राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी यांनी दिली सद्भावना दिवस प्रतिज्ञा
राजीव गांधी यांच्या
जयंतीनिमित्त
जिल्हाधिकारी यांनी दिली सद्भावना दिवस प्रतिज्ञा
अमरावती, दि. 18: माजी प्रधानमंत्री दिवंगत
राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जिल्हाधिकारी
कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सद्भावना दिवस’ प्रतिज्ञा दिली.
जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक
भेद न करता भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करण्याची तसेच सर्व प्रकारचे मतभेद हे हिंसाचाराचा
अवलंब न करता संविधानिक मार्गानी सोडविण्याची प्रतिज्ञा जिल्हाधिकारी यांनी
उपस्थितांना दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल, उपजिल्हाधिकारी व जिल्हा
सैनिक कल्याण अधिकारी मनिष गायकवाड, उपजिल्हाधिकारी राम लंके, विधी अधिकारी
नरेंद्र बोहरा, नाझर किशोर चेडे, अमोल दांडगे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.
000000
Comments
Post a Comment