिहाय कामांना भेटी देऊन योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती घेतील.
दि. 3 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता अमरावती महापालिकेत अनुसूचित जमातीच्या पदांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणीबाबत चर्चा होईल.  त्यानंतर दु. 2 वाजता जिल्ह्यातील विविध यंत्रणांना दिलेल्या भेटीच्या अनुषंगाने आढळलेल्या त्रुटी व उपाययोजना याबाबत सर्व अधिका-यांची आढावा बैठक घेतली जाणार आहे.
                   000
पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांचा ‘एकता दौड’मध्ये सहभाग
       राष्ट्रीय एकतेसाठी धावले अमरावतीकर
अमरावती, दि. 31 : राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त आज शहरात शासकीय कार्यालयांसह विविध संस्था- संघटनांतर्फे एकता दौड काढण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनीही विविध ठिकाणी उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग घेतला.
  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने रन फॉर युनिटी’ हा उपक्रम जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांमध्ये आबालवृद्ध उत्साहाने सहभागी झाले होते. राजकमल चौक येथून श्री. पोटे- पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी  दाखवून एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला.
देशाची अखंडता राखण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच आज त्यांना अभिवादन म्हणून संपूर्ण देशभरात रन फॉर युनिटी’ दौड आयोजित केली जात आहे.  देशाची अखंडता, एकात्मता चिरंतन आहे, असाच संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जात आहे, असे श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फेही एकता दौड काढण्यात आली. शहरांतील विविध शाळा- महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला.
विभागीय क्रीडा संकुल येथे प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. सतीश पहाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडचा शुभारंभ केला. क्रीडा अधिकारी रमेश बुंदिले, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक वैशाली घोम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला.  
00000
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ
अमरावती, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन कार्यक्रम झाला. राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सर्व अधिकारी- कर्मचा-यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ यावेळी घेतली.
अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावणे व इतर कर्मचा-यांनीही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
                            00000

एकता दौड’मध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

अमरावती, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आज एकता दौड काढण्यात आली. शहरांतील विविध शाळा- महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला.
विभागीय क्रीडा संकुल येथे प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. सतीश पहाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडचा शुभारंभ केला. क्रीडा अधिकारी रमेश बुंदिले, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक वैशाली घोम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला.  
00000

Monday, October 30, 2017

दीपावली मिलना’निमित्त पालकमंत्र्यांचा नागरिकांशी संवाद
सामाजिक सलोख्याचे प्रभावी माध्यम
-           पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

अमरावती, दि. 30 : ‘दीपावली मिलन’ हे समाजातील विविध स्तरांतील नागरिकांशी संवाद साधत समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी येथे केले. 
श्री. पोटे-पाटील यांच्या निवासस्थानी  दीपावलीनिमित्त स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांनी दीपावलीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. आमदार अनिल बोंडे यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. समाजात विधायक कार्य करणा-या कार्यकर्ते, नागरिकांचा गौरव यावेळी करण्यात आला.  यावेळी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले हो

Saturday, October 28, 2017

सहकारातून सामाजिक बांधीलकी जोपासावी
-पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील
अमरावती  28:- सहकार चळवळीचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. सहकाराची व्याप्ती अधिक वाढवत गरजू वर्गासाठी विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जोपासावी, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.  
            सहकारी भारतीचे संस्थापक लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेतर्फे प्रशिक्षण व अधिवेशन अभियंताभवनात घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, आमदार सुनील देशमुख, सहकारी भारतीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष आशिष चौबीसा, दादारावजी भडके, निवेदिता दिघडे आदी उपस्थित होते.
श्री. पोटे- पाटील म्हणाले की, राज्यात सहकार क्षेत्राची व्याप्ती सर्वदूर आहे. या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वसामान्य  नागरिकांशी जनसंपर्क वाढवत सहकारी बँका व सोसायट्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत. याच भावनेतून मी पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना आवाहन करत असतो. या माध्यमातून सायकल, कपडे, पुस्तके आदी वस्तू अनेक गरजू लोकांपर्यंत पोहोचविणे शक्य झाले आहे.  समाजातील वंचित घटकांप्रती संवेदनशीलता ठेवून प्रत्येकाने काम केले पाहिजे. असे सामाजिक कार्य सहकार क्षेत्रातील मंडळींनी मिशन म्हणून राबवले पाहिजे, असेही ते म्हणाले.
       श्री. चरेगांवकर म्हणाले की,  सहकार क्षेत्राच्या विकासासाठी मनुष्यबळ व्यवस्थापनावर भर देण्यात येत आहे. सहकारी बँका व सोसायट्यांमधील संचालक व कर्मचाऱ्यांना सर्व ठिकाणी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  रमेश टेंभरे यांनी सूत्रसंचालन केले.  
00000 


Friday, October 27, 2017


                                                                                 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण
                                             -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी कोटीचा निधी प्राप्त

अमरावती 27- भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या कोटींच्या निधीतून करण्यात येत आहेकाम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी स्मारक व डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईलअशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी दिली.
शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केलीयावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवारबौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्री.आकोडेतायडेशहारेपालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकरनगरसेवक दिनेश बुबआर्कीटेक्चर श्रीखंडारकरकंत्राटदार श्रीअग्रवाल आदी उपस्थित होते.
            प्रारंभी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांनी भिमटेकडीला भेट दिलीतेथील परिसराचीबांधकामाची पाहणी त्यांनी केलीसदर वास्तुचे सद्यस्थितीत 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली. भिमटेकडीची उर्वरित स्थापत्य कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीअसे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेभिमटेकडी येथील वास्तू तयार झाल्यावर या पवित्र स्थळाची पवित्रता कायम राहील यासाठी संस्थेने व नागरिकांनी दक्षता घ्यावीहा परिसर रमनिय व सुंदर होण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावावीतविद्यार्थ्यांना या स्मारकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासाठी नवीन उपक्रम राबवावाअसेही त्यांनी यावेळी सांगितले
त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी शिवटेकडीला भेट दिली. शिवटेकडीच्या परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची पाहणी त्यांनी केलीपरिसरातील जलशुध्दीकरण पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करावेअसे आदेश त्यांनी यावेळी दिलेभिमटेकडी आणि शिवटेकडीच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच आवश्यक सोयी-सुविधांकरीता आराखडा तयार करण्यात यावाअशा सूचनाही त्यांनी मनपा प्रशासनाला दिल्याशहर सौंदर्यीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीअसेही त्यांनी यावेळी सांगितले
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी मागील वर्षी भिमटेकडीची पाहणी केली होतीत्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला होतात्यांच्या या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही पवित्र स्थळांच्या विकासाकरीता कोटी 42 लाख रुपये निधी 11 ऑक्टोंबर रोजी मंजूर झाला आहे.सदर निधी महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला असून प्राप्त निधीतून दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येईलया दोन्ही पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून कोटी 57लाख रुपयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होतीत्यापैकी टप्प्याने टप्प्याने हा निधी मनपा प्रशासनाला मिळाला आहे.
******



 डिजीटल ग्राम हरिसालमधील सुविधांबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा
सुविधांत वाढ व्हावी            
  जिल्हाधिकारी अभिजित बांगर
अमरावती, दि. 27 : देशातील पहिले ‘डिजीटल ग्राम’ हरिसाल येथे अद्ययावत व्यायामशाळा उभारण्यासह स्वच्छता व इतर विविध सुविधांत वाढ करण्याबाबत प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.
हरिसाल येथील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. टाकसाळे, आरोग्य अधिकारी श्री. आसोले, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रफुल्ल कणाके, ‘खोज’च्या पौर्णिमा उपाध्याय, ‘मायक्रोसॉफ्ट’च्या श्रिया रंगराजन व गणेश येवले आदी उपस्थित होते.  
          श्री. बांगर म्हणाले की, हरिसालमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून 885 बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक ग्राहकांना रुपे कार्डही देण्यात आले आहे. गावातील उर्वरीत नागरिकांचीही खाती उघडावीत. तसेच, एटीएम वापराबाबत कार्यशाळा घ्यावी.   रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा. शिबिर घेऊन सर्वांची आधारकार्ड नोंदणी पूर्ण करावी. गावात अद्ययावत व्यायामशाळा व शाळेलगत वाचनालय सुरु करावे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा वाढविण्यात याव्या, तसेच नेत्र तपासणी शिबीरे नियमित घ्यावी, असेही ते म्हणाले. 
ते पुढे म्हणाले की, हरिसालसह मेळघाट परिसरातील कृषी अधिकारी, सहायक यांनी तेथील शेतक-यांच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष शेतात पाहणी करुन मार्गदर्शन केले पाहिजे. हरिसालच्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून नागरिकांना पावत्या दिल्या जात नसल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी, तसेच डिजीटल शिधापत्रिकेचा प्रभावी वापर व्हावा, असे निर्देश त्यांनी जिल्हा पुरवठा अधिका-याला दिले.  
हरिसालमध्ये ‘मायक्रोसॉफ्ट’तर्फे स्वच्छता अभियानात ओल्या कच-यापासून खत निर्मिती केली जाते. तथापि, प्लास्टिक पिशव्या आदीच्या विल्हेवाटीसाठी, तसेच ग्रामोद्योग उपक्रमासाठी  वनविभागाकडून काही जागा हस्तांतरित करण्याबाबत प्रस्ताव द्यावा, असेही निर्देश त्यांनी दिले.  
00000

Monday, October 23, 2017

माध्यमांचा अंकूश महत्वाचा
                                                     - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 अमरावती, दि. 23- लोकशाहीतील सरकार निरंकुश असणे योग्य ठरत नाही, म्हणूनच माध्यमांच्या अंकुशाचे महत्त्व मोठे आहे. सरकार माध्यमांना सर्वोतोपरी सहकार्य करत असले तरी त्यामागे निरपेक्ष कर्तव्याची भावना आहे. सरकार सरकारचे कर्तव्य करीत आहे. माध्यमांनी माध्यमांचे कर्तव्य बजावत राहावे. प्रत्येक कर्तव्यामागे स्वहिताची नव्हे तर समाजहिताची आणि देशहिताची भावना असली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
           अमरावती येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे उदघाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित पत्रकार भवन लोकार्पण सोहळयाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार आनंदराव अडसुळ, आमदार सर्वश्री डॉ. सुनिल देशमुख, डॉ. अनिल बोंडे, यशोमती ठाकूर यांची उपस्थिती होती. महानगर पालिकेचे आयुक्त हेमंत पवार, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, सकाळ व साम टीव्हीचे समूह संपादक राहुल गडपाले, उद्योजक नरेंद्र भाराणी, अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल आदी यावेळी व्यासपीठावर होते.
            मुख्यमंत्री म्हणाले की, पत्रकारितेत अनेक बदल झाले असून या बदलांच्या आव्हानांचा सामना करीत माध्यमे समाजहिताचे कार्य करीत आहेत. त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरु राहण्यासाठी माध्यमांच्या स्वातंत्र्याला शासनाची नेहमीच पाठिंब्याची भूमिका राहिली आहे. शासनाचे विविध लोकोपयोगी निर्णय जनतेपर्यंत पोहचवावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
           अमरावती जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, या जिल्ह्याने राज्याला व देशाला अनेक चांगले पत्रकार दिले आहेत. स्वातंत्र्य चळवळीत येथील पत्रकारांचा वाटा मोठा आहे. एका अर्थाने अमरावती हे पत्रकारितेचे माहेरघरच म्हणावे लागेल. पत्रकार भवनाच्या नूतन वास्तूबद्दल बोलतांना ते म्हणाले की, या भवनात अद्यावत ग्रंथालय सुरु करावे, त्यासाठी निश्चितपणे सहकार्य केले जाईल.
            पत्रकारांसाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेतंर्गत राज्यातील विविध 500 रुग्णालयांतून त्यांना आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. पत्रकारांच्या पेन्शन योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे.  
             शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल बोलताना ते म्हणाले की, अत्यंत जलदगतीने तथा पारदर्शकपणे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. 15 नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रीया पूर्ण केली जाईल. कापसाची खरेदी ही आधार कार्ड नोंदणी करुनच केली जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव मिळेल, असेही त्यांनी सांगितले. अमरावती येथील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. विविध सरकारी योजना राबवतांना माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे शक्य होत आहे. त्याचा उपयोग जनतेला होत आहे. माध्यमांनी याची नोंद घेतली आहे आणि अजूनही अशी नोंद घेतली जावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
              पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील म्हणाले की, पत्रकारिता हा देशाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. नवीन पत्रकार भवनाचा पत्रकारांना निश्चितपणे लाभ मिळेल व त्यांच्या कार्याला चालना मिळेल. शासनाचे निर्णय पत्रकारांनी जनतेपर्यंत पोहोचवावेत.
              पत्रकारीता क्षेत्रात 40 वर्षांपासून अविरत सेवा देणारे जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे आणि दिलीप एडतकर यांना मुख्यमंत्री यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. यावेळी दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे, मनपा आयुक्त हेमंत पवार, माहिती व जनसंपर्क, नागपूर विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, सकाळ व साम टीव्हीचे समूह संपादक राहुल गडपाले, उद्योजक नरेंद्र भाराणी यांचाही सत्कार मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
                मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अनिल अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने पत्रकार व नागरिक उपस्थित होते.
                तत्पुर्वी  मुख्यमंत्री  यांनी शहरातील वालकट कंम्पाउंड येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे फित कापून उदघाटन केले. यावेळी त्यांनी भवनाची पाहणी करुन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक
                                     -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती, दि. 23 :  अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्र स्थापन करण्याबाबतच्या मागणी संदर्भात निश्चितच गांभिर्याने विचार करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
येथील ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार सुनील देशमुख, आमदार रणजित पाटील, आमदार अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे पदाधिकारी, जि.प. सदस्य यावेळी उपस्थित होते. प्रारंभी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या पदाधिकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्र स्थापन करण्याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री महोदयांना सादर केले.
            अमरावतीला इर्विन, डफरीन, सुपरस्पेशालिटी व टि.बी हॉस्पीटल अशी चार शासकीय हॉस्पीटल आहेत. या चारही हॉस्पीटलमध्ये 500 पेक्षा जास्त खाटा उपलब्ध आहेत. मेळघाटातील कुपोषण, शेतकरी आत्महत्या तसेच जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता अमरावती येथे शासकीय महाविद्यालय स्थापन होणे आवश्यक आहे. अमरावती शहरापासून 6-7 कि.मी. अंतरावर केंद्रीय विद्यापीठासाठी शासनाची जमीन उपलब्ध आहे. त्यातील 100 एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्राला देता येईल. महाविद्यालयाच्या स्थापनेतून जिल्ह्यातील गोर-गरीब रुग्णांची सेवा होईल. ग्रामीण व शहरी भागातून याबाबत मागणी असून सुमारे 100-150 संघटनांनी यासाठी पांठीबा दिला असल्याची माहिती कृती समितीचे संयोजन किरण पातुरकर यांनी मुख्यमंत्री महोदयांना दिली.
            यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, मनपा आयुक्त हेमंत पवार, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, पंजाबराव देशमुख रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पद्मामाकर सोमवंशी उपस्थित होते.

*****


शरद पवार राजकारणातील सुसंस्कृत, संवेदनशील व्यक्तिमत्व
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
* अमरावती येथे सर्वपक्षीय गौरव समारंभ
अमरावती, दि. 23 : शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला, असा दूरदृष्टीचा नेता घडायला मोठा कालावधी लागतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 50 वर्षांच्या संसदीय कार्याचा गौरव केला.
खासदार शरद पवार यांच्या संसदीय कार्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या मैदानावर सर्वपक्षीय नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्‍यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.
यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, खासदार आनंदराव अडसूळ, कमलताई गवई, आमदार सुनिल देशमुख, रवी राणा, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विकासासाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन निर्णय घेणारे व्यक्तिमत्व श्री. पवार यांच्या रूपाने आज महाराष्ट्रात आहे. पक्षभेद विसरून ते राज्य आणि देशाच्या विकासासाठी पाठिंबा देतात. राज्याच्या प्रगतीसाठी कोणते निर्णय घ्यावेत, याचे मार्गदर्शन श्री. पवार यांच्याकडून होत असते. राजकीय पक्षांमध्ये संवाद थांबतो, अशावेळी त्यांच्यात संवाद घडवून आणू शकेल, असे ते एकमेव नेते आहेत. समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांना योग्य मोबदल्यासाठी त्यांनी आंदोलन केले. तथापि महामार्गाला विरोध करू नका, असा सल्लाही शेतकऱ्यांना त्यांनी राज्यहितासाठी दिला. असा नेता प्रत्येक पक्षात असणे आवश्यक आहे.
श्री. पवार यांची शेतीशी असलेली निष्ठा त्यांनी स्वत:हून स्व‍िकारलेल्या कृषी खात्याच्या तत्कालीन जबाबदारीतून दिसून येते. या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे शेती क्षेत्राला दिशा मिळाली. राज्य फळबाग क्षेत्रात देशात अग्रेसर असण्याचे श्रेय त्यांनाच आहे. शेतीची उत्पादकता वाढावी यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. कृषी क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव संयुक्त राष्ट्रसंघाने केला आहे. शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान यावे, नवीन वाण यावे, यासाठी केलेले कार्य प्रशंसनीय असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना खासदार श्री. पवार म्हणाले, अमरावती शहराशी असलेल्या जुन्या ऋणानुबंधामुळे येथील सत्कार हा जुन्या आठवणींना उजाळा देणारा आहे. संत गाडगे महाराज, तुकडोजी महाराजांच्या सहवासामुळे त्यांच्या व्यक्त‍िमत्वाचा प्रभाव पडला. येथील भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी शेती व शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी मोठे कार्य केले. त्यांच्या कार्यामुळे अमरावती हे शिक्षणाचे माहेरघर झाले आहे. त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचण्यास मदत झाली आहे. अशा भूमीत सन्मान होणे भाग्याची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री श्री. पोटे-पाटील म्हणाले की, प्रत्येकाशी संवाद जिवंत ठेवणे हा श्री. पवार यांचा महत्वाचा गुण आहे. त्यांची सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत व विकासासाठी ते सतत सहकार्य करतात.
 खासदार श्री. अडसूळ, डॉ. राजेंद्र गवई, वसुधाताई देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात श्री. पवार यांच्या संसदीय कार्याचा गौरव म्हणून मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचवटी चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.
00000


Wednesday, October 18, 2017

दिवाळीपूर्वी कर्जमुक्ती प्रारंभ

शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे देऊन जिल्ह्यात कर्जमुक्ती प्रारंभ

कल्याणकारी योजनांतून ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट
                       -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

अमरावतीदि. 18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने  दिवाळीपूर्वी कर्जमुक्तीचा शब्द पूर्ण केला आहे. कर्जमुक्तीसह जलयुक्त शिवार, गटशेती आदी योजनांव्दारे  ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात जिल्ह्यातील 32 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र, वस्त्र, शाल-श्रीफळ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.  नियोजन भवनातील या कार्यक्रमास आमदार सुनील देशमुख, आमदार अनिल बोंडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
श्री पोटे-पाटील म्हणाले की, आजच्या दिवसाची सुवर्णाक्षरांत नोंद घेतली जाईल. कर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय दिवाळीपूर्वी अंमलात आला आहे.  कर्जमुक्तीसह विविध कल्याणकारी योजनांतून शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ऑनलाईन कर्जमाफीतून प्रक्रिया निर्दोष करुन खऱ्या गरजूंना लाभ देण्यात आला. अधिकाधिक शेतकऱ्यांच्या समावेशासाठी अल्प भूधारकांची अट काढण्यात आली. त्याचा लाभ होऊन ही योजना विस्तृत झाली. हा ऐतिहासिक निर्णय आहे.
आमदार श्री. बोंडे म्हणाले की, ही कर्जमाफी खऱ्या गरजूंची कर्जमुक्ती आहे. कर्जमुक्तीचा हा निर्णय शेती क्षेत्राच्या विकासासाठी व शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी महत्वाचा ठरला, अशी भावना अनेक शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली.
 यावेळी गौरविण्यात आलेल्या शेतकरी बांधवांची नावे पुढीलप्रमाणे : विजय श्रीरामजी आखरे (गोराळा ता. मोर्शी), मारोती गुलाबराव पांडे, बबन यशवंत सावरकर (नेरपिंगळाई, ता. मोर्शी), रमेश माणिकराव मोहोड, मुरलीधर शंकरराव मोहोड (माधान ता. चांदुरबाजार), पुरणजी आकाराम तायडे, श्रीमती नर्मदा ओंकारराव गांजरे (गणोजा देवी, ता. भातकुली), गजानन तुळशिराम शिरसाट (गौरखेडा, ता. भातकुली), श्रीमती शकुंतला प्रल्हादराव इंगळे (कोकर्डा, ता. अंजनगाव), श्रीमती लिलाबाई नाजुकराव काळपांडे(जवळा, ता. अंजनगाव), सुभाष अर्जुन काटकर (हरीजन खासपूर, अंजनगाव), यशवंत पुंडलीकराव दातीर, राजेंद्र शंकरराव शेवतकर (अंजनगाव बारी, ता. अमरावती), गोपाल कृष्णराव डांगे (धानोरा मा. ता. चांदुर रेल्वे), गजानन पांडुरंग अनासाने, श्रीमती कौशल्या नागारेाव वाढोणकर (आमला वि. ता. चांदुर रेल्वे), अनिल कृष्णराव भोगे (जवगाव आर्वी, ता. धामणगाव), निवृत्ती माधवराव मोलोदे (सोनेगाव, ता.धामणगाव ), सिदार्थ देविदास पाटील (तरोडा, ता. धामणगाव), सुरेंद्र  सुधाकर बोके (वरखेड, ता. तिवसा), व्दारकाबाई महादेवराव तिखे (शिरजगाव, ता. तिवसा), गोवर्धन रामराव बेलोकार (धोतरखेडा, ता. अचलपूर), केशवराव वासुदेवराव तत्ते (बोर्डी, ता. अचलपूर), बाळु तुकाराम सावरकर (बोपापुर, ता. अचलपूर), बाजीराव पायरुजी तायडे (नाचोना, ता. दर्यापूर), प्रल्हाद एकोजी गावंडे (जैनपुर, ता. दर्यापूर), वकीला बबन गावंडे (लोतवाडा, ता. दर्यापूर), मारोती लुनबाजी चामलोटे, रामकृष्ण विठ्ठल भुसारी (वाठोडा, ता. वरुड), विलास मनोहर चौधरी, भागवत राजाराम भड (गोरेगाव, ता. वरुड), हरीदास पुरुषोत्तम भड (करजगाव, ता. वरुड)
00000



Sunday, October 15, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात
 माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन

      अमरावती, दि. 15: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
          याप्रसंगी आमदार बच्चू कडू, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तसेच अधिकारी-कर्मचारी यांनीही पुष्प वाहून डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. डॉ. कलाम यांचा जन्मदिवस सर्वत्र वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त राज्य शासनातर्फे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.
००००

Friday, October 13, 2017

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या कामांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
 योजनेच्या कामांना गती द्यावी
-         जिल्हाधिकारी अभिजित बांगर
अमरावती, दि. 13 : लहरी हवामानामुळे शेती क्षेत्रावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील 356 गावांसह एकूण 532 गावे या योजनेत समाविष्ट असून, कृषी विभागाने या कामाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या जिल्ह्यात करावयाच्या कामांच्या नियोजनाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सत्यजीत ठोसरे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
          श्री. बांगर म्हणाले की, या प्रकल्पातून शेती समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.  शेतक-यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे व शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश आहे. यानुषंगाने शेतमालाच्या विपणनासाठी प्रभावी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय कृषी बाजाराच्या (ई-नाम) माध्यमातून अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे ई-व्यवहाराद्वारे शेतमाल विक्रीला अनेकविध पर्याय उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य व शेतक-यांपर्यंत विविध बाजारांतील दरांची माहिती वेळेत पोहचेल अशी समन्वय यंत्रणा निर्माण करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.    
 एकाच दिवशी झालेल्या जोरदार पावसाने काळी माती वाहून जाऊन नाल्यात साचण्याचा प्रकार काही ठिकाणी घडला. असे नाले जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून प्रवाहित करण्यात येतील, असेही ते म्हणाले.





                       प्रकल्पाची उद्दिष्टे
  • हवामान बदलास अनुसरून कृषी पद्धती विकसीत करणे
  • अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादकतेत वृद्धी करणे
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी मूल्य साखळीमध्ये त्याचा सहभाग वाढविणे

              प्रकल्पाचे घटक

  • क्षारपड व चोपण जमिनीचे व्यवस्थापन
  • संरक्षित शेती
  • पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत पद्धतीने वापर
  • भूजल पुनर्भरण
  • काढणी पश्चात व्यवस्थापन    
  • शेतकरी उत्पादक कंपन्यांना शेतीमालाचे संकलन, हाताळणी, मूल्यवृद्धी विक्री आदीबाबत सहाय्य
  • बियाणे वितरण प्रणालीची कार्यक्षमता वृद्धींगत करणे
  • पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे
  • पिकांचे हवामानाकुल वाण
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
  • शास्त्रीय निर्देशांकाचा वापर करून प्रकल्पांतर्गत समुह पद्धतीने गावांची निवड
  • महसूल मंडळनिहाय उभारणी करण्यात येणाऱ्या स्वयंचलित हवामान केंद्राकडून प्राप्त होणाऱ्या माहितीस अनुसरून शेतकऱ्यांना कृषी हवामान सल्ला
  • शिवारातील पाण्याच्या ताळेबंदानुसार पीक नियोजन
  • खारपाण पट्ट्यातील अकोला, अमरावती, बुलडाणा हे जिल्हे तसेच जळगाव जिल्ह्यातील  मुक्ताईनगर तालुका अशी एकूण 932 गावे.

00000

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...