जनगणनेबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण





जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना
नागरिकांनी व्यवस्थित माहिती द्यावी
                                                                                                                                                  -डॉ. नितीन व्यवहारे

*जनसहभागातून ….जनकल्याण…. ब्रीद वाक्य

*1 मे ते 15 जून दरम्यान जनगणना

अमरावती, दि. 25 :  संपूर्ण भारत देशात 2021 वर्षच्या जनगणनेला 1 मे पासून शुभारंभ होणार आहे. दि. 1 मे ते 15 जून दरम्यान राज्यातील प्रत्येक घरांची गणना होणार असून दि. 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान प्रत्यक्ष व्यक्ती गणना (शीर गणती) करुन माहितीचे सत्यापण होणार आहे. जनगणनेच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या लोकसंख्येच्या माहितीच्या आधारे देशात कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व ध्येय धोरणे ठरविण्यासाठी सहाय्य होते, त्यामुळे नागरिकांनी जनगणना करण्यासाठी येणाऱ्या प्रगणकांना व्यवस्थित व खरी माहिती द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी कार्यशाळेत दिली.
जनसहभागातून…जनकल्याण… हे या जनगणनेचे ब्रीद वाक्य आहे. म्हणजे तुमच्याच(नागरिकांच्या) सहभागातून तुमचेच (नागरिकांचे) कल्याण होणार. या जनगणनेत नागरिकांची माहिती जनगणना संचालनालयाच्या सीएमएमएस पोर्टलवर ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने नोंदविली जाणार असल्याने माहितीचे निरंतर साठवणूक होऊन डिजीटलायझेजन होणार आहे, त्यामुळे ही  जनगणना पूर्वीच्या जनगणनेपेक्षा महत्वपूर्ण ठरणार आहे.
 जनगणना संचालनालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय प्रबोधिनी येथे चार्ज जनगणना अधिकारी (ग्रामीण व शहरी) तसेच रेग्युलर असिस्टंट (जनगणना लिपीक) यांचे 24 व 25 फेब्रुवारी या दोन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री. व्यवहारे बोलत होते.
प्रशिक्षण सत्राला सर्व उपविभागीय अधिकारी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा सांख्यिकी अधिकारी, महानगरपालिका उपायुक्त, सर्व तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सर्व संबधीत जनगनणना लिपीक, तसेच जनगणना संचालनालयाचे उपसंचालक डॉ. रघु अनुमोलू, प्रशिक्षक प्रवीण भगत, रामनाथ पथवे, संदीप कुलकर्णी, अमरावती जिल्हा समन्वयक वसंत शेंडे, आदी यावेळी उपस्थित होते.
दोन दिवसीय प्रशिक्षण सत्राचे सोमवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. आज रोजी प्रशिक्षणाचा दुसरा दिवस होता. या जनगणनेमध्ये घरांची यादी, व्यक्ती गणना, घरगणनेसह राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचे अद्यावतीकरण करण्यात येणार आहे.
या जनगणनेच्या प्रक्रियेत जिल्हाधिकारी हे प्रधान जनगणना अधिकारी म्हणून जिल्ह्यासाठी जबाबदारी पार पाडणार आहे. तर महानगरपालिका क्षेत्रासाठी मनपा आयुक्त हे प्रधान जनगणना अधिकारी असणार. निवासी उपजिल्हाधिकारी हे अतिरिक्त जनगणना अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी यांच्यावतीने संपूर्ण कामकाज पाहतील. चौदा तालुक्यातील तहसीलदार तसेच चौदा नगरपालिकांचे मुख्याधिकारी हे चार्ज जनगणना अधिकारी म्हणून कामकाज पाहतील. याव्यतिरिक्त महापालिका क्षेत्रात पाच चार्ज जनगणना अधिकारी असणार. असे एकूण 34 चार्ज जनगणना अधिकाऱ्यांची जनगणना संचालनालयाव्दारे नेमणूक करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक चार्ज जनगणना अधिकाऱ्यांसाठी दोन तांत्रिक सहायक यांची नेमणूक करण्यात आली आहे.
चार्ज जनगणना अधिकारी यांच्या प्रशिक्षणासाठी चार मास्टर ट्रेनर नियुक्त करण्यात आले असून यांच्याव्दारे 95 फिल्ड ट्रेनर यांना प्रशिक्षण दिल्या जाणार. या  95 फिल्ड ट्रेनरमार्फत 5 हजार 340 प्रगणकांना जनगणने संदर्भात तांत्रिक व महत्वपूर्ण बाबी याविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती मास्टर ट्रेनर तथा तहसीलदार अभिजीत जगताप यांनी दिली.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती