पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उपोषण मागे
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे सुरू असलेले अन्न, जलत्याग उपोषण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या मध्यस्थीने सोडविण्यात आले.
राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे स्कुलबसचालकांसमोरील विविध प्रश्नांबाबत अन्न, जलत्याग उपोषण सुरू करण्यात आले होते. या प्रश्नाबाबत कॅबिनेट, तसेच शासन स्तरावर मांडण्यात येईल व लवकरात लवकर शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण होण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. संघटनेतर्फे अतुल खोंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment