Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Friday, October 30, 2020
पालकमंत्र्यांकडून विविध विकासकामांची पाहणीमुलभूत सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर
माजी राज्यपाल स्व. रा. सू. गवई यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन
Thursday, October 29, 2020
शिवभोजन थाळीचा दर मार्च अखेरपर्यंत पाच रुपयेनागरिकांचे हित जोपासण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Wednesday, October 28, 2020
नेत्रदान, अवयवदान उपक्रमासाठी महापालिकेकडून संपूर्ण सहकार्य करू - महापौर चेतन गावंडे
हरिना नेत्रदान समितीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम
नेत्रदान, अवयवदान उपक्रमासाठी महापालिकेकडून संपूर्ण सहकार्य करू
- महापौर चेतन गावंडे
अमरावती, दि. 28 : नेत्रदान, अवयवदान व देहदानाबाबत जागृती व प्रोत्साहनासाठी अमरावती महापालिकेकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे शहराचे महापौर चेतन गावंडे यांनी आज येथे सांगितले.
समाधाननगरातील हरीना नेत्रदान समितीच्या स्व. मंगलजीभाई पोपट नेत्रालयातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम महापौर श्री. गावंडे यांच्या हस्ते झाला, त्यानिमित्त संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, समितीचे अध्यक्ष मनोज राठी, उपाध्यक्ष चंद्रकांतभाई पोपट, सचिव अमित चांडक, सुरेंद्र पोफळी, शरद कासट, सुरेश जैन, शरणपालसिंग अरोरा, मनीष सावला, अशोक राठी, नरेश सोनी, मोनिका उमक, पप्पू गगलानी, धीरज गांधी, राजेंद्र वर्मा, सीमेश श्रॉफ, घनश्याम वर्मा, दिनेश वर्नदाणी, डॉ. विधळे, अविनाश राजगुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महापौर श्री. गावंडे म्हणाले की, नेत्रदान, अवयवदान व देहदानाबाबत सर्वदूर जागृती आवश्यक आहे. हरीना फाऊंडेशनअंतर्गत हरीना नेत्रदान समिती, स्व. मंगलजीभाई पोपट नेत्रालय, स्व. मधुसूदनजी जाजोदिया नेत्र प्रत्यारोपण केंद्र व स्व. चुन्नीलालजी मंत्री अवयवदान समिती या संस्था अत्यंत हिरीरीने काम करत आहेत. जोपर्यंत शेवटच्या माणसाचा विकास होत नाही, तोपर्यंत संपूर्ण समाजाचा विकास होत नाही, हे लक्षात घेऊन तळागाळातील नागरिकांसाठी, अंत्योदयासाठी या संस्था काम करत आहेत. त्यांच्या कार्याला महापालिकेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही श्री. गावंडे यांनी सांगितले.
दिवंगत डॉ. एव्हीएम मदनगोपाल यांनी स्थापलेल्या संस्थेचे गरीब व गरजूंना नेत्रोपचार, नेत्रदान, अवयवदान व देहदानाचे कार्य हरीना समिती पुढे नेत आहे. अशा लोकहितैषी संस्था शहराची, समाजाची संस्कृती उन्नत करत असतात. अवयवदान, देहदानासाठी संस्थेकडून होणारी जागृती व कार्य भविष्यातील पिढ्यांसाठीही महत्वाचे ठरणार आहे, असे श्री. पवार यांनी सांगितले.
हरीना नेत्रदान समितीतर्फे नेत्रालयात अत्यंत कमी दरात नेत्रोपचार उपलब्ध करून दिले जातात. गोरगरीब व गरजू व्यक्तींना त्याचा लाभ होतो. नेत्रालयाचा लाभ अधिकाधिक नागरिकांना मिळावा यासाठी सर्वदूर माहिती पोहोचणे व आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री. पोपट यांनी केले. संस्थेतर्फे नेत्रदान, अवयवदानाबरोबरच गरजूंना इतर बाबतींत वेळोवेळी मदत केली जाते. कोविड संकटकाळात संस्थेतर्फे भोजनदानाचा उपक्रमही चालविण्यात आला, असे श्री. पोफळी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
अपंग व्यक्ती व महिला बचत गटांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’जिल्ह्यात 240 केंद्रांचे होणार वितरण - जिल्हाधिकारी शैलेश नवाल
कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी मायग्रंट सपोर्ट सेंटर्समहिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Tuesday, October 27, 2020
यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वितरणऑनलाईन रोजगार मेळाव्यांत सातत्य ठेवावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल
पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उपोषण मागे
पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ न दिल्यास फौजदारी करू- जिल्हाधिकाऱ्यांची विमा कंपन्यांना तंबी
Monday, October 26, 2020
कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी सपोर्ट सेंटर्स - ॲड. यशोमती ठाकूर
भुखंड मिळूनही उद्योग न उभारणाऱ्यांना नोटीसा द्याव्यात - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर
Saturday, October 24, 2020
कोरोना उपचार व यंत्रणांसाठी सुमारे २६ कोटी २५ लक्ष खर्चसंख्या घटली, पण जोखीम अजूनही कायमदक्षता नियमांचे काटेकोर पालन करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल
रेमेडेसिवीर व इतर औषधे विक्रीसंदर्भात प्रशासनाने काटेकोर नियंत्रण ठेवावे - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Friday, October 23, 2020
डिजीटली घराघरात जात महिला, बालकांचे पोषण करणार - ॲड. यशोमती ठाकूर
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीसर्व विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्यात येणार - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर
Wednesday, October 21, 2020
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमात (सीएमईजीपी) ११५ अर्जांना मंजुरीयोजनेचा अधिकाधिक युवकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमात (सीएमईजीपी) ११५ अर्जांना मंजुरी
जिल्ह्यात 1 हजार 73 कोटी 94 लाख रू. कर्जवाटपशेतकरी बांधवांच्या विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
जिल्हाधिका-यांकडून दर्यापूर तालुक्यात कामांची पाहणी‘मनरेगा’मध्ये वैविध्यपूर्ण कामे राबवावीत - जिल्हाधिकारी शैलेश नवाल
जिल्हाधिका-यांकडून दर्यापूर तालुक्यात कामांची पाहणी
Tuesday, October 20, 2020
पोलीस व सैन्यभरतीच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना विविध मैदाने खुली - जिल्हाधिकारी शैलेश नवाल
जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वितरणगरीब व गरजू बांधवांना लाभ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात सहा लाखांहून अधिक लसी प्राप्त लसीकरण, टॅगींगचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल
वनौंषधी उत्पादन वाढीसाठी विभागीयस्तरीय समिती स्थापन करावी - राज्यमंत्री बच्चु कडू
वनौंषधी उत्पादन वाढीसाठी विभागीयस्तरीय समिती स्थापन करावी - राज्यमंत्री बच्चु कडू
Ø कृषी विभागाच्या आढावा बैठकीत निर्देश
अमरावती, दि. 20 : पानपिंपळी, सफेदमुसळी व पानवेल या ‘आजीबाईच्या बटव्या’तील अतिशय महत्वाच्या वनौंषधीच्या उत्पादन प्रक्रियेत समस्या निर्माण झाल्या आहेत. या वनौंषधीच्या उत्पादन प्रक्रियेतील अडथळे, पिक विम्याचे संरक्षण, वनौंषधीचे विपणन, बाजारपेठेची उपलब्धता आणि औषधी पिकांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी विभागीयस्तरावर समिती स्थापन करावी, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी बैठकीत दिले.
आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे, यवतमाळचे नवनाथ कोळमकर, वाशिमचे शंकर तोटावार, अकोलाचे यू. एस. नलावडे, बुलडाणाचे नरेंद्र नाईक, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. के. बी. खोत उपस्थित होते.
बच्चु कडु यांनी वनौंषधी उत्पादनांबाबतचा आढावा घेतांना सांगीतले की, समितीतील तज्ज्ञगटानी केलेल्या शिफारशी राज्यस्तरावर सादर करुन वनौंषधी उत्पादक शेतकऱ्यांच्या सर्व समस्या सोडविण्यात येतील. विविध शारिरीक व्याधींवर गुणकारी असलेल्या वनौंषधी उत्पादनांवर लक्ष देणे गरजेचे आहे. इतर राज्यांमध्ये वनौंषधीचे उत्पादन, विपणन आणि बाजारपेठेची स्थिती याबाबतचा समिती अभ्यास करणार आहे. समितीमध्ये अकोला, अमरावती, बुलडाणा येथील कृषी संशोधक, तज्ज्ञांचा समावेश असेल. यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येईल. याबाबतही ही समिती शिफारस करील. समितीमार्फत तज्ज्ञांच्या अभ्यास दौऱ्यात वनौंषधी पिकाचे उत्पादन क्षेत्र वाढविणे, तसेच सद्या असलेले अनुदान वाढविण्यासंदर्भात विचार करेल. वनौषधींची शेकडो वर्षांपासूनची उत्पादन परंपरा पहाता त्या वनौषधींना भोगोलिक चिन्हांकन करुन त्याचे महत्त्व कायम ठेवण्याबाबतचा अभ्यासही ही समिती करेल.
विभागीय समितीच्या अभ्यासादरम्यान प्रशासनस्तरावर अस्तित्वात असलेल्या योजनांमधून तात्काळ उपाययोजना संबंधित शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याचे निर्देश श्री. कडू यांनी कृषी विभागाला दिले. संबंधित समस्याग्रस्त शेतकऱ्यांकडून प्रस्ताव तयार करुन ते शासनास सादर करावे, असेही त्यांनी सांगितले. वनौंषधीवर येणारे रोग, किडीच्या उपाययोजनांची योग्य माहिती नसल्यामुळे पिकांचे नुकसान होते. सद्यस्थितीत अकोला आणि अमरावती येथे शेतकऱ्यांची कार्यशाळा घेवून त्यांना यंत्रसुविधा आणि किटकनाशकाबाबत माहिती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
विषमुक्त शेतीच्या समस्यांवर उपाययोजना करावी
‘सेंद्रिय उत्पादन मिळेल’ असा फलक लावून विषारी उत्पादने विकणाऱ्या उत्पादकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश श्री. कडू यांनी दिले. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनतर्फे आयोजित विषमुक्त शेतीविषयी आयोजित बैठकीत दिले.
सेंद्रिय उत्पादनाच्या नावाखाली फळ, भाजीपाला आणि इतर उत्पादनाची विक्री मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. अशा प्रकारामुळे प्रामाणिक सेंद्रिय शेती उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जैविक शेतीचा उत्पादनाच्या प्रसाराकरीता प्रत्येक जिल्ह्यात ‘विषमुक्त शेती अभियान पंधरवडा’ राबविण्यात येईल. या माध्यमातून जैविक शेतीचे उत्पादक थेट ग्राहकांशी जोडले जातील. तसेच शेतकऱ्यांना छोटेखानी बाजारपेठ उपलब्ध करुन देता येईल. यात बचतगटांच्या स्टॉलचा देखील सहभाग ठेवावा. पंधरवाड्यादरम्यान शेतकऱ्यांकडून उत्पादित होणाऱ्या पिकांची माहिती घेणे व सेंद्रीय उत्पादक म्हणून शेतकऱ्यांची नोंदणी कृषी विभागाने करावी, असे श्री. कडू यांनी सांगितले. त्याप्रमाणे सेंद्रिय शेती प्रमाणिकरण संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त करण्याची पद्धत सहज आणि सुलभ करण्याबाबत चर्चा करण्यात झाली.
बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करा - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी
बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करा
अमरावती, दि. 20 : परतीचा पाऊस तसेच या अगोदर आलेल्या किडीचा प्रादुर्भाव यामुळे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात शेती व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, यासाठी पंचनामे करण्याचे निर्देश देतानाच ही मदत दिवाळीअगोदर मिळण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सांगितले.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांतील शेती पिकांची प्रत्यक्षपणे पाहणी श्री. कडू यांनी केली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यावेळी पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले की, परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाअगोदरही किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी बांधव त्रस्त झाला होता. आता शेतात खूप कष्ट करुन घाम गाळला तर, निसर्गाने दगा देऊन हाती आलेले पीक गमावले. सोयाबीन काळे पडले असून गंजीसुध्दा खराब झाली आहे. कापसाची बोंड खराब झाले असून तूरीचे सुध्दा नुकसान झाले आहे. सुरवातीला बियाणे खराब निघाले नंतर किडीचा प्रादुर्भाव व आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.
शेतपिकांच्या नुकसान भरपाईसह ज्या शेतीचा पावसामुळे पोत जाऊन नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना सुध्दा मदत मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करुन पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर मिळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाहीही श्री. कडू यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना दिली.
पाहणी दौऱ्यात राज्यमंत्री कडू यांनी जनूना, टिमटाळा, खिरसाना, सावनेर येथील नुकसानग्रस्त शेतशिवाराची व पिकांची पाहणी केली.
000000
Monday, October 19, 2020
विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत उपक्रम बहुवार्षिक चारा लागवड कार्यक्रमात 481 गावांचा समावेश - जिल्हाधिकारी शैलेश नवाल
विशेष लेख - गडांचा राजा : राजगड
गडांचा राजा : राजगड सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
'तपोवन'चा अमृतमहोत्सव : पद्मश्री शिवाजीराव पटवर्धन यांची १३० वी जयंती दाजीसाहेबांचे मानवसेवेचे व्रत समर्थपणे व एकजुटी...
-
पारधी समाजाच्या व्यक्तींसाठी विविध योजना; अर्ज करण्याचे आवाहन अमरावती, दि. 11 : धारणी एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प कार्याक्षेत्रांतर्गत ...