फळपीक विमा योजनेत सहभागाचे आवाहन
अमरावती, दि. 3 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेनुसार हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहारातील संत्रा, मोसंबी, डाळींब, केळी, या फळपीकांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील अधिसूचित केलेल्या महसूल मंडळांत ही योजना ‘बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी’मार्फत राबविण्यात येत आहे. बिगर कर्जदार /कर्जदार शेतकऱ्यांसाठी संत्रा पीकासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत दि. 30 नोव्हेंबर तर, मोसंबी, केळी व डाळिंबासाठी 31 ऑक्टोबर आहे.
ही नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण देणारी हवामानाधारित योजना असून, जिल्ह्यात पथदर्शी स्वरुपात अधिसूचित महसूल मंडळ स्तरावर निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा लाभ अधिकाधिक शेतकरी बांधवांना घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अनिल खर्चान यांनी केले आहे.
Comments
Post a Comment