Monday, January 31, 2022

जिल्ह्यात 19 कोटी 68 लक्ष रु. निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

 





जिल्ह्यात 19 कोटी 68 लक्ष रु. निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

पांदणरस्त्यांची अधिकाधिक कामे होण्यासाठी प्रशासनाने सर्वंकष प्रयत्न करावे

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 31 :  जिल्ह्यात आवश्यक पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अनेक कामांना चालना मिळाली आहे. मुख्य रस्ते व पूलांच्या कामांबरोबरच पांदणरस्त्यांच्या कामांनाही गती द्यावी. त्यादृष्टीने प्रशासनाने सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आज झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. जळका हिरापूर येथे ३ कोटी रुपये निधीतून टाकरखेडा पुसदा रोहणखेडा प्रजिमा  रस्त्याची सुधारणा, साऊर येथे दोन कोटी रूपये निधीतून अंजनगाव काकडा पूर्णानगर साऊर शिराळा रस्ता सुधारणा, सोनारखेडा येथे तीन कोटी रुपये निधीतून पूर्णानगर निरुळ गंगामाई रस्ता रामा ३०१ वर लहान पुलाचे बांधकाम, तसेच खोलापूर येथे ५ कोटी ३० लक्ष निधीतून पूर्णानगर निरुळ वाठोडा खोलापूर रामा ३०१ रस्ता सुधारणा आदी कामांचे भूमीपूजन, तर टाकरखेडा संभू येथे 6 कोटी 38 लक्ष निधीतून 33 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले. उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार नीता लबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, हरिभाऊ मोहोड, जयंतराव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

 

पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात रस्ते, पूल, इमारतींच्या अनेक कामांना चालना मिळाली असून, आवश्यक निधीही मिळवून दिला जात आहे. मात्र, त्याचबरोबर, पांदणरस्त्यांची कामे गतीने होणे गरजेचे आहे. विशेषत: खारपाणपट्‌ट्यातील गावांमध्ये ही कामे प्राधान्य देऊन राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव, बैठका व इतर कार्यवाही नियोजनबद्ध पद्धतीने व गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.

 

जिल्ह्यात अनेक विकासकामांचा शुभारंभ झाला. ही सर्व कामे विहित मुदतीत व गुणवत्ता राखून पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे, इतरही आवश्यक कामांबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करावेत. आवश्यक कामांसाठी निधीची उपलब्धता करून दिली जाईल, अशी ग्वाही ही त्यांनी दिली.

 

000000

हमीभाव तूर खरेदीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 






हमीभाव तूर खरेदीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

 

अमरावती, दि.31 : केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेत हंगाम 2022 च्या शेतमाल तूर हमी भाव खरेदीचा शुभारंभ राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झाला.

 

          अमरावती कृउबासचे सभापती विजय दहिकर, सचिव दीपक विजयकर, माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या हस्ते पूजन होऊन तूर खरेदीचा शुभारंभ झाला.

 

पालकमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या की, कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेऊन शेतकरी बांधव, हमाल, कष्टकरी यांच्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधव व कष्टक-यांसाठी अनेक उत्तमोत्तम बाबींची अंमलबजावणी करता येणे शक्य आहे. त्यानुसार प्रस्ताव द्यावेत. आवश्यकतेनुसार शेड व इतर सुविधा आदी बाबींची पूर्तता करून घ्यावी.

 

यंदा तुरीचा हमीभाव सहा हजार 300 रुपये निश्चित करण्यात आला आहे. अधिकाधिक शेतकरी बांधवांचा या प्रक्रियेत समावेश करावा व कुणीही वंचित राहू नये म्हणून पुरेपूर प्रयत्न करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

 

00000

टाकरखेडा शंभू (आष्टी) ३३/११ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण

 






टाकरखेडा शंभू (आष्टी) ३३/११ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण

अमरावती जिल्ह्याच्या ऊर्जाविकासासाठी २२ उपकेंद्रे प्रस्तावित

-   ऊर्जा मंत्री नितीन राऊत

अखंडित व गुणवत्तापूर्ण वीजपुरवठ्यासाठी अनेक विकास कामांना चालना

-  पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. ३१ : ग्राहकांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावती जिल्ह्याच्या ऊर्जाविकासासाठी सुधारित वितरण क्षेत्रीय पद्धतीत (आरडीएसएस योजनेत)  ३३/११ केव्हीचे २२ उपकेंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी केले. 

                उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत (HVDS) ६ कोटी ३८ लाख रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या टाकरखेडा शंभू (आष्टी) ३३/११ केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण प्रसंगी उदघाटक म्हणून ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत आभासी पद्धतीने उपस्थित होते. प्रत्यक्ष लोकार्पण सोहळा टाकरखेडा येथे पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाला.  कार्यक्रमाला महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचलन) संजय ताकसांडे, प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आभासी पद्धतीने तर मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे, दीपक देवहाते,उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार नीता लबडे, जि प सदस्य जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड, टाकरखेडा येथील सरपंच रश्मीताई देशमुख, मुक्कदर पठाण, कार्यकारी अभियंता अनिरूध्द आलेगावकर, भारतभूषण औगड,नितीन नांदूरकर,मनोज निटनवरे आदी प्रत्यक्ष उपस्थित होते.

               ऊर्जा मंत्री डॉ.राऊत म्हणाले की, पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने उपकेंद्राचे काम गतीने झाले. पालकमंत्र्यांनी मागणी केलेल्या वाठोडा शुक्लेश्वर उपकेंद्राचाही २२ प्रस्तावित केंद्रांमध्ये  समावेश आहे.

मागील दोन वर्षात महावितरणकडून विविध वर्गवारीतील ४१ हजार ३३४ ग्राहकांना नविन वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.  शेतक-यांच्या हिताचे आणि कृषी ग्राहकांना ६६ टक्क्यापर्यंत थकबाकीत माफी देणा-या कृषी धोरणात ३२ हजार ९९१ ग्राहकांनी सहभाग घेतला असून ५ हजार ४४५ कृषी ग्राहक थकबाकीमुक्त झाले आहेत. शेतकरी बांधवांनी शेतीची २२.२१ कोटी थकबाकी भरल्याने धोरणानुसार १५.६ कोटीचा निधी स्थानिक विकास कामांसाठी  प्राप्त झाला आहे. १ लाख ३८ हजार  ४९५ कृषी ग्राहकांकडे एकूण १ हजार ३११ कोटींची थकबाकी असून निर्लेखन व व्याज विलंब आकार महावितरणकडून माफ केल्यानंतर उरलेल्या ८०१ कोटीपैकी ५० टक्के रक्कम म्हणजे ४०० कोटी भरले तर ४०० कोटी माफ होणार आहे. या योजनेत ३१ मार्च २०२२ पूर्वी सहभागी घेऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

टाकरखेडा शंभू(आष्टी) उपकेंद्रामुळे परिसरातील 22 गावांना फायदा : पालकमंत्री

              पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जिल्ह्यात अखंडित व उत्तम दर्जाची वीजसेवा मिळण्यासाठी सातत्याने ऊर्जामंत्री यांचेकडून  प्रयत्न होत आहेत.  टाकरखेडा शंभू (आष्टी) व परिसरातील २२ गावांना या उपकेंद्राचा फायदा होणार आहे.  या उपकेंद्रावरून सद्य:स्थितीत १ हजार ७०० कृषी व १२ हजार इतर वीज ग्राहकांना खात्रीशीर वीज पुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय भविष्यात ग्राहकांची संख्यावाढ लक्षात घेता मागेल त्याला वीज पुरवठा करण्यास मदत मिळणार आहे.  वीज वाहिनीच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गावातच हे उपकेंद्र उभारण्यात आल्याने ३३ केव्ही वलगाव व ३३ केव्ही आसेगाव उपकेंद्रावरील भार कमी झाला आहे. पर्यायाने त्याचा फायदा वलगाव व आसेगाव उपकेंद्र परिसरातील ग्राहकांनाही योग्य दाबाची वीज उपलब्ध करण्यास मदत होणार आहे. 

              या उपकेंद्रातून एक कृषी व एक गावठान वाहिनी काढण्यात आली असून या अगोदर असलेल्या कृषी वाहिनीची ५५ किमीची लांबी आता  फक्त १८ किमीच  झाली आहे.शिवाय या वाहिनीवरील ग्राहकाची संख्याही कमी झाली आहे.तसेच गावठान वाहिनीचीही लांबी ३५ किमीवरून १५ किमीच झाल्याने अखंडित व योग्य दर्जाची वीज देण्यास महावितरणला मदत होणार आहे.  अमरावती जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण वीजपुरवठ्यासाठी अधिक निधी मिळवून देण्याची मागणी पालकमंत्र्यांनी यावेळी केली. अनिरुद्ध आलेगावकर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रास्ताविक मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण यांनी आणि आभारप्रदर्शन अभियंता चौधरी यांनी केले.

00000

Sunday, January 30, 2022

जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 
























जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते 18 कोटीच्या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

 

अमरावती, दि. 30 : गावात दर्जेदार शैक्षणिक सुविधा, उत्कृष्ट  शालेय इमारती, वर्गखोल्या, प्राथमिक आरोग्य सुविधा, तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांनी सुसज्ज रुग्णालये यासह इतर भौतिक सुविधा, अद्ययावत व्यायामशाळा, परिसराचे सौंदर्यीकरण, सभागृहे, विश्रामगृहे, ग्रामपंचायत इमारती आदींची निर्मिती करतांना जिल्ह्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.

 

विविध योजनेअंतर्गत 17 कोटी 85 लक्ष रुपये प्राप्त निधीतून मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये  विकासकामांचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले. गावात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधांची निर्मिती करावी.

गावातील नागरीकांच्या सुविधेसाठी कामे गतीने पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी संबंधिताना दिले. मोर्शी तालुक्याचे उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, तहसीलदार सागर ढवळे आदी उपस्थित यावेळी होते.

 

मोर्शी तालुक्यातील राजुरवाडी  येथे 1 कोटी रुपये प्रमाणे प्राप्त निधीतून तळणी पिंपळखुटा रस्त्यावर 2 लहान पुलाच्या कामांचे भूमीपुजन, जिल्हा वार्षिक योजनेतुन प्राप्त सुमारे 60 लक्ष रुपयांच्या निधीतून पशुवैद्यकीय दवाखाण्याचे बांधकाम व वॉर्ड क्रमांक 1 ते 2 मधील बाबाराव टेकाम ते सुधाकर उईके यांच्या घरापर्यंतचे 10 लक्ष रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या रस्त्याचे लोकार्पण,10 लक्ष रुपयांच्या निधीतून मुस्लिम कब्रस्तानचे बांधकाम व  सौंदर्यकरणचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले. यावेळी सरपंच पल्लवी मानकर, उपसरपंच पद्मताई डोळस आदी उपस्थित होते.

 

मोर्शी तालुक्यातील शिरलस येथे 10 लक्ष रुपये निधीतून ग्रामपंचायत  भवनाचे व राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत नागरी सुविधा केंद्राचे  लोकार्पण, 8 लक्ष रुपयांच्या निधीतून व्यायाम शाळेचे लोकार्पण, शाळा वर्ग खोली दुरुस्तीचे लोकार्पण त्यांनी केले. यावेळी सरपंच निपेश चौधरी, उपसरपंच अमोल देशमुख, सदस्य रमेश काळे, सुरेंद्र राहते, कमला तायडे, रेणुका टेकाम, अभय आठवले उपस्थित होते

 

नेरपिंगलाई-लिहीदा-नया वाठोडा-पिंपळखुटा-पाडी कि.मी.0/00 ते 9/500 मध्ये सुधारणेच्या 4 कोटी 25 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भुमीपुजन श्रीमती ठाकूर यांनी केले.

 

मोर्शी येथील उदखेड-खोपडा-शिरखेडा रस्त्याच्या 1 कोटी 25 लक्ष रुपयांच्या निधीतून  सुधारणा कामाचे भुमीपुजन करण्यात आले. यावेळी सरपंच मीना मोहोड, उपसरपंच उज्वला देशमुख, सदस्य ललिता गावंडे, शकिरा बानो आदी उपस्थित होते.

 

धामणगाव येथील पशुवैद्यकीय  दवाखान्याच्या 60 लक्ष रुपयांच्या प्राप्त निधीतून बांधकामाचे लोकार्पण केले यावेळी सरपंच सुनील अडायके, उपसरपंच पुरुषोत्तम कळसकरआदी उपस्थित होते. धामणनगाव-पोरगव्हाण-विष्णोरा रस्ता सुधारणेच्या 2 कोटी 40 लक्ष रुपयांच्या प्राप्तनिधीतून कामाचे भूमिपूजन श्रीमती ठाकूर यांनी केले. पोरगव्हाण येथील काशी नदीवरील पुल व लेंडी नाल्यावरील पुलाचे 2 कोटी 50 लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या बांधकामाचे भुमीपुजन यावेळी करण्यात आले. पोरगव्हान च्या सरपंच माया कोकणे, उपसरपंच इंद्रीस भाई पटेल सदस्य दिनकर पुंड, निलेश कोकाटे उपस्थित होते.

 

बेलोरा-काटसूर-अडगांव-रस्त्याचे 1 कोटी 20 लक्ष रुपये निधीतून सुधारणा करण्यात येणार आहे. तसेच अडगांव-तळेगांव-खेड झायवाडा-पिंपरी गणेशपूर मार्गावरील असलेल्या लहान पुलाचे बांधकाम 3 कोटी रुपये निधीतून करण्यात येत आहे. या दोनीही कामाचे  भुमीपुजन श्रीमती ठाकूर यांनी केले.

पुल निर्माण करतांना त्याची उंची योग्य प्रमाणात असावी व पूल मजबूत असावा असे निर्देश श्रीमती ठाकूर यांनी दिले. सरपंच मंगला लोखंडे, उपसरपंच किशोर आमले व सदस्य रंगराव बनसोड आदी उपस्थित होते.

 

शिरजगाव-मंगरूळ-घोडगव्हाण ते रोहणखेडा-धामनगाव येथे पेढी नदीवरील पुलाचे 50 लक्ष रुपयांच्या निधीतून होणाऱ्या कामाचे, तेथिल नाल्याच्या  संरक्षण भिंतीचे 50 लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन व गोरळ ते शिराजगाव येथील जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत प्राप्त 90 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या  दोन रस्ता सुधारण्याच्या कामाचे  भुमीपुजन श्रीमती ठाकूर यांनी केले. सरपंच सुनील गोटे, उपसरपंच संजय देशपांडे उपस्थित होते.

 

मंगरूळ-भिल्लापूर येथील 40 लक्ष रुपयांच्या निधीतून होणाऱ्यारस्ता सुधारण्याच्या  कामाचे व भिलापूर-जमनापूर रस्ता सुधारण्याचे कामाचे भुमीपुजन श्रीमती ठाकूर यांनी केले.

00000

 

Saturday, January 29, 2022

डिजिटल अंगणवाड्या व इतर पायाभूत सुविधा सर्वदूर उभारणार - महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 







विकासकामांना चालना; डिजिटल अंगणवाडी व अनेक कामांचे भूमीपूजन

डिजिटल अंगणवाड्या व इतर पायाभूत सुविधा सर्वदूर उभारणार

- महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २९ : बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी अधिक सक्षम व अद्ययावत करण्यासाठी डिजिटल अंगणवाडी प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमरावती तालुक्यात पाच डिजीटल अंगणवाडी निर्माण होणार असून जिल्ह्यातही ठिकठिकाणी डिजीटल अंगणवाड्या निर्माण होतील, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

जिल्ह्यात दीड कोटी रुपयांहुन अधिक निधीतून विविध विकासकामांचे भूमीपूजन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावली शहीद येथे १५ लक्ष निधीतून बसस्थानक ते जन्मस्थान मार्गाचे काँक्रीटीकरण व १५ लक्ष निधीतून एमआरजीईएस अंतर्गत डिजिटल अंगणवाडीचा कामाचे,तसेच देवरी येथे ९ लक्ष रुपये निधीतून काँक्रीट रस्ता, पुसदा येथे ८ लक्ष निधीतून काँक्रीट रस्ता,नांदुरा किरकटे येथे १० लक्ष निधीतून रस्ता काँक्रीटीकरण,८ लक्ष निधीतून नया अकोला येथे वलगाव चांदुर बाजार रस्त्यावरील रस्ता सुधारणा,वलगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात १० लक्ष निधीतून चेंजिग रुमचे बांधकाम, ३० लक्ष निधीतून वाल कुंपण बांधकाम, १५ लक्ष पेव्हर ब्लॉक बसवणे, १० लक्ष निधीतून सिमेंट काँक्रीट नाली, त्याचप्रमाणे, रेवसा येथे २४ लक्ष निधीतून काँक्रीट रस्ते, वर्गखोली आदी कामांचे भूमीपूजन झाले.

 

पं. स. सभापती संगीताताई तायडे, जि प  सदस्य अलकाताई देशमुख, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, गटविकास अधिकारी डॉ. राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात ठिकठिकाणी विकासकामाना चालना देण्यात आली आहे. आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. देवरी येथे उत्कृष्ट ग्रामपंचायत भवनही उभारण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. प्रशासनाने कामे विहित वेळेत पूर्ण करावीत. कामांचा दर्जा व गुणवत्ता राखून कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले

 यावली शहिद येथे १०० हून अधिक नागरिकांना घरकुल व पट्टेवाटपही करण्यात आले.

00000

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्माण होणार - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 






वनक्षेत्र विकासासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवाव्यात; पालकमंत्र्यांचे निर्देश

सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्माण होणार

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २९ : वनक्षेत्र विकास, पर्यावरण संवर्धनासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवणे आवश्यक असून, त्याअंतर्गत सावर्डी वन क्षेत्रात ऑक्सिजन पार्क निर्माण होणार आहे. येथील नैसर्गिक वनसंपदेचे रक्षण करतानाच एक सुंदर उपवन त्यानिमित्त उभे राहणार आहे,असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.

नांदगावपेठनजिक वन वाटिका वनक्षेत्र सावर्डी निसर्ग अभ्यासिका क्षेत्रात ऑक्सिजन पार्क कामाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

वन क्षेत्र विकासाच्या अनुषंगाने १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, वन क्षेत्र विकास व पर्यावरण संवर्धनासाठी अभिनव संकल्पना राबवणे आवश्यक आहे. त्यानुसार वनविभागाने नाविन्यपूर्ण संकल्पना अंमलात आणाव्यात. सावर्डी वन क्षेत्रात नैसर्गिक वनसंपदा जतन करतानाच बहुविध वृक्षसंपदेचा व आवश्यक सुविधांचा समावेश असलेले उपवन निर्माण करण्यात येईल. त्या दृष्टीने कार्यवाही वन विभाग प्रशासनाने गतीने करावी, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.

 

 

वनांची पाहणी

यावेळी पालकमंत्र्यांनी वन विभागाच्या सफारी वाहनातून व क्षेत्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी वनक्षेत्र, वन्यजीवन, आवश्यक सुधारणांच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबत त्यांनी वन प्रशासनाकडून माहिती घेतली. त्याचप्रमाणे, पालकमंत्र्यांनी वनविभागाच्या रोपवाटिकेला भेट देऊन पाहणी केली.

 

00000

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...