प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजना सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजना
सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
अमरावती, दि.1: प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. राज्यात दुसऱ्या टप्प्यात 50 हजार पारेषण विरहित सौर कृषी पंपाच्या आस्थापनेचे उद्दिष्ट या योजनेत दिले आहे . या सौर कषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार आहे. शेतकऱ्यांच्या कृषीधारक क्षमतेनुसार अश्वशक्ती सौर पंप उपलब्ध करुन दिले जाणार आहे. यामध्ये सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5% हिस्सा राहणार आहे.
सौर कृषी पंप योजना लाभार्थी निवडीचे निकष
विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी तसेच शाश्वत पाण्याच्या स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी तसेच पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी यांना या योजनेचा फायदा होणार आहे. अटल सौर कृषी पंप योजना टप्पा 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतंर्गत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले अर्जदार शेतकरीही या योजनेचा लाभ घेवू शकतात.
शेतजमीन धारकाजवळ किती एकर जमीन आहे, त्यानुसार सौर कृषी पंप देण्यात येणार आहे. प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (कुसुम) योजना राज्य शासनाच्या महाऊर्जा या विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन
नोंदणीसाठी http://kusum.
आयडी domedaamravati@mahaurja.com वर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यासाठी 990 इतक्या पंपाचे उद्दिष्टे शिल्लक असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यात यावा, असे आवाहन विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.
Comments
Post a Comment