Tuesday, April 30, 2019

खड्डे निर्मितीची कामे 15 मेपर्यंत पूर्ण करा - विभागीय आयुक्त पियूष सिंह

33 कोटी वृक्षलागवड अभियान


*वृक्ष लागवडीच्या नोंदीसाठी वनविभागाचे पोर्टल कार्यान्वित
www.mahaforest.gov.in वन विभागाचे पोर्टल
अमरावती, दि. 30 :    33 कोटी वृक्षलागवड योजने अंतर्गत वृक्ष लागवडीकरीता जागेची सुनिश्चिती, खड्डे खोदून जीओ टॅगींग, उद्दिष्टानुसार वृक्ष लागवडीचे नियोजन आदी कामे दिनांक 15 मेपर्यंत पूर्ण करावी, याबाबतची दैनंदिन अद्ययावत माहिती वनविभागाच्या अधिकृत पोर्टलवर नोंदवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पियूष यांनी आज दिले.
33 कोटी वृक्षलागवड अभियान अंतर्गत वृक्ष लागवडीसंबंधी जिल्हानिहाय आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य वनसंरक्षक प्रदीप चव्हाण, पुनर्वसन उपायुक्त प्रमोद देशमुख, मनपा आयुक्त संजय निपाणे यांचेसह इतर खात्याचे विभाग प्रमुख, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री. सिंह म्हणाले की, राज्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ठ पूर्ण करण्याच्या अनुषंगाने अमरावती विभागाला एकूण 4 कोटी 36 लाख 58 हजार 800 एवढे लक्षांक असून त्याअनुषंगाने विविध शासकीय यंत्रणांनी वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. यापैकी सुमारे 1 कोटी 96 लाख 50 हजार 252 खड्डे निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विभागाचे खड्डे निर्मितीबाबतचे उर्वरित उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी प्रथमत: जागेची सुनिश्चिती करण्यात यावी. सुनिश्चित केलेल्या जागेवर वृक्ष लागवडीचे सुरळीत नियोजन करावे. दिलेल्या लक्षांकानुसार वृक्ष लागवड करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत दि. 15 मेपर्यंत खड्डे खोदून जीओ टॅगींग करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. वरील सर्व बाबींची माहिती वनविभागाच्या अधिकृत पोर्टलवर (www.mahaforest.gov.in) दैनंदिन अद्ययावत करावी. 
आतापर्यंत वृक्ष लागवडीसाठी विविध शासकीय विभागाव्दारे 40 लाख 28 हजार खड्डे, वनविभागाव्दारे 70 लाख 42 हजार 782 खड्डे, सामाजिक वनीकरण विभाग 72 लाख 80 हजार खड्डे तर स्वयंसेवी संस्था व इतर यंत्रणाव्दारे 12 लाख 98 हजार 772 असे एकूण 1 कोटी 96 लाख 50 हजार 252 खड्डे खोदून झाल्याचे चर्चेअंती वनविभागाने बैठकीत माहिती दिली.
विभागात मोठे, मध्यम, लघु धरण व तलावांच्या जलाशयाला लागून 125 हेक्टर क्षेत्रावर बॅक वाटरचे क्षेत्र आहे. दुष्काळग्रस्त भागात चारा टंचाईवर मात करण्यासाठी सिंचन प्रकल्पांच्या बॅक वॉटर क्षेत्रात चारा छावणी निर्माण करण्यात यावी. रस्त्यांच्या व कॅनलच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने जागेची सुनिश्चिती करावी. विभागात आतापर्यंत 81 हजार 220 सदस्यांची हरित सेना नोंदणी झाली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, अशा सूचना श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या.
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अमरावती विभागातील विविध रोपवाटीकामध्ये सुमारे 4 कोटी 30 लाख 13 हजार दर्जेदार व गुणवत्तापूर्ण रोपांची उपलब्ध आहे. तसेच यावर्षी 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत जिल्हा परिषदेव्दारे सुमारे 1 लाख 96 हजार 173 लाभार्थी जन्मवृक्ष, शुभमंगल वृक्ष, आनंदवृक्ष व स्मृतीवृक्ष निवडण्यात आले असल्याची माहिती वनविभागाने दिली. या रोपांचे लाभार्थ्यांना जिल्हानिहाय वितरण करून त्यांच्याकडून वृक्ष लागवड होणार आहे. वरिल उपक्रमांतर्गत महानगरपालिकेव्दारे 17 हजार 428 वृक्ष तर नगरपालीकाव्दारे 6 हजार 594 लाभार्थ्यांकडून वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.  कन्या वनसमृध्दी अंतर्गत 90 हजार 500 लाभार्थ्यांकडून वृक्ष लागवड होणार आहे.

वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत सन 2016 लागवड केलेल्या वृक्षांपैकी 63 टक्के वृक्ष जिवंत आहेत. सन 2017 मध्ये 70 टक्के वृक्ष जिवंत आहे तर 2018 यावर्षी 88 टक्के वृक्ष जिवंत असल्याच्या नोंदी वन विभागाचे डिजिटल प्लॅटफार्मवर आहे. यावर्षी सुध्दा प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करुन जिवंत वृक्षांचे प्रमाण वाढण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे, असे आवाहनही श्री. सिंह यांनी केले.

मतमोजणी प्रक्रियेसाठी काटेकोर व्यवस्था ठेवावी - जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांचे निर्देश

   


अमरावती, दि. 30 : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत मतमोजणी नेमाणी गोडाऊन येथे दि. 23 मे रोजी होणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ, चोख बंदोबस्त आदी काटेकोर ठेवावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.
मतमोजणी संदर्भात पूर्वतयारी आढावा सभा जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी ते बोलत होते. स्वीपच्या नोडल अधिकारी तथा जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, उप जिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, उप निवडणूक निर्णय अधिकारी उदय राजपूत, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, मनोहर कडू, स्नेहल कनिचे, शिरीष नाईक, अनिल टाकसाळे, खर्च सनियंत्रण पथकाचे रवींद्रकुमार लिंगनवाड, आचारसंहिता कक्षाचे संदीप जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी निलिमा टाके यांच्यासह सर्व नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले की, मतमोजणीचे काम लक्षात घेऊन सुसज्ज यंत्रणा मतमोजणी केंद्रावर उपलब्ध असावी. या सर्वांना प्रशिक्षण देण्यात येईल. मोजणी अधिकारी, सहायक, संगणक सहायक आदी सर्व मनुष्यबळाला आवश्यक प्रशिक्षण व सूचना देण्यात याव्यात. या संपूर्ण प्रक्रियेत उप निवडणूक निर्णय अधिका-यांसह सर्वांनी परस्पर समन्वय ठेवावा.
पुरेशी सुरक्षा यंत्रणा, लेखनसामग्री, आवश्यक वाहनांची तजवीज ठेवावी. मनुष्यबळासाठी भोजन, पेयजल आदी सुविधा असाव्यात. ज्या कर्मचा-यांना आदल्या दिवशी हजर व्हावयाचे आहे, त्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात. त्यांच्या मुक्कामाची सुविधा ठेवावी. या प्रक्रियेच्या कोणत्याही कामात कसूर ठेवू नये, असेही ते म्हणाले.
टपाली मतपत्रिका, कम्युनिकेशन सेंटर, मीडिया सेंटर आदींबाबत काटेकोर कार्यवाहीचे निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन



        अमरावती, दि.30 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अन्य अधिकारी कर्मचारी यांनीही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रति

Thursday, April 25, 2019

टंचाईग्रस्त भागात प्राधान्याने पिण्याचे पाणी पूरविणार जिल्हाधिकारी शैलेश नवाल




अमरावती, दि. 25 : दुष्काळ तालुक्यात चारा टंचाई व पिण्याचे पाण्याचे दुर्भिक्ष मोठया प्रमाणावर जाणवते.  टंचाई काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही,यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. टंचाईच्या भागात प्राधान्याने पिण्याचे पाणी पुरविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिल.
जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई, मनरेगा योजना, जलयुक्त शिवार तसेच 33 कोटी वृक्ष लागवडसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा खत्री, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच इतर यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
श्री. नवाल म्हणाले, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध कामे सुरु आहेत. नागरिकांना किमान एक हजार दिवसाचा रोजगार मिळेल यापद्धतीने सर्व कामांचे नियोजन करावे. मनरेगा योजनेतर्गत येणाऱ्या कामांमध्ये जास्तीत जास्त जलव्यवस्थापनाची कामे हाती घेऊन पूर्ण करावी. प्रकल्प पूर्ण करण्याच्या अनुषंगाने तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव व निधी मागणीचे प्रस्ताव तातडीने जिल्हा प्रशासनाकडे सादर करावे. 
गाळ काढणे, नाला खोलीकरण, शेततळे, जलसाठा निर्मितीची कामे जून महिन्याअगोदर पूर्ण करावित. जेणेकरुन पावसाळयात अधिक प्रमाणात जल पुन:र्भरण शक्य होईल.सद्यस्थितीत जिल्ह्यात विविध यंत्रणामार्फत 2 हजार 561 कामे सुरु आहेत. या कामांवर सुमारे 43 हजार 604 मजूरांची उपस्थिती आहे. तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी आपसात समन्वय ठेवून मजूरांचे मस्टर नियमित ठेवावे. त्यामध्ये कुठलाही अपहार होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या.
सन 2006 पासून 2018-19 या वर्षापर्यंत विविध शासकीय यंत्रणांकडून कामे प्रलंबित आहे. सदर कामांचे पंचनामे करुन त्यासंदर्भातील आवश्यक माहिती संकेतस्थळावर नोंदवून काम पूर्णत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मिळवून घ्यावे. तसेच 33 कोटी वृक्ष लागवडी अभियानांतर्गत सर्व यंत्रणांनी खड्डे खोदल्याची अद्ययावत माहिती ग्री ऑर्मी संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवावी. वृक्ष लागवडी अंतर्गत येणारी सर्व कामे मनरेगा योजनेतूनच करावी, त्यामुळे रोजगार उपलब्ध होईल. रेशीम विभागाने तूतीची लागवड व रेशीम उत्पादनवाढीसाठी लागवडीचे क्षेत्रफळ वाढेल, यादृष्टीने नियोजन करावे. घरकुल बांधणीसाठी संबंधित यंत्रणांना नियमानुसार रेती उपलब्ध करुन द्यावी. पाणीटंचाई, रोजगार हमी योजना आणि वृक्ष लागवड या विषयाशी निगडीत कामे तालुका प्रमुखांनी आपापसात समन्वय ठेवून पूर्ण करावी. तसेच जनतेच्या समस्या किंवा अडचणी ग्रामस्तरावर सोडविण्याचे प्रयत्न करावे. आगामी पक कर्ज वितरणाबाबत शेतकऱ्यांना शेतीचा सातबारा मिळण्यासाठी कुठल्याही अडचणी येणार नाही, याची दक्षता घ्यावी, सेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

Wednesday, April 24, 2019

अनधिकृत,बोगस,एचटीबीटी,बियाणे,विक्रीबाबत,सावधानतेची,सूचना



अमरावती दि. 24 : JÉ®úÒ{É ½ÆþMÉɨÉÉSÉÒ ºÉÖ°üú´ÉÉiÉ ½þÉäiÉ +ºÉÚxÉ ¤ÉÒ - ʤɪÉÉhÉä, ®úɺÉɪÉÊxÉEò JÉiÉä, ÊEò]õEòxÉɶÉEäò <iªÉÉnùÒ ÊxÉʴɹ`öÉ ¤ÉÉVÉÉ®úÉiÉ ={ɱɤvÉ ½þÉäiÉ +ɽäþ. +É{ɱªÉÉ ÊVɱ½þªÉÉiÉ JÉ®úÒ{É ½ÆþMÉɨÉɨÉvªÉä EòÉ{ÉÚºÉ Ê{ÉEòÉSÉÒ ±ÉÉMÉ´Éb÷ ¨ÉÉä`öªÉÉ |ɨÉÉhÉÉiÉ ½þÉäiÉä. ªÉäiÉÉ JÉ®úÒ{É ½ÆþMÉɨÉÉiÉ EòÉ{ÉÚºÉ Ê¤ÉªÉÉhªÉÉSÉÒ JÉ®äúnùÒ Eò®úÒiÉ +ºÉiÉÉÆxÉÉ ºÉiÉEÇò +ºÉhªÉÉSÉÒ MÉ®úVÉú +ɽäþ. MÉ䱪ÉÉ 2 - 3 ´É¹ÉÉǨÉvªÉä iÉhÉÉSÉÉ ½þÉähÉÉ®úÉ jÉɺÉ, ¨ÉVÉÖ®úÉÆSÉÒ ={ɱɤvÉiÉÉ ´É ´ÉÉføiÉÒ ¨ÉVÉÖ®úÒ +ºÉä ´ÉäMÉ´ÉäMɳýªÉÉ +b÷SÉhÉÒ EòÉ{ÉÚºÉ Ê{ÉEòɨÉvªÉä ÊxɨÉÉÇhÉ ZÉɱªÉÉ. ªÉÉSÉ MÉÉä¹]õÒSÉÉ MÉè®ú ¡òɪÉnùÉ PÉä>ðxÉ ú®úÉ>Æðb÷ +{É ¤ÉÒ ]õÒ/BSÉ ]õÒ ¤ÉÒ ]õÒ/¤ÉÒ VÉÒ - 3/iÉhÉÉ´É®úSÉÒ ¤ÉÒ ]õÒ/Ê´Éb÷MÉÉbÇ÷ |ÉEòÉ®úSªÉÉ EòÉ{ÉÚºÉ Ê¤ÉªÉÉhÉäSÉÒ JÉÉVÉMÉÒ ´ªÉCiÉÓ¨ÉÉ¡ÇòiÉ MÉÉ´É{ÉÉiɳýÒ´É®ú PÉ®ú{ÉÉäSÉ Ê´ÉGòÒ ½þÉäiÉ +ºÉ±ªÉÉSÉÒ ¶ÉCªÉiÉÉ xÉÉEòÉ®úiÉÉ ªÉäiÉ xÉɽþÒþ. ½äþ ʤɪÉÉhÉä +xÉÊvÉEÞòiÉ +ºÉÚxÉ, +¶ÉÉ Ê¤ÉªÉÉhªÉÉSªÉÉ Ê´ÉGòÒ±ÉÉ Eåòpù ¶ÉɺÉxÉÉSªÉÉ VÉxÉÖEòÒªÉ iÉÆjÉYÉÉxÉ ºÉʨÉiÉÒxÉä (GEAC) |ÉÊiɤɯvÉ PÉÉiɱÉä±ÉÉ +ɽäþ. +¶ÉÉ +xÉÊvÉEÞòiÉ, ¤ÉÉäMÉºÉ ´É ¤ÉäEòɪÉnäù¶ÉÒ®ú ʤɪÉÉhªÉÉSªÉÉ {ÉÉEòÒ]õÉ´É®ú EòÉähÉiªÉɽþÒ |ÉEòÉ®úSÉä iÉÆjÉYÉÉxÉ, ´ÉÉhÉ ªÉÉSÉÉ =±±ÉäJÉ xɺÉiÉÉä ´É {ÉÉEòÒ]õÉ´É®ú ¨ÉɱÉÉSªÉÉ MÉÖhÉ´ÉkÉSÉä Ê´É´É®úhÉ Ênù±Éä±Éä xɺÉiÉä.þ ½äþ +xÉÊvÉEÞòiÉ, ¤ÉÉäMÉºÉ ´É ¤ÉäEòɪÉnäù¶ÉÒ®ú ʤɪÉÉhÉä +´ÉÉVÉ´ÉÒ nù®úÉxÉä Ê´ÉEÖòxÉ ´É EòÉähÉiªÉɽþÒ |ÉEòÉ®úSÉÒ {ÉÉ´ÉiÉÒ ËEò´ÉÉ Ê¤É±É xÉ Ênù±ªÉÉxÉä ¶ÉäiÉEò­ªÉÉÆSÉÒ ¨ÉÉä`öªÉÉ |ɨÉÉhÉÉiÉ +ÉÌlÉEòò ¡òºÉ´ÉhÉÖEòõ ½þÉä>ð ¶ÉEòiÉä. +¶ÉÉ ¤ÉÉäMÉºÉ ´É ¤ÉäEòɪÉnäù¶ÉÒ®ú ʤɪÉÉhªÉÉSÉÒ ¦ÉÉèÊiÉEò ´É VÉxÉÖEòÒªÉ ¶ÉÖvnùiÉÉ ¨ÉÉʽþiÉÒ xɺÉiÉä iɺÉäSÉ ÊEòb÷ ´É ®úÉäMÉÉÆSÉÉ |ÉÉnÖù¦ÉÉÇ´É ´ÉÉføhªÉÉSÉÒ ¶ÉCªÉiÉÉ xÉÉEòÉ®úiÉÉ ªÉäiÉ xÉɽþÒ. iªÉɨÉÖ³äý +¶ÉÉ Ê¤ÉªÉÉhªÉÉSªÉÉ ´ÉÉ{É®úɨÉÖ³äý  EòÉ{ÉÚºÉ =i{ÉÉnùxÉÉ´É®ú {ÉÊ®úhÉÉ¨É ½þÉä>ðxÉ +É{ɱªÉÉ ¶ÉäiÉÒSÉä iɺÉäSÉ {ɪÉÉÇ´É®úhÉÉSÉä ¨ÉÉä`äö xÉÖEòºÉÉxÉ ½þÉähªÉÉSÉÒ ¶ÉCªÉiÉÉ +ɽäþ. +xÉÊvÉEÞòiÉ ¨ÉÉMÉÉÇxÉä JÉ®äúnùÒ Eäò±Éä±Éä VÉxÉÖEòÒªÉ Ê¤ÉªÉÉhÉä {ɪÉÉÇ´É®úhÉ EòɪÉnùªÉÉÆiÉMÉÇiÉ EòɪÉnäù¶ÉÒ®ú EòɪÉÇ´ÉɽþÒºÉ {ÉÉjÉ `ö®úiÉ +ºÉ±ªÉÉxÉä +¶ÉÉ Ê¤ÉªÉÉhªÉÉSÉÒ ±ÉÉMÉ´Éb÷ ¶ÉäiÉEò®úÒ ¤ÉÆvÉÖºÉÉ`öÒ {ÉÖfäø EòɪÉnäù¶ÉÒ®ú ºÉ¨ÉºªÉÉ ºÉÖvnùÉ ÊxɨÉÉÇhÉ Eò°ü ¶ÉEòiÉä ªÉÉSÉÒ VÉÉhÉÒ´É `äö>ðxÉ EÞòÊ¹É ÊxÉʴɹ`öÉÆSÉÒ JÉ®äúnùÒ b÷Éä³ýºÉ{ÉhÉä +ÊvÉEÞòiÉ ¨ÉÉMÉÉÇxÉäSÉ Eò®úhªÉÉSÉÒ nùIÉiÉÉ iɨÉÉ¨É ¶ÉäiÉEò®úÒ ¤ÉÆvÉÖ ¦ÉMÉÒxÉÓxÉÒ PªÉÉ´ÉÒ.
       +ÉVÉ ¤ÉÉVÉÉ®úɨÉvªÉä ¨ÉÉä`öªÉÉ |ɨÉÉhÉÉiÉ ºÉ®úEòÉ®ú ¨ÉÉxªÉ ¤ÉÉä±ÉMÉÉbÇ÷ ´É ¤ÉÉä±ÉMÉÉbÇ÷ - 2 iÉÆjÉYÉÉxÉ ªÉÖCiÉ Ê¤ÉªÉÉhªÉɨÉvªÉä ={ɱɤvÉ ½þÉähÉÉ®ú +ɽäþ. iªÉɨÉÖ³äý ¶ÉäiÉEò®úÒ ¤ÉÆvÉÖÆxÉÉ Ê´ÉxÉÆiÉÒ Eò®úhªÉÉiÉ ªÉäiÉä EòÒ EÞòÊ¹É Ê´É¦ÉÉMÉÉSªÉÉ +Énäù¶ÉÉxÉÖºÉÉ®ú ¶ÉɺÉxÉ ¨ÉÉxªÉ {É®ú´ÉÉxÉÉvÉÉ®úEò Ê´ÉGäòiªÉÉEòbÚ÷xÉSÉ EòÉ{ɺÉÉSªÉÉ +ÊvÉEÞòiÉ Ê¤ÉªÉÉhªÉÉSÉÒ JÉ®äúnùÒ Eò®úÉ´ÉÒ. VÉ®ú BJÉÉnùÒ ´ªÉCiÉÒ/EÞòÊ¹É ºÉä´ÉÉ Eåòpù vÉÉ®úEò ¤ÉÉäMÉºÉ ´É ¤ÉäEòÉnäù¶ÉÒ®ú, ¶ÉɺÉxÉ ¨ÉÉxªÉiÉÉ xɺɱÉ䱪ÉÉ EòÉ{ÉÚºÉ Ê¤ÉªÉÉhªÉÉSÉÒ Ê´ÉGòÒ Eò®úiÉ +ºÉ±ªÉÉSÉä +É{ɱªÉÉ ÊxÉnù¶ÉÇxÉÉºÉ +ɱªÉÉºÉ iªÉɤÉɤÉiÉ xÉÊVÉEòSªÉÉ iÉɱÉÖEòÉ EÞòÊ¹É EòɪÉÉDZɪÉÉiÉ, EÞòÊ¹É Ê´É¦ÉÉMÉ, ÊVɱ½þÉ {ÉÊ®ú¹Énù ËEò´ÉÉ ]õÉä±É Ê£ò Gò¨ÉÉÆEò 1800 233 4000 ´É®ú iÉGòÉ®ú Eò®úhªÉÉiÉ ªÉÉ´ÉÒ.

EÞòÊ¹É Ê´É¦ÉÉMÉ, ¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉÉSÉä ʤɪÉÉhÉä JÉ®äúnùÒSÉä ÊxÉnæù¶É
1) ʤɪÉÉhÉä {ÉÉEòÒ]õÉ´É®ú ºÉ®úEòÉ®ú ¨ÉÉxªÉ ÊSÉx½þ +ºÉ±ªÉÉSÉÒ JÉÉjÉÒ Eò°üxÉ PªÉÉ´ÉÒ.
2) ʤɪÉÉhÉä {ÉÉEòÒ]õÉ´É®ú ºÉ®úEòÉ®ú ¨ÉÉxªÉ ¤ÉÉä±ÉMÉÉbÇ÷ ´É ¤ÉÉä±ÉMÉÉbÇ÷ - 2 SÉä ÊSÉx½ ºÉÉä¤ÉiÉ nùÉäxÉ =¦ªÉÉ MÉÖ±ÉɤÉÒ ®äú¹ÉÉ iÉ{ÉɺÉÖxÉ PªÉÉ´ªÉÉ.
3) ʤɪÉÉhÉä {ÉÉEòÒ]õÉ´É®ú EòÉ{ɺÉÉSªÉÉ ´ÉÉhÉÉSÉä xÉÉ´É, xÉÆ¤É®ú, ¤ÉìSÉ xÉÆ¤É®ú ´É +ÆiÉÒ¨É ¨ÉÖnùiÉ iÉ{ÉɺÉÖxÉ PªÉÉ´ÉÒ.
4) ʤɪÉÉhªÉÉSÉä {ÉÉEòÒ]õ ÊºÉ±É¤ÉÆnù/¨ÉÉä½þ®ú¤ÉÆnù +ºÉ±ªÉÉSÉÒ JÉÉjÉÒ Eò°üxÉSÉ JÉ®äúnùÒ Eò®úÉ´Éä.
5) PÉäiɱÉ䱪ÉÉ EòÉ{ɺÉÉSªÉÉ Ê¤ÉªÉÉhªÉɱÉÉ Ê´ÉEòhªÉɺÉÉ`öÒ EòÉähÉEòÉähÉiªÉÉ ®úÉVªÉÉiÉ {É®ú´ÉÉxÉMÉÒ +ɽäþ ½äþ iÉ{ÉɺÉÖxÉ PªÉÉ´Éä.
6) Ê´ÉEòiÉ PÉäiɱÉ䱪ÉÉ EòÉ{ÉÚºÉ Ê¤ÉªÉÉhªÉÉSªÉÉ {ÉÉEòÒ]õÉSÉä {ÉCEäò Ê¤É±É xÉ SÉÖEòiÉÉ PªÉÉ´Éä.

+É{ɱªÉÉ iÉGòÉ®úÒʴɹɪÉÒ ¨ÉɽþÒiÉÒ |ÉiªÉIÉ/nÚù®úv´ÉxÉÒ/< - ¨Éä±É/]õÉä±É £òÒ Gò¨ÉÉÆEò/BºÉ. B¨É. BºÉ. <iªÉÉnùÒ´nùÉ®úä näù´ÉÚxÉ ¶ÉɺÉxÉÉSªÉÉ MÉiÉÒ¨ÉÉxÉ MÉÖhÉÊxÉªÉÆjÉhÉ +ʦɪÉÉxÉÉiÉ ºÉ½þ¦ÉÉMÉÒ ´½þÉ.     
 +ºÉä xÉ©É +É´ÉɽþxɠʴɦÉÉMÉÒªÉ EÞòÊ¹É ºÉ½þºÉÆSÉɱÉEò, +¨É®úÉ´ÉiÉÒ Ê´É¦ÉÉMÉ, +¨É®úÉ´ÉiÉÒ ªÉÉÆxÉÒ Eäò±Éä +ɽäþ.

बेरोजगार विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ग्रंथालय सुविधा



अमरावती, दि. 24 : अमरावतीच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केद्रमार्फत अभ्यासिका ग्रंथालय ही योजना राबविण्यात येते. या ग्रंथालयामार्फत विद्यार्थांना परिक्षेला आवश्यकअसणारी पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात.
बँकीग, रेल्वे भरती वनविभाग आरोग्य विभाग भरती, पोलीस भरती, पोस्ट ऑॅफीस भरती  तलाठी एल.आय.सी.तसेच विविध विभागाच्या विभागीय परिक्षा, केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग आदी संदर्भातील आवश्यक पुस्तके, वाचन साहित्य ग्रंथालयामध्ये उपलब्ध करुन देण्यात येते.
त्याचप्रमाणे, रोजगार वार्ता, रोजगार, नोकरी संदर्भ, एम्प्लॉयमेंट न्यूज यासह स्पर्धा परीक्षेस आवश्यक दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके व विविध नियतकालिके उपलब्ध आहेत.  तसेच मुलाखत तंत्र, व्यक्तिमत्व विकास, ताणतणाव व्यवस्थापन, यश मिळवण्यासाठी मार्गदर्शनपर पुस्तके,  स्वयंरोजगार विषयक पुस्तके आदी विविध साहित्यही ग्रंथालयात उपलब्ध आहे.                 
 हे ग्रंथालय व अभ्यासिका दुसरा माळा, दत्त पॅलेस, कोल्टरकर बिल्डींग, गांधी चौक, अमरावती येथे आहे. हे विनामूल्य ग्रंथालय कार्यालयीन वेळेत खुले असते. ग्रंथालय आणि अभ्यासिकेसाठी कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. 
स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना जिल्हा रोजगार व कौशल्य विकास केंद्रातर्फे ग्रंथालय व अभ्यासिका विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात आली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहायक संचालक (रोजगार) प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.
00000

मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन


अमरावती, दि 24 : मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकात्मिक किड व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.
सर्वप्रथम किडीची ओळख करावी. किडीची ओळख ही किड ओळखण्याची मुख्य खुण म्हणजे अळीच्या डोक्यावर पुढच्या बाजुस  अलट “y”   आकाराची खुण असते व शरीराच्या शेवटून दुसऱ्या सेग्मेंटवर चौकोनी आकारात ठिपके दिसुन येतात. त्या ठिपक्यावर केसही आढळुन येतात. या किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग अशा चार अवस्थेत पुर्ण होतो. एक मादी सरासरी 1500 ते 2000 अंडी देऊ शकते. पुंजक्यात घातलेली अंडी घुमटाच्या  आकाराची असून अंडी अवस्था सुमारे दोन ते तीन दिवसाची असते. अळी अवस्था 15 ते 30 दिवस सहावेळा कात टाकुण पुर्ण होते.
प्रथम अवस्थेतील अळी आकाराने लहान, रंगाने हिरवी असुन त्यांचे डोके काळ्या रंगाचे असते. दुसऱ्या अवस्थेत अळीचे डोके नारंगी रंगाचे होते. तिसऱ्या अवस्थेत अळीच्या शरीराच्या दोन्ही बाजुने पांढऱ्या रेषा दिसण्यास सुरुवात होते व अळी तपकीरी रंगाची होते. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या अवस्थेत अळीच्या शरीरावर काळे उंचवट्यासारखे  ठिपके  दिसुन येतात. पुर्ण वाढ झालेली अळी 2 ते 8 सेंटीमीटर खालीवर मीनीत जाऊन मातीचे  आवरण करते आणि त्या आवरणात कोषावस्थेत जाते. हा कोष लालसर तपकिरी रंगाचा असुन  वातावरणानुसार कोषावस्था 8 ते 30 दिवसापर्यंत पुर्ण होते. प्रौढ पतंग निशाचर असुन जष्ण व दमट वातावरणात खुपच सक्रीय असतात. नर पंतगामध्ये समोरच्या पंखावर राखाडी व तपकीरी  रंगाच्या छटा असुन टोकाला त्रिकोणी पांढरे ठिपके  असतात.  मादीमध्ये समोरचे पंख  नरापेक्षा कमी चिन्हांकीत असुन एकसमान राखाडी तपकिरी रंगाचे असतात. अशाप्रकारे ही लष्करी  अळी आपला जीवनक्रम 30 ते 90 दिवसात पुर्ण करते. ऊस, भात,ज्वारी, गहु, कापूस, सोयाबीन या पिकांवर देखील  या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.

किडीच्या व्यवस्थापनाकरीता उपाययोजना
किडग्रस्त पिकाच्या शेतातील खोल नांगरणी शक्यतो दिवसा करावी म्हणजे पक्षाद्वारे  किडीच्या वेगवेगळया अवस्था नष्ट करण्यास मदत होईल. पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे व या किडीने पंतग आकर्षित करण्यासाठी प्रकाश सापळे व कामगंध सापळ्याचा वापर करावा. पिकावरील अंडीसमूह अळ्या हाताने गाळा करुन नष्ट कराव्यात. टेलनोमस रेमस व ट्रायकोग्रामा या परोपजीवी किटसकांची फवारणी करु नये. ऑझेडिरॅक्टीन  1500 पीपीएम किंवा निंबोळी अर्क 5 टक्के 50 मि.ली. प्रती 10 लिटर  पाण्यात मिसळून फवारावे.  ज्र्युमोरीया रिलई किं मेटाऱ्हिझीयम ॲनीसोप्ली या जैवीक किटकनाशकाची 40 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात मिसळुन संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी. पिक लागवडीपासुन  काढणीपर्यंत दर आठवड्याला पिकांमधील किडरोगाचे व पिकांच्या अवस्थेचे सुक्ष्म अवलोकन केल्याने किडीच्या प्रादुर्भावाची तिव्रता पाहुन आर्थीक नुकसानची पातळी गाठली असल्यासच फक्त रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा.
वरीलप्रमाणे उपाययोजना करुन मका पिकांवरील अमेरिकन लष्करी अळीच्या बंदोबस्तासाठी शेतकरी बंधु-भगीनींनी एकात्मीक व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करण्याचे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.   
00000

रस्ते बांधकामामुळे वाहतुक मार्गात बदल


                       अमरावती दि. 24 : अमरावती शहरातून जाणारा रस्ता पंचवटी इर्विन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, बडनेरा या रस्त्याच्या कॉक्रीटकरणाचे काम केंद्रीय मार्गनिधी अंतर्गत मंजूर असून ते सुरु करण्यात आलेले आहे. हे काम शहरामधून टप्याटप्याने पुढे नेण्यात येणार आहे.
 पंचवटी चौक ते रोशनी हॉटेलपर्यंत उजवी बाजू व इर्विन येथे कॉक्रीटकरणाचे काम सुरु करावयाचे आहे.  यासाठी या रस्त्याच्या उजव्या बाजुची वाहतूक दि. 24 एप्रिल ते 23 मे पर्यंत सहायक पोलीस आयुक्त वाहतूक, अमरावती  यांच्या परवानगीनुसार वाहतूक बंद करण्यात आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नागरिकांना सूचित करण्यात येते की, या कालावधीत एका बाजूने सावकाश काळजीपूर्वक वाहतूक करावी. खापर्डे बगीचा व रेल्वे स्टेशनकडून इर्विन चौकाकडे येणारी वाहतूक मर्चुरी टी पॉईंटकडून तात्पुरत्या स्वरुपात वळविण्यात येत आहे. असे सहायक अभियंता यांनी कळविले आहे.
00000

महाराष्ट्रदिनानिमित्त शासकीय सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

मुख्य ध्वजारोहण सोहळा नेहरू स्टेडियमला होणार







अमरावती, दि. 24 :  महाराष्ट्र दिनानिमित्त दि. 1 मे रोजी आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत आढावा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.  
मुख्य ध्वजारोहण सोहळा नेहरू स्टेडियमला होणार असून ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभाची काटेकोर तयारी करावी. प्रत्येक विभागाने त्यांना सोपवून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. महाराष्ट्र दिन उत्साहपूर्वक साजरा करण्यासाठी सर्वांगिण तयारी करावी. महाराष्ट्र दिनी वाहतूक खोळंबा होणार नाही यादृष्टीने सुरळीत व्यवस्थापन करावे. तालुका स्तरावर ध्वजारोहणासह प्रभात फे-या आयोजित केल्या जाव्यात. शासकीय कार्यालयांवर रोषणाई केली जावी. आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व तरतुदी तपासून नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्रदिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन वनिता समाज येथे करण्यात येणार आहे.

00000

Tuesday, April 16, 2019

मतदारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी


अमरावती, दि. 16 - ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या सहाय्याने मतदान करताना करावयाच्या कार्यवाहीबाबत निवडणूक आयोगाने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  
मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर मतदान केंद्रांवर कार्यरत असलेले अधिकारी हे मतदान यंत्रणा कार्यान्वित करतील. ईव्हीएम मशीनवरील आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील अथवा चिन्हासमोरील निळे बटन दाबावयाचे आहे. आपण मत दिलेल्या उमेदवाराच्या नावासमोरील किंवा चिन्हासमोरील लाल दिवा पेटेल. प्रिंटर एक मतपावती मुद्रित करेल. त्यावर आपण मत दिलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह असेल. मतदार ही मतपावती सात सेकंद पाहू शकेल. मुद्रित मतपावती व्हीव्हीपॅट मशिनवरील काचेच्या माध्यमातून पाहता येईल. त्यामुळे आपण दिलेले मत संबंधित उमेदवारालाच मिळाल्याची खातरजमा मतदाराला करता येणार आहे.

फसव्या व्हाटस्अप संदेशामुळे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल


* मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारकच
अमरावती, दि. 16 : मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असणे बंधनकारक आहे. असे असतानाही नागरिकांची दिशाभूल करणारा एक व्हाटसअप संदेश व्हायरल होत असून, त्याविरुद्ध आचारसंहिता कक्षाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत.  
‘मतदार यादीत नाव नसतानाही मतदान करता येते’, अशा आशयाचा संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे निदर्शनास आले आहे. ‘मतदानाच्या दिवशी फोटो व अन्य ओळखपत्र पुरावा घेऊन मतदान केंद्रावर गेल्यास मतदान करता येते,’  अशी दिशाभूल करणारी माहिती या संदेशात आहे. ती अफवा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
 मतदान करण्यासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारकच आहे. लोकसभा निवडणूक दि. 18 एप्रिलला असल्याने आता मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार नाही.  
मतदान करण्यासाठी अन्य कागदपत्रांचा पर्याय हा केवळ मतदार यादीत नाव असलेल्यांसाठीच आयोगाने उपलब्ध करून दिला आहे. असे असतानाही अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल करणे व निवडणुकीच्या राष्ट्रीय कार्यात बाधा आणणे ही कृती गुन्हा आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे.
त्याचप्रमाणे, कुणीही या आशयाची अफवा फॉरवर्ड केल्यास किंवा प्रसृत केल्यास कडक कारवाई केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Sunday, April 14, 2019

जिल्ह्यात भीमजयंती उत्साहात साजरी



     


बाबासाहेबांच्या विचारांचा वसा जपूया, मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया
-          जिल्हा निवडणूक प्रशासनाचे आवाहन
अमरावती, दि. 14 : भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रौढ मताधिकाराचे कट्टर समर्थक होते. त्यामुळे भारतीय संविधानात एक व्यक्ती, एक मत आणि एक मूल्य हे तत्व समाविष्ट होऊन देशातील प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार मिळाला. बाबासाहेबांच्या विचारांचा हा वसा जपूया व आपणही मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया, असे आवाहन आज भीमजयंतीनिमित्त जिल्हा निवडणूक प्रशासनाने जिल्ह्यातील मतदारांना केले आहे.
            भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात आज सर्वत्र प्रशासन, विविध विभाग व कार्यालये, शाळा- महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, संघटना, समित्या यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अमरावती शहरातील इर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आज विविध क्षेत्रातील नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. काल सायंकाळपासूनच या परिसरात नागरिकांनी भेट द्यायला सुरुवात केली. परिसरात काल सायंकाळी भीमगीतांचा अप्रतिम कार्यक्रम सादर करण्यात आला.  त्यालाही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
            जिल्ह्यातून, तसेच शहरातून आज सकाळीच आबालवृद्ध, महिला, युवक, युवतींचे जत्थे या परिसरात दाखल झाले.  शिक्षण, संघटन व संघर्षाचा संदेश कृतीत उतरवणा-या महामानवाच्या जीवन, कार्य व विचारांना मानवंदना देण्यासाठी आपल्या कुटुंबियांसह नागरिक जमले होते. उन्हातान्हाची पर्वा न करता मोठ्या उत्साहात नागरिक येत होते. कुणी रॅली घेऊन आले, कुणी गाणी म्हणत आले, कुणी घोषणा देत आले. महामानवाच्या जयघोषाने आसमंत निनादून गेले होते.
परिसरात बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तके, त्यांच्यावर विविध लेखकांनी लिहिलेली पुस्तके, विचारवंतांची पुस्तके उपलब्ध करून देणारी अनेक दुकाने मांडण्यात आली होती. समतेच्या विचारांच्या आजच्या उत्सवानिमित्त नागरिकांनी पुस्तकांची मोठी खरेदी केली.  येणा-या नागरिकांसाठी संस्था- संघटनांकडून पेयजल, खाद्यपदार्थांची सुविधा पुरविण्यात आली. एकता रॅली आयोजन समितीच्या वतीने दिवसभर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे अभिवादन कार्यक्रम झाला.
            जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आदर्श आचारसंहिता कक्षाचे प्रमुख संदीप जाधव, नायब तहसीलदार नीता लबडे, विधी अधिकारी नरेंद्र बोहरा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले. जिल्हा माहिती कार्यालयात हर्षवर्धन पवार, विजय राऊत, सागर राणे, योगेश गावंडे, सुरेश राणे, सविता बारस्कर, गजानन परटके, राजश्री चोरपगार यांनी अभिवादन केले. स्वीप मोहिमेतही बाबासाहेबांचे लोकशाही निवडणूक प्रक्रियाविषयक संदेश प्रसारित करण्यात आले.
            ‘मतदानाचा अधिकार केवळ साक्षरांपुरता मर्यादित असू नये. तो या देशातील प्रत्येक व्यक्तीला असावा. मताधिकार हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार असावा’, असे स्पष्ट मत बाबासाहेबांनी मांडले होते. जर कायद्याचे पालन करण्याचे बंधन प्रत्येक नागरिकावर आहे, तर शासनकर्ते निवडण्याचा अधिकारही प्रत्येकाला असावा, अशी भूमिका बाबासाहेबांनी मांडली. त्यानुसार भारतीय संविधानात एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य हे तत्व समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे मतदारांनीही  लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदान करून बाबासाहेबांच्या विचारांचा वसा जोपासावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले.
                                    000     

Friday, April 12, 2019

उस्मानिया मस्जिद येथे ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक



अमरावती, दि. 12 : खापर्डे बगिचा नजीकच्या उस्मानिया मस्जिद येथे स्वीप मोहिमेत आयोजित ईव्हीएम-व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिकाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
भारतीय राज्यघटनेने भारतीयांना मतदानाचा हक्क दिला आहे. लोकशाहीला अधिक सक्षम करण्यासाठी घटनेने दिलेल्या हक्कानुसार 1952 पासून लोकसभेची निवडणूक होत आहे.  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने मतदान करणे हा प्रत्येक नागरिकांचा हक्क असून सर्वांनी या राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल आणि स्वीप मोहिमेच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शन व सहभागाने संपूर्ण जिल्ह्यात मतदार जागृतीची मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोणताही मतदार हा मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये म्हणून स्वीप मोहिमेच्या माध्यमातून जागृती करण्यात येत आहे.
ही मोहिम अधिक भक्कम करण्याच्या हेतूने सर्व नागरिकांसह मुस्लिम समाजामध्ये मतदानाविषयी जागृती करण्यासाठी आज उस्मानिया मस्जिद ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक तेथील लोकांना दाखविण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या शंकांचे तज्ज्ञांकडून निरसन करण्यात आले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेविषयी जागृती करण्यात आली. प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहून त्यांनी मतदान करण्याचा संकल्प केला.
यावेळी बेरार मुस्लिम एज्युकेशनल कॉन्फरन्स व उस्मानिया मस्जिदचे अध्यक्ष एस.ए. हसन, उपशिक्षणाधिकारी एजाज खान, स्वीप मोहिमेचे डि. पी. घाटे, विरेंद्र गलफड, तुषार पावडे, संजय खारकर, समीर चौधरी, मिर्झा जुबेर बेग, प्रदीप बद्रे आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे बडनेरा परिसरातील मुस्लिम बहुल वस्तीत उर्दु शाळांच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर जनजागृतीपर कार्यक्रम आज घेण्यात आले. त्यालाही नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.




DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...