सरपंचपदासाठी २३, २४ एप्रिल
रोजी आरक्षण सोडत
*नागरिकांनी उपस्थित
राहण्याचे आवाहन
अमरावती, दि.
१३: जिल्ह्यातील सन २०२५ ते २०३० या कालावधीत सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठित
होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठीचे आरक्षण येत्या २३ आणि २४ एप्रिल २०२५
रोजी निश्चित केले जाणार आहे. यासाठी नागरिकांनी संबंधित तहसील कार्यालयात उपस्थित
राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील
सर्व १४ तालुक्यांमध्ये तालुकास्तरावर प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदारांमार्फत ही
सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा
मागास प्रवर्ग (नामाप्र) या पदांसाठी महिला आरक्षणासह सरपंचपदाचे आरक्षण निश्चित
केले जाईल.
दि. २३ एप्रिल
रोजी अमरावती - तहसिलदार कार्यालय, अमरावती, भातकुली - तहसिलदार कार्यालय,
भातकुली, चांदूर रेल्वे - तहसिलदार कार्यालय, चांदूर रेल्वे, दर्यापूर - तहसिलदार
कार्यालय, दर्यापूर, अचलपूर - तहसिलदार कार्यालय, अचलपूर, धारणी - तहसिलदार
कार्यालय, धारणी, मोर्शी - तहसिलदार कार्यालय, मोर्शी तसेच दि. २४ एप्रिल रोजी
नांदगाव खंडेश्वर - तहसिलदार कार्यालय, नांदगाव खंडेश्वर, तिवसा - तहसिलदार
कार्यालय, तिवसा, धामणगाव रेल्वे - तहसिलदार कार्यालय, धामणगाव रेल्वे, वरूड -
तहसिलदार कार्यालय, वरुड, अंजनगाव सुर्जी - तहसिलदार कार्यालय, अंजनगाव सुर्जी,
चांदूर बाजार - तहसिलदार कार्यालय, चांदूर बाजार, चिखलदरा - तहसिलदार कार्यालय,
चिखलदरा येथे दुपारी १२.०० वाजता संबंधित तहसील कार्यालयाच्या सभागृहात ही सोडत
प्रक्रिया पार पडेल. उपविभागीय अधिकारी हे नियंत्रण अधिकारी म्हणून या सोडतीसाठी
उपस्थित राहतील.
संबंधित
नागरिक आणि ग्रामपंचायत सदस्यांना या सोडतीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन
जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
0000
खुलासा
अलायन्स एअरच्या पत्रामध्ये
डॉक्टर पंजाबराव देशमुख विमानतळ अमरावती असा उल्लेख आलेला आहे. मात्र अद्यापपर्यंत
विमानतळाच्या नावाबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. अलायन्स एअरतर्फे पाठवण्यात
आलेल्या पत्रामध्ये या झालेल्या उल्लेखाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास
प्राधिकरणतर्फे आक्षेप नोंदविण्यात आला असून याबाबत कंपनीला मेल करण्यात आलेला
आहे, असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने कळविले आहे.
०००००
No comments:
Post a Comment