कोरोनाने छत्र हरपलेल्या सार्थकची महिला व बालविकास मंत्र्यांकडून घरी जाऊन विचारपूस
कोरोनाने छत्र हरपलेल्या सार्थकची महिला व बालविकास मंत्र्यांकडून घरी जाऊन विचारपूस
अनाथ
मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शासनाची संगोपन योजना
- महिला व बालविकास मंत्री ऍड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. ६ : कोरोनामुळे पालकांचे
छत्र हरवलेल्या सात वर्षाच्या सार्थक या चिमुकल्याची महिला व बालविकास मंत्री ऍड.
यशोमती ठाकूर यांनी कुऱ्हा येथील घरी जाऊन विचारपूस केली व दिलासा दिला.
कोरोनाच्या संकटामुळे
राज्यातील अनेक बालक अनाथ झाल्याची माहिती पुढे आली आहे. या मुलांचे उज्ज्वल
भवितव्य घडावे यासाठी शासनाने जबाबदारी स्वीकारली असून संगोपन योजनेत मुलांचा
सांभाळ करण्यात येईल.
कोरोनामुळे कुणाची आई किंवा
वडील गेले आहेत तर काही बालकांचे आई-वडिल दोघांचेही निधन झाले आहे. अशाच एका
बालकाची शनिवारी मंत्री. एड. यशोमती ठाकूर
यांनी त्याच्या घरी जाऊन स्वत: विचारपूस केली. चंद्रपूरमध्ये राहणाऱ्या सार्थक
विजय तिजारे या बालकाचे वडील विजय व आई राजश्री या दोहोंचेही कोरोनामुळे निधन
झाले. त्यामुळे चिमुकला विजय सध्या तो अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा या गावात आपल्या
मामाकडे नरेश पाखरे यांच्याकडे राहतोय. या संकटात एकट्या पडलेल्या सार्थकची माहिती
कळताच मा. मंत्री यशोमती ताई ठाकूर यांनी कुऱ्हा येथे जाऊन त्याची विचारपूस केली व
दिलासा दिला.
कोरोनामुळे राज्यातील अनेक
मुले अनाथ होत आहेत. या सर्व मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सरकारने त्यांच्या
संगोपनाची जबाबदारी घेतली आहे, अशी माहिती मंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिली.
“संगोपन योजनेचा लाभ 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालक ज्यांच्या दोन्ही पालकांचे 1 मार्च, 2020 किंवा त्यानंतर कोविड-19 च्या संसर्गामुळे निधन झाले
आहे, अशा
बालकांना होणार आहे. या कालावधीत कोविड संसर्गामुळे एका पालकाचा आणि इतर कारणाने
दुसऱ्या पालकाचा मृत्यू झाला आहे अशा बालकांचाही समावेश आहे. तसेच 1 मार्च 2020 पूर्वी कोणत्याही कारणाने
एका पालकाचा आणि त्यानंतर कोविड संसर्गाने एका पालकाचा मृत्यू झाला आहे, अशा बालकांनासुद्धा या
योजनेचा लाभ मिळणार आहे.
कोरोनामुळं दोन्ही पालक
गमावलेल्या बालकांना अर्थसहाय्य मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनाथ
झालेल्या मुलांच्या नावे प्रत्येकी 5 लाख रुपये मुदत ठेव ठेवली जाणार आहे. ही मुलं 21 वर्षांची झाल्यावर त्यांना
व्याजासह ही रक्कम मिळेल. तसेच अशा अनाथ झालेल्या बालकांची माहिती नागरिकांनी
संबंधित यंत्रणांना दिल्यास त्या मुलांना मदत करता येईल असे आवाहनही मंत्री यशोमती
ठाकूर यांनी यावेळी केले.
00000
Comments
Post a Comment