किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांनी ई- केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे - जिल्हाधिकारी पवनीत कौर


 

किसान सन्मान निधीच्या लाभार्थ्यांनी ई- केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे

-         जिल्हाधिकारी पवनीत कौर

            अमरावतीदि. 27 : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. संबंधितांनी ती पूर्ण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

            योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ई- केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे, ई-केवायसी पूर्ण करण्यास दि. 31 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

           अमरावती जिल्ह्यातील ई-केवायसी प्रमाणीकर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांच्या तालुकानिहाय गावनिहाय याद्या amravati.gov.in संकेतस्थळावर ‘सूचना-घोषणा’ (अनाऊन्समेंटस्) शीर्षाखाली प्रसिध्द करण्यात येत आहेया यादीत नाव असलेल्या लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया दि. 31 जुलैपर्यंत पूर्ण करावी. त्यासाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधून, तसेच pmkisan.gov.in या संकेतस्थळावर फार्मर्स कॉर्नरई-केवायसी न्यू  हा पर्याय निवडून करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती