Wednesday, July 23, 2025

DIO NEWS AMRAVATI 23.07.2025

 सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई तीन दिवसांच्या अमरावती दौऱ्यावर

अमरावती, दि. 23 (जिमाका) : सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई हे गुरूवार, दि. 24 जुलैपासून तीन दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात दारापूर, दर्यापूर आणि अमरावती येथील विविध कार्यक्रमाला न्या. गवई उपस्थित राहतील.

उद्या गुरुवार, दि. 24 जुलै  दुपारी 3. 45 वाजता बेलोरा विमानतळ, अमरावती येथे आगमन होईल.

शुक्रवार, दि. 25 जुलै रोजी सकाळी 10.45 वाजता दारापूर येथील विविध कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी 3 वाजल्यापासून दर्यापूर येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता दर्यापूर येथील नवीन न्यायालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहतील.

शनिवार, दि. 26 जुलै रोजी सकाळी 10.35 वाजता सिपना कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे अमरावती जिल्हा व सत्र न्यायालय येथील ई -लायब्ररीचे उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहून सोयीनुसार बेलोरा विमानतळावरून श्रीनगरकडे प्रयाण करतील.

00000

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील

यांचा  अमरावती दौरा

             अमरावती, दि. 23 (जिमाका) : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्ये मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांचा शुक्रवार, दि. 25 जुलै रोजीचा अमरावती दौरा पुढीलप्रमाणे:

            शुक्रवार, दि. 25 जुलै  रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती येथील परीक्षा भवन व प्रशासकीय इमारत, उपहारगृह, विद्यार्थ्यांचे सामान्य कक्ष उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पीडीएससी कॅम्पस, मोर्शी रोड, येथे श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती येथे आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल्स असोसिएशन ऑफ नॉन गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या 40 व्या वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थिती. दुपारी 2 वाजता आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ, बहिरमकुऱ्हा, चांदूरबाजार येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4 वाजता बहिरमकुऱ्हा येथून वाहनाने समृध्दी महामार्गाने नागपूरकडे प्रयाण.

00000




जिल्हाधिकारी कार्यालयात  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन

            अमरावती, दि. 23 (जिमाका) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अधीक्षक निलेश खटके  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

      अधिकारी - कर्मचारी यावेळी उपस्थित होते.  उपस्थितांनीही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

00000

रोहयोच्या विहिरींची कामे वेगाने पूर्ण करण्याचे आवाहन

अमरावती, दि. 23 (जिमाका) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) तिवसा तालुक्यात सुरू असलेल्या विहिरींच्या कामांना गती देण्यासाठी पंचायत समितीने महत्त्वपूर्ण आवाहन केले आहे. तालुक्यात एकूण ५८४ विहिरींची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आले आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंर्तगत वैयक्तिक सिंचन विहीर ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. यात विहीरी खोदुन व बांधुन पूर्ण करणे ही वैयक्तिक लाभार्थ्यांची जबाबदारी आहे. विहीरीच्या बांधकामासाठी प्राप्त होणारा कुशल, अर्धकुशल निधी हा विहिरीचे भौतिकदृष्ट्या काम पुर्ण झाल्यावरच तांत्रिक अधिकाऱ्यामार्फत मोजमाप करुन व शासनाला मागणी सादर केल्यानुसार प्राप्त होत असतो.

मात्र कुंपन घातलेला नाही आणि बांधकाम अपूर्ण असलेल्या विहीरी शेतकरी व जनावरांसाठी धोकादायक ठरत आहे. अशा विहीरीमुळे जावरा शिवारात घडलेल्या दुर्घटनेमुळे विहिरीचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर अपुर्ण विहीरीचे काम पुर्ण करणे कठीण आहे. मात्र सर्व लाभार्थी आणि शेतकऱ्यांनी शेतातील विहीरीचे काम अपूर्ण असल्यास खबरदारीने उपाय म्हणून सदर जागी तातडीने संरक्षण कुंपण लावुन घ्यावे. तसेच शक्य तितक्या लवकर बांधकाम पूर्ण करावे. याबाब पॅनल तांत्रिक अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांनी अपूर्ण विहीरींना प्रत्यक्ष भेट देवून लाभार्थ्यांना अवगत करून कोणतीही दुर्घटना घडणार नाही यांची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पंचायत समिती तिवसा अंतर्गत मनरेगामध्ये खोदलेल्या व बांधकाम पूर्ण केलेल्या विहिरींच्या लाभापासून वंचित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विहिरींची कामे अपूर्ण असलेल्या ठिकाणी तातडीने पाहणी करून ती पूर्ण करण्याची जबाबदारी तांत्रिक अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि रोजगार सेवक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तांत्रिक अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामरोजगार सेवक यांनी विहिरींना प्रत्यक्ष भेट देऊन कामाची सद्यस्थिती तपासण्यास व उर्वरित कामे त्वरीत पूर्ण करावे, असे आवाहन तिवसाचे गटविकास अधिकारी यांनी केले आहे.

000000










जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा चांदूर रेल्वे उपविभाग दौरा;
'माझी सुंदर शाळा' अभियान, सूतगिरणी व रोपवाटिकेची पाहणी
अमरावती, दि. २३ (जिमाका) :अमरावती जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चांदूररेल्वे उपविभागातील नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे तालुक्यांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी शिक्षण, उद्योग, वनीकरण, कृषी आणि प्रशासकीय कामकाजाचा विस्तृत आढावा घेतला.
'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' अभियानाला प्रोत्साहन:
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जि. प. शाळा पीएम श्री दाभा येथे जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी भेट दिली. या शाळेने 'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' अभियान अंतर्गत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. जिल्हाधिकारी यांनी या शाळेतील विविध अभिनव उपक्रमांची माहिती जाणून घेतली. शाळेतील आयसीटी (ICT) लॅबला भेट दिली. यावेळी त्यांनी 'मिशन आरंभ' अंतर्गत नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षकांना शैक्षणिक कार्याविषयी सूचना दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनीही जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधला. शिक्षकवृंद तसेच विद्यार्थ्यांचे 'मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा' अभियानाअंतर्गत प्रथम क्रमांक पटकाविल्याबाबत अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
डीजी कॉटसिन सूतगिरणीची पाहणी:
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दाभा येथील डीजी कॉटसिन (DEGEE cotsyn) सूतगिरणीला भेट दिली. येथे त्यांनी वस्त्रोद्योग मूल्य साखळी (Textile industry Value chain) बाबत सविस्तर माहिती घेतली. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
सामाजिक वनीकरण आणि मनरेगा मजुरांशी संवाद:
माहुली चोर येथील सामाजिक वनीकरण रोपवाटिकेलाही जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी यांच्याशी रोपवाटिका प्रकल्पाबद्दल चर्चा केली. तिथे काम करणाऱ्या मनरेगा मजुरांशी जिल्हाधिकारी यांनी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. ग्रामरोजगार सेवकांचे मस्टर तपासले आणि त्यांना सनकोट, टी-शर्ट व कॅपचे वाटप करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. 'एक पेड माँ के नाम' या संकल्पनेनुसार वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही त्यांनी यावेळी दिला.
कृषी क्षेत्राचा आढावा आणि गोडाऊन पाहणी:
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नवीन गोडाऊनची पाहणी करून जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी ज्वारी खरेदी केंद्राला भेट दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली.
विभागप्रमुखांची आढावा बैठक:
उपविभागीय अधिकारी कार्यालय, चांदूर रेल्वे येथे उपविभागातील तिन्ही तालुक्यातील विभागप्रमुखांची यावेळी बैठक घेण्यात आली. या बैठकीत कृषी विभाग, पंचायत समिती, नगरपरिषद, वनविभाग, शिक्षण विभाग, आणि भूमिअभिलेख विभाग या प्रमुख विभागांच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. विकासकामांना गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी संबंधितांना त्यांनी निर्देश दिले.
एफपीओ (FPO) शेतकऱ्यांशी चर्चा:

चांदूर रेल्वे तालुक्यात लखदातार येथे स्मार्ट अंतर्गत उभारण्यात आलेल्या एफपीओ (Farmer Producer Organisation) यांच्या गोडाऊन व प्रोसेसिंग युनिटला जिल्हाधिकारी यांनी भेट दिली. एफपीओला येणाऱ्या अडचणी आणि इतर विषयांवर शेतकऱ्यांशी थेट चर्चा करून, त्यांच्या समस्यांची नोंद घेतली.
उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे, नांदगाव खंडेश्वर तहसीलदार अश्विनी जाधव, धामणगाव रेल्वे तहसीलदार अभय घोरपडे, चांदुर रेल्वे तहसीलदार पूजा माटोडे, मुख्याधिकारी नगरपरिषद चांदुर रेल्वे विकास खंडारे, नांदगाव खंडेश्वर गट विकास अधिकारी स्नेहल शेलार, चांदुर रेल्वे गट विकास अधिकारी संजय खारकर तसेच संबंधित विभाग प्रमुख, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
***

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...