पालकमंत्र्यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा
ऑक्सिजन सिलेंडर उपलब्धतेसाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत
- पालकमंत्री ॲड. यशोमती
ठाकूर
अमरावती,
दि. 28 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर
आरोग्यसेवेच्या अन्य सुविधांप्रमाणेच पुढील काळासाठी ऑक्सिजन सिलेंडरची पुरेशी
उपलब्धता असण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हावेत, असे निर्देश राज्याच्या
महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज
येथे दिले.
जिल्हाधिकारी
कार्यालयात पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या उपस्थितीत पुनर्वसन उपाययोजनांबाबत
बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, हनुमान व्यायाम
प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, सचिव रवींद्र खांडेकर,
संजय तीरथकर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित
होते.
पालकमंत्री श्रीमती
ठाकूर म्हणाल्या की, कोरोना नियंत्रणासाठी सर्वंकष व एकसंध प्रयत्नांची गरज आहे.
सद्य:स्थितीत ऑक्सिजनची पुरेशी उपलब्धता असली तरीही रूग्णांची वाढती संख्या पाहता
यापुढेही ऑक्सिजनच्या पुरेशा साठ्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. यासाठी संबंधित
उत्पादन करणा-या कंपनी व संस्थांनीही योगदान द्यावे. लिक्विड ऑक्सिजन टाकी
तसेच राखीव ऑक्सीजन सिलेंडर याबाबत ऑक्सिजन पुरवठा खंडित
होणार नाही, याची
दक्षता घेणे आवश्यक आहे. लिक्वीड ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण
होऊ नयेत. आवश्यक तिथे शासनाकडून सर्वतोपरी साह्य करण्यात येईल.
रूग्णालयांनी
उपचारासाठी आकारावयाच्या दरासंबंधी यापूर्वीच शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
त्यामुळे कुठल्याही रूग्णालयाने त्याहून जादा दर आकारून रुग्णांची फसवणूक करू नये.
असा प्रकार झाल्याचे आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही
पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.
कोरोना संसर्गाची जोखीम
सर्वांना समान आहे. त्यामुळे दक्षता उपाययोजनांचा अवलंब करणे ही सर्वांचीच जबाबदारी
आहे. त्यानुषंगाने
स्वच्छता, सोशल डिस्टन्स व मास्कचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब प्रत्येकाकडून
होण्यासाठी भरीव जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थांसह विविध
क्षेत्रातील मान्यवरांनी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत
जनजागृतीसाठी युवकांचे योगदान मिळविणे आवश्यक आहे. त्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती
विद्यापीठाच्या सहकार्याने राष्ट्रीय सेवा योजना व इतर उपक्रमांचा सहभाग मिळवावा.
त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत. संस्थेकडून पूर्णत: सहकार्य केले
जाईल, असे पद्मश्री श्री. वैद्य यांनी सांगितले. याअनुषंगाने विद्यापीठाशी समन्वय
साधण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांनी सांगितले.
कोरोना प्रतिबंधक
उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील स्थिती, आरोग्य यंत्रणा, उपलब्ध मनुष्यबळ व
इतर आवश्यकता आदी विविध बाबींचा आढावा पालकमंत्र्यांनी यावेळी घेतला.
000
No comments:
Post a Comment