Wednesday, June 29, 2022

शासकीय योजना तयार करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची माहिती महत्त्वपूर्ण - जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे

 



शासकीय योजना तयार करण्यासाठी अर्थ व सांख्यिकी

संचालनालयाची माहिती महत्त्वपूर्ण

- जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे

अमरावती, दि. 29 : शाश्वत विकासासाठी निश्चित केलेली ध्येये साध्य करतांना केवळ उद्दिष्टपूर्तीवर भर न देता गुणवत्तेला अधिक महत्त्व द्यावे. राज्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनांचा मुख्य स्त्रोत म्हणून अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची माहिती महत्त्वपूर्ण असल्याचे मत जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी आज येथे व्यक्त केले.

नियोजन भवन येथे भारतीय संख्याशास्त्राचे जनक प्रा. महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त सोळावा सांख्यिकी दिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रा. प्रशांतचंद्र महालनोबिस यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

श्रीमती भाकरे म्हणाल्या की, भारतीय संख्याशास्त्राचे जनक सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांतचंद्र महालनोबिस यांचे संख्याशास्त्राच्या विकासातील योगदान महत्त्वाचे आहे. यावर्षीचे घोषवाक्य ‘शाश्वत विकासासाठी सांख्यिकी’ हे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासाची 17 ध्येये निश्चित करुन दिली असून ती साध्य करण्यासाठी शासनातील विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या योजनांचा मुख्य स्त्रोत म्हणून अर्थ व सांख्यिकी संचालनालयाची माहिती महत्त्वपूर्ण असते. या माहितीच्या आधारे शासनस्तरावरुन सर्व समावेशक योजना राबविण्यात येतात.

शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा विकास होणे आवश्यक आहे. यासाठी शेती, आरोग्य, शिक्षण, रोजगार आदी माहिती शासनाच्या इतर विभागांकडून वेळेत आणि अचूक मिळणे गरजेचे आहे. ही माहिती परिपूर्ण असावी, यासाठी जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. आजच्या नियोजनामुळे त्यांच्या पुढील पिढीलाही त्याचा निश्चितच फायदा होईल. अशा पदध्तीने शाश्वत विकासाचे ध्येय व सुसूत्रपणे अंमलबजावणी करण्याची सूचना श्रीमती भाकरे यांनी यावेळी केली.

शाश्वत मानवी विकासासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांचा विकास होणे आवश्यक आहे. शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करतांना सर्व संबंधित यंत्रणेने एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. सर्वच क्षेत्रात सांख्यिकी अपरिहार्य असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.

अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे क्षेत्रीय स्तरावर येणारे अनुभव, अडचणी याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. मान्यवरांनी यासंबंधी यावेळी मार्गदर्शन केले.

00000

जिल्हा लोकशाही दिन 4 जुलैला

जिल्हा लोकशाही दिन 4 जुलैला

 अमरावती, दि.29: जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. त्यानुसार जुलै महिन्यातील जिल्हा लोकशाही दिन, सोमवार, दिनांक 4 जुलै 2022 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. संबंधितांनी याची नोंद घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी  यांनी केले आहे.


शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात प्रवेशोत्सव हिंगणगांव निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत

 



शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात प्रवेशोत्सव

हिंगणगांव निवासी शाळेतील विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत

 

अमरावती, दि.29: हिंगणगांव येथील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेत 27 जून रोजी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या उपस्थितीत विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार, विशेष अधिकारी राजेंद्र भेलाऊ, मुख्याध्यापिका शीतल तिरपुडे आदी यावेळी उपस्थित होते.

समाजकल्याण आयुक्त यांनी सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात राज्यातील प्रत्येक निवासी शाळेमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्याबाबत सूचना दिली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत 27 जून या एकाच दिवशी जिल्ह्यातील सातही शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

जिल्हाधिकारी यांनी यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना पुष्प देवून त्यांचे स्वागत केले. त्यांनी सर्व प्रवेशितांसोबत संवाद साधला. स्वतःचा शैक्षणिक पुर्वानुभव व जिल्हाधिकारी  पदापर्यंतचा प्रवासाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देवून प्रशासकीय  सेवांविषयी मार्गदर्शन केले. सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयींसाठी दालन उपलब्ध करुन दिले आहे. त्याचा उपयोग घेवून चांगला अभ्यास करा व आपण निवडलेल्या क्षेत्रात यशस्वी व्हा. विद्यार्थीदशेत आपण नेहमी मोठे स्वप्न पाहावे व ते साकार करण्यासाठी जिद्द व चिकाटी कायम ठेवून आपले स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्रीमती कौर यांनी यावेळी निवासी शाळेच्या इमारतीची पाहणी केली. त्यांच्या संकल्पनेतून अनुसूचित जाती उपयोजनेच्या नाविण्यपूर्ण योजनेतून सर्व निवासी शाळांना देण्यात आलेल्या नाविण्यपूर्ण विज्ञानकेंद्राची पाहणी करुन या केंद्राचे उदघाटन केले. प्रवेशितांच्या वर्गखोल्या, निवास व्यवस्था, ग्रंथालय, प्रयोगशाळा यांची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. या विज्ञान केंद्राचा उपयोग शाळेतील सर्व प्रवेशितांना करुन देण्यात यावा तसेच शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वृध्दींगत व्हावा यासाठी प्रयत्नशील रहावे. विज्ञान केंद्राचा उपयोग तालुक्यातील इतरही शाळांतील विद्यार्थ्यांना होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,नागरिक, पालक, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

00000

Tuesday, June 28, 2022

बियाण्याची उगवण न झालेल्या शेतीक्षेत्राचे पंचनामे करण्याचे निर्देश बोगस बियाणे विकणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 



बियाण्याची उगवण न झालेल्या शेतीक्षेत्राचे पंचनामे करण्याचे निर्देश

बोगस बियाणे विकणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

-    पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 28 : बियाण्याची उगवण न झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. बोगस बियाणे विकणा-या कंपन्या व विक्रेत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. त्याचप्रमाणे, उगवण न झालेल्या शेतीक्षेत्राचे पंचनामे करण्यात यावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत. 

 

जिल्ह्यात बोगस बियाणे विकणे, बियाण्याची उगवण न होणे आदी तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. तिवसा तालुक्यात ‘विक्रांत या व्हेरायटीचे सोयाबीन बियाणे पेरल्यानंतर उगवण न झाल्याची तक्रार शेतकरी बांधवांनी केली आहे. या क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून घ्यावेत. प्रत्येक शेतकरी बांधवाशी संवाद साधून माहिती जाणून घ्यावी. त्याचप्रमाणे, बोगस बियाणे विकणा-यांवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 

खते, बी-बियाणे यांचा काळा बाजार, साठेबाजी, बोगस बियाणे विक्री यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी व संबंधित सर्व विभागांनी काटेकोर कार्यवाही करावी. भरारी पथकांनी सक्रिय होऊन सातत्याने तपासण्या कराव्यात. शेतकरी बांधवांची फसवणूक झाल्यास खपवून घेतले जाणार नाही. कुठेही गैरप्रकार आढळून येत असतील तर दोषींवर कडक कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

 

जिल्ह्यात कुठेही बोगस, अनधिकृत बियाणे विक्री आदींची माहिती मिळाल्यास तत्काळ भरारी पथकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जादा दराने विक्री, मुदतबाह्य मालाची विक्री, साठेबाजी, अनधिकृत निविष्ठांची विक्री अशा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भरारी पथक व तक्रार निवारण कक्ष स्थापण्यात आला आहे. जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी क्र. 9325962775 आणि कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-233-4000 असा आहे.

 

00000

 

 

 

 

 


खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत

मध केंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 

            अमरावती, दि.28: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना संपूर्ण राज्यात कार्यान्वित करण्यात आली  आहे. मध केंद्र योजनेमध्ये  मध उद्योगासाठी  मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणुक, शासनाची हमी भावाने मधखरेदी, विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षक व संवर्धनाची जनजागृती याबाबत सहाय्य  करण्यात येणार आहे.

 

वैयक्तिक मधपाळ

मध केंद्र योजनेनुसार वैयक्तिक मधपाळ अर्जदार हा साक्षर असावा. तसेच त्याचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.  स्वत:ची शेती असल्यास त्या अर्जदारास प्राधान्य देण्यात येईल.

 

केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ

 

केंद्रचालक प्रगतीशील मधपाळ व्यक्ती किमान दहावी उत्तीर्ण असावा. त्याचे वय 21 वर्षापेक्षा जास्त   असावे. अशा व्यक्तीच्या नावे किमान एकर जमीन अथवा त्या व्यक्तींच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेत-जमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेत जमीन असावी. केंद्रचालक प्रगतीशील मधपाळाकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनासंबंधी इच्छुकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

 

केंद्रचालक संस्था पात्रता

 

            मध केंद्र योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्रचालक संस्था नोंदणींकृत असावी. संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्त्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट एवढी इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनासंबंधी इच्छुकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

            लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरू करण्यासंबधी मंडळास बंधपत्र लिहून देणे अनिर्वाय राहील. याशिवाय मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिर्वाय राहील.

            अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्राचे जिल्हा ग्रामद्योग अधिकारी यांच्याशी दुरध्वनी क्रमांक 0721-2662762  तसेच मधुक्षेत्रिक पी. के. आसोलकार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक  8208497189  यांच्याशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामद्योग मंडळ, संचालक मधमहासंचालनालय, शासकीय बंगला क्रमांक 5,  मु. पो. ता. महाबळेश्वर, जिल्हा -सातारा पीन कोड क्रमांक-412806, दुरध्वनी क्रमांक 02168-260264 येथे संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी  यांनी केले आहे.

 

00000

 

 

शेतक-यांना ६ टक्के दराने कर्ज मिळण्यासाठी शासनाचे अर्थसाह्य जिल्ह्यात पीक कर्जवितरणाला गती द्यावी - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


शेतक-यांना ६ टक्के दराने कर्ज मिळण्यासाठी शासनाचे अर्थसाह्य

जिल्ह्यात पीक कर्जवितरणाला गती द्यावी

- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २८ : शासनाने राज्यातील शेतक-यांना ६ टक्के व्याजदराने अल्पमुदत पीक कर्जपुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतला असून, तसा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. त्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करतानाच जिल्ह्यात पीक कर्जवितरणाला गती द्यावी, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

 

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कर्जपुरवठ्याचे 1 हजार 400 कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत खरीपाचे 66.67 टक्के कर्जवितरण झाले असून, संपूर्ण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वितरणाची प्रक्रिया गतीने होणे आवश्यक आहे.  कर्जपुरवठ्याची प्रक्रिया राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांकडून संथगतीने होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. राष्ट्रीयकृत व खासगी बँकांची कर्जवितरणाची टक्केवारी कमी असून, ती वाढविण्यासाठी मोहिम स्तरावर काम करावे. जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी बांधव कर्ज मिळण्यापासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले आहेत.

 

जिल्ह्यातील गरजू शेतकरी बांधवांना पीक कर्ज मिळण्यासाठी सर्वदूर मेळावे घ्यावेत. शेतकरी बांधवांच्या अडचणी संवेदनशीलतेने जाणून घेऊन त्यांना कर्ज मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 

शेतकरी बांधवांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का  व्याजदराने अर्थसहाय्य करण्यासाठी शासन निर्णय शासनाने निर्गमित केला आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतक-यांना ७ टक्के दराने कर्जपुरवठा करणार आहेत, त्याठिकाणी बँकांनी ७ टक्क्यांऐवजी शेतकरी बांधवांना ६ टक्के व्याजदराने कर्जपुरवठा करावा, असे राज्य शासनाचे धोरण आहे. या प्रयोजनासाठी एक टक्का व्याज फरकाची रक्कम शासन देणार आहे. या प्रयोजनासाठी निधीची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे. राज्यभरातील शेतकरी बांधवांना त्याचा लाभ होणार आहे. 

 

00000

 

 

 

 

 

 

 

Monday, June 27, 2022

कृषी निविष्ठा विक्रीत गैरव्यवहार आढळल्यास भरारी पथकाकडे तक्रार करा - जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान

 

कृषी निविष्ठा विक्रीत गैरव्यवहार आढळल्यास 

भरारी पथकाकडे तक्रार करा

-         जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान

अमरावती, दि.27: कृषी निविष्ठा विक्रीत गैरव्यवहार रोखण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर भरारी पथके निर्माण करण्यात आली असून, तसे आढळल्यास भरारी पथकाला तत्काळ , संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी केले आहे.

          जादा दराने विक्री, मुदतबाह्य मालाची विक्री, साठेबाजी, अनधिकृत निविष्ठांची विक्री अशा तक्रारींचे निराकरण करण्यासाठी भरारी पथक व तक्रार निवारण कक्ष स्थापण्यात आला आहे. जिल्हास्तरीय तक्रार निवारण कक्षाचा भ्रमणध्वनी क्र. 9325962775 आणि कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक 1800-233-4000 असा आहे.

या क्रमांकावर संपर्क साधा

कृषी विभागाने पथकांचे संपर्क क्रमांकही जाहीर केले आहेत. त्यावरही तक्रार करता येईल. त्यानुसार जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी दादासो पवार यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8975815204, तर कृषी विकास अधिकारी जी. टी. देशमुख यांचा भ्रमणध्वनी क्र. 9422855587 असा आहे.  जिल्हा कृषि अधिकारी अजय तळेगावकर यांचा भ्रमणध्वनी  क्र. 7588085827, जिल्हा कृषी अधिकारी उज्वल आगरकर यांचा क्र. 9763519754 आहे. मोहिम अधिकारी एल. जी. आडे यांचा संपर्क क्र. 8275068639 असा आहे.

पंचायत समित्यांतील पथकांचे क्रमांक

अमरावती व तिवसा पंचायत समितीतील कृषी अधिकारी उध्दव भायेकर भ्र. क्र. 8275283001, भातकुली पं. स. मधील कृषी अधिकारी अश्विनी चव्हाण यांचा क्र. 7774884148, नांदगाव खंडेश्वरचे कृषी अधिकारी लक्ष्मण खांडरे यांचा 8275229532, चांदूर रेल्वेचे कृषी अधिकारी प्रकाश खोबरखडे यांचा 9763737259, धामणगाव रेल्वेचे अधिकारी पवन ढोमणे यांचा 9595903320, मोर्शीचे कृषी अधिकारी राहूल चौधरी यांचा भ्र. क्र. 9421827693 असा आहे.

वरूड पं. स. कृषि अधिकारी राजू सावळे यांचा भ्रमणध्वनी क्र. 8379909305, चांदूर बाजार येथील नारायण आमझरे यांचा 9421790525, अचलपूर कृषी अधिकारी रवी उईके यांचा 9404075276, अंजनगाव सुर्जी येथील श्विन राठोड यांचा 9422016056, दर्यापूरचे पं. स. कृषी अधिकारी सुरेश रामागडे यांचा 9096238655 असा आहे. धारणी पंचायत समितीतील कृषी अधिकारी धैर्यशील पाटील यांचा भ्रमणध्वनी क्र. 8275935084, तर चिखलदरा येथील शालिनी वानखडे यांचा क्र. 9049555011 असा आहे.

तालुका कृषी अधिका-यांचे क्रमांक

अमरावतीचे तालुका कृषी अधिकारी किशोर हातांगळे  यांचा भ्रमणध्वनी क्र. 9405281646, तर भातकुलीच्या सुनंदा दळवी यांचा 9172772457 असा आहे. नांदगाव खंडेश्वरचे तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांचा भ्र. क्र. 7875421450, चांदूर रेल्वेचे आर. डी. बांबल यांचा 8975961695, धामणगाव रेल्वेचे राजेश वालदे यांचा भ्र. क्र. 8928040467, तर तिवस्याचे तालुका कृषि अधिकारी अनिल कांबळे यांचा संपर्क क्र. 9404611414 असा आहे.

 मोर्शी येथील तालुका कृषी अधिकारी संजना इंगळे यांचा संपर्क क्र. 9673242117, तर वरुड तालुका कृषि अधिकारी कल्पना काणे यांचा भ्र. क्र. 9145782149, चांदूर बाजार येथील  शिवाजी दांडेगावकर यांचा 7798297955, अचलपूर येथील स्नेहल ढेंबरे यांचा 7249808836, अंजनगाव सुर्जीचे राजाभाऊ तराळ यांचा 8669064611 व दर्यापूरचे  आर.टी. अडगोकर यांचा 9850175401 असा आहे. धारणीचे तालुका कृषी अधिकारी आर. जी. पाडवी यांचा भ्र. क्र. 9922128199 व चिखलदरा येथील व्ही. एस. पथाडे यांचा  9604741733 असा आहे. या क्रमांकांवर संपर्क करून कृषी निविष्ठांबाबतची तक्रार दाखल करावी, असे आवाहन श्री. खर्चान यांनी केले आहे.

0000

 

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...